Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 30

चिचघाट येथे बालिकेचा मृत्यू पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे

0

शिवसेना तालुकाध्यक्ष मोरेश्वर सरोदे यांचा आरोप, अवैध दारूची विक्रेते झाले गब्बर

News Today (दिलीप भोयर)

वणी : झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन पोलिस हद्दीत चिचघाट येथे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव दुचाकीने ४ वर्षीय बालिकेला चिरडल्याची घटना ५ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली होती. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. झरीजामणी तालुक्यात खेडोपाड्यात अवैधरीत्या दारू विक्रीला ऊत आले असून याला पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष मोरेश्वर सरोदे यांनी केला आहे. अवैध दारू विक्रीला गावातील पोलीस पाटील देखील खतपाणी घालत असल्याचे आरोप त्यांनी केले आहे.

उल्लेखनीय आहे की, 5 मार्च रोजी चिचघाट येथे घराबाहेर खेळत असलेल्या अंकिता उर्फ चुटकी बंडू वाघाडे या बालिकेला एम.एच.२९ सी.ई.५५४६ क्रमांकाच्या भरधाव दुचाकीने धडक दिली. धडक देऊन पळून जात असताना गावकऱ्यांनी दुचाकी चालकाला पकडले असता दुचाकीवर एका पिशवीत देशी दारूच्या शिस्या आढळल्या. दुचाकी चालकाला नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव अविनाश भिमराव मरसकोल्हे वय २९ वर्ष, राहणार बग्गी अकोली, तालुका केळापूर असे सांगितले.

अपघातग्रस्त जखमी बालिकेचा वणी येथे उपचारानंतर मध्यरात्री मृत्यू झाला. याबाबत मृत बालिकेच्या मोठ्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र दाखल एफआयआर मध्ये अपघाताच्या वेळी दुचाकी चालकाकडे अवैध देशी दारू आढळल्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुकुटबन पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चिचघाट खडकडोह भागात अवैध दारू बंद करण्यासाठी मोरेश्वर सरोदे यांनी अनेकदा निवेदने देऊनही पोलिस मात्र लक्ष देत नाही. तसेच गावातील पोलिस पाटील देखील अवैध दारू विक्रेत्यांसोबत आपले आर्थिक हित संबंध जोडून गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचा आरोप मोरेश्वर सरोदे यांनी केला आहे.

मृत्युमुखी पडलेली ४ वर्षीय बालिका कु. अंकिता

झरीजामनी तालुका हा अतीदुर्गम व आदिवासी बहुल आहे. या भागात साक्षरता कमी असल्याने अनेकांना व्यसनाचे प्रमाण ग्रासले आहे. या भागातील अवैध दारू विक्री बंद व्हावी नागरिकांनी व्यसनापासून अलिप्त रहावे तसेच त्यांचे सामाजिक जीवनात बदल घडवा यासाठी मोरेश्वर सरोदे हे सातत्याने कार्यरत असतात. मात्र त्यांच्या कार्यामुळे अवैधरीत्या दारु विक्री करणारे व त्यांना पाठबळ देणारे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात.

मोरेश्वर सरोदे तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट झरीजमणी

*खडकडोह येथील वाद हा भ्रष्टाचार व दारू विक्रीतून*

मोरेश्वर सरोदे यांनी चिचघाट येथील पोलिस पाटील पंढरी डुकरे यांचेवर लोखंडी रॉड ने वार करून जखमी केल्याची तक्रार 3 मार्च रोजी मुकुटबन पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. वास्तविक पाहता सदर घटना गावात अवैध दारू विक्रीतून झाली असून अगोदर पोलिस पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरोदे यांना एकट घेरून मारहाण करायला सुरुवात केली होती. मोरेश्वर सरोदे यांनी त्यांच्या जवळील लोखंडी रॉड हिसकावून त्याच रॉडने आपला जीव वाचविण्यासाठी प्रति हल्ला केल्याची माहिती खडकडोह येथील नागरिकानी दिली. त्यामुळे या प्रकरणाची उचित चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अवैध दारूची वाहतूक करणारे दारूच्या पेटीसह आरोपी

