Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 9

शेतकऱ्याचा मुलगा वैभव गवळी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यशस्वी, ताडउमरीचा संपूर्ण परिसर आनंदात — मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाची चमकदार कहाणी

0

News Today 

पांढरकवडा :- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

या निकालात यवतमाळ जिल्ह्याचे नाव अभिमानाने उजळवणारा विद्यार्थी म्हणजे ताडउमरी (ता. पांढरकवडा) येथील वैभव सुनील गवळी आर्थिक अडचणींशी झुंज देत, अढळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने चार्टर्ड अकाउंटंटच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे.

गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवने लहानपणीच संघर्षाचे चटके अनुभवले. वडील सुनील गवळी शेतकरी असून मर्यादित उत्पन्नात त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. घरातील सर्वांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला शिक्षणासाठी आवश्यक प्रोत्साहन दिले.

या आधारावर वैभवने शिक्षणाला जीवनाचे ध्येय मानले.वैभवचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण पांढरकवडा येथे झाले, तर चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रम त्याने नागपूर येथे पूर्ण केला. त्याच्या म्हणण्यानुसार, “प्रतिकूल परिस्थिती माणसाला घडवते. नियमित अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वास हेच यशाचे खरे सूत्र आहे.

” वैभवने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना, आजी-आजोबांना, काका-काकूंना, शिक्षकांना आणि मित्रपरिवाराला दिले.या यशामुळे ताडउमरी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावकरी, शिक्षक, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांनी वैभव व त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन केले.

शेतकरी समाजातून असे यश मिळवणारा वैभव अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थी अंतिम परीक्षेत यंदा यशस्वी ठरले असून तीन विद्यार्थी फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झाले.

त्यापैकी वैभव गवळीचे नाव विशेष उल्लेखनीय ठरले आहे. ग्रामीण भागातील जिद्दी आणि अभ्यासू तरुणांच्या यशकथांमधील वैभवची कहाणी ही पुढील पिढीला प्रेरणा देणारी आहे.

वणी नगर परिषद निवडणुका : “घटक पक्षांनी एकत्र यावे” — कार्यकर्त्यांची भावना प्रबळ

0

News Today 

वणी : – आगामी वणी नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र यावेत, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे कार्यकर्ते परस्पर संवाद साधत एकतेचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.

अद्याप अधिकृत पातळीवर कोणत्याही पक्षाने याबाबत निर्णय घेतलेला नसला तरी, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमताने एकतेच्या बाजूने आहेत. “मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो, तर वणीचा विकास आणि कार्यकर्त्यांचा सन्मान दोन्ही साध्य होतील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही काळापासून वणी शहरातील विकासकामांना वेग देण्यासाठी सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन चर्चाही करत आहेत. “राजकीय मतभेद असले तरी उद्दिष्ट एकच — वणीचा विकास,” या भावनेतून एकसंध आघाडी उभी राहावी, अशी सर्वसामान्य नागरिकांचीही अपेक्षा आहे.

काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले की, “लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच जर स्थानिक स्वराज्य संस्थेतही महाविकास आघाडी एकत्र आली, तर जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल आणि विकासाचे स्थिर सूत्र तयार होईल.”

दरम्यान, सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेचा सिलसिला सुरू असून, पुढील काही दिवसांत याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या वणीच्या राजकीय वातावरणात एकतेचा आणि सहकार्याचा सकारात्मक सूर उमटत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

वणी नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणसंग्राम – प्रभाग ९ मध्ये शंकर देरकर इच्छुक उमेदवार 

0

News Tosay 

वणी : वणी शहर पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढताना दिसून येत आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच, दि. ६ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या खेळी आखायला प्रारंभ केला आहे.

या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर १७ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस राहणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. शेवटी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा रंगली आहे.

काही प्रभागांमध्ये स्थानिक गटबाजी आणि नाराजीचे स्वर उमटत आहेत, त्यामुळे अनेक पक्ष अजूनही योग्य उमेदवार निवडण्यात व्यस्त आहेत. खास करून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट), तसेच स्थानिक गट आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखताना दिसत आहेत.

याच दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेकडून प्रभाग क्र. ९ मधून शंकर देरकर यांचे नाव चर्चेत आले आहे. शंकर देरकर हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असून, प्रभागात त्यांना कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे, त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची जोरदार शक्यता असून चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू ठरत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत नव्या पिढीच्या तरुण चेहऱ्यांसह अनुभवी नगरसेवक देखील रिंगणात उतरणार आहेत. हा सामना दुरुस्त व प्रत्यक्ष संघर्षाचा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शहरातील मतदारांचा भर विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता व बुनियादी सुविधांवर असल्याने उमेदवारांसाठी विविध आव्हाने उभी आहेत.

२ डिसेंबरच्या मतदानाने आणि ३ डिसेंबरच्या मतमोजणीने वणी शहरामधील सत्ता कोणाच्या हातात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर होताच प्रचाराचा रंग वाढेल, असे चित्र आहे.फोटोसाठी: खालील फोटोप्रमाणे ‘शंकर देरकर (प्रभाग क्र. ९, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)’ हे पात्र ठळकपणे वापरता येईल.

साथी पोर्टल 2 व अनावश्यक लिकिंग खत खरेदीविरोधात कृषी विक्रेत्यांचा बंद

0

News Today 

विवेक ठाकरे प्रतिनिधी

वणी:- राज्य शासनाच्या कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी ‘साथी पोर्टल 2’ चा वापर अनिवार्य केला आहे. मात्र या पोर्टलचा वापर प्रत्यक्षात करणे विक्रेत्यांसाठी अव्यवहार्य ठरत असल्याने वणी, झरी-जामणी आणि मारेगाव तालुक्यातील कृषी विक्रेता संघटनेने मंगळवारी कडकडीत बंद पाळला.

शासनाने बियाणे कंपन्यांसाठी फेज 1 मोहीम आणि विक्रेत्यांसाठी फेज 2 मोहीम जाहीर केली आहे. फेज 1 संदर्भात विक्रेत्यांना काहीही हरकत नसली, तरी फेज 2 अंतर्गत पोर्टल 2 द्वारे बियाणे खरेदी-विक्री सक्तीने करावी लागणार असल्यामुळे विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांना नोटीस देणे, परवाना निलंबित करणे अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येत असल्याने विक्रेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

याशिवाय काही बियाणे व खत उत्पादक कंपन्यांकडून “लिकिंग” पद्धतीने कृषी विक्रेत्यांना खत पुरवठा करण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार करण्यात आली. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना आवश्यक नसलेली खते खरेदी करावी लागत असून त्यांचा आर्थिक भुर्दंड वाढत असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. त्यामुळे या कंपन्यांच्या विरोधातही या बंददरम्यान घोषणाबाजी करण्यात आली.

बंदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत खालील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले —
1️⃣ कोणतेही लिकिंग साहित्य खरेदी करू नये.
2️⃣ भाडेतत्त्वावर (Freight basis) येणाऱ्या सर्व ऑर्डर तात्काळ रद्द कराव्यात.
3️⃣ पुढील काळात कोणतेही खत किंवा कृषी साहित्य लिकिंग किंवा अनपेड फ्रेड पद्धतीने खरेदी करू नये.
4️⃣ साथी पोर्टल 2 च्या विरोधात आवश्यकतेनुसार आंदोलन करणे सर्व विक्रेत्यांना बंधनकारक राहील.

या ठरावांची अंमलबजावणी सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी करण्याचे ठरविण्यात आले.

या संपात जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाचभाई, वणी तालुकाध्यक्ष देवराव काकडे, झरी-जामणी तालुकाध्यक्ष विजय कोठारी, मारेगाव तालुकाध्यक्ष प्रदीप उत्तरवार यांच्यासह वणी, झरी आणि मारेगाव तालुक्यातील सुमारे 120 कृषी सेवा केंद्र चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बंद यशस्वी केला.

निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचा कृतज्ञता सोहळ्यात विशेष गौरव 

0

News Today 

यवतमाळ:- श्रीमती लीलाबाई कावलकर यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित कृतज्ञता सोहळ्यात निस्वार्थ सेवा फाऊंडेशन या समाजहितासाठी कार्यरत संस्थेला विशेष गौरव करण्यात आला.

संस्थेच्या स्वैच्छिक रक्तदान प्रोत्साहन व निस्वार्थ रुग्णसेवेच्या कार्याची दखल घेत, डॉ. विजय कावलकर सर व त्यांच्या परिवाराकडून फाऊंडेशनला रु. २१,००० ची सन्मानराशी प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी फाऊंडेशनतर्फे परशुराम कडू, अनिकेत नवरे, चेतना ताई राऊत आणि अर्पित शेरेकर उपस्थित होते. 

वणीत काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न; नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचा निर्णय

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तारीख २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडली. या बैठकीत नगर परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा व महाविकास आघाडीच्या स्वरूपात रणनिती आखण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात माजी आमदार वामनराव कासावार यांनी माहिती देताना सांगितले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार संजय देरकर यांच्याशी लवकरच बैठक घेण्यात येणार असून, महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी चर्चा केली जाईल. तसेच या आघाडीत वंचित बहुजन आघाडीला देखील सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली असून, हा प्रस्ताव सध्या विचाराधीन ठेवण्यात आला आहे.

बैठकीस काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खूलसंगे, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, झरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजीव कासावार, इजहार शेख, दिलीप मालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांचे मार्गदर्शनाखाली प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर, तालुका अध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तसेच प्रदीप खोब्रागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सामायिक धोरण, जागावाटप आणि प्रचारयोजना याबाबत प्राथमिक चर्चा केली. उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन भाजपविरोधात मजबूत लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला.

“वणी शहरात विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देऊन, सर्वसमावेशक नेतृत्व तयार करणे हा आमचा उद्देश आहे,” — माजी आमदार वामनराव कासावार

महाविकास आघाडीसोबत मनसेही निवडणुकीत सहभागी होणार आहे त्यांचे सोबत औपचारिक बैठक घेऊन लवकरच घोषणा देखील करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.

 

अबब…१५ एकर शेतीवर मिळते १०० कोटीचे कर्ज! फक्त अट एकच तुम्ही आमदार आहात का? भाजप आमदार दाम्पत्यावर ‘मेगा लोन’चा वाद वाचा सविस्तर वृत्त

0

News Today 

नागपूर – भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य आमदार डॉ. परिनय फुके आणि त्यांची पत्नी परिणीता फुके यांच्या नावावर केवळ १५ एकर शेतीवर तब्बल १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. आ. फुके हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात.

कॅनरा बँकेच्या नागपूर शाखेने हे कर्ज ५ मार्च २०२४ रोजी मंजूर केले असून उद्देश “शेती विकास प्रकल्प” असा नमूद करण्यात आला आहे. मात्र या रकमेचा वापर व्यावसायिक उद्देशासाठी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मौजा रनाळा तालुका कामठी येथील सर्व्हे नंबर १२९/१/१/४४ आणि १२९/१/१/६४ मधील एकूण ६.०७ हेक्टर (१५ एकर) जमीन परिणीता फुके यांच्यासह इतर काही लोकांच्या प्रमुख मालकीची असून सातबारा उताऱ्यात परिनय आणि परिणीता फुके या दोघांची नावे नोंद आहेत. या जमिनीचे एन. ए. प्लॉट करून हे कर्ज घेतल्याची माहिती आहे. परंतु खरच हे प्लॉट या किमती आहे का? हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कारण, सामान्य शेतकऱ्यांना एवढ्याच क्षेत्रावर केवळ ५० ते ७५ लाख रुपयांचे कर्जही मंजूर होत नाही, तर सत्ताधाऱ्यांना थेट कोट्यवधींची सवलत मिळते, असा रोष व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांचं म्हणणं कामठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना “ना हरकत प्रमाणपत्र”, “भांडवल पुरावा” अशा विविध कारणांनी बँकांकडून कर्ज नाकारले जाते. शेतकरी संघटनांचे नेते सांगतात, “१५ एकर शेतीवर आम्हाला २० लाखांचं कर्जही मिळत नाही, पण MLC साहेबांना १०० कोटी! हे अन्यायकारक आहे.”

राजकीय वाद निर्माणया घटनेवर विरोधकांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी “सत्तेचा उघड दुरुपयोग” असा आरोप करत तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर #FukeLoanScam हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला असून ग्रामीण भागात या प्रकरणावरून संताप उसळला आहे.प्रशासनाने घ्यावी दखलराज्यात सुमारे १० लाख शेतकरी आजही कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यापैकी केवळ ३० टक्क्यांना कर्ज मंजूरी होते, अशी अधिकृत आकडेवारी सांगते. 

अशा वेळी सत्ताधाऱ्यांना १५ एकरवर १०० कोटींचे कर्ज मिळाल्याने बँकिंग व्यवस्थेतील असमानता समोर आली आहे.शेतकरी संघटनांनी सरकारकडे या प्रकरणाची चौकशी, पारदर्शकता आणि समान कर्जनियमांची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभरात शेतकरी मोर्चाचे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना असे भाजपाच्या आमदारांचे प्रकरण उघडकीस येत असल्याने मतदारांमध्ये मोठी नाराजीचे सूर उमटत आहे. 

बघा व्हिडिओ.

https://www.instagram.com/reel/DQVrX8ECIHj/?igsh=ZmdzcmR0emQwemxr

 

 

सुगंधित तंबाखूची तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरून? तेलंगणा, मध्यप्रदेश, आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात वणी शहरात पुरवठा

0

News Today

वणी:- शहरात सुगंधित तंबाखू विक्रीवरील सरकारी बंदी असूनही हा घातक पदार्थ खुलेआम उपलब्ध आहे, हे उघड झाल्यानंतर आता या अवैध व्यवसायामागील मोठे तस्करी रॅकेट उघडकीस येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विश्वासार्ह सूत्रांचे म्हणणे आहे की तेलंगणा, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा गुप्त मार्गाने वणी शहरात पोहोचवला जातो.

या तस्करीसाठी खास लॉजिस्टिक नेटवर्क तयार करण्यात आले असून, माल कंटेनर, ट्रक तसेच खासगी वाहने वापरून शहराच्या बाहेरील परिसरातून गाळवला जातो. हा माल शहरातील काही किराणा दुकानदारांकडे व वितरकांकडे साठवला जातो आणि नंतर लहान पानठेल्यांपर्यंत पोहोचवला जातो, अशी माहिती मिळाली आहे.

स्थानिक सूत्रांकडून कळते की सीमा भागात असलेल्या काही ट्रान्सपोर्ट सेवा व पेट्रोल पंपांच्या माध्यमातून या तंबाखूचा गैरव्यवहार चालतो. अनेकवेळा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहितीदेखील देण्यात आली; मात्र अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही.

अन्न सुरक्षा कायद्यानुसार सुगंधित तंबाखूची आयात, साठवणूक अथवा विक्री हा गंभीर गुन्हा असून दोषींवर तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. तरीदेखील, या मुद्द्यावर प्रशासन गप्प का आहे, असा सवाल नागरिक करत आहेत.

आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की इतर राज्यांतून येणाऱ्या या बेकायदेशीर मालावर नियंत्रण न ठेवल्यास तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येईल. नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय पथकाकडून करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मारेगाव तालुक्यात सामूहिक गायगोधन गोपूजा सोहळा 2025 संपन्न

0

News Today 
वणी:- अनेक वर्षांची परंपरा असलेला यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील टेकडीवरील माळावर (मोठा देव मंदिर), (वणीवरून पंधरा किलोमीटर तर मारेगाववरून नऊ किलोमीटर अंतर) बलिप्रतिपदेच्या दिवशी बुधवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत गायगोधनाचा सामूहिक सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या गायगोधन सोहळ्यासाठी चिंचाळा, वरुड, आकापूर, नेत, पाथरी, पारधी वस्ती, पिसगाव, पहापळ या गावांतील गुराखी व शेतकरी यांनी आपल्या गावातील सजविलेल्या शेकडो गायींना वाजत गाजत पूजेसाठी आणले. मंदिराचे पुजारी अंकुश गेडाम यांनी मोठा देवाची पूजा व आरती करून सजविलेल्या गायींची मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. या प्रसंगी गुराखी मंडळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वादन, गायन, तसेच गायगोधनाशी संबंधित गाणी व आरत्या सादर केल्या.

 

भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत गायी, पशुधन आणि गुराख्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे यांच्या संकल्पनेतून गुराखी मंडळींचा सत्कार करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. यावर्षी प्रज्योत भाऊराव खंडरे (चिंचाळा), शंकर गोविंदा नागोसे (वरुड), श्रीराम घोरपडे व वैभव ढवळे (नेत), नंदू पोतू कोरझरे (साले भट्टी), संदीप मरसकोल्हे (गौराळा), आशिष वाढई (आकापूर), बाल गुराखी व वादक विशाल रामभाऊ चाहारे (चिंचाळा), अन्य गुराखी, पोलीस कर्मचारी व वनविभाग कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि राष्ट्रसंतांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. महिला गुराखी, बाल वादक आणि महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आकर्षण ठरली.

यवतमाळ जिल्ह्यात अशा सामूहिक गायगोधन सोहळ्यांचे आयोजन अनेक ठिकाणी होत असले तरी टेकडीवरील माळावरील हा सोहळा उंच परिसरात असल्याने दूरवरूनही स्पष्ट दिसतो. त्यामुळे भाविकांची उपस्थिती दरवर्षी वाढत आहे.

मोठा देव मंदिराची जीर्णावस्था लक्षात घेऊन शासनाकडून जीर्णोद्धाराची अपेक्षा भाविक करत आहेत. तसेच भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलची सोय करण्याची मागणीही होत आहे.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, शशिकांत तावाडे (उपसरपंच, चिंचाळा ग्रामपंचायत), देवीदास भट (उपसरपंच, वरुड ग्रामपंचायत), चंद्रकांत ढोबे (उपसरपंच, गौराळा ग्रामपंचायत), संदीप कारेकर (सरपंच, आकापूर-नेत ग्रामपंचायत) आणि दिवाकर रिंगोले यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमस्थळी मद्यपान करून येणे, मद्यपान करणे आणि फटाके फोडणे यावर सक्त मनाई होती. आमदार संजय देरकर (वणी विधानसभा मतदारसंघ), जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (वणी), पोलीस निरीक्षक (मारेगाव) आणि वनविभाग (मारेगाव) यांच्या सहकार्याने ठेवलेल्या कडक बंदोबस्तामुळे हा सोहळा अत्यंत शांततेत पार पडला. उपस्थित भाविक समाधानी होते.

एक काळी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या सोहळ्याला उर्जितावस्था आणण्यासाठी 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, शशिकांत तावाडे, देवीदास भट, चंद्रकांत ढोबे, संदीप कारेकर आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

वणी नगर परिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक ५ मध्ये मनोज दुर्गे यांच्या उमेदवारीला वेग

0

मंगेश गोरे (प्रतिनिधी)

वणी :-– येत्या वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे दामले नगर येथील रहिवासी आणि पक्षाचे तडफदार कार्यकर्ते मनोज लक्ष्मण दुर्गे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रभाग क्रमांक पाच हा अनुसूचित जाती (sc) सर्वसामान्य  राखीव असून, गेल्या काही वर्षांपासून समाजकार्याच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास संपादन केलेले मनोज दुर्गे हे युवा, ऊर्जावान आणि लोकसंग्रहशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सर्वांच्या अडचणींना तत्परतेने हातभार लावणारे व सर्व धर्म संभावाचा सन्मान करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची छाप स्थानिक पातळीवर उमटली आहे.

स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सोयीसुविधांच्या प्रश्नांवर मनोज दुर्गे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे वॉर्डातील सर्व समाजघटकांमधून त्यांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्याच बरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय नगराळे, रज्जाक पठाण, आबिद हुसेन, सूर्यकांत खाडे, राजू वांढरे, तथा विनोद ठेंगणे हे देखील त्यांच्या नावाला सहमती देतील अशी चर्चा आहे. त्यामुळे पक्षांतर्गत चर्चांमध्ये त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला वेग दिला आहे.

पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मनोज दुर्गे यांच्या प्रचाराची पूर्वतयारी करताना दिसत असून, वॉर्डात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. “जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाचे वारे वाहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे मनोज दुर्गे यांनी सांगितले.

दरम्यान, वणी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मजबूत संघटनेच्या बळावर उतरतेय. प्रभाग क्रमांक ५ मध्ये मनोज दुर्गे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.