Friday, April 17, 2026
Google search engine
Home Blog

वणी शहरातील नमो उद्यान प्रकल्पाच्या फलकावरून राजकारण तापले, सत्तेतील माजी आमदारांचा वणीच्या विकास कामातील हस्तक्षेपामुळे जनतेत चर्चेला ऊत 

0

दिलीप भोयर

News Today 

वणी शहरातील “नमो उद्यान” प्रकल्पाच्या फलकावरून निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र झाला असून, या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक रंग धारण केला आहे. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या उद्यानाच्या फलकावर विद्यमान आमदार संजय देरकर यांचे नाव नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी माजी आमदार बोदकुरवार वणी शहरासह परिसरातील विकास कामात हस्तक्षेप घालून सत्तेचा माज दाखवत अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड चर्चेला ऊत येत असून घाणेरड्या राजकारणाची परंपरा उभी होत असल्याची टीका देखील उमटत आहे. 

शासनाच्या प्रोटोकॉलनुसार शासनाच्या विकास कामावरील अशा फलकावर विद्यमान आमदार संजय देरकर नाव असणे अपेक्षित असताना, माजी आमदार बोदकुरवार यांचे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यामागे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही पुढे येत आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उबठा) गटाचे आमदार संजय देरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नमो उद्यानाचा फलक तयार करून त्यांचे उद्धाटन परस्पर केल्याने भाजपाच्या फलकाचा केवळ देखावा निर्माण झाला आहे. या फलकावर नगराध्यक्ष यांचे नाव व फोटो असल्याने त्या विशिष्ट समाजाच्या महिला नगराध्यक्षांचा अपमान झाल्याचा आरोप विरोधी गटाकडून करण्यात येत असला तरी कोणतीही जातीवाचक घटना घडली नाही. असे असताना केवळ राजकारण करीत जातीय वादाला समोर करून भाजप आपले राजकारण घडवित असल्याचे आरोप जनतेतून केल्या जात आहे. 

मात्र, याच दरम्यान मागील ११ एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आले होते तेव्हा शिलालेखावर शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांचे नाव वगळले तेव्हा नगराध्यक्षा व त्यांच्या व समाजाचा अपमान चक्क भाजपा कडूनच झाला नाही का ? असा शहरात एक महत्त्वाचा सवालही उपस्थित केला जात आहे. केवळ एका विशिष्ट समाजाचे नाव समोर करून राजकारण तापविणाऱ्या भाजपची सर्वत्र चेष्टा उडवल्या जात आहे. 

याच शिलालेखावर नगराध्यक्षांचे नाव नाही

महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वाहिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळी शिलालेखावर नगराध्यक्षांचे नाव वगळण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकार जातीयवाद मानला गेला नाही, मग आता नमो उद्यानाच्या फलकाच्या प्रकरणातच जातीयवादाचा मुद्दा पुढे का आणला जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

“आपल्या चुका दुर्लक्षित करून इतरांवर आरोप करणे योग्य आहे का?” असा सवालही समाजमाध्यमांवर चर्चेत आहे. या सर्व घडामोडींमुळे वणी शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे.

सध्या या वादाकडे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले असून, पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सृजन अभियानांतर्गत उद्या वणी येथे काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

0

News Today

वणी : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभरात पक्ष बांधणी व संघटन मजबुतीसाठी राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियान अंतर्गत वणी विधानसभा मतदारसंघात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक बुधवार, 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता वसंत जिनिंग सभागृह, वणी येथे पार पडणार आहे.

बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संजय कपूर, वणी-चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, निरीक्षक सुनिल केदार, शकूर नगीन, भैय्याजी पवार, माजी आमदार वामनराव कासावर, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, प्रदेश सचिव संजय खाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश भा. पानघाटे यांनी केले आहे.

नाशिक कुंभमेळा टेंडर घोटाळा? वायरल ऑडिओनं महाराष्ट्रात खळबळ, कारवाईत दुजाभावाचा आरोप, 

0

ऑडिओ क्लिपवरून बच्चू कडू यांचेवर गुन्हा नोंद होतो तर नाशिक कुंभमेळा टेंडर मॅनेज प्रकरणी सरकार गप्प का ?

