Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog

वणी विधानसभेतून विधान परिषदेसाठी नवे समीकरण? अभ्यासू चेहऱ्याची चर्चा रंगली

0

दिलीप भोयर

News Today 

वणी प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी लवकरच निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, वणी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या गोटात वणीतील एका अभ्यासू आणि संघटनक्षम चेहऱ्याला संधी देण्याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे नाव विशेषतः पुढे येत आहे. पिदुरकर यांनी तब्बल दहा वर्षे प्रभावी नेतृत्व करत स्थानिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओबीसी समाजातील अभ्यासू व सक्रिय नेते म्हणून त्यांची प्रतिमा असून, त्यामुळेच पक्षाच्या अंतर्गत चर्चांमध्ये त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी असलेले ज्यांचे जवळचे संबंधही त्यांच्या दावेदारीला बळ देणारे ठरत आहेत. विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्यातील वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्याशी असलेले त्यांचे निकट संबंध लक्षात घेता, पक्षाकडून त्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, वणी विधानसभा क्षेत्रातून यावेळी विधान परिषदेसाठी प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्थानिक पातळीवर नाराजी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे भाजप नेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत, वणीतील राजकारण सध्या निर्णायक टप्प्यावर असून, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे समीकरण आकार घेताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत याबाबतची चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

त्याच बरोबर आपल्या वणी शहराच्या नगराध्यक्षपदावर असताना वणी शहराचा संपूर्ण काया पालट करणारे माजी नगराध्यक्ष युवा नेतृत्व तारेंद्र बोर्डे, संघाचे जिगरी पदाधिकारी रवी बेलुरकर, तसेच सर्वांसोबत सन्मानाने व संयमाने वागणारे दिनकर पावडे यांचे देखील नाव चर्चेत आहे. 

विविध सामाजिक संघटनांचे राष्ट्रपतींना निवेदन; “जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय डिलिमिटेशन नको”

0

वणी नशेच्या विळख्यात; ‘ड्रग्स-दारू-तंबाखू’ माफियांचा उघड दहशतवाद, राजकीय छत्रछायेखाली शहर पोखरले!

0

दिलीप भोयर  (News Today)

वणीत काल एम.डी. (मेफेड्रोन) प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर वणी शहरातील वास्तव अधिकच भयावह स्वरूपात समोर येत आहे. शहरात सध्या ड्रग्स, गांजा, बनावट दारू आणि बंदी असलेले सुगंधित तंबाखू यांचा अक्षरशः पूर आला असून, हा सगळा अवैध बाजार उघडपणे, निर्भयपणे आणि कोणत्याही भीतीशिवाय सुरू असल्याचे चित्र आहे. या गंभीर गुन्हेगारी प्रकाराला कमळाबाईसोबत छुपा संबंध आल्याचे आरोप सर्रासरित्या केल्या जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून जनमानसात प्रचंड रोष तयार होत आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या नशेच्या जाळ्यात आता केवळ तरुणच नव्हे, तर अल्पवयीन मुलंही ओढली जात आहेत. शहरातील काही भागात लहान मुलं गांजाचा हुक्का ओढताना दिसत असल्याने सामाजिक अध:पतन किती खोलवर गेले आहे, याचा अंदाज येतो. “पुढची पिढी वाचणार तरी कशी?” असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. लोकशाहीत ज्यांना लोक लोकांच्या होता निवडून पाठवीत आहे. ते लोकांना नशेच्या घाईत लोटत आहे. असे आरोप आता उमटायला सुरवात झाली आहे.

