Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 15

“खंडणी प्रकरणाचा राजकीय डाव? मनसे नेते उंबरकर यांना बदनाम करण्याचा कट!” गृह विभागाचा दबाव, सीसीटीव्हीची तपासणी

0

News Today 

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्यावर दाखल झालेल्या खंडणी प्रकरणाने आता राजकीय वादळ उठवले आहे. या गुन्ह्यामागे सत्ताधाऱ्यांचा डाव असून, निवडणुका तोंडावर येताच मनसेच्या नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कट रचला गेला असल्याचा ठपका मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठेवला आहे.

ठोस पुराव्याचा अभाव

सदर प्रकरणात संबंधित ठेकेदाराकडे खंडणी मागणीसंबंधी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तरीदेखील गंभीर आरोप लावून उंबरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या घटनेमागे राजकीय हेतू दडलेला असल्याचा आरोप होत आहे.

निवडणुकीची पार्श्वभूमी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. ग्रामीण भागात मनसेची चळवळ वेग घेत असून, पक्षाचा प्रभाव वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उंबरकर यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही निव्वळ निवडणूकपूर्व डावपेचाचीच चाल असल्याचा सूर उमटत आहे.

गृह विभागाडूनही गुन्हा नोंदवून घेण्यासाठी दबाव असल्याची जोरदार चर्चा

या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे तो म्हणजे पोलिसांवर झालेला दबाव. सूत्रांच्या माहितीनुसार, गृह विभागाकडून संबंधित पोलिसांवर उंबरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता. ठोस पुरावा नसतानाही गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय दबाव होता का, असा प्रश्न आता जनतेत विचारला जात आहे. प्रशासनाच्या स्वतंत्र कामकाजात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.

मनसेचा संताप

मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “आमच्या नेत्याला बदनाम करून सत्ताधारी स्वतःचे राजकीय हितसंबंध साधण्याचा प्रयत्न करत आहेत. खंडणीसारखे आरोप ठोस पुराव्याशिवाय लावले जाणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सत्य लवकरच बाहेर येईल आणि या षडयंत्राचा पर्दाफाश होईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढील घडामोडींकडे लक्ष

या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आगामी काळात उंबरकर प्रकरणातील खरे तथ्य जनतेसमोर उघड होईल. मात्र सध्या तरी या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासण्याची गरज

फिर्यादी मामीडवार यांनी दिनांक 18 रोजी उंबरकर यांच्या कार्यालयात भेट घेतली असता त्यांना दहा लाख रुपयांची खंडणी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे परंतु उंबरकर यांच्या ऑफिसला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत दहा लाख रुपयाची रक्कम हि फर मोठी आहे. ही रक्कम आणताना संबंधित कंत्राटदारांनी बॅकचा पिशवीचा वापर केला असावा त्याकरिता खरंच हा गुन्हा घडला आहे का हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी उंबरकर यांच्या कार्यालयातील लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

तहसिल कार्यालयाजवळ आठ जणांची एकास रक्तरंजित मारहाण – इसम मृत्यूशी झुंजत, आरोपी अटकेत,

0

News Today  (दिलीप भोयर)

वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील तहसिल कार्यालयाजवळील जी.आर. नास्ता सेंटर समोर काल मध्यरात्री (दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता) झालेल्या प्राणघातक हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पानठेल्यावर गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून तब्बल आठ जणांनी संगनमत करून एका इसमावर जीवघेणा हल्ला केला.

घटनेचा तपशील

पीडित अंकुश मोगरे यांचा आरोपींसोबत वाद झाला. त्यातच त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान आरोपींनी हातातील काठ्या व लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, तसेच हातापायांवर मारहाण केली. जखमी अवस्थेत अंकुश मोगरे पोलिस स्टेशनकडे जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून जी.आर. नास्ता सेंटर समोरील सिमेंट रोडवर पाडले. या ठिकाणी आरोपी विशाल चौहान याने अंकुश यांच्या डोक्यावर वारंवार काठीचे प्रहार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

फिर्याद आणि आरोपी

या घटनेबाबत भोलेश्वर नारायण ताराचंद (वय ४०, रा. सेवानगर, वणी, व्यवसाय – नोकरी, नगर परिषद वणी) यांनी वणी पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

या प्रकरणी आरोपी पुढीलप्रमाणे आहेत : १) विलास चौहाण २) विशाल चौहाण ३) सूर्यभान चौहाण ४) विरसिंग उर्फ विरु लीवारे ५) दुर्गेश उर्फ सोनू चौहाण ६ ) दोन अनोळखी, एक विधी संघर्ष बालक असे आरोपी आहेत.