वणी येथील वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार

0

ग्राहकांच्या अधिकाराचे सर्रास उलंघन, वाचा ग्राहकांचे अधिकार 

News Today 

वणी :- येथील वीज वितरण कंपनी कडून मनमर्जीने मनमानी कारभार सुरू असून ग्राहकांना मिळणाऱ्या वीज पुरवठ्यासाठी किमान सेवा मानके अधिकाराचे सर्रास उलंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा रोष निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

महाराष्ट्र शासन व वीज वितरण कंपनी कडून वीज ग्राहकांना विविध अधिकार प्राप्त आहेत. तरी देखील वणी उपविभागातील ग्राहकांना अधिकाऱ्यांच्या मनमर्जीचा सामना करावा लागत आहे. वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून ग्राहकांना मिळणाऱ्या अधिकारांना पायदळी तूडविल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या भावनेचा उद्रेक होण्याची शक्यता वाढली आहे. 

वीज ग्राहकांना मिळणारे अधिकारी वितरण परवानाधारकांकडून वीज पुरवठ्यासाठी किमान सेवा मानके मिळणे, वितरण परवानाधारकांनी कार्यप्रदर्शन मानकांनुसार सर्व ग्राहकांना २४ x ७ वीज पुरवठा करणे, नवी जोडणी आणि सध्याच्या जोडणीत सुधारणा करण्याचा हक्क वीज देयके आणि भरणा याबाबतची माहिती मिळणे, पुरवठ्याची विश्वसनीयता मिळणे, नुकसान भरपाईसाठी यंत्रणा मिळणे, ग्राहक सेवेसाठी कॉल सेंटर मिळणे, तक्रार निवारण यंत्रणा मिळणे तसेच वीज बंद करायची असल्यास ग्राहकांना एक दिवस किंवा काही तासापूर्वी  पूर्व  सूचना देऊन वीज पुरवठा खंडित करणे अनिवार्य आहे. असे विविध अधिकार ग्राहकांना प्रधान आहे.

परंतु यातील कोणत्याही अधिकाराची पूर्तता वीज वितरण कंपनी कडून केल्या जात नाही  उलट मनमानी पणाने अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार वीज खंडीत करण्याचा प्रकार येथील कार्यालयाचे माध्यमातून केल्या जात आहे. ग्राहकांनी अधिकाऱ्यांच्या संवाद साधला असता बेजबदारीचे उत्तरे देण्यात येत आहे.

अश्या बेशिस्तपणे कारभार चालवित असलेल्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्याची रीतसर चौकशी करून उचित कारवाई अपेक्षित असल्याची भावना वीज वितरणाचे ग्राहक भावना व्यक्त करीत आहे. 

                सकाळच्या वेळी विज खंडित

सकाळच्या वेळी सर्व ग्राहकांना विजेची नितांत गरज असतात परंतु अशावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी कोणतीही पूर्व सूचना न देता वीज बंद करून आपले कामे काढत असतात. खरे तर नियमानुसार ग्राहकांना पूर्व सूचना देऊन वीज खंडीत करायला पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांना दुपारच्यावेळी आपले कामे करण्याला आळस येत असल्याने ग्राहकांच्या अधिकाराचे उलंघन करून सोयीनुसार कामे केल्या जात असल्याचे आरोप होत आहे. 

                        इथे करा तक्रार

कनिष्ठ अभियंता कार्यालयातील तक्रार निवारण कक्षात आपली रजिस्टरवर  नोंदविण्याची सुविधा असते. किंवा याठिकाणी जाणे शक्य नसल्यास कनिष्ठ अभियंता यांचा मोबाईल क्रमांक 8208318185 यावर तक्रार करू शकतात यांनी तक्रार घेण्यास कुचराई केली तर उपविभागीय अभियंता यांचे मोबाईल क्रमांक 7875315448 यांचेकडे संपर्क साधून तक्रार करू शकता यांच्याकडूनही समाधान न झाल्यास कार्यकारी अभियंता पांढरकवडा यांचेकडे त्यांचा मोबाईल  7875763022 यावर संपर्क साधून आपली समस्या मांडू शकता यांचे मोबाईल हे २४ तास ग्राहकांच्या सेवेत सुरू असतात यांनी तक्रार ऐकली नाही किंवा यांनी मोबाईल उचलला नाही तर अधीक्षक अधीक्षक अभियंता यवतमाळ यांच्याकडे त्याचा मोबाईल क्रमांक 7875763555 यावर आपली तक्रार नोंदवू शकतात तसेच वीज वितरण कंपनीच्या ऑनलाइन वेबसाइड वर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. 

