Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 6

वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक : प्रभाग 4 मध्ये सागर मुने यांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद

0

News Today 

वणी : वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवार सागर मुने यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. विरोधकांनी “सागर मुनेला मतदान करू नका” असा प्रचार केल्याने त्यांच्या नावाची जनतेत अधिक चर्चा होत असून हेच त्यांना अनपेक्षित प्रसिद्धी मिळण्याचे कारण ठरत असल्याची चर्चादेखील होत आहे.

सागर मुने यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, जनतेशी सातत्याने संवाद साधत सामाजिक कार्याचा दाखला देत ते प्रचार करत आहेत. “कोणताही मोठा राजकीय चेहरा नसतानाही स्वतःच्या विश्वासावर आणि कार्यशक्तीवर मी निवडणूक लढवत आहे,” असे ते सांगतात. नागरिकांकडून “तुम्ही सामाजिक कामामुळे ओळखता, आमचं ठरल आहे” अशा प्रतिक्रिया मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघर्षपूर्ण वातावरणात विरोधक allegedly मतदारांना विविध प्रलोभने देत असल्याची चर्चा असून त्याबाबत मुने यांनी मतदारांना आवाहन केले की, “कोणी पैसे, मेजवानी किंवा इतर काही देत असेल तर घ्या, पण मतदान मात्र योग्य व्यक्तीला करा—जो समाजासाठी कार्य करतो, सुजाण व सुशिक्षित आहे.”

दरम्यान, स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, पत्रकारिता क्षेत्रात व लहान व्यावसायिकांसाठी मदत करणारा चेहरा म्हणून सागर मुने यांची ओळख तयार झाली आहे. त्यामुळे प्रभाग 4 मध्ये त्यांची मजबूत स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. विरोधकांनी त्यांना हलक्यात घेतल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली असून, जनतेत त्यांच्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

आगामी 3 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर प्रभाग 4 मधील स्पर्धेचे पारडे कोणत्या दिशेने झुकते हे स्पष्ट होणार आहे.

वणी नगर परिषदेत प्रभाग १ कडून माजी नगरसेवक प्रकाश पिंपळकर यांना पुन्हा संधी? मतदारांचा कल सकारात्मक

0

News Today 

वणी – नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील राजकीय वातावरणाला आता वेग येऊ लागला असून माजी नगरसेवक प्रकाश पिंपळकर यांच्या पुनर्निवडीबाबत मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे. 

गेल्या कार्यकाळात प्रभागात केलेल्या विकासकामांच्या भक्कम पायावर मतदार पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकण्यास उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे.

आपल्या कार्यकाळात पिंपळकर यांनी रस्ते-विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज लाइन सुधारणा आदी अनेक मूलभूत प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले होते. यामुळे प्रभागात दृश्यमान बदल घडून आले होते. विकासाबरोबरच त्यांनी नागरिकांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांवर तत्परतेने काम केल्याने त्यांची ओळख काम करणारा जननेता अशी निर्माण झाली.

प्रभागातील नागरिकांशी त्यांचा दांडगा लोकसंपर्क ही त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठी ताकद मानली जाते. घरोगरी जाऊन केलेली भेट, नागरिकांशी राखलेला स्नेहयुक्त संवाद आणि कोणत्याही समस्येला नकार न देता केलेला पाठपुरावा यामुळे पिंपळकरांविषयी मतदारांमध्ये आजही विश्वासाची भावना टिकून आहे.

आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्याचा कल मतदारांमध्ये दिसू लागल्याने प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणूक अधिक चुरशीची आणि उत्सुकतेची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

डोंगरगाव येथे समाज प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न, दिलीप भोयर यांच्या प्रबोधनाने गावकरी मंत्रमुग्ध

0

News Today 

वणी तालुक्यातील डोंगरगाव (विरकुंड) येथे क्रांतिवीर श्यामादादा कोलाम, भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर राणी दुर्गावती, क्रांतिकारी बाबुराव शेडमाके, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती तसेच संविधान दिनानिमित्त भव्य समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी समाज भूषण पैकुजी आत्राम यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीरामजी पेंदोर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, लढा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खानझोडे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष उठाव देणारी ठरली.

