Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 14

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे तरुणाची आत्महत्या;  ओबीसी समाजात खळबळ, सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम

0

News Today दिलीप भोयर 

वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कायर गावातील अजय पांडुरंग शेंडे (वय ३०) या तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. काल, दिनांक २९ सप्टेंबर रोजी ब्राह्मणी फाट्याजवळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

शोध घेतल्यावर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता तो कायर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील रहिवासी असल्याचे समोर आले. सदरचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून आज ३० रोजी सकाळी घटनास्थळी कायर येथील काही तरुण गेले असता त्यांना एका रुमालीत एक कृषी केंद्राचे बिल आढळले. त्यावरच त्याने आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले आहे की, मी अजय शेंडे रा. कायर ओबीसीतून मराठा समजले आरक्षण दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. या चिठ्ठीची सत्यता अजून पर्यंत पडताळणी झाली नसून पोलिसांनी याचा कसून तपास करण्याची गरज आहे. सदरची चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली नसल्याची माहिती आहे. 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. आधीच ओबीसी समाजात मराठा आरक्षणाच्या संदर्भात तीव्र अस्वस्थता आहे. अशातच अजय शेंडे यांच्या मृत्यूमुळे या प्रश्नाला अधिक गंभीर वळण मिळन्याची शक्यता आहे.

ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “सरकारने तात्काळ लक्ष घालून ओबीसी समाजाचा विश्वास संपादन केला पाहिजे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल.” अशी चर्चा सुरू झाली आहे.

अजय शेंडे यांचा मृत्यू हा केवळ एका तरुणाचा बळी नसून, ओबीसी समाजाच्या मनात दडलेल्या असंतोषाचा व भावनिक जखमेचा ज्वालामुखी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

राज्यभर या घटनेची चर्चा सुरू झाली असून, “ओबीसींच्या हक्कांवर कुठल्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही” अशा घोषणांनी वातावरण तयार होत आहे. येत्या काही दिवसांत या प्रश्नावरून मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

टीप – न्यूज टुडे सदर चिठीची पडताळणी करीत नाही. कृपया नोंद घ्यावी. संपादक

“बोर्डा येथील बस सेवा सुरू करा” – सरपंच, उपसरपंच यांची मागणी

0

News Today  (सचिन वाभिटकर )

वणी (ता. बोर्डा) – बोर्डा येथील बससेवा काही दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे वेळ, श्रम व आर्थिक भार वाढला आहे. कामकाज, बाजारहाट तसेच उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्याही हालअपेष्टा वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर बोर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. आशा  झाडे व उपसरपंच सतीश राजुरकर यांनी बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आगरप्रमुख, वणी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांच्या दैनंदिन गैरसोयी दूर करण्यासाठी बोर्डा येथील बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

निवेदन सादर करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. बससेवा सुरू झाल्यास नागरिकांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होईल, असा विश्वास सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केला. 

“उद्रेक “दिव्यांग उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून – भाजप नेत्यांची कंपनीत ‘पेटपूजा’

0

News Today 

मुकुटबन, दि. २४ : मुकुटबन येथील RCCPL सिमेंट कंपनीसमोर दिव्यांग बांधव व स्थानिक भूमिपुत्रांचे रोजगाराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री तथा OBC आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी २४ सप्टेंबर रोजी उपोषणस्थळी भेट दिली.

स्थानिक नागरिक व उपोषणकर्त्यांची अपेक्षा होती की, या भेटीदरम्यान त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट उपोषण मंडपात बोलावून समस्या सोडविण्यासाठी ठोस चर्चा केली असती. परंतु तसे न करता त्यांनी केवळ औपचारिक चौकशी करून पुढे कंपनीच्या परिसरात जाऊन अधिकाऱ्यांसोबत उपहाराचा आस्वाद घेतला. या प्रकारामुळे जनतेच्या मनात भाजपच्या प्रति मोठा उद्रेक होत आहे.

उपोषणकर्ते दिवसरात्र उपाशीपोटी न्याय मागत असताना नेतेमंडळी मात्र कंपनीच्या उपचारात सहभागी झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचा उद्रेक झाला. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही उपाशी बसलो आहोत, आणि आमचे नेते मात्र कंपनीसोबत ‘पेटपूजा’ करत आहेत. हा आमच्या संघर्षाचा आणि भावनांचा अपमान होता.”