दरम्यान, शहराच्या काही भागांमध्ये बनावट दारू तयार करण्याचे कारखानेच सुरू असल्याची चर्चा आहे. ही विषारी दारू बंदी असलेल्या भागात पाठवली जात असून, यामुळे अल्पावधीत मृत्यूच्या घटनाही घडत आहेत. यापूर्वी दारूबंदी विभागाने साठे जप्त करूनही हा काळाबाजार थांबत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एम.डी. ड्रग्सचा वाढता सुळसुळाट हा तर आणखी भयंकर आहे. काल (ता. १८) वणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली खरी; पण ही कारवाई केवळ ‘छोट्या माशां’पुरतीच मर्यादित असल्याची टीका जोर धरत आहे. “मोठे मासे कोणाच्या आशीर्वादाने मोकाट फिरत आहेत?” हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

याशिवाय, शहरभर बंदी असलेला सुगंधित तंबाखूचा खर्रा खुलेआम विकला जात आहे. या विषारी पदार्थामुळे तरुणांचे तोंड अक्षरशः बंद होत आहे, कर्करोगासारखे गंभीर आजार वाढत आहेत, आणि अनेकांना साधे जेवण करणेही कठीण झाले आहे. तरीही या विक्रेत्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नाही.

या सर्व प्रकारांमागे केवळ गुन्हेगारी टोळ्या नाहीत, तर त्यांना मिळणारे राजकीय संरक्षण हा अधिक गंभीर मुद्दा असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. काही सत्ताधारी मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना या अवैध धंद्यात ढकलत असल्याचे आरोप होत आहेत. जलद पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी तरुणांना गुन्हेगारीच्या खाईत लोटले जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, “उद्घाटनं आणि श्रेयवाद सोडून आता तरी प्रशासन जागं होणार का?” असा थेट सवाल केला जात आहे.

वणी शहर आज अक्षरशः नशेच्या माफियांच्या ताब्यात जात असल्याची भीती व्यक्त होत असून, जर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वरील सर्व अवैध्य व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे कनेक्शन केवळ कमळाबाई सोबत जुडत आहे. त्यामुळे सत्तेतील काही पुढारी स्वार्थी राजकारण तरुणाईला नशेच्या खाईत लोटून आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचे आरोप होत आहे.

वणीत एम.डी. ड्रग्जचा जोरदार धंदा; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त — आरोपींचे ‘कमळाबाई कनेक्शन’ चर्चेत, प्रकरण तापले, सत्ताधारी श्रेयवादाच्या उद्धाटनात व्यस्त

0

दिलीप भोयर

वणी (प्रतिनिधी) – शहरात एम.डी. (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा व्यवसाय जोरात वाढत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असून, पोलिसांनी आज (ता. १८) रोजी शहरातील देशमुख वाडी परिसरात कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. प्रीतम केशवानी व राहुल ठाकूरवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कमळाबाई कनेक्शन असल्याचे चर्चेला ऊत आला आहे.

राज्यात ‘झोंबी ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम.डी.च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वणीसारख्या शहरातही या नशेने शिरकाव केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अमली पदार्थामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होऊन मानसिक संतुलन बिघडणे, आक्रमकता वाढणे, हृदयविकाराचा धोका निर्माण होणे आणि व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकणे असे परिणाम दिसून येतात. त्यामुळे तरुणाई थेट विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय कलाटणी मिळाली असून, अटक केलेल्या आरोपींपैकी एकाचे सत्तेतील कमळाबाईचे संबंध उघड होत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. 

संबंधित आरोपी हा स्थानिक शहर शाखेतील पदाधिकाऱ्याचा चुलत भाऊ असून, शहराच्या उपाध्यक्ष पदाशी त्याचा जवळचा संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे “या अमली पदार्थ साखळीमागे राजकीय संरक्षण आहे का?” असा गंभीर सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

त्याच बरोबर यातील एका आरोपीने काही दिवसापूर्वी एका मामा नामक माजी पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढदिवसाचे बॅनर देखील झडकले होते असे शहरात बोलल्या जात आहे. 

यापूर्वीही शिरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त झाले होते. मात्र, त्या वेळीही ‘मोठे मासे’ हाती लागले नाहीत, अशी टीका झाली होती. सध्याच्या प्रकरणातही केवळ स्थानिक पातळीवरील आरोपींवर कारवाई होत असताना, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अशा गंभीर परिस्थितीत तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर असताना, स्थानिक सत्ताधारी मात्र उद्घाटन सोहळे आणि श्रेयवादाच्या राजकारणात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. रोजगार, व्यसनमुक्ती आणि कायदा-सुव्यवस्था यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी जनतेत पसरली आहे.

“तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकत असताना नेते राजकारणात रमले आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संपूर्ण घडामोडींमुळे वणी शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणातील कमळाबाई कनेक्शन’ नेमके कितपत खरे आहे आणि तपासातून आणखी काय उलगडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वणी शहरातील नमो उद्यान प्रकल्पाच्या फलकावरून राजकारण तापले, सत्तेतील माजी आमदारांचा वणीच्या विकास कामातील हस्तक्षेपामुळे जनतेत चर्चेला ऊत 

0

दिलीप भोयर

News Today 

वणी शहरातील “नमो उद्यान” प्रकल्पाच्या फलकावरून निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र झाला असून, या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक रंग धारण केला आहे. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या उद्यानाच्या फलकावर विद्यमान आमदार संजय देरकर यांचे नाव नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी माजी आमदार बोदकुरवार वणी शहरासह परिसरातील विकास कामात हस्तक्षेप घालून सत्तेचा माज दाखवत अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड चर्चेला ऊत येत असून घाणेरड्या राजकारणाची परंपरा उभी होत असल्याची टीका देखील उमटत आहे. 

शासनाच्या प्रोटोकॉलनुसार शासनाच्या विकास कामावरील अशा फलकावर विद्यमान आमदार संजय देरकर नाव असणे अपेक्षित असताना, माजी आमदार बोदकुरवार यांचे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यामागे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही पुढे येत आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उबठा) गटाचे आमदार संजय देरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नमो उद्यानाचा फलक तयार करून त्यांचे उद्धाटन परस्पर केल्याने भाजपाच्या फलकाचा केवळ देखावा निर्माण झाला आहे. या फलकावर नगराध्यक्ष यांचे नाव व फोटो असल्याने त्या विशिष्ट समाजाच्या महिला नगराध्यक्षांचा अपमान झाल्याचा आरोप विरोधी गटाकडून करण्यात येत असला तरी कोणतीही जातीवाचक घटना घडली नाही. असे असताना केवळ राजकारण करीत जातीय वादाला समोर करून भाजप आपले राजकारण घडवित असल्याचे आरोप जनतेतून केल्या जात आहे. 

मात्र, याच दरम्यान मागील ११ एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आले होते तेव्हा शिलालेखावर शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांचे नाव वगळले तेव्हा नगराध्यक्षा व त्यांच्या व समाजाचा अपमान चक्क भाजपा कडूनच झाला नाही का ? असा शहरात एक महत्त्वाचा सवालही उपस्थित केला जात आहे. केवळ एका विशिष्ट समाजाचे नाव समोर करून राजकारण तापविणाऱ्या भाजपची सर्वत्र चेष्टा उडवल्या जात आहे. 

याच शिलालेखावर नगराध्यक्षांचे नाव नाही

महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वाहिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळी शिलालेखावर नगराध्यक्षांचे नाव वगळण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकार जातीयवाद मानला गेला नाही, मग आता नमो उद्यानाच्या फलकाच्या प्रकरणातच जातीयवादाचा मुद्दा पुढे का आणला जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

“आपल्या चुका दुर्लक्षित करून इतरांवर आरोप करणे योग्य आहे का?” असा सवालही समाजमाध्यमांवर चर्चेत आहे. या सर्व घडामोडींमुळे वणी शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे.

सध्या या वादाकडे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले असून, पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सृजन अभियानांतर्गत उद्या वणी येथे काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

0

News Today

वणी : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभरात पक्ष बांधणी व संघटन मजबुतीसाठी राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियान अंतर्गत वणी विधानसभा मतदारसंघात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक बुधवार, 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता वसंत जिनिंग सभागृह, वणी येथे पार पडणार आहे.

बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संजय कपूर, वणी-चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, निरीक्षक सुनिल केदार, शकूर नगीन, भैय्याजी पवार, माजी आमदार वामनराव कासावर, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, प्रदेश सचिव संजय खाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश भा. पानघाटे यांनी केले आहे.