राजस्थानी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिवस साजरा

0

 प्ले शाळेतील महिला मदतनिसांचा केला सन्मान

News Today 

वणी : 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजस्थानी महिला मंडळातर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला. येथील जैन स्थानक आनंद भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमात किरण देरकर, डॉ. सुलभा मुंजे व सुलोचना मुथा ह्या प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्ले शाळेतील महिला मदतनीस यांचे सन्मान करण्यात आले. कार्यक्रमात हाऊजी व इतर खेळांचा महिलांनी मनसोक्त आनंद घेतला.

 

 

महिला दिवस कार्यक्रमात राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष समता चोरडिया, माजी अध्यक्षा चंचल मुथा, संगीता खटोड, निशा अग्रवाल, बरखा बाजोरिया, स्नेहलता चुंबळे, पायल आबड़, काजल काठेड, संजुलता कोठारी व इतर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन खुशाली गुप्ता यांनी केले तर प्रेक्षा कटारिया हिने मानले.

सत्तेतील शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षाकडून पोलिस पाटलावर जीवघेणा हल्ला – पालकमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव

0

लोखंडी रॉडने डोक्यावर वार, झरीजाममी तालुक्यातील घटना

News Today (दिलीप भोयर)

वणी :-  राज्यात मसनजोग प्रकरणावर कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षाकडून एका पोलिस पाटलावर लोखंडी रॉडने डोक्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना तारीख ३ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झरीजामणी तालुक्यातील खडकडोह येथे घडली आहे. या घटनेतील पोलिस पाटील गंभीर दुखापत झाली असून उपचार घेत आहे. याबाबत फिर्याद न नोंदविण्यासाठी पोलिसांवर पालकमंत्री संजय राठोड यांनी पोलिसांवर दबाव वाढविला होता परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधकांकडून बीड जिल्ह्यातील बहुचर्चीत मसनजोग प्रकरण सरकारची कोंडी करीत आहे. त्यातच  प्रशांत कोरटकर , कोकाटे यांचे प्रकरण विरोधकांनी ऐरणीवर घेतला आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांचे सरकार असून राज्यात घडत असलेल्या गुन्हेगारीतील प्रकरणात सत्तापक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आरोपी म्हणून निदर्शनात येत असल्याने सत्तेतील लोकांनी राज्यात गुन्हेगारीचा उच्चांक मांडलेला असल्याचे आरोप होत आहे. 

अश्याच झरिजामणी तालुक्यातील खडकडोह येथील रहिवासी असलेले शिवसेना (शिंदे गटाचे) तालुकाध्यक्ष मोरेश्वर सरोदे यांनी चिंचघाट येथील पोलिस पाटील पंढरी अरुण डुकरे यांचेवर शुल्लक कारणावरून वाद झाला व यावयाचे रूपांतर मारामारीत झाले व रागाच्या भरात येऊन मोरेश्वर सरोदे यांनी पोलिस पाटील पंढरी डुकरे यांचे डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केला यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांचेवर वणी येथे उपचार चालू आहे. अविनाश अशोक डुकरे यांचे फिर्यादीवरून मुकुटबन पोलिस स्टेशनला बिएनएस अंतर्गत ११८(२), २९६, ३५१(२) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांचे मार्गदर्शनानुसार जमादार दिलीप जाधव करीत आहे. या प्रकरणात पोलिस पाटील संघटना आक्रमक होण्याची शक्यता वाढली आहे. 

       

      माऊंद्यायचे जेवण करायला जाणे पडले महागात

नुकतीच शिवरात्र निमित्त खडकडोह व चिचघाट येथील काही भक्त मंडळी मध्यप्रदेशातील प्रसिद्ध शिवशंकराच्या दर्शनासाठी गेले असता त्या लोकांनी माउंद्याचा कार्यक्रम खडकडोह येथील गणपती मंदिरात ठेवला होता. त्यानिमित्य पोलिस पाटील पंढरी डुकरे व त्यांचे काही सहकारी सायंकाळी जेवण करायला आले असता बस स्टॉप वरील पान टपरीवर कोल्ड्रिंक घेत असताना शिंदे गटाचे तालुकाक्ष मोरेश्वर सरोदे हे आले व त्यांनी अचानक वाद घालायला सुरवात केली यात झालेल्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला झाल्याने हे जेवण डुकरे यांना चांगलेच महाग पडले आहे. 