या घटनेने जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली असून, उपोषणाकडे दुर्लक्ष करून कंपनीशी सलगी दाखवल्याचा आरोप भाजप नेत्यांवर केला जात आहे.

आमदार संजय देरकर यांच्या मध्यस्थीने दिव्यांग यांच्या उपोषणाची सांगता. 

वणी विधानसभेचे आमदार संजय दरेकर यांनी कंपनी समोर चालू असलेले दिव्यांग यांच्या उपोषणाची सांगता तारीख २६ रोजी  केली. आर सी सी पी एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपोषण मंडपात बोलावून दिव्यांग यांच्या समस्येवर चर्चा केली व यात बहुतांश समस्यांचा निपटारा करून उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचेसह  शिवसेना (उबाठा) गटाचे नेते मंडळी उपस्थित होते.

 

शिवसेनेचा दणका…आरसीसीपीएल कंपनीसमोर आमदार संजय देरकरांची आक्रमक मोर्चेबांधणी; चार तासांच्या चर्चेत मान्य मागण्या 🚩

0

News Today 

मुकुटबन, ता. झरी (दि. २७ सप्टेंबर २०२५)
मुकुटबनच्या भूमीत गेल्या काही दिवसांपासून पेटलेल्या आंदोलनाच्या ज्वाला अखेर भडकल्या आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या आमरण उपोषणाने ऐतिहासिक वळण घेतले. आरसीसीपीएल कंपनीविरोधातील ग्रामस्थांचा संताप आणि शिवसैनिकांचा निर्धार यांच्या संगमाने काल कंपनी प्रशासनाला गुडघ्यावर आणले.

आमदार देरकरांचे आक्रमक नेतृत्व
२६ सप्टेंबर रोजी सकाळी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक रणांगणात उतरले. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रचंड जनसागर उसळला. वाहतूक ठप्प, पोलीस बंदोबस्त निष्प्रभ! 👉 शिवसैनिकांनी थेट कंपनीच्या कार्यालयात घुसून दणदणीत आंदोलन करून मुकुटबनच्या इतिहासात नवा अध्याय रचला.

आंदोलनाची धग मंत्रालयात पोहचली
गावकऱ्यांचा ज्वालामुखी थेट मंत्रालयापर्यंत धडकला. जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना व पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः आमदार देरकरांना फोन करून विनंती केली – “कृपया आंदोलन शांत घ्या, आम्ही सर्व मागण्या मान्य करू आणि पूर्ण सहकार्य करु.”
👉 या फोनकॉलने आंदोलनाच्या विजयाचा शंखनाद झाला.

सत्ताधाऱ्यांचे मांजर ठरले उंदीर
याच वेळी काही अधिकारी, कर्मचारी सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनून कंपनीचे समर्थन करण्यासाठी धडपडत होते. पण ग्रामस्थांचा संताप आणि शिवसेनेची जिद्द पाहून त्यांचे “माऊ-माऊ” निष्फळ ठरले.

चार तासांचा निर्णायक सामना
उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कंपनी अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास चर्चा केली. शिवसैनिकांचा दबाव, आमदार देरकरांची ठाम भूमिका आणि ग्रामस्थांची तडफ पाहून अखेर कंपनी प्रशासन झुकले. 👉 सर्व मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच उपोषण स्थळावर जल्लोषाचा महापूर उसळला.

शिवसैनिकांची विजयी रणधुमाळी
या लढ्यात नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गझलवार, संतोष माहुरे, सतीश आदेवार, सितारामजी पिंगे, दया कर गिराम, विजय पनघंटीवार, अशोक बरपटवार, शिवशंकर ठाकरे, सुभाष पारखी, संतोष लढांगे, सुभाष भगत, विनोद चिंतावर यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला.

मुकुटबनचा नवा इतिहास
शिवसेनेच्या या विजयाने ग्रामस्थांचा आत्मविश्वास उंचावला आहे. कंपनी प्रशासन गारद झाले, तर गावोगाव “मुकुटबनच्या लढ्याचा” जयजयकार सुरू आहे.
👉 हे आंदोलन मुकुटबनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, यात तिळमात्र शंका नाही!

आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी

जिल्हाप्रमुख संजय निखाडे, संतोष माहुरे, दिपकभाऊ कोकास, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, विनोदभाऊ उप्परवार, तालुकाप्रमुख सतीश आदेवार, संतोष कुचनकार, पुरुषोत्तम बुट्टे, संजय बिजगुणवार, बंडू गुरणुले, संगीत भुजबलराव, सुरेखाताई भोयर, समता माहुरे, मनिषा वऱ्हाटे, कविता भगत, मायाबाई मंगाम, सतीश पचारे, देवाजी बोबडे, सीताराम पिंगे, विजय पनगंटीवार, दयाकर गेडाम, दुष्यांत उपरे, अशोक पंधरे, मंगेश मोहितकर, अतुल निखाडे, अशोक कल्लूरवार, अशोक बरपटवार, नेताजी पारखी, संतोष लेडांगे, शिवशंकर ठाकरे, बालू दुधकोहळे, राजु आसुटकर, संतोष बर्डे, शेख हसन, शेख अहमजद, अतुल विधाते, सुभाष भगत, महेंद्र आवते, विनोद धोटे, विशाल ठाकरे, संतोष सासनवार, शेख आसिफ, प्रविण आसुटकर, संजय आसुटकर, प्रकाश खिरटकर, किशोर गोल्लावार, किसन पाटील गावंडे, मनोहर ताजने, मधूकर ठाकरे, प्रविण खडसे, राकेश गोंडलावर, शंकर ठाकरे, पांडुरंग खडसे, दुर्गे पाटील, संतोष नेल्लावार, बळवंत देवलवार, अशोक गालेवार, पांडुरंग पाईलवार, नेताजी पारखी, संदीप विच्चू, संकेत गज्जलवारयांचेसह शेकडो शिवसैनिकांनी परिश्रम घेतले या आंदोलनात हजारोच्या संख्येनी पुरुष व महिला उपस्थित होत्या

चीनने चार हजार कि.मी. जमीन गिळली; आवाज उठविणाऱ्या भारताचा रांचोच्या अटकेनंतर देशभरात आक्रोश, वाचा सविस्तर कोण आहे सोनम वांगचुक

0

News Today ( उत्तराखंड)

लडाख :- — स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या चिंता प्रमाणे, चीनने लडाखमधील जवळपास ४,००० चौरस किलोमीटर भारतीय जमीन हडप केली असल्याचे स्थानिकांनी आणि तज्ज्ञांनी म्हटले आहे. या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक हक्कांसाठी आणि सीमावर्ती जागांचा बचाव करण्यासाठी आवाज उठवणाऱ्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणसुधारक सोनम वांगचुक यांना अलीकडे अटक करण्यात आली, ज्यामुळे देशभरात रोष आणि आंदोलन सुरु झाले आहे.

वांगचुक हे SECMOL या संस्थेचे संस्थापक आणि “आइस स्तूप” सारख्या पर्यावरणप्रवर्तक प्रकल्पांसाठी ओळखले जातात. त्यांच्या समर्थकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चीनच्या अतिक्रमणाविरुद्ध आणि जमीन व पर्यावरण संवर्धनाविरुद्ध सातत्याने सरकारला प्रश्न विचारले. त्याच प्रश्नांमुळे त्यांना NHA/इतर कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचा आरोप लोकांकडून केला जात आहे.

स्थानिकांनी आणि नागरिक कार्यकर्त्यांनी या कारवाईला दडपशाहीचे प्रयत्न म्हणून पाहिले आहे. ते म्हणतात की — “खरा प्रश्न म्हणजे परकीय शक्तीचा भारतीय भूमीवर वर्चस्व; परंतु प्रश्न उपस्थित केल्यावर देशभक्तीचा ठप्पा लगावून, सत्य बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यात येते.” अनेक ठिकाणी निदर्शनं व शांततापूर्ण परंतु तगडे आंदोलन निघाले असून, मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

सोनम वांगचुक यांची तातडीने आणि अटीशिवाय सुटका;

चीनने हडपलेल्या जमिनेच्या नेमक्या प्रमाणाची सार्वजनिक चौकशी व स्पष्ट माहिती देणे;

सीमेवरील अतिक्रमणाविरोधात कडक आणि पारदर्शक धोरण आखणे;

NHA सारख्या कायद्यांचा दुरुपयोग थांबवण्याचे आश्वासन व शांततापूर्ण आंदोलकांवर कारवाई न करण्याची हमी.