नाशिक कुंभमेळा टेंडर घोटाळा? वायरल ऑडिओनं महाराष्ट्रात खळबळ, कारवाईत दुजाभावाचा आरोप, 

0

ऑडिओ क्लिपवरून बच्चू कडू यांचेवर गुन्हा नोंद होतो तर नाशिक कुंभमेळा टेंडर मॅनेज प्रकरणी सरकार गप्प का ?

दिलीप भोयर    (News Today )

मुंबई:- नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप समोर येत असून, एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या वायरल ऑडिओमध्ये मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘सेटिंग’ झाल्याचा दावा करण्यात आला असून, संपूर्ण प्रक्रिया मॅनेज केल्याचे सूचित होत आहे.

केवळ ऑडिओ क्लिअर बच्चू कडू यांचेवर गुन्हा नोंद होऊ शकतो तर मग नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी हजारो कोटीचे टेंडर मॅनेज होत असल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. मग या घटनेवर सरकार गप्प का ? असा सवाल जनतेत निर्माण झाला आहे.

एका प्रकरणात लाचखोरीत अटक असलेल्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड यांचा उल्लेख होत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. जर या क्लिपमधील दावे सत्य ठरले, तर हा प्रकार केवळ भ्रष्टाचार नसून सरकारी तिजोरीवर टाकलेला मोठा डाका असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात आमदाराच्या भावाला मारण्याच्या कट केल्याच्या आरोपावरून कथित ऑडिओ क्लिप वायरल होताच त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद करण्यात आला. कडू हे अचलपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असून, ते शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर सातत्याने सरकारला धारेवर धरत असतात.

यामुळेच काही राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगू लागली आहे की, सरकारमधील काही जातीयवादी मंत्र्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्यामुळे बच्चू कडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली का? एका बाजूला तात्काळ गुन्हा नोंद होतो, तर दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धर्माच्या नावाखाली पवित्र मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यात जर भ्रष्टाचार होत असेल, तर हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे.

बघा हजारो कोटींचे टेंडर मॅनेज झाल्याची वायरल व्हिडिओ क्लिप

https://www.facebook.com/share/v/1FgBFJzGgF/

६०० मीटर रस्त्यासाठी मनोज काळे यांचे ‘मरेपर्यंत उपोषणाला सुरवात; मेंढोली-पिंपरी मार्गासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र ; राष्ट्रवादीचे विधानसभाध्यक्ष दिलीप भोयर यांचे आंदोलनाला भेट

0

News Today 

वणी:- मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेंढोली-पिंपरी जोडरस्त्याच्या प्रश्नाने अखेर तीव्र स्वरूप धारण केले असून, वन विभागाच्या जागेतून जाणाऱ्या केवळ ६०० मीटरचा रस्ता न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेंढोली येथील समाजकार्यकर्ते मनोज काळे यांनी ३ एप्रिलपासून मरणांत उपोषणाला सुरुवात केली आहे.

सदर रस्ता अपूर्ण असल्यामुळे पिंपरी गावात जाण्यासाठी नागरिकांना तब्बल ३० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे, तर प्रत्यक्ष अंतर केवळ ३ किलोमीटर आहे. या समस्येमुळे शेतीकाम, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून, अनेक वेळा ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

याच पार्श्वभूमीवर मनोज काळे यांनी मेंढोली शिवारातील जंगलालगतच्या शेतात मंडप उभारून उपोषण सुरू केले आहे. सध्याच्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज काळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करत रस्त्याच्या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बांगळे यांच्यासह प्रत्यक्ष रस्त्याची पाहणीही करण्यात आली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मोरेश्वर पोतराजे, राजू झाडे, वसंता कोहळे, प्रवीण झाडे, सुरेश गोरे, लटारी पिंपळकर , रामकृष्ण मोहारे , गजानन तुरणकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपोषणाला पिंपरी येथील सरपंच तातोबा पावडे, मेंढोली येथील सरपंच सविताताई ढवस, विनायक ढवस, पंढरी ताजने, प्रकाश भोसले पिपंरी व मेंढोली गावातील तमाम ग्रामवाशी आदी परिश्रम घेत आहे.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत? ११४७ एकर जमिनीचा दावा; व्हिडिओ व्हायरलमुळे राज्यात खळबळ