गुन्हा नोंद व तपास

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम १०९, १८९(१), १८९(२), १८९(३), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास  पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनी सुदाम आसोरे आदी करीत आहे. 

परिसरात भीतीचे वातावरण

पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर अशी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाकडून तातडीने सुरक्षा वाढवावी, अशी मागणी होत आहे.

बघा इंस्टाग्रामवर घटनेचा व्हिडिओ 👇 https://www.instagram.com/reel/DPO9yi2CJH6/?igsh=MXJ4Yzg2Njg4cm5pOA==

बघा फेसबुकवरील घटनेचा थरारक व्हिडिओ 👇

https://www.facebook.com/share/r/1BaJ2ZmqkE/

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे तरुणाची आत्महत्या;  ओबीसी समाजात खळबळ, सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम

0

News Today दिलीप भोयर 

वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कायर गावातील अजय पांडुरंग शेंडे (वय ३०) या तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. काल, दिनांक २९ सप्टेंबर रोजी ब्राह्मणी फाट्याजवळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

शोध घेतल्यावर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता तो कायर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील रहिवासी असल्याचे समोर आले. सदरचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून आज ३० रोजी सकाळी घटनास्थळी कायर येथील काही तरुण गेले असता त्यांना एका रुमालीत एक कृषी केंद्राचे बिल आढळले. त्यावरच त्याने आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले आहे की, मी अजय शेंडे रा. कायर ओबीसीतून मराठा समजले आरक्षण दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. या चिठ्ठीची सत्यता अजून पर्यंत पडताळणी झाली नसून पोलिसांनी याचा कसून तपास करण्याची गरज आहे. सदरची चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली नसल्याची माहिती आहे. 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. आधीच ओबीसी समाजात मराठा आरक्षणाच्या संदर्भात तीव्र अस्वस्थता आहे. अशातच अजय शेंडे यांच्या मृत्यूमुळे या प्रश्नाला अधिक गंभीर वळण मिळन्याची शक्यता आहे.

ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “सरकारने तात्काळ लक्ष घालून ओबीसी समाजाचा विश्वास संपादन केला पाहिजे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल.” अशी चर्चा सुरू झाली आहे.

अजय शेंडे यांचा मृत्यू हा केवळ एका तरुणाचा बळी नसून, ओबीसी समाजाच्या मनात दडलेल्या असंतोषाचा व भावनिक जखमेचा ज्वालामुखी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

राज्यभर या घटनेची चर्चा सुरू झाली असून, “ओबीसींच्या हक्कांवर कुठल्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही” अशा घोषणांनी वातावरण तयार होत आहे. येत्या काही दिवसांत या प्रश्नावरून मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

टीप – न्यूज टुडे सदर चिठीची पडताळणी करीत नाही. कृपया नोंद घ्यावी. संपादक

“बोर्डा येथील बस सेवा सुरू करा” – सरपंच, उपसरपंच यांची मागणी

0

News Today  (सचिन वाभिटकर )

वणी (ता. बोर्डा) – बोर्डा येथील बससेवा काही दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे वेळ, श्रम व आर्थिक भार वाढला आहे. कामकाज, बाजारहाट तसेच उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्याही हालअपेष्टा वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर बोर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. आशा  झाडे व उपसरपंच सतीश राजुरकर यांनी बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आगरप्रमुख, वणी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांच्या दैनंदिन गैरसोयी दूर करण्यासाठी बोर्डा येथील बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

निवेदन सादर करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. बससेवा सुरू झाल्यास नागरिकांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होईल, असा विश्वास सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केला. 