              

           पालकमंत्री राठोड यांचा पोलिसांवर दबाव

संबंधित घटना घडताच पोलिस पाटील हे मुकुटबन पोलिस स्टेशन येथे फिर्याद नोंदविण्यासाठी गेले असता ही फिर्याद नोंदवू नये म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पोलिसांवर दबाव वाढविला होता परंतु पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला असून यातील सत्तता पडताळणीसाठी ना. राठोड यांचे कॉल डिटेल्स काढण्याची मागणी होत आहे.

यवतमाळ येथे सिकलसेल जनजागृती शिबिर संपन्न

0

 

News Today 

वणी  :- दिनांक 18 फेब्रुवारीला यवतमाळ येथे एकता सिकलसेल असोसिएशन व निस्वार्थ सेवा फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या “मातोश्री प्रतिक्षाालय ” येथे सिकलसेल जनजागृती शिबिर संपन्न करण्यात आले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जया रामटेके,उद्घाटक अधिष्ठाता डाॅ. गिरीश जतकर, वैद्यकिय अधीक्षक डाॅ. सुरेंद्र भुयार , मार्गदर्शक विभाग प्रमुख( मेडिसिन) डाॅ. बाबा येलके व डाॅ. गणेश जाधव तसेचअरुण घनमोडे संचालक, जविसेस, प्रीती नगराळे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

डाॅ. सुरेंद्र भुयार प्रमुख मार्गदर्शक यांनी सिकलसेल रुग्णांनी सिकलसेल रुग्णा सोबत विवाह करू नये. निरोगी व्यक्तीने सिकलसेल व्यक्ती सोबत विवाह करावा. ज्यामुळे पुढील पिढीत सिकलसेल आजार टाळता येईल. डाॅ. बाबा येलके सर व डाॅ. गणेश जाधव सर यानी रुग्ण रुग्णाला योग्य उपचाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. , अरुण घनमोडे यांनी पिण्याचे शुद्ध पाण्याचे महत्व उपस्थितांना विविध उदाहरण सह समजाऊन सांगितले. पिण्याच्या पाण्या पासून होणारे 80% आजाराला जागृतीमुळे नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हे प्रत्येकाच्या हातात आहे.

 तसेच वैयक्तीक स्वच्छता, परिसर स्वच्छता, जीवनसत्त्व चे आहारात मोलाचे योगदान. या विषया वर भर देण्यात आला. ज्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी करता येते. असे मोलाचे मार्गदर्शन अरुण घनमोडे यांनी उपस्थितांना केले. तसेच प्रीती नगराळे यांनी सिकलसेलग्रस्त रुग्णांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणुन गजभिये सर लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भुषन घनमोडे यांनी तर प्रास्ताविक अमित लभाने व आभार प्रदर्शन बादल बांबोडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परशुराम कडू, करण गेडाम,ज्योती राठोड, प्रांजली मडावी तसेच चमूने अथक परिश्रमपूर्वक सहकार्य केले. सिकलसेल रुग्णांना मदत करण्यासाठी आणि यवतमाळमधील स्थितीबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दिशेने हे जनजागृती शिबिर एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

आ. संजय देरकर यांचे हस्ते प्रख्यात वक्ते रविदादा मानव यांचा सत्कार

0

 

News Today 

वणी : – गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक तथा प्रख्यात समाज प्रबोधनकार रविदादा मानव यांचा तारीख २० फेब्रुवारी रोजी आमदार संजय देरकर यांनी त्यांचे निवासस्थानी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

रविदादा मानव हे शिवजयंती निमित्त मौजा खांदला येथे व्याख्यानासाठी वणी येथे दाखल झाले होते. त्यांनी आमदार संजय देरकर यांची निवास स्थानी भेट घेतली असता आमदार देरकारांनी त्यांचा सत्कार केला यावेळी त्यांचे सोबत असलेले नरेश ढाले यांचा देखील सत्कार केला. रविदादा मानव हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ग्रामगीता विचारांचे प्रचारक असल्याने त्यांची एक युवा प्रबोधनकार व विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे.

