Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 36

रायपूर येथील पाण्याच्या टॉकीवर महिलेच्या “शोले” आंदोलनाची आ. संजय देरकरांच्या पुढाकारातून झाली सांगता

0

News Today (प्रतिनिधी)

वणी :- विधानसभा क्षेत्रातील झरीजामनी तालुक्यातील रायपूर या छोट्याश्या गावातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने तारीख १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पासून गावच्या विकासासाठी चक्क पाण्याच्या टॉकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले असता या आंदोलनाने प्रशासनाची धावाधाव झाली होती. या आंदोलनाची माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी दोन तासात सर्व अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी उपस्थित करून आंदोलकांची मागण्या मान्य करून आंदोलनाची सांगता केली.

झरीजामानी हा आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास कुठेच दिसून येत नाही. अनेक आदिवासी गावांमध्ये जाण्यासाठी सुरळीत रस्ते नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्मशानभूमी नाही, त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाही, अंगनवाड्यांचे प्रश्न आहे. गावच्या मूलभूत गरजेच्या अनेक समस्या आहे.

अश्यातच रायपूर हे एक आदिवासी समाजाचं पोड आहे. या ठिकाणी केवळ ४० घरे असून १७० लोकसंख्या आहे. हे गाव भाजपचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या लिंगटी या गावाला लागून असून मागील मागील दहावर्ष सत्तेतील आमदारकी भोगून देखील या गावच्या मूलभूत गरजा पूर्ण करता अल्या नाही. त्यामुळे स्वताला विकास पुरुष संबोधून विकास होत नाही तर गावाची परिस्थिती सर्वकाही बोलून जात होती.

रायपूर या गावातील सामाजिक कार्यकर्त्या क्रांतीवीर शामादादा कोलाम महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंद्रे यांनी गावात जाण्याचा रस्ता तत्काळ करून मिळावा, स्मशानभूमीच्या प्रश्न निपटारी लावून त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता तयार करून मिळावा, गावातील चावडी जवळील सभागृहाचे काम चालू करावे, आणि इतर समस्या घेवून शासनाच्या दरबारी चकरा मारून थकल्या नंतर सरळ पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आमरण उपोषणाचे शस्त्र उभरताच प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडवून दिली.

या आंदोलनाची माहिती वाणीचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी सर्व संबंधित प्रशनातील अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी हजर राहण्याचे आदेश दिले असता सर्व विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हे हजार झाले. आ. संजय दरेकर यांनी काल तारीख १३ डिसेंबर रोजी रायपूर गाठून अधिकारी व कर्मचारी व आंदोलक यंचेसोबत यशस्वीरित्या चर्चा करून पुढील दोन महिन्यात आंदोलनाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देवून संबंधितांना त्या पद्धतीने कार्य करण्याचे सुचवून आंदोलनाची सांगता केली. आ. देरकर यांच्या धडाडीच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष तथा काँग्रेस नेते राजू येल्टीवार, श्रीगुरूदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, युवक कांग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष राहूल धांडेकर, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष निलेश येल्टीवार, माजी सभापती संदीप बर्रेवार, सरपांचा गीता पुसाम, युवा सेनेचे समीर लेनगुरे, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष इंगळे , सेनेचे संदीप विंचू, झरीचे तहसिलदार रासने सा. बां. विभागाचे मून ,पं.स.विस्तार अधिकारी कैलास जाधव , तलाठी मोरे , भूमिअभिलेख विभागाचे विलास मुत्यालवार आदिवासी प्रकल्प विभागाचे सोनटक्के ग्रामसेवक प्रकाश बळीत, हरिदास गुर्जलवार, दिवाकर पुसाम, नागोराव उरवते, अरविंद भेडोडकर, उपसरपंच सतीश टेकाम, सदस्य अमोल तेलंग,, लक्ष्मीबाई मंडपाचे, गीताताई नैताम, सुवर्णा पदकांतीवर, गंगाधर अत्राम, शंकर अकुलवार, विनोद उप्परवार, सतीश अदेवार, दयाकर गेडाम, अनिल डेगरवार आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार संजय देरकर 