केंद्र सरकारकडून अद्याप या बाबतीत स्पष्ट प्रतिक्रिया मिळालेली नाही; परंतु प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे की ही कामे सुरक्षा गोपनीयता व देशाच्या सार्वभौमिकतेशी निगडीत संवेदनशील बाबी असल्याने पुढील प्रक्रियेबद्दल माहिती मर्यादित ठेवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे मुद्दे चर्चेचा विषय बनत आहेत: सीमावर्ती तणाव, जमिनीचे अतिक्रमण आणि स्थानिक लोकांची हक्कविषयक तक्रारी या सर्वांमुळे परिस्थिती ही केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाहीच्या मूलभूत प्रश्नांशी जोडलेली आहे. 

सोनम वांगचुकांना अटक; देशभरात निषेध

लडाखमधील सुमारे ४,००० चौरस किमी जमिनीवर चीनने अतिक्रमण केले या अतिक्रमणाला सरकारची मूकसंमती  असल्याचे तक्रारी; आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुकांना अटक केल्यावर आंदोलन आणि जनआक्रोश उफाळला आहे. देश विदेशात सरकारचा निषेध नोंदवल्या जात आहे.

सोनम वांगचुक म्हणजे भारताचा “रांचो”

“3 इडियट्स” या चित्रपटातील रांचोने प्रेक्षकांची मने जिंकली. पण सिनेमाबाहेरही एक रांचो आहे – तो म्हणजे सोनम वांगचुक. लडाखच्या कठोर हवामानात वाढलेला हा तरुण अभियंता पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीत अडकला नाही. त्याने शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर नव्हे, तर जीवनाशी जोडलेला अनुभव आहे हे दाखवून दिले.

1994 मध्ये त्यांनी SECMOL (Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) ही संस्था उभारली. सरकारी शाळेत नापास ठरलेले अनेक विद्यार्थी इथे यशस्वी झाले. सौरऊर्जेवर चालणारी वसतिगृहे, स्थानिक साहित्याचा वापर करून बांधलेली घरे, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान – हे सर्व वांगचुक यांच्या कल्पनाशक्तीतून जन्माला आले.

त्यांच्या आईस स्टूपा प्रकल्पाने जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांचे लक्ष वेधले. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी बर्फाचे कृत्रिम स्तूप तयार केले. हे केवळ विज्ञान नव्हते; तर स्थानिक गरजांवर आधारित उपाय होते.

सोनम वांगचुक यांचे कार्य हे दाखवते की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसते. ते माणसाला आत्मनिर्भर, जिज्ञासू आणि समाजाभिमुख बनवते. आज “3 Idiots” पाहून लोक रांचोला आठवतात, पण खरा प्रेरणास्त्रोत लडाखच्या डोंगररांगांमध्ये राहतो.

👉 म्हणूनच, रांचो ही व्यक्तिरेखा जरी सिनेमाची देणगी असली तरी सोनम वांगचुक हे खऱ्या आयुष्यातले रांचो आहेत, ज्यांच्या कल्पना व कामगिरीने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे.

 

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव २०२५ चे आयोजन

0

ग्रामगीता तत्त्वज्ञानाचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाचे आयोजन

News Today 

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) :
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षीही श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी येथे विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवात “ग्रामगीता तत्त्वज्ञानाचार महायज्ञ” व “पालखी पदयात्रा शिबिर महोत्सव” या प्रमुख कार्यक्रमांचा समावेश असून देशभरातील श्रद्धाळू व अनुयायांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विविध विषयांवर मार्गदर्शन

शिबिर महोत्सवात समाजजीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर सत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये “ग्रामगीता प्रणित आदर्श गाव निर्माण संकल्प”, “ग्रामसभा व नागरिकांचे अधिकार व कर्तव्य”, “ग्रामनाथांच्या समस्या व उपाय” यासारख्या ग्रामविकासाशी संबंधित सत्रांचा समावेश आहे. तसेच “सर्वधर्म समन्वय संमेलन”, “अनिष्ट रूढी तोडणाऱ्यांचा सत्कार”, “युवक संमेलन”, “महिला संमेलन” व “सप्तखंजरी वादक समाज प्रबोधन” या कार्यक्रमांद्वारे समाजजागृती घडवून आणली जाणार आहे.

मौन श्रद्धांजलीचा विशेष क्षण

पुण्यतिथी महोत्सवातील विशेष कार्यक्रम म्हणून शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित भाविकांनी दोन मिनिटे मौन पाळून राष्ट्रसंतांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक–आध्यात्मिक सोहळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या “ग्रामगीता” या ग्रंथामध्ये ग्रामविकास, नैतिकता, सर्वधर्म समन्वय आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार मांडले आहेत. त्यांचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुण्यतिथी महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयोजक मंडळाने सांगितले.

या अध्यात्म–सामाजिक सोहळ्यात सहभागी होऊन राष्ट्रसंतांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा तसेच कार्यक्रमांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

१७३३ कोटींचा निधी – पण वणीकरांना दिले खड्डे, कोसळलेल्या शाळा आणि ना मिळाला रोजगार !” जनतेचा संताप उफाळला : “हा निधी कागदावरच खर्च झाला की काय?”

0

जनतेचा संताप उफाळला : “हा निधी कागदावरच खर्च झाला की काय?”

News Today

वणी :- विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षांत तब्बल १७३३ कोटी विकास निधी आल्याचा दावा माजी आमदारांकडून करण्यात आला. मात्र वास्तव इतके भयावह आहे की गावोगावी खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पावसात वाहणाऱ्या वर्गखोल्या, पाण्यासाठी आणि वीजेसाठी तडफडणारे शेतकरी, तर बेरोजगारीसोबत झुंजणारे तरुण – एवढेच लोकांच्या पदरी पडले. त्यामुळे वणीकरांचा संताप ऊफाळून आला असून, “१७३३ कोटी कुठे गाडले?” असा थेट सवाल चौकाचौकात घुमतोय.

रस्त्यांवर खड्ड्यांचा महास्फोट

वणी–कोरपना राज्य मार्गाची अवस्था ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून लोक ओळखू लागले आहेत. खोल खड्डे आणि खोलीसमान गटारांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. इतकेच नव्हे तर चंद्रपूर–मुकुटबन बससेवाही थांबवावी लागली. प्रवाशांना हजारो रुपयांचा खर्च करून खाजगी प्रवास करावा लागत आहे.

शिक्षण ठप्प, शाळा उध्वस्त

उच्चशिक्षणाचे मोठे दावे करण्यात आले; पण दहा वर्षांत एकाही नवीन महाविद्यालयाचा शिलान्यास झाला नाही. ग्रामीण शाळांमध्ये वर्गखोल्यांचे छप्पर गळते, पावसाळ्यात मुले पिशव्या नव्हे तर बादल्या घेऊन बसतात. मुलांच्या भवितव्याशी असा निर्दयी खेळ हेच का विकासाचं चित्र?

शेतकरी उध्वस्त – सिंचन गायब

निधीच्या नावाखाली मोठ्या जाहिराती केल्या गेल्या, पण सिंचन प्रकल्प कागदावरच अडकले. शेतकऱ्यांना वीजपुरवठा अपुरा, पंप बंद, पिकं नष्ट; अशा परिस्थितीत शेतकरी हताश झाला आहे. निधीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नाही.

तरुणांची पळवाट – बेरोजगारी पसरली

रोजगारनिर्मितीसाठी एकही ठोस प्रकल्प उभा राहिला नाही. मोठ्या उद्योगांचेच नव्हे तर छोटे व्यवसायिक प्रकल्पही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी नागपूर, पुणे, मुंबईकडे पलायन करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

नागरिकांची घणाघाती टीका

स्थानिक लोकांचा आवाज आज ठाम आहे –
“माजी आमदारांनी फक्त बिगाऱ्याच्या गाढवाला पिसं लावल्यासारखे दाखवे केले. १७३३ कोटींचा गौऱवगीत गायलं, पण आम्हाला खड्ड्यांशिवाय काहीच दिसलं नाही. आमच्या स्वप्नांचा, विकासाचा आणि भविष्याचा सुद्धा खड्डाच खोदला!

अंतिम सवाल

दहा वर्षांत ‘१७३३ कोटींचा गाजावाजा’ झाला, पण वणीकरांना मिळालं काय? उद्ध्वस्त रस्ते, ढासळलेली शिक्षणसंस्था, शेतीचं विनाश आणि बेरोजगारांचे टोळके. त्यामुळेच आज एकच आक्रोश ऐकू येतोय—
“१७३३ कोटी कुठे गेले, कोणाच्या खिशात गेले?”असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

कुंड्रा मार्गावरील बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

0

कुंड्रा मार्गावरील बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

News Today (मंगेश गोरे)

वणी, ता. २५ सप्टेंबर – तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कुंड्रा गावाकडे जाणारी बससेवा मागील वर्षापासून बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी आगाराकडे तात्काळ बससेवा सुरू करण्याचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य व वणी पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.

कुंड्रा गावासह शिरपूर, वेळाबाई, मोहदा, कृष्णापूर, पुरड, मुकुटबन या मार्गावर बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करत आहेत. आर्थिक व सामाजिक स्तरावर विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ग्रामीण प्रवाशांनाही दैनंदिन व्यवहारासाठी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यावेळी सुधाकर गोरे म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून बससेवा बंद असल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शेतकरी व सामान्य लोकांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे अवघड झाले आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ही बससेवा तात्काळ सुरू करावी, अन्यथा आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील.”

या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावर किशोर नांदेकर, बंटी ठाकूर, अमित केशवाणी, सजू तोमस्कर, डॉ. राजूरकर, अंकुश भाऊ ठावरी आदींच्या स्वाक्षऱ्या असून गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला.

नागरिकांची अपेक्षा आहे की प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शिरपूर–कुंड्रा–मुकुटबन मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल.

वणी नगर परिषदेकडून डुक्कर ग्रामीण भागात सोडल्याचा आरोप

0

News Today

वणी नगर परिषद क्षेत्रातील मोकाट फिरणाऱ्या डुकरांबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडून गंभीर तक्रारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नगर परिषदेने शहरातील डुकरे पकडून ती थेट मौजा बोर्डा व अन्य ग्रामीण भागात सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डुकरे जंगल परिसर व शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालत आहेत. फळबागा, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, त्रस्त परिस्थितीत दिवस काढत आहे.

शेतकऱ्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, शहरातून ग्रामीण भागात डुकरे आणून सोडल्याने झालेल्या नुकसानीसाठी नगर परिषद थेट जबाबदार आहे. शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, या नुकसानीची पूर्ण जवाबदारी नगर परिषदेकडेच राहील.

निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की, त्वरित सर्व डुकरे पकडून ती संबंधित परीसरातून हटविण्यात यावीत, अन्यथा शेतकरी आणखी मोठ्या अडचणीत सापडतील. तसेच नगर परिषद प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांचा हा प्रश्न निकाली न लागल्यास पुढील काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. उपसरपंच राजू राजुरकर, सतीश काळे, सचिन वाभिटकर, प्रवीण झाडे, दिनेश ढाले, सतीश राजूरकर, गंगाराम राऊत आदी उपस्थित होते.

मुकूटबन आरसीसीपीएल कंपनीविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस : आंदोलकांची प्रकृती खालावली, वातावरण तणावग्रस्त, राष्ट्रवादीचा पाठिंबा

0

News Today 

मुकुटबन (ता. झरी), दि. २३ सप्टेंबर २०२५
आरसीसीपीएल कंपनीविरोधात सुरू असलेले शिवसेना (उबाठा) गटाचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले असून आंदोलनकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावली आहे. उपोषणकर्त्यांचे आज सकाळी शासकीय चिकित्सकांनी आरोग्य तपासले. मात्र कंपनी प्रशासनाकडून अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

✦ आंदोलन तीव्र, शिवसैनिकांचा संताप

नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गझलवार यांच्यासह उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. कालपासून सुरू असलेले हे आंदोलन आता जनआंदोलनाचे रूप धारण करत असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत. शिवसेना (उबाठा) गटाने इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास परिस्थिती चिघडू शकते.

✦ प्रकृती खालावली, आरोग्य तपासणी

उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने आंदोलक व ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे. शासकीय डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून सल्ला दिला असला तरी उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.

✦ राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी आज आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. त्यांच्या भेटीमुळे आंदोलनाला राजकीय रंग मिळण्यास सुरुवात झाली आहे.

✦ कंपनी प्रशासन मौन

उपोषणाचा दुसरा दिवस संपत आल्यानंतरही कंपनी प्रशासनाने मागण्यांबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. या मौनामुळे ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.

📌 उपोषण दीर्घकाळ चालल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

यावेळी यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख संतोष माहुरे, घरी जा मी तालुकाप्रमुख सतीश आदेवार, जरी तालुका समन्वयक सितारामजी पिंगे, दया कर गिराम विजय पनघंटीवार अशोक बरपटवार शिवशंकर ठाकरे सुभाष पारखी संतोष लढांगे सुभाष भगत विनोद चिंतावर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपोषण मंडपामध्ये उपस्थित होते