Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 5

नगरपरिषदेची ट्यूबवेल बंद पाडून खासगी बोअरवेलचा घाट; जनतेच्या पाण्यावर गदा, वणीत संतापाचा उद्रेक कमळाबाईच्या माजी नगरसेवकाचा महाप्रताप ; माजी आमदारांच्या ‘आशीर्वादाने’ नगरपरिषदेवर दबाव टाकल्याचा नागरिकांचा दावा “मामा मेहेरबान तो नगरसेवक पैलवान” अशी ओरड होत आहे

0

News Today 

वणी : वणी शहरातील टांगोर चौक परिसरात नगरपरिषदेची तब्बल १५ ते १७ वर्षे सुरू असलेली सार्वजनिक ट्यूबवेल बेकायदेशीरपणे बंद पाडून त्या ठिकाणी खासगी बोअरवेल खणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे गणेशपूर रोड, उतारी भाग, रंगारीपुरा, सर्वोदय चौक, भोईपुरा, गांधी चौक व सती घाट परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून जनतेत तीव्र संताप उसळला आहे.

“मामा मेहेरबान तो नगरसेवक पैलवान अशी म्हण आता शहरात रंगताना दिसून येत आहे. भाजपच्या या माजी नगरसेवकाने प्रचंड मोठा महाप्रताप घडविल्याने जनमानसात मोठा रोष निर्माण होत आहे.

या प्रकरणातील संबंधित व्यापारी हा टांगोर चौकातील एका नामांकित मिठाई भंडाराचा संचालक असून तो भारतीय जनता पार्टीकडून नगरपालिकेत मागील काळात स्वीकृत नगरसेवक असल्याची माहिती आहे. या नगरसेवकाचे माजी आमदार ‘मामा’ यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्यांच्या माध्यमातून नगरपरिषदेवर राजकीय दबाव आणल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

माहितीनुसार, सदर ट्यूबवेल २०१०-११ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत नगरपरिषदेकडून खोदण्यात आली होती. या ट्यूबवेलवरून वणी शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जात होता. या प्रकल्पासाठी लोखंडी व महागडी पाइपलाइन टाकण्यात आली असून आंबेडकर चौक, सर्वोदय चौक, मुख्य बाजारपेठ व वॉटर सप्लाय विभागापर्यंत ती जोडलेली आहे. या संपूर्ण यंत्रणेवर आजपर्यंत अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे.

नागरिकांच्या आरोपानुसार, संबंधित व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानसमोर ही ट्यूबवेल व टँकर भरण्याची सुविधा ‘अडथळा’ ठरत होती. त्यामुळे या सार्वजनिक ट्यूबवेलचा कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी दोन-तीन दिवसांपूर्वी ती मुद्दाम बंद ठेवण्यात आली. त्यानंतर ट्यूबवेलमधील मोटार काढून त्यामध्ये दगड व गोटे टाकून ती पूर्णपणे जाम करण्यात आली. त्याच ठिकाणी खासगी पाण्यासाठी बोअरवेल खणल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.

या गंभीर प्रकारामुळे वणी शहरात पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून नागरिकांत भाजपाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून खासगी स्वार्थ साधल्याचा हा प्रकार असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी शिंदे सेनेचे नेते विजयबाबू चोरडिया यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना कळविले असून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याशीही संपर्क साधून तातडीने चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

सार्वजनिक पाण्यावर गदा आणणाऱ्या या प्रकरणाकडे प्रशासन गंभीरपणे पाहणार का, की राजकीय दबावापुढे पुन्हा एकदा जनतेच्या हक्काचे पाणी मुरणार, असा सवाल आता वणीकर विचारत आहेत.

झरी-जामनीत राजकीय उलथा- पालथ, नगर पंचायतीवर शिंदेसेनेचा झेंडा — शिलाताई चौधरी यांची नगराध्यक्षपदी निवड सेनेचे नेते विजयबाबू चोरडियांच्या खेळीने तालुका हादरला

0

News Today 

झरी-जामनी नगर पंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. उबाठा गटाच्या नगराध्यक्षा सौ. संगीताताई बिजगुनवार यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर शिंदेसेनेच्या सौ. शिलाताई चौधरी यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निर्णायक घडामोडीमुळे संपूर्ण झरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

नगर पंचायतीच्या विशेष सभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. एकूण १५ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांनी शिलाताई चौधरी यांच्या बाजूने मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौधरी यांना अधिकृतरित्या नगराध्यक्षा घोषित केले. यावेळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी भाजपमधून नाराज होऊन शिंदेसेनेत प्रवेश केलेले विजयबाबू चोरडिया असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विजयबाबू चोरडिया यांनी अत्यंत कुशल राजकीय खेळी करत नगरसेवकांची मोट बांधली आणि नगर पंचायतीतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलून टाकले. त्यांच्या या रणनीतीमुळे झरी तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