सदर आंदोलनाची गांभीर्याने दाखल घेवून आमदार संजय देरकर  यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ आंदोलनस्थळी उपस्थित करून आंदोलनाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सुचविले व गावकऱ्यांना ठोस आश्वासन दिले असता सर्व गावकऱ्यांनी उत्साहात आमदार संजय देरकर यांचा भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी प्रसंगी आ. संजय देरकर आपल्या मनोगतात असे बोलले की, आपण मतदानातून दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तळा जाणार नाही. गावच्या आणि विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची मी सदैव कटिबद्ध राहील. आपल्या सेवेची मिळालेली ही संधी आहे. आ. देरकर यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

Ground report : जनभावनेचा अनादर लोकशाहीला बाधक,मारकडवाडीतील जनक्षोभाची ठिणगी राज्यभर 

0

सरकारने रचला दडपशहीचा पाया , EVM हटविण्याच्या दिशेने मतदारांचा मूड

NEWS TODAY | दिलीप भोयर 

Political News | नुकतीच राज्याची विधानसभा निवडणूक संपली. अनाकलनीय, अनपेक्षित व आश्चर्यकारक निकालाने राज्यभरातील मतदार सैरभैर झाले आणि ते एकमेकांकडे संशयाने बघायला लागले. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावाने हुकूमशाही विरोधात आवाज उठवून EVM विरुद्ध रणशिंग फुंकले. सत्यता जगाला कळेल असं समजताच सरकारने दडपशहीचा पाया रचला आणि गावातच घेण्यात येत असलेल्या मतपत्रिकेवरील मतदानाला विरोध दर्शवला यामुळे मारकडवाडीतील जनक्षोभाची ठिणगी राज्यभर पसरली. 

मारकडवाडी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील छोटेसे गाव जेमतेम पंधराशे ते दोन हजार मतदान असेल. आपल्या उमेदवाराला गावात भक्कम मतदान होईल अशी त्यांची रास्त अपेक्षा आणि घडलं विपरीत. या गावत उत्तमराव जानकर व विजयसिंह मोहिते पाटील यांचे दोन मोठे गट आहे. तिसरा गट म्हणजे भाजपाचा आहे. नेहमी लढत जानकरव मोहिते गटात व्हायची. येथे तिसरा गट भाजपचा जनाधार अल्प. मात्र यावेळी जानकर व मोहिते गट एकत्र असल्याने भाजपची कोंडी झाली व मताधिक्य घटेल असं वाटत असतानाच चित्र वेगळेच दिसल्याने ग्रामस्थ कमालीचे बिथरले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमुळे आ. उत्तमराव जाणकार व विजयसिंह मोहिते पाटील यांचे दोन्ही गट एकत्रपणे सोबत होते आणि भाजप विरुद्ध पार्टी होती. निवडणुकीचे बिगुल वाजताच महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर तर महायुतीकडून राम सातपुते हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आले आणि निवडणूक संपन्न झाली. या गावात भाजप उमेदवाराला अल्प मते मिळतील असे असताना त्यांना घसघशीत मते मिळाली आणि evm च्या कार्यपद्धती ची ठिणगी पडली. मतदारात कमालीचा जनक्षोभ उसळला.

मतमोजणीत माळशिरस विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर हे निवडून आले. तसा तर सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. परंतु तो आनंद मारकडवाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत नव्हता. सर्व जण चिंतेत पडले की गावातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जाणकार यांना मतदान कमी कसे पडले. गावातील 80 टक्के लोक सातपुते यांच्या विरोधात मतदान करणारे होते. हीच बाब ग्रामस्थांना खटकली आणि मत पत्रिकेवर मतदान करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून संपूर्ण गावकऱ्यांचा होता.