प्रमुख प्रबोधनपर भाषणात दिलीप भोयर यांनी समाजातील अनिष्ट रूढी–परंपरा आणि अंधश्रद्धांवर सोप्या, प्रभावी आणि थेट भाषेत प्रहार करत गावकऱ्यांना जागृती, शिक्षण आणि प्रगतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. संत-महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळात किती नितांत गरज आहे, यावरही त्यांनी ऐतिहासिक पुरावे आणि उदाहरणांसह प्रकाश टाकला. त्यांच्या प्रभावी भाषणादरम्यान उपस्थित ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन पार्वती सोयाम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामकिशन मेश्राम, महादेव मडावी, नितेश सुरपाम, रुपेश टेकाम यांच्यासह अनेक तरुण मंडळींनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

समाजजागृती, सांस्कृतिक मूल्यांचा सन्मान आणि आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मरणातून एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या मनात चिरंतन ठसा उमटवून गेला.

राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा, नगर नियोजनाच्या विकासासाठी (TPS) वणीकरांच्या मानगुटीवर बसणार टॅक्स वाढीचा राक्षस, मतदारांनो व्हा सावधान,

0

मामाचा कारनामा – भाग ३

News Today

वणी – नगर नियोजन योजनेच्या (TPS) घोटाळ्याचे धागेदोरे उलगडत असताना आता या योजनेचा सर्वात भयावह चेहरा समोर येऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून, नियमांना पायदळी तुडवून, पर्यावरणाची राखरांगोळी करत ‘सोन्याची खाण’ आपल्या खाजगी टोळीला देण्याचा कट रचणाऱ्या टोळक्याने आता योजनेच्या विकासाचा संपूर्ण आर्थिक बोजा वणीकरांच्या माथी मारण्याची तयारी केली आहे.

खरे तर सर्व सामान्य जनतेच्या डोक्यावरून जाणारा हा विषय आहे. जेवढ दिसते तेवढाच आम्ही विचार करतो, गोरगरिकांनी केवळ कष्ट करायचे आणि सरकारची तिजोरी भरायची आणि धन राजकीय प्रतिनिधी तो जमा झालेला निधी धन डानग्यांची तिजोरीत भर पडण्यासाठी योजना आखून त्यावर निधी खर्च करायचा हा वणीच्या राजकीय क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून खाजपचे माजी आमदार बोडकुडवार यांनी थंड डोक्याची शिजवलेला एक कट आहे. 

शहरवाढ, पायाभूत सुविधा, रोड–ड्रेनेज, लाईट्स, उद्याने—हे सगळे TPS योजनेनुसार शासकीय निधीतून किंवा नियमानुसार होणे अपेक्षित असताना, वणीतील योजनामध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे.

ज्यांनी कट रचला, ज्यांनी शेतजमिनी काबीज केल्या, ज्यांनी करोडोंची सोन्याची खाण उभी केली—त्यांना फायदा. आणि ज्यांचा या कारस्थानाशी काही संबंध नाही अशा वणीकरांना भरायचा कर

 

वणीकरांच्या मानगुटीवर बसणार अतिरिक्त टॅक्सचा राक्षस”

सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांची आणि हितचिंतकांची बडदास्त ठेवण्याची किंमत आता सर्वसामान्य वणीकरांना मोजावी लागणार आहे. TPS विकासासाठी प्रचंड निधी आवश्यक आहे.

तो कुठून येणार?
शासनाकडून? नाही.
व्यापाऱ्यांकडून? अजिबात नाही.
जमिनी गिळंकृत करणाऱ्या बड्या मांडवळ्यांकडून? नाहीच.

हा सगळा बोजा आता कराच्या नावाखाली वणी शहरातील नागरिकांच्या खिशातून काढण्याचा डाव आखला जातो आहे.

लोकांच्या अंगावर कराचे नवे–नवे बोजे टाकून TPS विकासाचा खर्च चुकता केला जाणार अशी चर्चा वेग घेत आहे. कर भरायचा वणीकरांनी आणि नफा मिळवायचा खासगी हितसंबंधी आणि व्यापाऱ्यांनी—ही तर थेट लूट!
विकास नाही, केवळ “व्यापारी विकास”

वणीतील स्थानिक नागरिकांचा प्रश्न अगदी थेट आहे—
“TPS प्लानमुळे वणीचा विकास होणार की काही मोजक्या व्यापाऱ्यांचा?”