“उद्रेक “दिव्यांग उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून – भाजप नेत्यांची कंपनीत ‘पेटपूजा’

0

News Today 

मुकुटबन, दि. २४ : मुकुटबन येथील RCCPL सिमेंट कंपनीसमोर दिव्यांग बांधव व स्थानिक भूमिपुत्रांचे रोजगाराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री तथा OBC आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी २४ सप्टेंबर रोजी उपोषणस्थळी भेट दिली.

स्थानिक नागरिक व उपोषणकर्त्यांची अपेक्षा होती की, या भेटीदरम्यान त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट उपोषण मंडपात बोलावून समस्या सोडविण्यासाठी ठोस चर्चा केली असती. परंतु तसे न करता त्यांनी केवळ औपचारिक चौकशी करून पुढे कंपनीच्या परिसरात जाऊन अधिकाऱ्यांसोबत उपहाराचा आस्वाद घेतला. या प्रकारामुळे जनतेच्या मनात भाजपच्या प्रति मोठा उद्रेक होत आहे.

उपोषणकर्ते दिवसरात्र उपाशीपोटी न्याय मागत असताना नेतेमंडळी मात्र कंपनीच्या उपचारात सहभागी झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचा उद्रेक झाला. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही उपाशी बसलो आहोत, आणि आमचे नेते मात्र कंपनीसोबत ‘पेटपूजा’ करत आहेत. हा आमच्या संघर्षाचा आणि भावनांचा अपमान होता.”

या घटनेने जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली असून, उपोषणाकडे दुर्लक्ष करून कंपनीशी सलगी दाखवल्याचा आरोप भाजप नेत्यांवर केला जात आहे.

आमदार संजय देरकर यांच्या मध्यस्थीने दिव्यांग यांच्या उपोषणाची सांगता. 

वणी विधानसभेचे आमदार संजय दरेकर यांनी कंपनी समोर चालू असलेले दिव्यांग यांच्या उपोषणाची सांगता तारीख २६ रोजी  केली. आर सी सी पी एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपोषण मंडपात बोलावून दिव्यांग यांच्या समस्येवर चर्चा केली व यात बहुतांश समस्यांचा निपटारा करून उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचेसह  शिवसेना (उबाठा) गटाचे नेते मंडळी उपस्थित होते.

 

शिवसेनेचा दणका…आरसीसीपीएल कंपनीसमोर आमदार संजय देरकरांची आक्रमक मोर्चेबांधणी; चार तासांच्या चर्चेत मान्य मागण्या 🚩

0

News Today 

मुकुटबन, ता. झरी (दि. २७ सप्टेंबर २०२५)
मुकुटबनच्या भूमीत गेल्या काही दिवसांपासून पेटलेल्या आंदोलनाच्या ज्वाला अखेर भडकल्या आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या आमरण उपोषणाने ऐतिहासिक वळण घेतले. आरसीसीपीएल कंपनीविरोधातील ग्रामस्थांचा संताप आणि शिवसैनिकांचा निर्धार यांच्या संगमाने काल कंपनी प्रशासनाला गुडघ्यावर आणले.

आमदार देरकरांचे आक्रमक नेतृत्व
२६ सप्टेंबर रोजी सकाळी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक रणांगणात उतरले. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रचंड जनसागर उसळला. वाहतूक ठप्प, पोलीस बंदोबस्त निष्प्रभ! 👉 शिवसैनिकांनी थेट कंपनीच्या कार्यालयात घुसून दणदणीत आंदोलन करून मुकुटबनच्या इतिहासात नवा अध्याय रचला.

आंदोलनाची धग मंत्रालयात पोहचली
गावकऱ्यांचा ज्वालामुखी थेट मंत्रालयापर्यंत धडकला. जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना व पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः आमदार देरकरांना फोन करून विनंती केली – “कृपया आंदोलन शांत घ्या, आम्ही सर्व मागण्या मान्य करू आणि पूर्ण सहकार्य करु.”
👉 या फोनकॉलने आंदोलनाच्या विजयाचा शंखनाद झाला.