दिलीप भोयर    (News Today )

मुंबई:- नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप समोर येत असून, एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या वायरल ऑडिओमध्ये मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘सेटिंग’ झाल्याचा दावा करण्यात आला असून, संपूर्ण प्रक्रिया मॅनेज केल्याचे सूचित होत आहे.

केवळ ऑडिओ क्लिअर बच्चू कडू यांचेवर गुन्हा नोंद होऊ शकतो तर मग नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी हजारो कोटीचे टेंडर मॅनेज होत असल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. मग या घटनेवर सरकार गप्प का ? असा सवाल जनतेत निर्माण झाला आहे.

एका प्रकरणात लाचखोरीत अटक असलेल्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड यांचा उल्लेख होत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. जर या क्लिपमधील दावे सत्य ठरले, तर हा प्रकार केवळ भ्रष्टाचार नसून सरकारी तिजोरीवर टाकलेला मोठा डाका असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात आमदाराच्या भावाला मारण्याच्या कट केल्याच्या आरोपावरून कथित ऑडिओ क्लिप वायरल होताच त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद करण्यात आला. कडू हे अचलपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असून, ते शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर सातत्याने सरकारला धारेवर धरत असतात.

यामुळेच काही राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगू लागली आहे की, सरकारमधील काही जातीयवादी मंत्र्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्यामुळे बच्चू कडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली का? एका बाजूला तात्काळ गुन्हा नोंद होतो, तर दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धर्माच्या नावाखाली पवित्र मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यात जर भ्रष्टाचार होत असेल, तर हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे.

बघा हजारो कोटींचे टेंडर मॅनेज झाल्याची वायरल व्हिडिओ क्लिप

https://www.facebook.com/share/v/1FgBFJzGgF/

६०० मीटर रस्त्यासाठी मनोज काळे यांचे ‘मरेपर्यंत उपोषणाला सुरवात; मेंढोली-पिंपरी मार्गासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र ; राष्ट्रवादीचे विधानसभाध्यक्ष दिलीप भोयर यांचे आंदोलनाला भेट

0

News Today 

वणी:- मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेंढोली-पिंपरी जोडरस्त्याच्या प्रश्नाने अखेर तीव्र स्वरूप धारण केले असून, वन विभागाच्या जागेतून जाणाऱ्या केवळ ६०० मीटरचा रस्ता न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेंढोली येथील समाजकार्यकर्ते मनोज काळे यांनी ३ एप्रिलपासून मरणांत उपोषणाला सुरुवात केली आहे.

सदर रस्ता अपूर्ण असल्यामुळे पिंपरी गावात जाण्यासाठी नागरिकांना तब्बल ३० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे, तर प्रत्यक्ष अंतर केवळ ३ किलोमीटर आहे. या समस्येमुळे शेतीकाम, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून, अनेक वेळा ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

याच पार्श्वभूमीवर मनोज काळे यांनी मेंढोली शिवारातील जंगलालगतच्या शेतात मंडप उभारून उपोषण सुरू केले आहे. सध्याच्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज काळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करत रस्त्याच्या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बांगळे यांच्यासह प्रत्यक्ष रस्त्याची पाहणीही करण्यात आली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मोरेश्वर पोतराजे, राजू झाडे, वसंता कोहळे, प्रवीण झाडे, सुरेश गोरे, लटारी पिंपळकर , रामकृष्ण मोहारे , गजानन तुरणकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपोषणाला पिंपरी येथील सरपंच तातोबा पावडे, मेंढोली येथील सरपंच सविताताई ढवस, विनायक ढवस, पंढरी ताजने, प्रकाश भोसले पिपंरी व मेंढोली गावातील तमाम ग्रामवाशी आदी परिश्रम घेत आहे.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत? ११४७ एकर जमिनीचा दावा; व्हिडिओ व्हायरलमुळे राज्यात खळबळ

0

दिलीप भोयर News Today

मुबई:- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक धक्कादायक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कामठी मतदारसंघात तब्बल 1147 एकर जमीन असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या व्हिडिओमध्ये मंत्री बावनकुळे यांच्या पत्नी सौ. ज्योती, मुलगा संकेत आणि मुलगी पायल यांच्या नावाने ही जमीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी गाडी किंवा बंगला नसावा अशी अट मांडणाऱ्या मंत्र्यांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ही पोलखोल केल्याचा दावा रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी केला आहे. त्यांनी “बोल बिंदास बोल” या कार्यक्रमातून हा व्हिडिओ सादर करत गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांच्या विधानाविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे.

दरेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकरी पुत्र घाबरत नाही, तो लढतो,” आणि त्यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान दिले आहे. या प्रकरणात पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्यावतीनेही गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेले पुरावे सत्य आहेत का, याची अधिकृत चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.

सध्या या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे जनतेत संभ्रम आणि संताप दोन्ही भावना दिसून येत आहेत.

आता या आरोपांवर मंत्री बावनकुळे किंवा सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बघा व्हिडिओची लिंक

https://www.facebook.com/share/v/1Arn17eEgJ/

टीप – वणी न्यूज टुडे कोणतीही पुष्टी करीत नाही

पंढरपूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन

0

     २ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणीची अंतिम तारीख

News Today 

पंढरपूर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर, सांगोला रोड, पंढरपूर येथे दिनांक ५ मे ते २० मे २०२६ या कालावधीत सर्वांगीण सुसंस्कार शिबीर २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये १२ ते २० वयोगटातील मुला-मुलींना सहभाग घेता येणार आहे.

या शिबिरात ध्यान, प्रार्थना, योग-प्राणायाम, ग्रामगीता व भगवद्गीता अभ्यास, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण रक्षण, लाठी-काठी, कराटे, भजन, संगीत, वादनकला तसेच वैदिक गणित यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नम्रता, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा या शिबिराचा उद्देश आहे.

शिबिराचे अध्यक्ष प्रा. जनार्दन देठे असून सचिवपदी दिलीप भाऊ भोयर कार्यरत आहेत. शिबिराचे प्रमुख सेवकरामदादा असून मार्गदर्शनासाठी गजानन घुमनर (गुरुजी), राजुजी घुमनर (गुरुजी), अभिराज पवार, कु. नंदिनी ठेंगणे, कु. दिव्यानी बोढे हे योग व प्राणायाम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

संगीत व बौद्धिक मार्गदर्शनासाठी सेवकरामदादा, गजानन घुमनर, ह.भ.प. केसाळे दादा, ह.भ.प. गुलाबरावजी महाराज, दिनकर उघडे, बाळासाहेब वाळके यांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच संगीतकार म्हणून डॉ. कल्पेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शिबिराच्या आयोजनात सुरेंद्र नावडे (पुणे), सुधीर गायकवाड, जामदार महाराज (बेलवाडी), अॅड. राजाभाऊ व्यवहारे, चंपत पाचभाई, आण्णासो पवार, महादेव फरफार, मंगलाताई बोबडे, दिग्विजय, दिनकर उपबळे, भिमराव डोके, कृष्णात पवार, नंदकुमार पवार, दत्ता गाडे, सरसे साहेब, पेटकर, विनोद दादा विधाते, माणिक दादा दुकरे, नगरकर काकाजी आदींचे सहकार्य लाभत आहे.

शिबिरासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २ मे २०२६ असून व्यवस्थापन फी ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. शिबिरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना जेवण व नाश्ता मोफत देण्यात येणार आहे.

पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात आमदार संजय देरकर यांची मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्टॉलला भेट

0

News Today 

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाला संजय देरकर (वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार) यांनी उत्स्फूर्त भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्टॉलला भेट देऊन कंपनीकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध कृषी उत्पादनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

आमदार संजय देरकर यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल विशेष रस दाखवला. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण कसे साध्य होऊ शकते, याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले.

या प्रसंगी BTM बनसोड तसेच कृषी सहाय्यक कुडमेथे उपस्थित होते. त्यांनीही कंपनीच्या उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व अधोरेखित केले.