उत्तर स्पष्ट आहे.
ज्या पद्धतीने जमीनविक्रीचे खेळ झाले, झोन बदलले गेले, शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला—ते पाहता हा प्लान वणीच्या विकासासाठी नव्हे, तर काही जणांच्या संपत्ती वाढवण्यासाठी उभारलेला प्रकल्प असल्याचे चित्र लोकांसमोर येऊ लागले आहे.

कर भरताना वणीकर विचारणार – आमचे कसले पाप?

वणीकरांना कर लादून, घरगुती कर वाढवून, प्रॉपर्टी टॅक्स वाढवून किंवा विकास शुल्क उभारून पैसे गोळा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
शहराचा विकास करावा याबद्दल कोणालाही आक्षेप नाही, परंतु— शेतकऱ्यांना फसवून उभारलेला TPS,

बड्या लोकांना फायद्याचा, सामान्य माणसाच्या खिशाला झळ पोहोचवणारा, आणि पर्यावरणाला धोका पोहोचवणारा—

असा प्रकल्प लोकांच्या अंगावर कराच्या रूपाने का टाकायचा?

वणीमध्ये संतापाची लाट

या सर्व प्रकारामुळे वणीकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
स्थानिकांचा आरोप असा—
“वणीचा विकास थांबवून, आमच्या खिशातून पैसा काढून खासगी हितसंबंधींचे साम्राज्य उभे करण्याचा पापकारभार आम्ही का सहन करावा?” असा सवाल वणीतील प्रत्येक जागृत मतदारांमध्ये निर्माण होत आहे.

त्यामुळे या राजकीय माजी आमदार मामाला यावेळी चांगलाच धडा शिकविण्यासाठी जनता सज्ज झाली आहे.

TPS घोटाळ्याने आधीच ज्वाला पेटल्या आहेत. आता या करराक्षसामुळे ही आग आणखी धगधगणार हे निश्चित.

             भाग चार मध्ये  बघायला मिळणार ७/१२ 

TP scheme चा भस्मासूर! शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्व: नातलग आणि व्यापाऱ्यांसाठी हिसकावली ‘सोन्याची खाण’ TPS प्लॅनचा उभारणीवर निर्माण झाले प्रश्न चिन्ह,

0

मामाचा कारनामा – पार्ट २

News Today 

वणी – शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांचे हरकती–आक्षेप नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रियांना बगल देत वणी शहराच्या उपनगरात मंजूर करण्यात आलेल्या TP scheme प्रकल्पावर गंभीर ताशेरे ओढले जात आहेत. नियमांचे कोणतेही पालन न करता, कृषीप्रधान जमिनी स्वतः साठी आणि व्यापाऱ्यांसाठी ‘सोन्याची खाण’ बनविण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वणी येथून मुकुटबन मार्गावर सुमारे ५ किमी परिसरात कुणाला कानोकान खबर न देता उभारण्यात येत असलेल्या या TPS प्रकल्पाचा अलीकडेच पुराव्यांसोबत भांडाफोड झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमानुसार, मुळ शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, त्यांचे हरकती–आक्षेप औपचारिकपणे नोंदविणे आणि शासकीय निधीतून त्या क्षेत्रात सुविधा उभारल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात ५ पटपर्यंत भरघोस मूल्य मिळणे अपेक्षित असते.

मात्र प्रत्यक्षात घडले त्याच्या उलट. शहरालगतच्या जमिनींच्या व्यवहारात शेतकऱ्यांना TPS योजनेची कणभरही माहिती न देता त्या “खासगी ले–आउट”साठी घेत असल्याचे भासविण्यात आले. शेतजमिनीचे फेरफार होऊन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर वणी शहराची हद्दवाढ करून ते क्षेत्र शहरात समाविष्ट करण्यात आले आणि तिथे TPS प्लान तत्काळ मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीवर खंजीर खुपसताना सत्ताधारी गोटातील एका माजी आमदाराचे नाव चर्चेत आहे. या माजी आमदाराने शासनाला दिशाभूल करण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या व कुटुंबाबातील व्यक्तींच्या नावाने ४.८ एकरासह व हितचिंतकांच्या नावाने शेकडो एकर जमीन तेही अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत दिशाभूल करून विकत घेतल्याची प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जमिनी घेताना शेतकऱ्यांना ‘TPS प्लान’ येणार असल्याची कानोकानीही माहिती दिली गेली नव्हती.