नव्या नगराध्यक्षा शिलाताई चौधरी यांच्या निवडीनंतर शिंदेसेना गटात जल्लोषाचे वातावरण होते. यावेळी विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते मनीष सुरवार, विनोद मोहितकर, चंद्रकांत घुगुल, नगरसेवक दिनेश जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षा पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बोलताना शिलाताई चौधरी यांनी, “झरी-जामनी नगर पंचायतीच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करणार असून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न करू,” असा विश्वास व्यक्त केला.
शीलाताई चौधरी यांनी या निवडीचे श्रेय शिवसेनाप्रमुख तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड , माजी आमदार विश्वास नांदेकर, आणि विजयबाबू चोरडिया यांना देण्यात आले

या सत्ताबदलामुळे येणाऱ्या काळात झरी-जामनी नगर पंचायतीतील विकासकामे, राजकीय समीकरणे आणि तालुक्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

१० वर्षात बोदकुरवारांना जे जमल नाही ते विजयबाबू चोरडिया यांनी १० आठवड्यात घडवून आणलं

मागील १० वर्ष भारतीय जनता पार्टीचे वणी विधानसभेवर आमदार म्हणून बोदकुरवार यांचे वर्चस्व होते. तसेच ते झरी तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असून देखील झरी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविणे त्यांना शक्य झाले नाही परंतु भाजपला राम राम ठोकून शिंदेसेनेत प्रवेश घेऊन अवघ्या दहा आठवड्याचा कालावधीत विजयबाबू चोरडिया यांनी झरी नगर पंचायतीवर शिंदे सेनेचा झेंडा फडकवून दाखविल्याने जे १० वर्षात भाजपला जमलं नाही ते विजयबाबूंनी दहा आठवड्यात करून दाखवलं अशी चर्चा संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात सुरू झाली आहे.

 

वणी येथील पत्रकार रवी ढुमने यांची आत्महत्या; शहरात हळहळ

0

News Today

वणी (ता. वणी):
येथील विद्यानगरी परिसरात राहणारे ज्येष्ठ पत्रकार रवी ढुमने वय ५० वर्ष यांनी सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वणी शहरासह पत्रकार बांधवांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, रवी ढुमने हे विद्यानगरी, वणी येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत असून . मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याच्या तयारीला लागले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

रवी ढुमने हे वणी तालुक्यातील एक परिचित पत्रकार म्हणून ओळखले जात होते. सामाजिक प्रश्न, स्थानिक घडामोडी आणि सामान्य जनतेच्या समस्या मांडण्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, ढुमने कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

 

पुनवट ग्रामपंचायतीत सरपंचांचा कथित विश्वासघात; उपसरपंच्याचा आरोप, सत्तेतील कमळाबाईच्या एका माजी आमदाराने “मोक्याच्या भूखंडाचे लाटले श्रीखंड”, खासगी शाळेला जागा देण्याचे प्रकरण

0

News Today 

वणी :- तालुक्यातील पुनवट ग्रामपंचायतीतील शासकीय जमीन गट क्र. ०२, क्षेत्र ३.५५ हेक्टेअर (ई-वर्ग) या जमिनीच्या लिलाव व उपलब्धतेसंदर्भातील वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. सरपंचांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ग्रामवासीयांचा विश्वासघात झाल्याचा आरोप उपसरपंचांसह ग्रामस्थांकडून होत असून, सदर जमिनीच्या व्यवहारात आर्थिक अपहाराची दाट शक्यताही वर्तवली जात आहे.

हा मौल्यवान भूखंड अगदी गावालगत मुख्य राज्यमार्गावर असून खासगी DAV शाळेला देण्यात कोणतीच हरकत नसल्याचे प्रमाणपत्र (NOC) ग्राम पंचायतीने कोणतीही ग्रामसभा न घेता मासिक सभेत दिल्याने गावात प्रचंड गोंधळ उडाला आहे. या करोडो रुपयाच्या जमीन प्रकरणात कमळाबाईचा एका माजी आमदार (मामा) यांनी सरपंच यांना हाताशी धरून भूखंडातील श्रीखंड चाटून पुसून खाल्याचा आरोप उपसरपंच मिलिंद कांबळे यांनी केला असून या भूखंडाची रीतसर चौकशीची मागणी केली आहे.