सत्ताधाऱ्यांचे मांजर ठरले उंदीर
याच वेळी काही अधिकारी, कर्मचारी सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनून कंपनीचे समर्थन करण्यासाठी धडपडत होते. पण ग्रामस्थांचा संताप आणि शिवसेनेची जिद्द पाहून त्यांचे “माऊ-माऊ” निष्फळ ठरले.

चार तासांचा निर्णायक सामना
उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कंपनी अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास चर्चा केली. शिवसैनिकांचा दबाव, आमदार देरकरांची ठाम भूमिका आणि ग्रामस्थांची तडफ पाहून अखेर कंपनी प्रशासन झुकले. 👉 सर्व मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच उपोषण स्थळावर जल्लोषाचा महापूर उसळला.

शिवसैनिकांची विजयी रणधुमाळी
या लढ्यात नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गझलवार, संतोष माहुरे, सतीश आदेवार, सितारामजी पिंगे, दया कर गिराम, विजय पनघंटीवार, अशोक बरपटवार, शिवशंकर ठाकरे, सुभाष पारखी, संतोष लढांगे, सुभाष भगत, विनोद चिंतावर यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला.

मुकुटबनचा नवा इतिहास
शिवसेनेच्या या विजयाने ग्रामस्थांचा आत्मविश्वास उंचावला आहे. कंपनी प्रशासन गारद झाले, तर गावोगाव “मुकुटबनच्या लढ्याचा” जयजयकार सुरू आहे.
👉 हे आंदोलन मुकुटबनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, यात तिळमात्र शंका नाही!

आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी

जिल्हाप्रमुख संजय निखाडे, संतोष माहुरे, दिपकभाऊ कोकास, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, विनोदभाऊ उप्परवार, तालुकाप्रमुख सतीश आदेवार, संतोष कुचनकार, पुरुषोत्तम बुट्टे, संजय बिजगुणवार, बंडू गुरणुले, संगीत भुजबलराव, सुरेखाताई भोयर, समता माहुरे, मनिषा वऱ्हाटे, कविता भगत, मायाबाई मंगाम, सतीश पचारे, देवाजी बोबडे, सीताराम पिंगे, विजय पनगंटीवार, दयाकर गेडाम, दुष्यांत उपरे, अशोक पंधरे, मंगेश मोहितकर, अतुल निखाडे, अशोक कल्लूरवार, अशोक बरपटवार, नेताजी पारखी, संतोष लेडांगे, शिवशंकर ठाकरे, बालू दुधकोहळे, राजु आसुटकर, संतोष बर्डे, शेख हसन, शेख अहमजद, अतुल विधाते, सुभाष भगत, महेंद्र आवते, विनोद धोटे, विशाल ठाकरे, संतोष सासनवार, शेख आसिफ, प्रविण आसुटकर, संजय आसुटकर, प्रकाश खिरटकर, किशोर गोल्लावार, किसन पाटील गावंडे, मनोहर ताजने, मधूकर ठाकरे, प्रविण खडसे, राकेश गोंडलावर, शंकर ठाकरे, पांडुरंग खडसे, दुर्गे पाटील, संतोष नेल्लावार, बळवंत देवलवार, अशोक गालेवार, पांडुरंग पाईलवार, नेताजी पारखी, संदीप विच्चू, संकेत गज्जलवारयांचेसह शेकडो शिवसैनिकांनी परिश्रम घेतले या आंदोलनात हजारोच्या संख्येनी पुरुष व महिला उपस्थित होत्या

चीनने चार हजार कि.मी. जमीन गिळली; आवाज उठविणाऱ्या भारताचा रांचोच्या अटकेनंतर देशभरात आक्रोश, वाचा सविस्तर कोण आहे सोनम वांगचुक

0

News Today ( उत्तराखंड)

लडाख :- — स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या चिंता प्रमाणे, चीनने लडाखमधील जवळपास ४,००० चौरस किलोमीटर भारतीय जमीन हडप केली असल्याचे स्थानिकांनी आणि तज्ज्ञांनी म्हटले आहे. या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक हक्कांसाठी आणि सीमावर्ती जागांचा बचाव करण्यासाठी आवाज उठवणाऱ्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणसुधारक सोनम वांगचुक यांना अलीकडे अटक करण्यात आली, ज्यामुळे देशभरात रोष आणि आंदोलन सुरु झाले आहे.

