News Today
वणी (ता. वणी) | ३१ जुलै
राज विद्या केंद्र शास्त्री नगर व पूनवट शाखेच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मंदिर, वणी येथे एक सामाजिक प्रबोधन व गुरुपूजनाचा भव्य कार्यक्रम दिनांक ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण ठरले ते प्रेम रावत यांच्या “शांतीचा नांदेश” या कार्यक्रमाचे आयोजन. या माध्यमातून समाजात शांतता, संयम आणि आत्मप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. प्रेम रावत यांचे विचार आणि संवाद उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ठरले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते मा. देवराव पाटील धांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणी, आत्मसन्मान व संघटित लढ्याचे महत्त्व यावर सखोल विचार मांडले.

वसंत जिनिंगचे अध्यक्ष आ. आशीष खुलसंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दशरथ पाटील बोबडे, उत्तम गेडाम, घनश्याम पवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, तसेच सुरेश बारासागळे यांचाही कार्यक्रमाला सक्रिय सहभाग होता.
सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजातील सद्य:स्थिती, युवा वर्गाची जबाबदारी, आत्मशोध व अध्यात्मिक प्रगती याविषयी मौल्यवान विचार मांडले. त्यांनी राज विद्या केंद्राच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामदास पखाले यांनी केले,
समारोपाच्या सत्रात उपस्थित नागरिकांनी “शांतीचा नांदेश” कार्यक्रमात आत्मपरीक्षण व शांततेच्या महत्त्वाचा अनुभव घेतला. एकूणच हा कार्यक्रम समाजप्रबोधन, अध्यात्मिक उन्नती आणि गुरुंच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी सोहळा ठरला.