उत्तमराव जानकारांना कमी मतदान हे कोणालाही मान्य नव्हते. त्यामुळे गावातील सर्व तरुणांनी एकता निर्माण केली व मतदान प्रक्रिया पार पाडणारी EVM मशीनवर शंका घेतली. या शंकेचे निराकरण झाले पाहिजे. त्यासाठी गावातच गावकऱ्यांकडून कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घेवून आपल्या शंकेचे निराकरण करायचे अस गावकऱ्यांचे ठरल त्यांनी नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर व विजयसिंह मोहिते पाटील, आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सल्ला मसलत केली. आणि गावकऱ्यांनी कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी तसा सर्वानुमते ठरावही घेतला आणि मतदानाची तारीख ठरली.

एखाद्या गोष्टीवर जर शंका येत असेल तर त्याचे निराकरण करणे हे अनिवार्य असते. मतदान तर लोकशाहीची ताकत आहे. इथे माणसांचा माणसांवर विश्वास नाही. तर मग माणसाने बनवलेल्या EVM मशीन माणसाने का म्हणून विश्वास ठेवायचा असा प्रश्न प्रत्येक मतदारांमध्ये पडला होता. म्हणून येथील गावकऱ्यांनी कागदी मतपत्रिकेवर आपले मतदान करून EVM मशीनची सत्यता पडताळ्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न उभारला केला आणि यातून निवडणूक आयोगाच्या EVM वरील शंका कुशंका देखील दूर झाली असती.

एक तर हा गावकऱ्यांनी सर्वानुमते अशासकीय प्रयत्न उभरण्याला होता. तो केवळ एका गवापुरता मर्यादित होता आणि यातून कोणताही आक्षेप कुणावर नव्हता. यात खर तर सरकारने आपके तोंड खुसायला पाहिजे नव्हते. कारण “गाव करी ते राव न करी” गावकऱ्यांचा निर्णय गावकऱ्यांना पूर्णत्वास नेण्यासाठी कोणाचीही हरकत नव्हती. आणि गावकऱ्यांना अडविण्याचा अधिकार सरकारला नाही. आपल्या गावात काय करायचे आणि काय करायचे नाही, हा अधिकार गावकऱ्यांना आहे.

गावकऱ्यांनी बहुमतांनी EVM मशीनची सत्यता आणि गावातील मतदान खरंच योग्य झाल आहे का? हे तपासण्यासाठी तारीख ३ डिसेंबर २०२४ रोजी कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायची ठरवलं असता सरकारने तत्काळ पोलिस छावणी उभी केली. त्यामुळे गावकरी आणखी संतापले व शेवटी गोळी सुद्धा छातीवर झेलू पण मतदान करूच या भूमिकेवर ठाम झाले. त्यामुळे सरकारने आणखी त्यागावर सैन्याची तुकडी पाठवून गावाला छावणीचे स्वरूप दिले व काही महत्वाच्या पुढाऱ्यांना नजर कैद केले आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण केले. 

निवडणूक आयोगाची EVM मशीन पारदर्शक आहे असे त्यांचे ठाम मत आहे तर मग गावकऱ्यांना गावकऱ्यांच्या खर्चाने उभारलेला कागदी मतपत्रिकेचा प्रयोग का उधळून लावावा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. हा प्रयोग उधळून लावल्याने ही EVM मशीन आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आणि या आंदोलनाची ठिणगी आता राज्यभर पेटली आहे. 

राज्यात महायुतीचे कोणतेही वातावरण नसताना त्यांच्या अनपेक्षित २३२, जागा निवडणुकीत विजयी होणे हे एक राज्यातील प्रत्येक मतदारांना अविश्वसनीय बाब आहे. त्यामुळे जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध लढले आणि देशाला स्वतंत्र मिळवून दिले. या स्वातंत्र्यातून मिळालेली लोकशाही ही अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य झाले आहे. 