दोघांमध्ये समाजसेवेच्या रचनाबद्धकार्याची चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आमदार देरकर यांनी तुकाराम दादा गीताचार्य यांच्या जुन्या आठवणी सांगत ते आमच्या घरी यायचे आणि माझ्या बाबांचे आणि त्यांचे अतिशय स्नेहाचे संबंध होते असे सांगून जुन्या आठवणींना उजाळा. संजय देरकरांसारखे सामाजिक जाणिवेचे लोक विधानसभेत गेल्यामुळे सामान्य माणसांचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यास मदत होईल अशी भावना यावेळी रविमानव यांनी व्यक्त केली.

आमदार देरकर यांनी रवी मानव यांचा सन्मान केल्याने श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, माजी जिल्हापरिषद सदस्य संघदीप भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसैनिकांची एकनिष्ठता हीच खरी शिवसेनेची ओळख आहे – खा. संजय देशमुख

0

शिवनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला स्वप्नपूर्ती सोहळा

News Today 
वणी : – शिवसेनेची ओळख म्हणजे शिवसैनिकांमध्ये असलेली एकनिष्ठता आहे. ही एक निष्ठता ज्यांच्या रक्तात आहे. ते रक्त कधीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणार नाही. आहे प्रतिपादन यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांनी येथील एस.बी. लॉनच्या प्रांगणात काल ता. १५ रोजी रात्री ८ वाजता संपन्न झालेल्या शिवसेनेच्या स्वप्नपूर्ती या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड तर प्रमुख उपस्थित म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर उपस्थित होते.

यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झाले तर व वणी विधानसभा क्षेत्रात संजय देरकर हे विजय झाले होते. त्यामुळे शिवसैनिकात मोठा उत्साह निर्माण झाला होता तसेच शिवसेना विभाजित होऊनही या भागात त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही उलट शिवसैनिक एकनिष्ठेने उद्धव ठाकरे यांचे सोबत एकजुटीने उभे होते. त्यामुळेच हा विजय संपादित करता आला म्हणून शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास यांचे नेतृत्वात स्वप्नपूर्ती सोहळा आयोजन समिती नेमण्यात आली यात उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, राजू तुरणकर, अजिंक्य शेंडे, आदींचा समावेश होता.


यावेळी खासदार संजय देशमुख व त्यांच्या अर्धांगिनी सौ. वैशाली देशमुख तसेच आमदार संजय देरकर व त्यांच्या अर्धांगिनी सौ. किरण देरकर यांचा शिव सैनिकांच्या वतीने पुष्पहार, शाल व विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी या विचार पिठावर जिल्हासहसंपर्क प्रमुख संतोष माहूरे, ओबीसी महासंघाच्या सचि, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख व आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणपत लेडांगे यांनी तर सूत्रसंचालन राजू तुरणकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश कऱ्हाड यांनी केले.

 

शिवसेनेत मला न्याय मिळाला – आ. संजय देरकर अनेकदा पक्ष व अपक्ष राहून निवडणुका लढविल्या आहे. परंतु खऱ्या अर्थाने शिवसेनेकडून मला न्याय मिळाला आहे. महाविजास आघाडीच्या सर्व घटक पक्षांकडून भरभरून सहकार्य मिळाले आहे. 

सर्वांच्या सहकाऱ्याने आज मला महाराष्ट्र विधान सभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार आमदार संजय देरकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

उज्वलकर व कनाके यांचा पक्ष प्रवेश 

येथील समाजसेवक तथा  आमदार देरकर यांचे समर्थक मोरेश्वर उज्वलकर तथा व रमेश कणाके सामजिक कार्यकर्ता यांचा खासदार संजय देशमुख यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. 

अखिल कुणबी महासंघाची वणी तालुका कार्यकारणी गठित, तालुकाध्यक्षपदी गणेश आसूटकर तर सचिवपदी पवन बुऱ्हाण यांची निवड

0

News Today 

वणी : – अखिल कुणबी महासंघाच्या वतीने दिनांक १५ रोजी गोरक्षण जवळील ए. एस. लॉन येथे अखिल कुणबी महासंघाची वणी तालुका अध्यक्ष म्हणून गणेश आसुटकर तर सचिव म्हणून पवन बुऱ्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बैठकीला यावेळी अखिल कुणबी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डि. के. आरीकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर , महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष आशिष येडांगे, जिल्हा अध्यक्ष राजेश पहापळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