यापेक्षाही गंभीर म्हणजे, ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनीला राजकीय दबाव टाकून येलो झोन करण्यात आले, ज्यामुळे TPS प्लान मंजुरीचा मार्ग मोकळा झाला. पर्यावरणाचा बोजवारा उडवून, शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्याऐवजी जमीनपुत्रांना न विचारता व्यापाऱ्यांचे हित साधण्यासाठी पूर्ण शासकीय यंत्रणा वाकवली गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

TPS योजनेचा हेतू शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा न्याय्य मोबदला देत ग्रामीण भागाचा नियोजनबद्ध विकास हा असताना, वणीतील हा प्रकार मात्र उलट चित्र दाखवतो—जिथे सत्ता, जमीनमाफिया आणि प्रशासन यांची जुगलबंदी शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारत असल्याचा सूर उमटू लागला आहे.

परिसरातील शेतकरी आता या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. वणी परिसरातील या TPS प्लान घोटाळ्यावर पुढील काही दिवसांत विधानसभेतही वणवा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत…

“रस्ते बंद, प्रचार ठप्प! अपक्ष उमेदवारांची ‘चिन्ह’अभावी धावपळ; शहरात चर्चांना उधाण” वणी शहरातील उमेदवारांची प्रचारासाठी उडाली तारांबळ

0

News Today 

वणी :- शहरात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असतानाच प्रचाराला गती मिळण्याआधीच अनेक अडथळे उभे राहू लागले आहेत. शहरातील प्रस्थापित उमेदवारांचा प्रचार जवळपास अर्धा मार्ग सरला असला, तरी अपक्ष उमेदवारांना मात्र दुहेरी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे अजून निवडणूक चिन्ह मिळालेले नसल्याने त्यांच्या प्रचाराची अधिकृत सुरुवातही झालेली नाही, तर दुसरीकडे शहरातील रस्ते अचानक बंद झाल्याने गाड्या आणि कार्यकर्त्यांची हालचाल पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

निवडणुकीच्या अगोदर शहरातील कोणत्याही रस्त्याचे काम सुरू नव्हते. मात्र मतदानाची तारीख जाहीर होताच शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये बांधकामांचे ‘महाजनसंपर्क’ सुरू झाल्यासारखे दिसू लागले.

काँक्रीटीकरण आणि दुरुस्तीच्या नावाखाली अनेक मुख्य रस्त्यांसह उपरस्तेही बंद करण्यात आले आहेत. परिणामी, केवळ चार दिवसांच्या प्रचारकाळात अर्धा वेळ रस्ते अडथळ्यांतच जात असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

अडथळ्यांमुळे काही प्रभागांत तर पायी फिरणेही कठीण झाले असून कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. त्यामुळे “हे रस्ते अचानक का?”, “यावेळीच का?” यावरून शहरात चर्चा रंगत आहे.

सत्ताधाऱ्यांकडून जाणूनबुजून असा डाव रचला गेला का, असा प्रश्न जनतेतूनही मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे.

शेवटची चार दिवसांची धावपळ अतिशय महत्त्वाची असतानाच रस्ते बंदी आणि चिन्हअभावी अपक्ष उमेदवार अक्षरशः हवालदिल झाले आहेत. आगामी काही दिवसांत परिस्थिती सुधारते की आणखी गुंतागुंती वाढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वणी हद्दवाडी च्या निमत्ताने सरकार व सामान्य जनतेची फसगत , माजी आमदार आणि त्यांच्या व्यवसायिक भागीदारांचे होणार चांगभलं.

0

लेआऊटसाठी घेतलेल्या जमिनीचे केले स्मार्टसिटीत रूपांतर,

डोक भानावर ठेवून बातमी ऐका आणि वाचा, प्रश्न तुमच्या भविष्याचा आहे.