वांगचुक हे SECMOL या संस्थेचे संस्थापक आणि “आइस स्तूप” सारख्या पर्यावरणप्रवर्तक प्रकल्पांसाठी ओळखले जातात. त्यांच्या समर्थकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चीनच्या अतिक्रमणाविरुद्ध आणि जमीन व पर्यावरण संवर्धनाविरुद्ध सातत्याने सरकारला प्रश्न विचारले. त्याच प्रश्नांमुळे त्यांना NHA/इतर कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचा आरोप लोकांकडून केला जात आहे.

स्थानिकांनी आणि नागरिक कार्यकर्त्यांनी या कारवाईला दडपशाहीचे प्रयत्न म्हणून पाहिले आहे. ते म्हणतात की — “खरा प्रश्न म्हणजे परकीय शक्तीचा भारतीय भूमीवर वर्चस्व; परंतु प्रश्न उपस्थित केल्यावर देशभक्तीचा ठप्पा लगावून, सत्य बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यात येते.” अनेक ठिकाणी निदर्शनं व शांततापूर्ण परंतु तगडे आंदोलन निघाले असून, मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

सोनम वांगचुक यांची तातडीने आणि अटीशिवाय सुटका;

चीनने हडपलेल्या जमिनेच्या नेमक्या प्रमाणाची सार्वजनिक चौकशी व स्पष्ट माहिती देणे;

सीमेवरील अतिक्रमणाविरोधात कडक आणि पारदर्शक धोरण आखणे;

NHA सारख्या कायद्यांचा दुरुपयोग थांबवण्याचे आश्वासन व शांततापूर्ण आंदोलकांवर कारवाई न करण्याची हमी.

केंद्र सरकारकडून अद्याप या बाबतीत स्पष्ट प्रतिक्रिया मिळालेली नाही; परंतु प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे की ही कामे सुरक्षा गोपनीयता व देशाच्या सार्वभौमिकतेशी निगडीत संवेदनशील बाबी असल्याने पुढील प्रक्रियेबद्दल माहिती मर्यादित ठेवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे मुद्दे चर्चेचा विषय बनत आहेत: सीमावर्ती तणाव, जमिनीचे अतिक्रमण आणि स्थानिक लोकांची हक्कविषयक तक्रारी या सर्वांमुळे परिस्थिती ही केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाहीच्या मूलभूत प्रश्नांशी जोडलेली आहे. 

सोनम वांगचुकांना अटक; देशभरात निषेध

लडाखमधील सुमारे ४,००० चौरस किमी जमिनीवर चीनने अतिक्रमण केले या अतिक्रमणाला सरकारची मूकसंमती  असल्याचे तक्रारी; आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुकांना अटक केल्यावर आंदोलन आणि जनआक्रोश उफाळला आहे. देश विदेशात सरकारचा निषेध नोंदवल्या जात आहे.

सोनम वांगचुक म्हणजे भारताचा “रांचो”

“3 इडियट्स” या चित्रपटातील रांचोने प्रेक्षकांची मने जिंकली. पण सिनेमाबाहेरही एक रांचो आहे – तो म्हणजे सोनम वांगचुक. लडाखच्या कठोर हवामानात वाढलेला हा तरुण अभियंता पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीत अडकला नाही. त्याने शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर नव्हे, तर जीवनाशी जोडलेला अनुभव आहे हे दाखवून दिले.

1994 मध्ये त्यांनी SECMOL (Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) ही संस्था उभारली. सरकारी शाळेत नापास ठरलेले अनेक विद्यार्थी इथे यशस्वी झाले. सौरऊर्जेवर चालणारी वसतिगृहे, स्थानिक साहित्याचा वापर करून बांधलेली घरे, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान – हे सर्व वांगचुक यांच्या कल्पनाशक्तीतून जन्माला आले.