यावेळी महिला जिल्हाध्यक्षा म्हणून संध्या लोडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी मुरलीधर भोयर व नरेश मुरासकार, गजानन पोटे , तर वणी तालुका अध्यक्षपदी गणेश आसुटकार, उपाध्यक्ष पदी विलास आवारी, हरी आसुटकार, दत्ता बोबडे, सतीश लडके, कार्यध्यक्ष पदी हरिदास काकडे, सचिव पदी पवन बुऱ्हान, सहसचिव पदी दशरथ पायघन, संघटक पदी योगेश आवारी, प्रफुल उपरे तर वणी शहराध्यक्षपदी बालाजी भेदोडकार, उपाध्यक्ष पदी आशिष दुमोरे, प्रशांत बोबडे, सचिव पदी संतोष सिदुरकार, सहसचिवपदी गणेश पारोधी, संघटक पदी गजानन काकडे यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. आरिकर यांनी केली असता सर्व समाज बांधवांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

गणेशपूर येथे दोन दिवशीय शिवजयंती उत्सव

0

News Today 
वणी – लगत गणेशपूर येथे छत्रपती महोत्सव समिती तर्फे गेल्या अनेक वर्षा पासून सुरु असलेल्या शिवजयंती उत्सवा चे आयोजन या वर्षी सुद्धा करण्यात आले आहे. येणाऱ्या 19 आणी 20 तारखेला दोन दिवसीय शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे.

या मध्ये दिनांक 19 तारखेला छत्रपती स्मारक येथे सकाळी 8 वाजता भव्य माल्यर्पण सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. व दिनांक 20 तारखेला सायंकाळी 7 वाजता जीवनाशी संघर्ष करणाऱ्या इंडियन आयडल फेम, चेतन सेवानकुर तर्फे अंध कलावंतांचा अर्केस्ट आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून वणी येथील गटविकास अधिकारी मा किशोर गज्जलवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वणी पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मा. गोपाल उंबरकर, स्वागतध्यक्ष मा ऍड कुणाल चोरडिया उपस्थित राहणार आहे .

तसेच या कार्यक्रमात छत्रपती समितीच्या वतीने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा. संजयभाऊ देरकर व सौ किरणताई देरकर यांचा नागरी सत्कार होणार आहे. तरी गावातील व शहरातील सर्व नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती महोत्सव गणेशपूर च्या सर्व पधादिकारी, मार्गदर्शक व सदस्यांनी केले आहे.

मोहादा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोस्तवाचे आयोजन.

0

सामूहिक विवाह सोहळा,सत्कार समारंभ, प्रबोधन आणि मोहदा प्रीमियम लीगचे आयोजन 

वणी :- स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दिनांक 19 फेब्रुवारी हा सर्व जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो यानिमित्ताने शिवा महोत्सव समिती मोहदा तथा संभाजी ब्रिगेड मोहदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहदा तालुका वणी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


 दोन दिवसीय कार्यक्रमध्ये दिनांक 19 फेब्रुवारीला सकाळी सहा ते आठ ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच सायंकाळी सहा ते दहा या वेळामध्ये गावात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने दुसरे दिवशी २० तारखेला. सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे नवनिर्वाचित खासदार  प्रतिभाताई धानोरकर व नवनिर्वाचित आमदार संजय दरेकर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमांमध्ये घेण्यात येणार आहे.यवतमाळ येथील प्रसिद्ध विचारवंत लेखक  नंदू भाऊ बुटे यांचे यावेळी व्याख्यान आयोजित केलेले आहे.

त्याचप्रमाणे मोहदा प्रीमियम लीग चे आयोजन देखील करण्यात आले आहे.  सर्व उपक्रमासाठी संभाजी ब्रिगेड वणी तालुकाध्यक्ष तथा शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष  गणेश बोंडे सचिव
अमोल शेलवडे, उपाध्यक्ष वैभव मडावी, सदस्य अमोल पुनवटकर, रमण मेश्राम, मण कुचनकर,श्रीकांत देठे, कुचनकर, स्वप्नील बोथले रुपेश खुसपुरे, आशिष शेलवडे, विशाल कुचनकर खलील शेंख यासह सर्व ग्रामवाशी परिश्रम घेत आहे.