निवडणूक येतील आणि जातील परंतु आपली फसगत होऊ देऊ नका

News Today 
वणी:- नुकतीच केलेल्या वणी शहराची हद्दवाढ ही संशयच्या भोवऱ्यात सापडली आहे. वणी शहरालगत मुकुटबन मार्गावरील पेटूर शिव लगत तब्बल १२० ते १३० एकर जमीन हद्दवाढीच्या नावाखाली वणी नगरपरिषदेच्या हद्दीत घेण्यात आली आहे. ही जमीन सर्वप्रथम ले आऊटसाठी घेण्यात आली होती परंतु ती शेतजमीन अगदी व्यावसायिक बुद्धी वापरून स्मार्ट सिटी साठी रूपांतरित केली आहे.

त्यातील सुमारे ९८ एकर सुपीक शेतीजमिनी माजी आमदार यांच्या पत्नी व त्यांचे हितचिंतक बिल्डर, डेव्हलपर यांनी नाममात्र दरात लाटल्या या संशयास्पद व्यवहारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

तसेच “स्मार्ट सिटी” प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली ग्रीन झोनमधील जमिनी विकत घेऊन, नंतर राजकीय दबावातून झोन बदल केल्याचे गंभीर आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केल्याची चर्चा ऐन निवडणुकीच्या तोंडावर रंगत आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी ग्रीन झोन ते येलो झोन हा बदल कोट्यवधी रुपयांचा व किचकट प्रक्रियेचा विषय असतो. मात्र, कथित “स्मार्ट सिटी” प्रकल्प दाखवून हा झोनबदल तब्बल ९८ एकरांवर ‘सहज’ मंजूर झाल्याची चर्चा रंगली असून, या संपूर्ण प्रक्रियेवर शेतकरी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

स्थानिकांच्या दाव्यानुसार, या ९८ एकरांपैकी सुमारे ४.८ एकर जमीन माजी आमदार बोदकुरवार यांच्या कुटुंबीये जसे की (पत्नी – भाऊ) आदींच्या नावे असल्याचे बोलले जात आहे. उर्वरित जमीनही त्यांच्या विविध हित संबंधित व्यावसायिक सहकाऱ्यांच्या नावावर घेतल्याचा आरोप होत असून, “संपूर्ण व्यवहार हा आधीच आखलेला आणि ठरवून केलेला प्लॅन” असल्याचा सूर संपूर्ण वणीत निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, सरकारी निधीतून रस्ते, वीज, नाल्या, पाणीपुरवठा, इतर मूलभूत सुविधा उभारून हा तथाकथित स्मार्ट सिटी प्रकल्प उभा करण्यात येत आहे. पुढे या प्रकल्पातील प्लॉट तिप्पट – चौपट दराने विकून काही मोजक्या व्यक्तींना कोट्यवधींचा लाभ मिळवून देण्याची यंत्रणा राबवली जात असून, “जनतेच्या पैशातून जमीन माफियांचे घर भरले जात आहे,” असा संतप्त आरोप शेतकऱ्यांसह वणीकर जनता करीत आहेत.

या व्यवहारांमुळे परिसरात मोठी राजकीय व सामाजिक चर्चा पेटली आहे. विविध संघटनांनी तत्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून झोनबदल, जमीनखरेदी–विक्री व स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, माजी आमदार बोदकुरवार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. स्थानिकांनी केलेल्या आरोपांवर प्रशासन कोणती भूमिका घेते, चौकशी जाहीर होते का, आणि जनतेच्या संतापाला न्याय मिळतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वणीतील श्यामा (मिस्त्री) संगमवार यांचे अल्पशा आजाराने निधन

0

News Today 

वणी : वणी शहरातील लेथ मशीणवाले म्हणून परिचित श्यामा (मिस्त्री) उर्फ श्यामा नरेश संगमवार (वय ४०, रा. राजूर (क.), ता. वणी, जि. यवतमाळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

हसमुख स्वभाव, मदतीला तत्परता आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. पाच दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी वर्धा येथील सावंगी (मेघे) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. सकाळी सुमारास वर्धाहून पार्थिव शरीर राजूर येथे पोहोचेल.कमवता व्यक्ती निघून गेल्याने परिवारावर संकट कोसळले आहे.

ओ “मामा” काल टाकला स्लॅब आज गेले तळे, हाच का तुमच्या भाजपचा विकास, नांदेपेरा मार्गावरील निकृष्ट नाली बांधकामावर नागरिकांत उमटली संतापाची लाट, नगर परिषद निवडणुकीवर थेट परिणाम

0

News Today 

वणी – साई मंदिर ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या नांदेपेरा मार्गावर सुरु असलेल्या नाली व रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जामुळे शहरात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. कालच टाकलेली नाली आज तडे जाऊन बसल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे “हा शहराचा विकास नाही, तर हा मर्जीतील कंत्राटदारांचा विकास,” अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या मतदानावर याचा थेट परिणाम दिसून येणार आहे.

गेल्या एक वर्षापासून आर. व्हि. उंबरकर ही कन्ट्रक्शन कंपनी मार्फत या मार्गावरील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कामाची गती संत गती असल्याची टिका नागरिकांकडून सातत्याने होत आहे. त्यातच दरवेळी दोषपूर्ण आणि टिकाऊपणाचा अभाव असलेले बांधकाम होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, कामाचा दर्जा पाहता हे बांधकाम किती दिवस टिकणार हा मोठा प्रश्न आहे.

सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदाराला काम मिळाल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे आरोप नागरिकांमध्ये खुलेआम व्यक्त होत आहेत. त्यातच या कामात एक माजी लोकप्रतिनिधी ( मामा ) आणि त्याचा आर्थिक कमिशन संबंध जोडलेला भाचा थेट संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.

नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना हा माजी लोकप्रतिनिधी स्वतःच्या ‘विकासकामां’ची ग्वाही देत प्रचार करत आहे. मात्र दुसरीकडे त्याच्याच धनसंपत्ती भर टाकणारा भाच्या कडून केलेले निकृष्ट बांधकाम उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणखी वाढत आहे.

नांदेपेरा मार्गावरील नव्याने टाकलेल्या काँक्रीटचे पृष्ठभाग तासाभरात तडे जात असल्याचे दृश्य स्वतःच कामाच्या दर्जाचा बेमुदत पुरावा आहे. त्यामुळे हा ‘विकास’ की ‘कमिशनखोरीचा नमुना’ असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे.

शहरातील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून तात्काळ तपासणी व दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम तातडीने दुरुस्त करणे आणि कंत्राटदारासह जबाबदारांवर योग्य ती कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या कामाचे भवितव्य आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

९८ एकरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली व्यावसायिकांचा शेकडो कोटीच्या फायद्यासाठी मामाचा कारनामा 

लवकरच वाचकांसमोर…..

वणीमध्ये हिंदू–मुस्लिम एकतेचा नवा संगम “राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी” घोषणांनी दणाणले सभागृह राष्ट्रवादीच्या सौ. काजल शेख यांच्या उमेदवारीला एमआयएमचा जाहीर पाठिंबा

0

News Today 

वणी :- नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणाला नवा कलाटणी देणारी घटना घडली आहे. शदचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. काजल इस्माईल शेख (राजगडकर) यांना एमआयएम पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याने वणीतील राजकीय चित्र नव्याने रंगले आहे. मुस्लिम समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी” या घोषणांनी हिंदू–मुस्लिम एकतेचा उत्साह सभागृहात उसळून वाहिला. ही पत्रकार परिषद स्व. नानासाहेब गोहकार सभागृहात संपन्न झाली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव रजाक पठाण, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अरबाज खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र लोणारे, भारत मालेकर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. काजल शेख व नगरसेवक उमेदवारांसह एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष असीम हुसेन, प्रवक्ते तौसिफ खान, युवा नेते रेहान खान व रेहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या बहुतेक नगरसेवक उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून वणीतील केवळ दोन प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. विशेषतः प्रभाग ९(ब) मध्ये राष्ट्रवादीने उमेदवार दिला नसल्याने एमआयएमच्या साकिब खान यांना पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे.

वणीतील दोन्ही समाजांत एकतेचा संदेश देणाऱ्या या पत्रकार परिषदेने राजकीय विरोधकांचे समीकरण बिघडवले आहे.


“हिंदू-मुस्लिम हातात हात घालून एकत्र आले, ही वणीच्या राजकारणातील ऐतिहासिक घडी ठरणार आहे,” अशी प्रतिक्रिया उपस्थितानी व्यक्त केली.