अमेरिका, जपान सारखे तंत्रज्ञानात प्रगत असलेले देश आजही कागदी मतपत्रिकेवर निवडणूक लढवीत आहे. आणि आपल्या देशात अजून कोणतेच असे थोड तंत्रज्ञान अवगत नाही. देशाची ७०% जनतेला वापरत असलेला मोबाईल व्यवस्थित कळत नाही. संगणकाचे पाहिजे तसे ज्ञान नाही. मग EVM मध्ये काय आहे. आणि काय नाही हे जिल्ह्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील व्यवस्थित माहिती नाही. मग ही EVM मतदारांच्या मानगुटीवर मनमानी पद्धतीने का म्हणून बसविल्या जात आहे. असा निर्वाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकशाहीत लोक या देशाची मालक आहे. प्रशासनातील अधिकारी हे जनतेचे नौकर व सरकार मधील मंत्री हे जनतेचे मुनिम आहे. मालक नाही. मग हे नोकर आणि मुनिम यांना जनतेने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जाण्याचा अधिकार कोणी दिला आहे. लोकशाहीची हुकुमशाही या EVM ने तर निर्माण केली नाही ना? लोकशाही वाचवायची असेल तर देशातील प्रत्येक तरुणांना आता EVM च्या विरुद्ध आवाज मजबूत करण्याची वेळ आली आहे. आता कोणताही क्रांतिकारी देश वाचवायला येणार नाही तर त्या क्रांतीकाऱ्यांचे स्मरण करून क्रांती घडविण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी मारकडवाडी या गावातील तरुणांनी व गावकऱ्यांनी या क्रांतीची ठिणगी पेटवली आहे असे दिसून येत होते.

बिग ब्रेकिंग… पोलिसांनी पकडल्या लाखोच्या बनावट नोटा, लाखो रुपये जप्त, मोठी कारवाई 

0

News Today 

दिलीप भोयर

पंढरपूर :- येथील शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी   आज ता. ६ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ५०० च्या बनवत नोटा बाळगणाऱ्याणा एका चार ते पाच जणांच्या समूहाला अटक करण्यात आली आहे. त्यांचे जवळून लाखो बनावट रुपये जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. 

पंढरपूर पोलिसांच्या गुप्तचर विभागाला काही लोक बॅगमध्ये भरून  पंढरपुरात दाखल झाले आहे. त्यांचे जवळ लाखो बनावट रुपये आहे. अशी माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार विश्वजित घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सापडा रचण्यात आला व संशयितांची झडती घेताच लाखो रुपये मिळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी अटक करण्यात आली आहे. वृत्त लीहेपर्यंत गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू असू शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक विश्वजित घोडके यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कौतुक केल्या जात आहे.

लक्षवेधी०२… आचार संहितेचे उल्लंघन करून वृक्ष लागवड झाली कशी गुन्हा दाखल करणार का? जनतेचे लागले लक्ष,

0

सा. बां. विभागाची मान्यता नसताना वर्क ऑर्डर झाली कशी

News Today

दिलीप भोयर

वणी :- वृक्ष लागवडीची कोणतीही रीतसर परवानगी नसताना येथील मुख्य मार्गावरील दुभाजकाच्या मधोमध वृक्ष लावलेल्याने चक्क आचार सहितेचा झाला असून या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का ? तसेच वृक्ष लागवडी करण्यासाठी जागेची उपलब्धता नसताना त्या कामाची वर्क ऑर्डर केली कशी असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजाची चौकशी करण्याची गरज प्रशासनासमोर निर्माण झाली आहे.

वणी शहरातील टिळक चौक ते हॉटेल नंदिनी, टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या मधोमध वृक्ष लागवडी आणि तीन वर्ष संगोपनाची निविदा नगर परिषद यांचे कडून काढण्यात आली व तारीख ११ ऑक्टोंबर रोजी वर्क ऑर्डर देखील पास करण्यात आली.  सदर निविदा काढण्याचे अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियमाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शन प्रणालीने रीतसर परवानगी घेणे अनिवार्य आहे. 