त्यांच्या आईस स्टूपा प्रकल्पाने जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांचे लक्ष वेधले. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी बर्फाचे कृत्रिम स्तूप तयार केले. हे केवळ विज्ञान नव्हते; तर स्थानिक गरजांवर आधारित उपाय होते.

सोनम वांगचुक यांचे कार्य हे दाखवते की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसते. ते माणसाला आत्मनिर्भर, जिज्ञासू आणि समाजाभिमुख बनवते. आज “3 Idiots” पाहून लोक रांचोला आठवतात, पण खरा प्रेरणास्त्रोत लडाखच्या डोंगररांगांमध्ये राहतो.

👉 म्हणूनच, रांचो ही व्यक्तिरेखा जरी सिनेमाची देणगी असली तरी सोनम वांगचुक हे खऱ्या आयुष्यातले रांचो आहेत, ज्यांच्या कल्पना व कामगिरीने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे.

 

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव २०२५ चे आयोजन

0

ग्रामगीता तत्त्वज्ञानाचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाचे आयोजन

News Today 

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) :
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षीही श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी येथे विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवात “ग्रामगीता तत्त्वज्ञानाचार महायज्ञ” व “पालखी पदयात्रा शिबिर महोत्सव” या प्रमुख कार्यक्रमांचा समावेश असून देशभरातील श्रद्धाळू व अनुयायांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विविध विषयांवर मार्गदर्शन

शिबिर महोत्सवात समाजजीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर सत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये “ग्रामगीता प्रणित आदर्श गाव निर्माण संकल्प”, “ग्रामसभा व नागरिकांचे अधिकार व कर्तव्य”, “ग्रामनाथांच्या समस्या व उपाय” यासारख्या ग्रामविकासाशी संबंधित सत्रांचा समावेश आहे. तसेच “सर्वधर्म समन्वय संमेलन”, “अनिष्ट रूढी तोडणाऱ्यांचा सत्कार”, “युवक संमेलन”, “महिला संमेलन” व “सप्तखंजरी वादक समाज प्रबोधन” या कार्यक्रमांद्वारे समाजजागृती घडवून आणली जाणार आहे.

मौन श्रद्धांजलीचा विशेष क्षण

पुण्यतिथी महोत्सवातील विशेष कार्यक्रम म्हणून शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित भाविकांनी दोन मिनिटे मौन पाळून राष्ट्रसंतांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक–आध्यात्मिक सोहळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या “ग्रामगीता” या ग्रंथामध्ये ग्रामविकास, नैतिकता, सर्वधर्म समन्वय आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार मांडले आहेत. त्यांचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुण्यतिथी महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयोजक मंडळाने सांगितले.

या अध्यात्म–सामाजिक सोहळ्यात सहभागी होऊन राष्ट्रसंतांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा तसेच कार्यक्रमांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

१७३३ कोटींचा निधी – पण वणीकरांना दिले खड्डे, कोसळलेल्या शाळा आणि ना मिळाला रोजगार !” जनतेचा संताप उफाळला : “हा निधी कागदावरच खर्च झाला की काय?”

0

जनतेचा संताप उफाळला : “हा निधी कागदावरच खर्च झाला की काय?”

News Today

वणी :- विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षांत तब्बल १७३३ कोटी विकास निधी आल्याचा दावा माजी आमदारांकडून करण्यात आला. मात्र वास्तव इतके भयावह आहे की गावोगावी खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पावसात वाहणाऱ्या वर्गखोल्या, पाण्यासाठी आणि वीजेसाठी तडफडणारे शेतकरी, तर बेरोजगारीसोबत झुंजणारे तरुण – एवढेच लोकांच्या पदरी पडले. त्यामुळे वणीकरांचा संताप ऊफाळून आला असून, “१७३३ कोटी कुठे गाडले?” असा थेट सवाल चौकाचौकात घुमतोय.