या भेटीमुळे मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुरामुळे शेत उद्ध्वस्त, नुकसानभरपाई नाही तर आमरण उपोषण!” – शेतकऱ्याचा इशारा

0

News Today 

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी अंकित शंकर डोहे यांनी परिसरातील औद्योगिक प्रदूषणाविरोधात तीव्र भूमिका घेतली असून, नुकसानभरपाई न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर व ईशान्य कल्सी परिसरातील डोलोमाईट कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर धूर आणि धूळ निर्माण होत आहे. विशेषतः EXCELLO FIN LEA LIMITED CHILAI DOLOMITE MINES CHILAI आणि ईशान्य कल्सी कंपनीमधून निघणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतीचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंकित डोहे यांच्या मते, कंपनीतून निघणारा धूर थेट शेतांवर परिणाम करत असून पिके नष्ट होत आहेत. तसेच कंपनीच्या वाहतुकीमुळे उडणारी धूळ शेतात साचत असल्याने जनावरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून दरवर्षी नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, ८ दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ईशान्य कल्सी कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

यवतमाळात ९ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठक

0

News Today

यवतमाळ : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक ९ मार्च रोजी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे पार पडणार आहे.

या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील भूषविणार आहेत. जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व दिले जात आहे.

बैठकीमध्ये पक्ष बळकटीकरण, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी तसेच संघटन बांधणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, याबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

या बैठकीसाठी सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

वणीत “नमो उद्यान”योजनेवर श्रेयवादासाठी बोदकुरवरांचे घाणेरडे राजकारण? — स्व प्रसिद्धीसाठी लाजिरवाणा प्रयत्न उघड, सर्वत्र उमटला टीकेचा सूर

0

News Today 

दिलीप भोयर

वणी:- वणी, मारेगाव आणि झरी येथे “नमो उद्यान” योजनेसाठी प्रत्येकी ₹१ कोटी असा एकूण ₹३ कोटी निधी राज्य शासनाने मंजूर केला. योजना राज्य शासनाची, निधी शासनाचा आणि अंमलबजावणी प्रशासनाकडून — हे सर्व स्पष्ट असताना माजी आमदार बोदकुरवार कडून या निर्णयाचे श्रेय घेण्याचा आटापिटा सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. ही योजना राज्य शासनाची असून स्व प्रसिद्धीसाठी हा लाजिरवाणा प्रयत्न केल्याने सर्वत्र टीकेचा सूर उमटत आल्याची चर्चा ऐकायला येत आहे. त्यामुळे भाजपची प्रतिमा चांगलीच मल्लिन होत असल्याने वरिष्ठांनी अश्या प्रकारावर बोदकुरवरांचे चांगलेच कान टोचल्याचे बोलल्या जात आहे.

योजना शासनाची… मग श्रेय कोणाचे?

“नमो उद्यान” ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत योजना आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी हरित उद्याने विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि निधीही शासनानेच मंजूर केला.
अशा परिस्थितीत माजी आमदारांचा अधिकृत निर्णयप्रक्रियेत कोणताही अधिकार नसताना पोस्टरबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर डोक्याला हात लावण्याची वेळ निर्माण झाली आहे. माजी आमदार बोदकुरवार यांना आभार मानायचे असेल तर राज्य सरकारचे मानायला हवे होते. स्वतःचे आभार मानून प्रसिद्धीचा लाजिरवाणा प्रयत्न उघड पडला आहे.

 विद्यमान आमदार देरकरांविषयी व्देष?

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की हा प्रकार केवळ विकासाच्या नावाखालील प्रसिद्धीचा खेळ नसून विद्यमान आमदार संजय देरकर यांच्याविषयीचा व्देष व्यक्त करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे का?
कारण, मतदारसंघात शासनाच्या योजनेचे श्रेय स्थानिक पातळीवर विद्यमान आमदारांना मिळू नये, यासाठीच ही घाईगडबड सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

बोदकुरवारांचा प्रसिद्धीसाठी हपापलेपणा?

निधी मंजुरीचे अधिकृत श्रेय शासनाचे असताना स्वतःचे फोटो लावून आभार प्रदर्शन करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार नाही का?
हा केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेला केविलवाणा प्रयत्न आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 जनतेचा सूर काय? नागरिकांचे स्पष्ट मत आहे 

“विकासाचे काम स्वागतार्ह आहे. पण शासनाच्या योजनेचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करणे ही जनतेची दिशाभूल आहे.”“नमो उद्यान”मुळे शहरांचे सौंदर्य वाढणार, हरित क्षेत्र विकसित होणार — हे निश्चित. मात्र विकासाच्या नावाखाली श्रेयवादाचे राजकारण करून मतदारांची दिशाभूल करणे योग्य ठरणार नाही.
जनतेला हवा आहे पारदर्शक विकास… नुसती पोस्टरबाजी नव्हे!