0

दिलीप भोयर News Today

मुबई:- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक धक्कादायक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कामठी मतदारसंघात तब्बल 1147 एकर जमीन असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या व्हिडिओमध्ये मंत्री बावनकुळे यांच्या पत्नी सौ. ज्योती, मुलगा संकेत आणि मुलगी पायल यांच्या नावाने ही जमीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी गाडी किंवा बंगला नसावा अशी अट मांडणाऱ्या मंत्र्यांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ही पोलखोल केल्याचा दावा रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी केला आहे. त्यांनी “बोल बिंदास बोल” या कार्यक्रमातून हा व्हिडिओ सादर करत गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांच्या विधानाविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे.

दरेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकरी पुत्र घाबरत नाही, तो लढतो,” आणि त्यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान दिले आहे. या प्रकरणात पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्यावतीनेही गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेले पुरावे सत्य आहेत का, याची अधिकृत चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.

सध्या या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे जनतेत संभ्रम आणि संताप दोन्ही भावना दिसून येत आहेत.

आता या आरोपांवर मंत्री बावनकुळे किंवा सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बघा व्हिडिओची लिंक

https://www.facebook.com/share/v/1Arn17eEgJ/

टीप – वणी न्यूज टुडे कोणतीही पुष्टी करीत नाही

पंढरपूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन

0

     २ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणीची अंतिम तारीख

News Today 

पंढरपूर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर, सांगोला रोड, पंढरपूर येथे दिनांक ५ मे ते २० मे २०२६ या कालावधीत सर्वांगीण सुसंस्कार शिबीर २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये १२ ते २० वयोगटातील मुला-मुलींना सहभाग घेता येणार आहे.

या शिबिरात ध्यान, प्रार्थना, योग-प्राणायाम, ग्रामगीता व भगवद्गीता अभ्यास, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण रक्षण, लाठी-काठी, कराटे, भजन, संगीत, वादनकला तसेच वैदिक गणित यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नम्रता, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा या शिबिराचा उद्देश आहे.

शिबिराचे अध्यक्ष प्रा. जनार्दन देठे असून सचिवपदी दिलीप भाऊ भोयर कार्यरत आहेत. शिबिराचे प्रमुख सेवकरामदादा असून मार्गदर्शनासाठी गजानन घुमनर (गुरुजी), राजुजी घुमनर (गुरुजी), अभिराज पवार, कु. नंदिनी ठेंगणे, कु. दिव्यानी बोढे हे योग व प्राणायाम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

संगीत व बौद्धिक मार्गदर्शनासाठी सेवकरामदादा, गजानन घुमनर, ह.भ.प. केसाळे दादा, ह.भ.प. गुलाबरावजी महाराज, दिनकर उघडे, बाळासाहेब वाळके यांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच संगीतकार म्हणून डॉ. कल्पेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शिबिराच्या आयोजनात सुरेंद्र नावडे (पुणे), सुधीर गायकवाड, जामदार महाराज (बेलवाडी), अॅड. राजाभाऊ व्यवहारे, चंपत पाचभाई, आण्णासो पवार, महादेव फरफार, मंगलाताई बोबडे, दिग्विजय, दिनकर उपबळे, भिमराव डोके, कृष्णात पवार, नंदकुमार पवार, दत्ता गाडे, सरसे साहेब, पेटकर, विनोद दादा विधाते, माणिक दादा दुकरे, नगरकर काकाजी आदींचे सहकार्य लाभत आहे.

शिबिरासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २ मे २०२६ असून व्यवस्थापन फी ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. शिबिरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना जेवण व नाश्ता मोफत देण्यात येणार आहे.

पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.