सरपंचांचा लिलाव थांबविण्याचा प्रस्ताव

दिनांक ०५/०३/२०२४ रोजी सरपंच पुनवट यांनी सदर शासकीय जमिनीच्या २०२४–२५ या वर्षासाठी ठेकेपत्राबाबत तहसिलदारांकडून मार्गदर्शन मागितले. त्याच दिवशी तहसिलदारांनी जमिनीचा लिलाव करू नये, असा स्पष्ट आदेश देत प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी वणी, गट विकास अधिकारी वणी आणि सरपंचांना दिली.

उपसरपंचांचा विरोध, पण प्रशासनाचे दुर्लक्ष

उपसरपंचांनी लिलाव व्हावा म्हणून गट शिक्षणाधिकारींना निवेदन दिले. प्रतिलिपी तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या. मात्र या सर्व निवेदनांना प्रशासनाने ‘केराची टोपली’ दाखवल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे.

तहसिलदारांचा पत्रव्यवहार, पण चार महिने विषय दडवला?

दिनांक २५/०४/२०२५ रोजी तहसिलदारांनी ग्रामपंचायत सचिव व सरपंचांना शासकीय जमीन शाळेच्या नवनिर्माणासाठी उपलब्ध करून नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना केल्या.

परंतु सरपंचांनी हा विषय तब्बल चार महिने गावापासून लपवून ठेवला, असा आरोप करण्यात येतो.

मासिक सभेत चार-चार मते; सरपंचांनी निर्णायक मत वापरून प्रस्ताव मंजूर

शेवटी २५/०८/२०२५ रोजी मासिक सभेत हा विषय ठेवण्यात आला. सभेत चार विरुद्ध चार अशी मतवाटणी झाली. तेव्हा सरपंचांनी निर्णायक मताचा अधिकार वापरून प्रस्ताव मंजूर केला.

यालाही उपसरपंचांनी तीव्र विरोध करत निर्णायक मत ग्राह्य धरू नये व विशेष ग्रामसभा बोलवावी, अशी मागणी २८/०८/२०२५ रोजी BDO यांच्याकडे केली.

आता प्रकरण राज्य व केंद्र सरकारपर्यंत

न्याय न मिळाल्याने उपसरपंचांनी ०३/११/२०२५ रोजी जिल्हाधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल व सामान्य प्रशासन मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, तसेच पंतप्रधान व राष्ट्रपती कार्यालयाकडेही तक्रार पाठवली आहे.

ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान?

या शासकीय जमिनीच्या लिलावातून दरवर्षी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न येते, जे जिल्हा परिषद शाळेला मिळते. लिलाव न झाल्याने गावाला व शाळेला मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे.

याशिवाय निर्णय ‘एककल्ली’ पद्धतीने घेतल्याने आर्थिक उलाढालीचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या सर्व घडामोडीला सत्तेतील कमळाबाईचा एक माजी आमदार मामा यांनी पूनवट गावाला चांगलेच मामा बनवून सोडले आहे. या माजी मामा व त्याच्या पुढाऱ्यांना येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जागा दाखविण्या चंग गावकरी बांधत आहे. अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सरपंच्यांचे म्हणणे काय ?

याविषयी पुनवट ग्राम पंचायतीचे सरपंच प्रतिभ जेउरकर यांना दूरध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी असे उत्तर दिले की, यात मासिक सभेत विषय ठेवण्यात आला व बहुमताने ठराव पारित करून नाहरकत देण्यात आले आहे व ही जागा ग्राम पंचायतीच्या मालकीची नाही असा दावा करील या जागेचे शासकीय मूल्यमापन करून वेकोली ती रक्कम अदा करणार असल्याची माहिती दिली.

बाजार मूल्यानुसार या जागेची किंमत किती ?

शासकीय मूल्यमापनाने (valuation) ही जागा केवळ काही लाखाची होऊ शकते परंतु ही जागा बाजारमूल्यानुसार सुमारे १५ ते  २० कोटी रुपयांची असल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे. 

अमरावती आयुक्तांकडून सोनेगाव पोलीस पाटील निलंबन प्रकरणातील स्थगिती आदेश कायम

0

News Today 

वणी:- अमरावती विभागाचे अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी सोनेगाव (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील पोलीस पाटील संजय लक्ष्मीनारायण जयस्वाल यांनी दाखल केलेल्या अपिल अर्जावर महत्त्वाचा अंतरिम आदेश जारी केला आहे.

महाराष्ट्र ग्राम पोलीस (नेमणूक, वेतन भत्ते व सेवा अटी) आदेश १९६८ अंतर्गत दाखल झालेल्या या अपिलमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांनी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशाविरुद्ध आव्हान करण्यात आले आहे.