रस्त्यांवर खड्ड्यांचा महास्फोट

वणी–कोरपना राज्य मार्गाची अवस्था ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून लोक ओळखू लागले आहेत. खोल खड्डे आणि खोलीसमान गटारांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. इतकेच नव्हे तर चंद्रपूर–मुकुटबन बससेवाही थांबवावी लागली. प्रवाशांना हजारो रुपयांचा खर्च करून खाजगी प्रवास करावा लागत आहे.

शिक्षण ठप्प, शाळा उध्वस्त

उच्चशिक्षणाचे मोठे दावे करण्यात आले; पण दहा वर्षांत एकाही नवीन महाविद्यालयाचा शिलान्यास झाला नाही. ग्रामीण शाळांमध्ये वर्गखोल्यांचे छप्पर गळते, पावसाळ्यात मुले पिशव्या नव्हे तर बादल्या घेऊन बसतात. मुलांच्या भवितव्याशी असा निर्दयी खेळ हेच का विकासाचं चित्र?

शेतकरी उध्वस्त – सिंचन गायब

निधीच्या नावाखाली मोठ्या जाहिराती केल्या गेल्या, पण सिंचन प्रकल्प कागदावरच अडकले. शेतकऱ्यांना वीजपुरवठा अपुरा, पंप बंद, पिकं नष्ट; अशा परिस्थितीत शेतकरी हताश झाला आहे. निधीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नाही.

तरुणांची पळवाट – बेरोजगारी पसरली

रोजगारनिर्मितीसाठी एकही ठोस प्रकल्प उभा राहिला नाही. मोठ्या उद्योगांचेच नव्हे तर छोटे व्यवसायिक प्रकल्पही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी नागपूर, पुणे, मुंबईकडे पलायन करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

नागरिकांची घणाघाती टीका

स्थानिक लोकांचा आवाज आज ठाम आहे –
“माजी आमदारांनी फक्त बिगाऱ्याच्या गाढवाला पिसं लावल्यासारखे दाखवे केले. १७३३ कोटींचा गौऱवगीत गायलं, पण आम्हाला खड्ड्यांशिवाय काहीच दिसलं नाही. आमच्या स्वप्नांचा, विकासाचा आणि भविष्याचा सुद्धा खड्डाच खोदला!

अंतिम सवाल

दहा वर्षांत ‘१७३३ कोटींचा गाजावाजा’ झाला, पण वणीकरांना मिळालं काय? उद्ध्वस्त रस्ते, ढासळलेली शिक्षणसंस्था, शेतीचं विनाश आणि बेरोजगारांचे टोळके. त्यामुळेच आज एकच आक्रोश ऐकू येतोय—
“१७३३ कोटी कुठे गेले, कोणाच्या खिशात गेले?”असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

कुंड्रा मार्गावरील बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

0

कुंड्रा मार्गावरील बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

News Today (मंगेश गोरे)

वणी, ता. २५ सप्टेंबर – तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कुंड्रा गावाकडे जाणारी बससेवा मागील वर्षापासून बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी आगाराकडे तात्काळ बससेवा सुरू करण्याचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य व वणी पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.

कुंड्रा गावासह शिरपूर, वेळाबाई, मोहदा, कृष्णापूर, पुरड, मुकुटबन या मार्गावर बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करत आहेत. आर्थिक व सामाजिक स्तरावर विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ग्रामीण प्रवाशांनाही दैनंदिन व्यवहारासाठी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यावेळी सुधाकर गोरे म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून बससेवा बंद असल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शेतकरी व सामान्य लोकांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे अवघड झाले आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ही बससेवा तात्काळ सुरू करावी, अन्यथा आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील.”

या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावर किशोर नांदेकर, बंटी ठाकूर, अमित केशवाणी, सजू तोमस्कर, डॉ. राजूरकर, अंकुश भाऊ ठावरी आदींच्या स्वाक्षऱ्या असून गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला.

नागरिकांची अपेक्षा आहे की प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शिरपूर–कुंड्रा–मुकुटबन मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल.