Wednesday, April 23, 2025
Google search engine
Home Blog

३६ तासानंतही मोहदा येथील त्या घटनेतील खदान धारक मोकाट, थातूरमातूर गुन्हे दाखल

0

News Today 

वणी :-  तालुक्यातील मोहदा येथील गिट्टी खडणीत उत्खननासाठी जात असलेली प्रोकलॅन मशीन ८० फूट खोल घाईत पडून झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना घडली होती. यात चंद्रपूर पोलिस स्टेशन कडून दाखल झालेल्या झिरो एफ.आय. आर. वरून शिरपूर पोलिस स्टेशनला नाममात्र गुन्हे नोंद करून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु महसूल विभागाने रीतसर तक्रार दाखल करून घेतली नआल्याने आरोपीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद न झाल्याने आरोपी मोकाट फिरत आहे.  त्यामुळे सदर प्रकरण हडप करण्याच्या मार्गावर तर नाही ना. अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोहदा येथील इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांनी लिझवर घेतलेल्या सर्व क्रमांक २८२ व २८३ मध्ये यात्रेच्या वेळी गाईकेदेशीर पद्धतीने बंद असलेल्या खाणीतून उत्खननासाठी प्रोकलॅन मशीन रेणू अहिरवार नामक चालक घेऊन जात असताना त्याचे संतुलन गेले व तो मशीन क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन केलेल्या खाणीच्या खोल खड्ड्यात पडल्याने गंभीर रित्या जखमी झालेला चालक राणू यास चंद्रपूर येथील रुग्णालयात मृत्य घोषित करण्यात आले आहे. गंभीर गुन्हा या ठिकाणी घडला असताना देखील महसूल विभागाकडून चौकशीसाठी जाणीवपूर्वक विलंब होत आहे.

या परिसरात अनेक गिट्टी खदाणी असून या खदान धारकांनी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम २०१३ चे उलंघन करून उत्खन्न केले आहे. या गंभीर बाबीकडे सातत्याने संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हे खादान धारक मजुरांच्या व कामगारांच्या जीवावर उठून आपली खळगी भरून घेत आहे. 

ज्या खदाणीत जे कामगार असतील त्यांचा कामगार विमा उतरविणे अनिवार्य असताना देखील राणू अहिरवार यांचा विमा खदानधारक झवेरी यांनी उतरविला नाही अशी माहिती आहे. त्यामुळे कामगार सुरक्षा अधिनियाचे देखील यांनी उलंघन केल्याने निदर्शनास येत आहे. एवढा गंभीर प्रकार असताना देखील या प्रकरणाची कोणतीही रीतसर तक्रार दाखल न झाल्याने महसूल विभागावर संशय व्यक्त केल्या जात आहे. सदर प्रकरणाची रीतसर महाराष्ट्र गौण खनिज अधिनीयमानुसार चौकशी करण्याची मागणी केल्या जात आहे.

खदानधारक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांचेवर गुन्हा नोंद करण्यास विलंब का ?

मोहदा येथील खदाणधारक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम २०१३ चे अंतर्गत देण्यात आलेल्या परवानगीमध्ये उत्खनन करण्यासाठी दिलेल्या टिपीवर नमूद नियम व अटींचा भंग होऊन देखील महसूल विभाग निद्रिस्त होऊन आरोपीची पाठ राखणं करीत असल्याचे आरोप होत आहे.

यात संबंधित खदान धारककाकडे रात्रीच्या वेळी उत्खननाची परवानगी होती का ? तसेच मृत्य प्रोक्लॅन मशीन चालकाकडे मशीन चालविण्याचा परवाना होता काय? टिपीवरील नमूद नियम व अटींचे उलंघन झाले आहे का? या सर्व प्रकाराचा अहवाल देण्यास महसूल विलंब लावत असल्याने पाणी कुठ मुरल्या जात आहे. त्याच बरोबर सदरची मशीन ही बंद असलेल्या सर्व क्रमांक २८३ मध्ये कोणत्या कारणाने गेली होती. सदरची खान बंद असताना अपघात घडला आहे. त्यामुळे बंद खाणीतून रात्रीच्या वेळी गैरमार्गाने उत्खनन केल्या जात होते काय? असे असेल तर त्यांचेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद होऊ शकते परंतु प्रशासन मात्र सदरचे प्रकरण गुलदस्त्यात ठेवू इच्छित असल्याचे दिसून येत आहे. 

मोठी खळबड : – प्रोकलॅन मशीन ८० फूट खदानीत पडली , एक ठार, वणी तालुक्यातील घटना

0

News Today 

वणी :-  गिट्टी खदान मध्ये उत्खनन करण्यासाठी जात असलेला प्रोकलॅन अचानक नियंत्रण सुटले व तो ८० फूट खोल खाणीत पडल्याने चालक गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना वणी तालुक्यातील मोहदा येथे  काल तारीख १६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.

मोहदा येथे मोठ्या प्रमाणात गिट्टीसाठी लागणारा दगडाच्या खाणी असून दररोज हजारो ब्रास दगडाचे उत्खनन केल्या जात आहे.या परिसरात १२ ते १५ गिट्टी क्रेशर असून कार्यान्वित आहे. या क्रेशरसाठी लागणारा दगळ उत्खननासाठी हजारो हेक्टर जमिनीवर उत्खनन करणाऱ्यांसाठी शासकीय लिजवर जमिनी वाटप करून खदाणी निर्माण केल्या आहे. 

मोहदा येथील क्रेशर मालक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांच्या नावे असलेल्या गिट्टी खदानीत काल रात्री १० वाजता च्या सुमारास राणू अहिरवार वय २६ वर्षाचा चालक हा प्रोकलॅन मशीन घेऊन उत्खननासाठी जात असता त्याचे प्रोकलॅन चालवित असताना संतुलन सुटले व ८० ते ९० फूट खोल खदाणीत प्रोकलॅन कोसळले असता यात चालक राणू अहिरवार रा. मोहदा हा चालक गंभीर जखमी झाला होता त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

संबंधित खदाण मोहदा गावातील गट क्र. २८३ मध्ये असून त्या खदाण ची लिज ही संपली असल्याची चर्चा आहे. गावातील काही नागरिकांनी ती खदाण गावा जवळ आहे म्हणून बंद केली  होती. गावातील नागरिकांनी  प्रशासन अधिकाऱ्याकडे त्या खदाण ची एटीएस मोजणीची मागणी पण केली होती त्यावर काही कार्यवाही केली गेली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत उचित चौकशीची मागणी होत आहे.

                  घटना स्थळावर पोलिस दाखल

वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहदा येथे काल रात्री घडलेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे आपल्या ताफ्यासह आज तारीख १७ रोजी दुपारी १२.३० वाजता दाखल झाले आहे. 

नागपूर येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन 

0

News Today 

नागपूर :- राष्ट्रीय स्तरावर संत नामदेव महाराज यांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सामाजिक एकत्रीकरण करिता समोरील वर्षीच्या जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे अतिशय भव्य स्वरूपात  संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्या संमेलनाचे नियोजन करण्याकरिता प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वरभाऊ धिरडे, जेष्ठ समाज सेवक  सुभाष खोडे, प्रमोद कोरमकर,  डॉ. प्रकाश ढगे, सचिव श्याम नानोटे ,  सौ.आरती भाईक, विदर्भ नामदेव शिंपी समाजाचे सचिव बोबडे, युवराजजी सुतोने ,अँड. अमोलजी भिसे,अँड. वासुदेव घिमे, माजी सचिव राजेश गंधे, श्री सुनील जावळेकर, प्रा.अनिल भाईक, छिपा शिंपी समाजाचे नीलकमल खैरवार गहलोत,सौ.स्नेहाताई हुकूम, सौ.सुनिताताई जुमळे , वर्षाताई जुमळे , संजय जुमळे,इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.

ईश्वर धिरडे यांनी या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन आपण आयोजित करून शिंपी समाजातील सर्व पोट शाखेला एकत्रित करून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याकरिता आपल्याला हे कार्य करायचे आहे. हे संमेलन भव्य स्वरूपाचे असेल व या संमेलनात शिंपी समाजातील सर्व भारतभरामधून जवळपास पाच लाख समाज बांधव उपस्थित राहतील याबद्दल माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे या सर्वांची राहण्याची कार्यक्रमाचे तयारी आपल्याला कशी करायची आहे याबद्दल मार्गदर्शन केले.

सोबतच युवक महिला या सर्वांनी मोठ्या स्तरावर एकत्रित येऊन या संमेलनाची जबाबदारी स्वीकारावी अशी आवाहन सुद्धा करण्यात आले . त्यानंतर अनेक मान्यवर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संमेलनाविषयी आपले मत व्यक्त केले. आणि सोबतच आपल्या समाजाला राजकीय स्थैर्य प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले.


यावेळी नागपूर शहरातील शिंपी समाजातील सर्व पोट शाखेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपले विचार प्रगट केले आणि महासंमेलन यशस्वी करण्याचा संकल्प केला.

देश दुनिया, ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवणे शक्य; अमेरिका इंटेलिजन्सच्या दाव्यानं जगभरात खळबळ

0

News Today (वृत्तसंस्था)

नवी दिल्ली — देशाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय असेल, तो म्हणजे, ईलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले.

काँग्रेस सुरुवातीपासून ईव्हीएमचा निकाल मान्य नाही. आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करताना, ईव्हीएम हॅक करून निकाल बदलणे शक्य आहे, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे भारतातील विरोधकांच्या ईव्हीएम विरोधाला भविष्यात आणखी धार चढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सनच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीन सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. यामुळे संपूर्ण अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित तुलसी गबार्ड यांनी मत व्यक्त केल्याने ईव्हीएमच्या विश्वासर्हतेविषयी पुन्हा जगभरात चर्चा सुरू झाली आहे.तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीनविषयी उपस्थित केलेली शंका, त्यावरील मत समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होऊ लागलं आहे.

त्याचे जगभरात पडसाद उमटू लागले आहे. विशेष म्हणजे, तुलसी गबार्ड यांना समाज माध्यमातून पाठिंबा देखील वाढू लागला आहे. परंतु काहींनी तुलसी गबार्ड यांच्या शंकेमागे राजकीय अजेंडा असल्याची भावना व्यक्त केली आहे. टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्राॅनिक्स मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले होते.

भारतीय निवडणूक आयोगाचा दावा

अमेरिकेच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या दाव्याचे पडसाद भारतात देखील उमटू लागले आहेत. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटवरील मतांशी जुळणी झाली आहे. ईव्हीएम मतांशी जुळत आहे. हा ईव्हीएमबाबतच्या विश्वासर्हतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. भारतातील ईव्हीएम आणि इतर देशातील ईव्हीएम मशीन सिस्टम वेगळ्या आहेत, असा दावा देखील भारतीय निवडणूक आयोगाने केला आहे. या दाव्यावर मात्र मतदार आता नाराजी व्यक्त करीत असून आयोगावर रोष व्यक्त करीत आहे.

         भारतातील ईव्हीएम प्रोग्राम सिस्टम वेगळी

अमेरिकेची ईव्हीएम मशीन ‘विंडो’, ‘लिनक्स’वर चालतात, भारताची ईव्हीएम अगदी ऑफलाईन आहे. वाय-फाय, ब्लूटुथ नाही. अमेरिकी यंत्र इंटरनेटशी जोडलेले असते. भारतातील ईव्हीएममधील प्रोग्रामिंगनंतर बदला येत नाही. अमेरिकी यंत्रात ते शक्य आहे. भारतीतील ईव्हीएममध्ये मुद्रित पावती देखील पाहता येते. अमेरिकेतल्या यंत्रांमध्ये तसे नाही, असे तुलनात्मक वर्णन भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. यावर मात्र आता कोणत्याही भारतीयांचा विश्वास उरला नाही. शेवटी ईव्हीएम या पुढे नकोच अशी मागणी होत आहे. 

शिरजगाव येथे गुरु शिष्य जयंती सोहळा संपन्न, रवी मानव आणि मनोज अंबडकर या दोन दिग्गज वक्त्यांचे एकाच मंचावर व्याख्यान

0

News Today 

शिरजगाव: येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे अर्थात गुरु शिष्य जयंती सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते मा रवी मानव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर मुख्य वक्ते म्हणून मा.मनोज अंबाडकर होते. तर शिरजगाव मोझरी चे सरपंच निरंजन भाऊ कडू, सौ शारदाताई देवघरे पोलीस पाटील शिरसगाव, सौ उमाताई अंबलकर क्रांती दोन क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, दीपक राव तिखे क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हा महासचिव, डॉ.छायाताई मानव, डॉ. सुधाकर डेहनकर, किरण खवले प्रफुल्ल उमाप आदींची उपस्थिती होती.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे मी पूल असे साहित्य निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केलेले आहे. त्यांचाच वसा पुढे चालू येत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना भारताच्या संविधानामध्ये स्थान देऊन त्याला संविधानिक दर्जा बहाल करून घेण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. या दोन्ही महापुरुषांनी देशावर अनन्य साधारण उपकार केले असल्याची भावना मनोज अंबाडकर यांनी आपल्या प्रबोधनातून बोलताना व्यक्त केली. 

यानंतर रवी मानव यांचे अध्यक्ष भाषण पार पडले अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयवाद या सर्व विषयावर चौफेर प्रबोधन करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व प्रकारच्या शोषणाचे कारण हे अविद्या आहे म्हणून आपण विद्या घेऊन विद्यावंत व्हावे असा विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला आणि शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत आणली परंतु आज जिल्हा परिषदेच्या शाळा झपाट्याने बंद होत आहे याकडे अर्थसंकल्पामध्ये कुठलीही विशेष तरतूद करण्यात येत नाही ज्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असे झालेले आहे अशी खंत यावेळी रवि मानव यांनी व्यक्त केली .

या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी कष्ट घेतले. महात्मा फुले उत्सव समिती- अध्यक्ष- अक्षय पाचघरे, उपाध्यक्ष- नवीन जळीत, सचिव- ऋषिकेश गाडगे, सहसचिव – सागर बेले, कोषाध्यक्ष – प्रणव पाचघरे, संघटक- सागर होले, सहसंघटक- महेश अडसड, कु.यशस्वी खेरडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – राणी कडू, क्षितिजा गाडगे.सर्व सदस्य गण, समस्त गावकरी मंडळी जय ज्योती जय क्रांती व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांचे कडून आ. संजय देरकरांचा सत्कार

0

News Today 

वणी:- तमाम शेतकऱ्यांचे कुलदैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी वणी विधानसभेतील शिवसेना (उबाठा) चे आमदार संजय देरकर यांचा शाल व मंदिर समितीचे पुस्तक आणि दिनदर्शिका देऊन तारीख ११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता मंदिर समितीच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. 

आमदार संजय देरकर हे पंढरपूर येथे आले आता विठ्ठलाच्या आशिर्वादासाठी विठ्ठल मंदिरात गेले असता त्यांचा हा सत्कार करण्यात आला यावेळी श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, इंजि. कुंडलिक ठावरी, राहुल ठाकरे, मनीष बत्रा, कुणाल मेकलवार , प्रीतम पेंदोर, पोलिस कॉन्स्टेबल निलेश झाडे, व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी देरे ” पांडुरंगा ”  – आमदार संजय देरकरांचे पांडुरंगाला साकडे

0

News Today
पंढरपूर :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सदस्य वणी विधानसभा क्षेत्र जि. यवतमाळचे आमदार संजय देरकर यांनी आज तारीख ११एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्राच कुलदैवतं भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतले व शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे रे पांडुरंगा असे साकडे पंढरपुरात येऊन आमदार संजय देरकर यांनी पांडुरंगाच्या चरणी दिले.


निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती देवू, लाडक्या बहिणींना २१०० रुपये मासिक वेतन देऊ, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ अशी अनेक वचने यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. सत्तेत आल्यानंतर या सरकाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला आहे. शेतकऱ्यांनी सर्व शेतमाल विकल्या नंतर भाव वाढ केल्या जात आहे. राज्यातली महायुती आणि शेतकऱ्यांची अधोगती अशी अवस्था राज्याची झाली आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे. यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे रे पांडुरंगा असे साकडे आमदार संजय देरकर यांनी पांडुरंगाला घातले.

यावेळी विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे (उबाठा) सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, इंजि. कुंडलिक ठावरी, राहुल ठाकरे, मनीष बत्रा, कुणाल मेकलवार , प्रीतम पेंदोर, पोलिस कॉन्स्टेबल निलेश झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वणी येथे प्रथमच संगीत आणि नाटय महोत्सव २०२५ चे आयोजन

0

 

News Today 

वणी :- श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र वणी यांच्या वतीने वणी मध्ये यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगीत आणि नाटय महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये श्रोत्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम पहायला मिळणार आहे. त्यामध्ये श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्राचे विदयार्थ्याचे गायन, श्री. जगन्नाथ महाराज यांचे संगीतमय जिवन चरीत्र, प्रा. हेमंत चौधरी आणि पुरुषोत्तम गावंडे यांचा हास्यदर्पण कार्यक्रम आणि विशेष पर्वणी म्हणून स्वर मंथन बहुद्देशिय संस्था नागपूर येथिल ७० कलाकारांच्या अथक प्रयत्नातून आणि उत्कृष्ट अभिनयातून साकार झालेले संत गजानन महाराज यांचे ‘शेगांवीचा संत गजानन’ हे महानाटय वणीकरांना पहायला मिळणार आहे.

हा कार्यक्रम गुढीपाडवा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५ ते १० वाजेपर्यंत शेतकरी लॉन, वसंत जिनिंग ऑफिस समोर वणी येथे होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र वणी तसेच वणी शहरातील अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था मिळून कार्य करीत आहे.

कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरीता वणी आणि वणी परीसरातील सर्व श्रोत्यांनी आवजून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सौ. सविता डोर्लीकर, डॉ. सौ. संचिता नगराळे, सौ. विना मोहीतकर, सौ. कानोपात्रा खंडाळकर, सौ. अल्का लाजूरकर, सौ. सुनिता आवारी, सौ. वंदना पिंपळकर, सौ. भाग्यश्री तोडेवार, अजित खंदारे, प्रा. सतिश बाविस्कर, अरूण डवरे, संतोष जोशी, प्रा. हेमंत चौधरी, संतोष क्रिगरे यांनी केले आहे.

 

शिवसेनेच्या (उबाठा) जिल्हाप्रमुखपदी संजय निखाडे, एका निष्ठावंत शिवसैनिकांच्या हाती जिल्ह्याची सूत्र 

0

News Today

वणी :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष्याच्या जिल्हा प्रमुखपदी संजय निखाडे यांची वर्णी लागल्याने एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या हातात जिल्ह्याची सूत्र गेल्याचे सर्वसामान्य शिवसैनिकत आनंद पसरला आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्हाप्रमुखाचे पद निलंबित केल्याने जिल्हाप्रमुख कोण होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील चार महिन्यापासून यवतमाळ जिल्हा व वणी विधानसभेतील अनेकपदे रिक्त आहेत. जिल्हाप्रमुख पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती यात मात्र उपजिल्हाप्रमुख पदावर मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले संजय निखाडे यांच्या नावाचा जिल्हाप्रमुख पदावर शिक्का मोर्तब झाला.

मागील ३५ वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय निखाडे यांची वणी विधानसभेत ओळख आहे. आज त्यांच्या निवडीने सर्व सामान्य शिवसैनिक मात्र आनंदी झाला आहे. निखाडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे,जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड, आमदार संजय देरकर यांना दिले आहे.

श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात शहीद दिनी महा जेलभरो

0

विधानसभेत सरकारचे लक्ष वेधण्याचे आमदार संजय देरकारांचे आश्वासन

News Today

मंगेश गोरे
वणी :- शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या स्व. साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाचे निमित्याने शेतकरी शेतमजूर, निराधार व दिव्यांग्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.) व श्रीगुरुदेव सेना यांचे वतीने लक्षवेधी महा जेलभरो आंदोलन आज रविवार ता. २३ मार्च दुपारी २ वाजता दिलीप भोयर यांचे नेतृत्वात येथील पोलीस स्टेशनमध्ये संपन्न झाले.

या आंदोलनाची सुरवात वसंत जीनिंग कार्यालया पासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाला वंदन करून पोलिस स्टेशन वणी येथील दक्षता सभागृहात भरगच्च गर्दीने जेलभरो करण्यात आला.

यात दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या यात सर्व निराधार , लाडकी बहीण कलावंत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना मानधन ५ हजार करण्यात यावे, निराधारांच्या उत्पन्नाची अट २१ हजारावरून १ लाखापर्यंत करण्यात यावी, निराधारांचे वय ६० वर्षे करण्यात यावे, सर्व कलावंताच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मान्य करावे, निवडणुकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ई व्ही एम बंद करण्यात याव्या, शेतकऱ्याच्या शेती साहित्य (बी- बियाणे,रासायनिक खते, औषधे व शेती अवजारे) या वरील जी. एस. टी. रद्द करण्यात यावी. वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक ३१५ च्या रस्ता बांधकामाचे तांत्रिकदृष्ट्या ऑडिट करण्यात यावे ,

सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी,शेतमजूर १२ बलुतेदार यांची ( मायक्रो फायनान्स, पतसंस्था,खाजगी सावकार, बँकांचे कर्ज ) यातून सर्वांना कर्ज मुक्त करावे, शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा , शेतकऱ्याच्या कापसाला किमान १२ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना १० हजार रुपये मासिक बेरोजगार पत्ता देण्यात यावा,


सार्वजनिक बांधकाम विभागाचे निविदा विषयक नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई व आर. व्हि. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम तांत्रिक दृष्ट्या ऑडिट करण्यात यावे,
वणी मुकूटबन घोन्सा चौफुली ते पुरड (नेरड) पर्यंतच्या मार्गावर सुमारे ६० करोड रूपय खर्चुन सुध्दा काम नित्कृष्ट झाले आहे. करिता या मार्गाचे बांधकाम पुनःश्चा करण्यात यावे. वणी शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावरील रेल्वे गेट पर्यंत चालु असलेले रस्ता बाधकाम अत्यंत निकृष्ठ असुन काम मागील अनेक दिवसांपासुन बंद आहे. सदरचे काम नियमबाह्य पध्दतीने केले आहे. त्याची संपुर्ण चौकशी करून संबंधीत अधिकारी व कंत्राटदारावर सक्त कारवाई करण्यात यावी,

सा. बां. विभाग पांढरकवडा जि. यवतमाळ यांचे कडुन सन २०१६ ते २०२४ पर्यंत खनिज विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेले सार्वजनिक सभागृहाची चौकशी करण्यात यावी. तसेच गावा गावातील बसविण्यात आलेले जल शुध्दीकरण यंत्र पुर्णता बंद आहे. या जलशुध्दी करण यंत्राची चौकशी करावी व संबधीत कंत्राटदार व अधिकारी यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, नव्याने प्रस्तावित असलेले जिल्हा सत्र न्यायालयाची ईमारत ज्या जागेवर बांधण्यात येणार आहे. ती जागा वणी शहराच्या कार्यक्षेत्रा बाहेर आहे. त्यामुळे सर्व सामन्य नागरीकांना त्या ठिकाणी येणे जाणे करणे अत्यंत अवघड होणार असुन नागरीकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्या इमारतीची जागा वणी शहरात उपलब्ध करून त्या ठिकाणी न्यायालयाची ईमारत बांधण्यात यावी.

मौजा परसोडा येथे ही ईमारत बांधुन मुख्यालयात बदल होत आहे, वणी शहरातील ग्रामिण रुग्णालयात मागील अनेक वर्षापासुन ट्रामा केअर सेंटर बांधण्यात आले आहे. त्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. त्या ठिकाणी लागणारे करोडो रूपयाचे साहित्य धुळखात पडले आहे. त्या साहित्याचा रुग्णांना कोणताही लाभ मिळत नसल्याने परनामी त्यांना त्यांचा जिव गमवावा लागत आहे. त्यामुळे सदर ट्रामा केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, वणी येथील कोळशाची रेल्वेसाठी हटविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे,

या आंदोलनात शेतकरी शेतमजुर कलावंत , दिव्यांग व निराधार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे, जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, विधानसभाध्यक्ष सूर्यकांत खाडे, श्रीगुरुदेव सेना तेलंगणा राज्याचे प्रभारी डॉ सुरेश महाराज उदार, रामदास पखाले, पुंडलिक मोहितकर, शहराध्यक्ष विनोद ढेंगळे, शेतकरी संघटनेचे दशरथ पाटील बोबडे, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलन यशस्वी करण्यासाठी मंगेश गोरे, प्यारेलाल मेश्राम, सौ.रत्‍नाबाई पारखी, निर्मलाबाई मडावी, राजू झाडे,वसंतराव कोहळे, अमोल वाघाडे, शिवाजीराव डाखरे,ज्ञानेश्वर कोडापे, सिंधुबाई गोरे, पुंडलिकराव कोंगरे, रंगरावजी भोयर, प्रतिमा मडावी, शोभा तुरानकर, भाऊराव दुरटकर, मेघबाई भगत, बालाजी गुरनुले, पंचफुलाबाई मंगाम, आदी परिश्रम घेत आहे.

आंदोलकांच्या मागण्या विधानसभेत मांडणार – आमदार संजय देरकर यांची ग्वाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्रीगुरुदेव सेनेच्या लक्षवेधी जेलभरो आंदोलनाला वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट दिली व आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि निवेदनातील सर्व मागण्यासाठी विधानसभेत मांडणार अशी ग्वाही दिली आली आंदोलनाला भगवी झेंडी दाखवून आंदोलनाची सुरवात केली.