अपिलार्थीच्या विनंतीनुसार यापूर्वी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थगिती दिली होती. आज, ३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या अधिवक्त्यांनी स्थगितीची मुदतवाढ मागितली असून, अपर आयुक्तांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे पूर्वीचा स्थगिती आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

या आदेशाची प्रत उपविभागीय अधिकारी, वणी यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

भीषण अपघात : बसला ट्रकची समोरासमोर धडक; दोन ठार, १५ जखमी, आमदार संजय देरकर तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने मदतकार्यास गती

0

News Today 

मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ गुरुवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. चंद्रपूरहून यवतमाळकडे जाणारी बस (क्रमांक MH 40 Y 5782) व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा गंभीर अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय देरकर हे तातडीने दाखल झाल्याने मदतकार्या गतीमान झाले.

धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की ट्रकने बस अक्षरशः अर्धी चिरून टाकली. बसमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी तसेच बस व ट्रक चालक गंभीर जखमी आहेत.

अपघातातील मृतक व जखमी प्रवाशांची अधिकृत नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय देरकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य गतीमान करून मृतदेह व जखमी प्रवाश्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या. प्राथमिक उपचारांनंतर बहुतांश जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

वणी नगर परिषदेची निवडणूक : मतासाठी पैशांची देवघेव करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांची प्रसिध्दीपत्रकातून भूमिका

0

News Today 
वणी – नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असताना निवडणूक विभाग तसेच पोलिस प्रशासन याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी विशेष प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

इंगळे यांनी म्हटले आहे की, निवडणुकीत मतासाठी पैसे घेणारे आणि पैसे देणारे अशा दोघांविरुद्धही तत्काळ आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मतदारांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ समोर आला असतानाही निवडणूक विभाग “मूग गिळून बसला आहे” तर पोलिस यंत्रणा “डोळे झाकून चालली आहे”, असा इंगळे यांनी आरोप केला.

सदर प्रकरणाचा गांभीर्याने विचार न केल्यास लवकरच निवडणूक विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिला असून पोलिस स्टेशन, वणी येथे रीतसर तक्रार दाखल केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पैसे वाटप करून सशक्त लोकशाहीला खिळ बसवत लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोपही इंगळे यांनी केला. या प्रकरणी निवडणूक विभाग व पोलिस यंत्रणा कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण वणी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मतमोजणी पुढे ढकलल्याने खळबळ; EVM सुरक्षेवर प्रश्नचिन्ह – मतदारांमध्ये संतापाची लाट

0

News Today 

मुंबई:- राज्यात आज, २ डिसेंबर २०२५, रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी निवडणूक आयोगाने आश्चर्यकारक निर्णय घेत मतमोजणीची तारीख थेट २१ डिसेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलली.

आयोगाच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

वाद कोर्टात, पण शंका EVM वर?

काही नगरपरिषदांच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयात वाद प्रलंबित असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. परंतु हा निर्णय जाहीर होताच मतदारांमध्ये EVM सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाला आहे.

लोकांच्या चर्चेत एकच मुद्दा:

“मतमोजणी इतक्या उशीराने का? EVM कुठे ठेवणार? सुरक्षा कोण पाहणार?”

मतदारांमध्ये आयोगाच्या निर्णयाविषयी रोष वाढताना दिसतो आहे. सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मतदारांमध्ये रोषाची भावना तीव्र

मतदारांचे म्हणणे आहे की, मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली असताना निकाल मात्र जवळपास अठरा दिवसांनी जाहीर करणे योग्य नाही.
अनेक मतदारांनी प्रशासनावर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे.

एक स्थानिक मतदार म्हणाले :

“EVM काही दिवस ठेवून दिल्या, तर शंका येणे स्वाभाविकच आहे. निकाल लांबवण्यामागे नेमके कारण काय?”

राजकीय पक्षांचा सूरही संशयाचा

काही स्थानिक पक्षांनीही आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मतमोजणी पुढे ढकलण्यामागील कारणांची सविस्तर स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली आहे.

विरोधकांनी तर हा निर्णय “मतदारांच्या विश्वासावर गदा” आणणारा म्हणत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

मतमोजणीपूर्वी जबाबदारी आयोगाची

आता २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत EVM ची सुरक्षा, पारदर्शकता आणि विश्वासार्हता—या तिन्ही मुद्द्यांवर निवडणूक आयोगाची कसोटी लागणार आहे.

मतदारांची वाढती नाराजी पाहता आयोगाने तातडीने संवाद साधून परिस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वणी न.प. — प्रभाग क्रमांक ८ ब : राजू इंगोले यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कुणालबाबू चोरडिया उमेश पोतदार यांच्या नेतृत्वात प्रचाराला गती

0

News Today 

वणी :  नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८बमध्ये प्रचाराला जोरदार उधाण आले असून शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार राजू इंगोले यांची उमेदवारी विशेष चर्चेत आहे. तरुण, उत्साही आणि सर्वसामान्यांच्या मदतीला तत्पर धावून जाणारा चेहरा म्हणून राजू इंगोले यांनी अल्पावधीतच मतदारांमध्ये भक्कम स्थान निर्माण केले आहे.

या संपूर्ण प्रचार मोहिमेचे नेतृत्व विजय बाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात शिस्त, नियोजन आणि प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा ध्यास दिसून येतो. यासोबतच कुणाल चोरडिया आणि उमेश पोतदार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेत असून, गल्लोगल्ली फिरत मतदारांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांच्या या व्यापक संपर्क मोहिमेमुळे राजू इंगोले यांच्या प्रचाराला मोठी उभारी मिळाली आहे.

या संपूर्ण प्रचार मोहिमेचे नेतृत्व विजय बाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात शिस्त, नियोजन आणि प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा ध्यास दिसून येतो. यासोबतच कुणाल चोरडिया आणि उमेश पोतदार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेत असून, गल्लोगल्ली फिरत मतदारांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांच्या या व्यापक संपर्क मोहिमेमुळे राजू इंगोले यांच्या प्रचाराला मोठी उभारी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांत प्रभागातील विविध समस्या, विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यावर इंगोले यांनी मतदारांशी थेट चर्चा केली. युवा उमेदवार म्हणून त्यांच्याकडून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा व्यक्त करणारे मतदारही मोठ्या प्रमाणात दिसले.

उद्या, २ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून प्रभाग क्रमांक ८बमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी मतदारांच्या चर्चेत राजू इंगोले हे नाव ठळकपणे पुढे येत असल्याचे चित्र दिसून येते.

निकाल काहीही असो, मात्र सध्या प्रभाग ८बमध्ये राजू इंगोले, विजय बाबू चोरडिया यांचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या अफाट मेहनतीमुळे निवडणुकीची हवा आणखी रंगतदार बनली आहे.

वणी नगरपरिषद निवडणूक : शिंदे गटामुळे भाजपचा आत्मविश्वास डळमळला; राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढतीने महाविकास आघाडीही धास्तावली एक नर एक नारी बजाव तुतारी, या नात्याने वणीत उभारली राष्ट्रवादी

0

News Today 

वणी | प्रतिनिधी
येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय समीकरणे धक्कादायक रीतीने बदलत असून, शिंदे गटाच्या आक्रमक उतरण्यामुळे भाजपला अनपेक्षित माघार घ्यावी लागली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाविकास आघाडीतून स्वतंत्र वाटचाल करत उमेदवार रिंगणात उतरवल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत चिंतेतही भर पडली आहे. शहरातील संपूर्ण भागात ” एक नर एक नारी, बजाव तुतारी या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चांगलीच उभारी घेतली आहे.

नगरपरिषद वणीची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत असून, सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला वेग दिला आहे. मात्र, प्रचाराच्या रणधुमाळीत शिंदे गटाने घेतलेली उभारी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विजयबाबू जोडी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने तब्बल २९ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष अशा ३० उमेदवारांची प्रभावी फळी उभी केली आहे.

स्थानिक राजकारणात मोठे मानले जाणारे चोरगे यांच्या खेळीमुळे भाजपची जवळपास अर्धी ताकद शिंदे गटात सामील झाली. यामुळे भाजपची पारंपरिक मतपेढी कमकुवत झाली असून, प्रचारासाठी बाहेरून कार्यकर्ते आणण्याची वेळ पक्षावर आली आहे. भाजपच्या संघटनात्मक अडचणी आणि कमी झालेली स्थानिक पकड त्यांच्यासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक बनवत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अचानक स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीतील संतुलन ढासळले आहे. राष्ट्रवादीकडून स्वतंत्र नगराध्यक्ष पदासह ११ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जाणारा उमेदवार दिल्याने एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न स्पष्ट दिसून येत आहे.

मात्र, या निर्णयाचा महाविकास आघाडीच्या मतांवर थेट परिणाम दिसू लागला आहे. परंपरागत मतदारांत विभाजन निर्माण झाल्याने आघाडीपुढे नवे समीकरण जुळविण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे.

राजकीय घडामोडींनी रंगलेली वणीची ही निवडणूक आता चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाची आक्रमक खेळी, भाजपची कमकुवत झालेली ताकद आणि राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढतीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता — या तिहेरी संघर्षात नगरपरिषदेचा कौल अखेर कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.