सा. बां. विभागाची कोणतीही परवानगी न घेता नगर परिषदेकडून तब्बल १ कोटी ३३ लाखाची निविदा प्रकाशित करून त्यांची वर्क ऑर्डर देखील संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली. कोणतीही मान्यता नसताना येवढ्या मोठ्या निधीची वर्क ऑर्डर ही कोणत्या नियमाच्या आधारे काढली याची कोणतीही कायदेशीर माहिती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नाही. 

जेव्हा की साधा रस्ता जरी एखाद्या शेतकऱ्यांनी परवानगी न घेता सिंचनाच्या सोयी करिता खोदला तर त्यांचेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करायला हे प्रशासन प्रामुख्याने सामोरे जावून गुन्हे नोंद करीत असतात मग आता कोणतीही परवानगी नसताना नागरिकांना समस्या निर्माण करणारे वृक्ष लागवड केली तेही आचार संहिता चालू असताना ही गंभीर बाब नाही का? मग यांचेवर गुन्हे नोंदविण्यासाठी प्रशासन का धजवल्या जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

वणी शहर प्रदूषणाने ग्रासलेले आहे. इथे लावले तेवढे वृक्ष कमीच पडतात. वृक्ष लागवड ही पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. परंतु कोणते वृक्ष कुठ लावायला पाहिजे जाची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु नगर परिषदेकडून करोडो रुपये खर्च करून या वृक्षांचे संगोपन करणे म्हणून विना परवानगीने वृक्ष लागवड करणे हा गंभीर गुन्हा आहे.

 खरच नगर परिषदेला वृक्ष लागवड करून शहराचे सौंदर्य वाढायचे असते ते शहरात वृक्ष संवर्धन समितीने या अगोदर शेकडे वृक्ष लागवड करून त्यांचे मोफत संगोपन केले आहे. ते वृक्ष आजही रस्त्याच्या दुबाजुंनी हिरवळ थंडगार सावली देत आहे. हेच काम वृक्ष संवर्धन समितीकडे दिले असते तर येवढ्या निधीत संपूर्ण वणी शहर हिरवेगार करून टाकले असते. आणि त्यांचे संगोपन देखील उत्तम प्रकारे केले असते अशी चर्चा शहरात सुरू आहे.

वृक्ष लागवड करायचीच होती तर आपल्या शहराजवळ पांढरकवडा, वरोरा, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी रस्ता दुभाजकावर सौंदर्य निर्माण करणारी आनंददायी झाडे लावलेली आहे. ती फुलांची झाडे निरागस सौंदर्य फुलवीत आहे. मग येथील तत्कालीन लोकप्रतिनिधी अधिकारी यांना का दिसली नाही. सौंदर्यदृष्टी व लोकांचा आनंद कशात आहे हे न ओळखणारे राज्यकर्ते असले की रस्ता दुभाजकावर नागरिकांना त्रासदायक झाडे लावली जातील आणि सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाची भ्रष्टाचार करून विल्हेवाट लावल्या जाईल ही बाब अतिशय गंभीर आहे. 

शहरातील संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी वृक्ष संवर्धन समितीने कोणती झाडे लावली आणि डिव्हायडरच्या मधोमध कोणते वृक्ष लावायला पाहिजे याची साधी कल्पना नसणारे बेमुर्वत पैशाची उधळपट्टी करणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची चौकशी करून त्यांचेवर गुन्हे दाखल करून पैसे वसूल करणे गरजेचे आहे. ही त्रासदायक झाडे उपडून नवीन फुलझाडे लावण्याकरिता समाजातील जागरूक नागरिकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे.

याच रस्त्यावर रेल्वे स्टेशन बाजार समिती दत्त मंदिर जगनाथ बाबा मंदिर, लोकमान्य टिळक महाविद्यालय या महत्वपूर्ण संस्था असून मुख्य बाजारात जाण्याचा आणि इतर शहरात जन्यचासाठी हा एकच मार्ग आहे. इथे विद्यार्थी भाविक भक्त शेतकरी शेतमजूर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. लावलेली झाड काटेरी टोकदार प्रवाशांना त्रासदायक होईल हे भ्रष्टाचार करणाऱ्यांना साधे भान सुद्धा राहिले नाही. या रस्त्यावरू सर्वांच्या कुटुंबातील लोक जाणार त्यांनाही त्रास होऊ शकते याची कल्पना नाही. अशा जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या मुर्दाडाची भर चौकात धिंड काढणे काळाची गरज आहे.

जनतेच्या पैसा सरकारी तिजोरी खर्च करून जीनागरिकांना त्रासदायक होणारी वृक्ष लागवडीला विकास मनाचे की भकास . वारे करते धरते वारे विकास एकदम छान लोकप्रतिनिधी व अधिकारी कंत्राटदाराच्या साहाय्याने मालामाल आणि मालक जनतेचे होते बेहाल. अश्या निर्लज्ज लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून येण्याची अपेक्षा करावी ही लाजिरवाणी बाब आहे. पराभव आला म्हणून रडणारे जनतेच्या पैश्याची उधळपट्टी करणार आणि पराभवाचे खापर इतरांवर फोडणार अश्या भ्रष्ट लोकांवर गुन्हे नोंद करायलाच पाहिजे अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कोणते वृक्ष लागवड करायची मंजुरात घेतली  – मुख्याधिकारी सचिन गाडे 

रस्ता दुभाजकावर मधोमध लावण्यात आलेले वृक्ष संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून तांत्रिक मांजुरात घेतल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी दिली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी नसताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला सरळ सरळ परवानगी देता येत का आणि काटेरी टोकदार वृक्ष लागवडीसाठी गाईडलाईंस करता येत का ही चौकशीची बाब निर्माण झाली आहे. 

 

लक्षवेधी…रस्ता दुभाजकाच्या मधोमध लावलेले वृक्ष सौंदर्यासाठी की समस्येसाठी, वृक्ष लागवडीच्या गाईड लाइन्स बनवल्या तरी कोणी ?

0

सां. बा. विभागाची परवानगीच नाही, १.३३ कोटी खर्च कशासाठी

News Today

दिलीप भोयर 

वणी :-  येथील मुख्य मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या बोगस काँक्रिट रस्ता बांधकामातील दुभाजकाच्या मधोमध लावण्यात आलेले वृक्ष हे सौंदर्यासाठी आहे की समस्या निर्माण करण्यासाठी आहे. असा प्रश्न उपस्थित झाला असून या वृक्ष लागवडीसाठी लागणारी गाईडलाइंस बनवली तरी कोणी यावर आता मोठी शंका निर्माण होऊन जवळपास १.३३ कोटी रुपयाच्या खर्चाची रीतसर चौकशी करण्याची वेळ निर्माण झाली आहे. 

चिखलगाव रेल्वे चौपाटी ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत नव्याने बोगस पद्धतीने बांधण्यात आलेला काँक्रिट रस्ता हा अगोदर पासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. रस्ता बांधकाम करणारा कंत्राटदार याने हा रस्ता न बांधता वणीतील आर. व्ही. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीने तत्कालीन एका माजी लोकप्रतिनिधींच्या (मामा) सहकार्याने नित्कृष्ट दर्जाचा बांधकाम केला आहे. या रस्त्यावरील चौकशीची कारवाई राजकीय हस्तक्षेपामुळे सत्तेचा दूर उपयोग करून केराच्या टोपलीत टाकली आहे. 

याच रस्त्याच्या दुभाजकाच्या आता नगर परिषदेकडून मोजके वृक्ष लागवड केल्याची माहिती आहे. खरे तर या दुभाजकाच्या मधोमध मार्गाचे सौंदर्य खुलण्यासाठी वृक्षांची लागवड असते. त्यात  बोगनवेल, तिकोमा, कनेर, जास्वंद, चमेली, अनंता इत्यादी शोभिवंत फुल वृक्ष लावने अनिवार्य आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या फुलांपासून आनंद होतो सोबतच शहराच्या सौंदर्यात भर पडते. प्रवाशामध्ये आनंददायी सकारात्मकता या फुलझाडामुळे निर्माण होते. तसेच रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने जेणाऱ्या वाहनाचा लाईटचा प्रकाश जाणाऱ्या वाहनावरीच चालकांना विचलित करू नये. व कोणताही अपघात घडू नये. यासाठी ही वृक्ष लागवड असते. 

वृक्ष लागवडीच्या या मूळ उद्देशाला डावलून नगर परिषदेने या दुभाजकाच्या मधोमध काटेरी टोकदार फांद्याचे वृक्ष लावले आहे. ज्या वृक्षांच्या फांद्या नारळाच्या फांद्या सारखे टोकदार असतात असे अनेक वृक्ष लागवत केली आहे. हे वृक्ष लांब वाढतात व त्यांच्या फांद्या २५ ते ३० फूट गोलाकार घेतात तर काही वृक्ष काटेरी आहेत. ज्या वृक्षापासून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करताना त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होवू शकतो. 

 

रस्त्याच्या दुभाजावरील मध्यभाग हा रस्त्याचा असल्याने तो अत्यंत कडक असतो कारण मुरूम , डांबर, टाकलेला असतो त्यामुळे लावण्यात आलेल्या वृक्षाची मुळे खोलवर जावू शकत नाही. त्यांना पाहिजे तशी मजबुती येत नाही. लावण्यात आलेली ही वृक्ष उंच वाढणारी आहे. त्यामुळे जोरदार हवा पाण्यात ही वृक्ष कोसळण्याची देखील दाट शक्यता आहे. अश्यावेळी एखादे वृक्ष जर रस्त्यावरील मार्ग भ्रमण करीत असलेल्या वाहनावर कोसळले आणि यात जीवित हाणी झाल्यास या घटनेला नेमके जबाबदार कोणाला धरायचे अशी वेळ निर्माण झाली आहे. 

रस्ता दुभाजक असल्याने वाहन चालविणारे सर्व नागरिक हे त्या दुभाजकाच्या जवळूनच अहन चलविणार आहे. यात एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याला काटेरी झाडाच्या किंव्हा टोकदार फांदीची इजा झाली, किंव्हा त्या फांद्यांमुळे एखादा अपघातात आणि अपंगत्व आल किंव्हा जीव गमावावा लागला तर  या दुर्दैवी घटनेची जबाबदारी कोणाची? म्हणून या वृक्ष लागवडीच्या गाईड लाइन्स कोणत्या तज्ज्ञांनी बनवली आहे. की कोणाच्या दबावात येवून मनमनी कारभार केला आहे. यासाठी चौकशी होणे गरजेचे झाले आहे. 

या मार्गाने दररोज लाखो वाहने चालल्या जात आहे. इजा होणारे वृक्ष व या कामात होत असलेली अनियमितता यासाठी नगर परिषद व संबधित विभागाकडून कोणत्या उपाय योजना आखल्या गेल्या आहेत का ? असेल तर त्यांची अमलबजवणी कोणत्या पद्धतीची आहे. या सर्व गोष्टींची खातर जमा केली आहे का? यावर चिंतनाची गरज आहे.

शासनाचा निधी मिळाला आणि तो कुठंही खर्च केला म्हणजे विकास म्हणता येईल का ? शासनाचा निधी म्हणजे तो जनतेचा पैसा आहे. तो पैसा जनतेच्या विकसित धोरणावर त्यांच्या सौरक्षण साधून खर्च करायचा आहे. केवळ कमिशन खोरीसाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जर मनमानी पद्धतीने खर्ची खालून जनतेला वेठीस धरत असेल किंव्हा त्यांना समस्येत ढकलत असेल तर हा एक संगनमताने केलेला गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक नसते. त्यामुळे या वृक्ष लागवतटीची उच्च स्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.

 वृक्ष लागवड करण्याची परवानगीच नाही – इंजी. आसुटकर

शहरातील मुख्य मार्ग क्र. ३१५ हा राज्य मार्ग असून हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत आहे. या मार्गावर लावण्यात आलेल्या वृक्षाची कोणतीही रीतसर परवानगी या विभागाकडून घेतली नाही अशी माहिती  सां.बा.विभागाचे उपविभागीय अभियंते आसुटकर यांनी दिली आहे. त्यामुळे ही वृक्ष लागवड चौकशीच्या घेऱ्यात येईल का याकडे लक्ष लागले आहे.

 

वणीत कोरपणा पॅटर्नने सीसीआयची कापूस खरेदी करण्यासाठी अडचण कुणाची

0

कृ.ऊ.बा.स. पदाधिकारी व भाजप पुढाऱ्यांची श्रेय वादासाठी शेतकऱ्यांना धरले वेटीस 

News Today

दिलीप भोयर

वणी :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआय कडून शासकीय कापसाची  खरेदी सुरू करण्यात आली आहे. व चुकरा जमा होण्यासाठी त्याची ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु ज्या पध्दतीने ऑनलाईन करून पुढील दोन महिन्यांची तारीख देण्यात येत होती.

त्यावर आमदार संजय देरकर यांचे कडून आक्षेप घेण्यात आला व सरळ जीनिंग मध्ये  ऑनलाईन करून कापूस खरेदी बाबत सुचविले तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयला या – ना त्या कारणाने कापूस खरेदीसाठी भाजपचे पुढारी व समितीचे पदाधिकारी आडेवेळे घालत असल्याने केवळ श्रेयवादासाठी शेतकरी विनाकारण वेटिस पकडल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होत आहे.

कोरपना तालुक्यात दररोज ७ ते ८ हजार क्विंटल कापूस खरेदी चालू असून वणीत मात्र नाममात्र कापूस खरेदी केल्या जात असल्याने आ. संजय देरकर यांनी ता. २६ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, सीसीआय केंद्र प्रमुख आणि शेतकऱ्यांना घेवून कोरपना पॅटर्नने कापसाची खरेदी करण्यासाठी आदेशीत केले होते. 

परंतु या पद्धतीने कापूस खरेदी केल्यास याचे सर्व श्रेय आमदार संजय देरकराना जाईल त्यामुळे सातत्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी , अधिकारी व सत्तेतील भुरके पुढारी शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्यात आपली धन्यता मानत आहे.

सोमवार तारीख २ डिसेंबर पासून वणी परिसरातील ६ जिणींग मध्ये सीसीआय आपली कापूस खरेदी सुरू करणार होते. परंतु मध्येच कुठ तरी घोड शिंकल आणि कापूस खरेदीत खोळंबा निर्माण झाला. आणि शेतकऱ्यांना कुठ तरी मानसिक, आर्थिक, शारीरिक  प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाचा प्रतिरोध घेण्यासाठी शेतकरी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपला हात दाखवन्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा आहे. 

शेतकऱ्यांना कुठेही मानसिक त्रास होऊ नये या उद्देशाने आमदार संजय देरकर यांनी प्रामाणिक प्रयत्न करून सर्व उपयोगी तोडगा काढून शेतकऱ्यांना कापूस सुरळीत विकता येईल आणि प्रशासनालाही सोयीस्कर होईल. परंतु साधा आणीं सोप्या पद्धतीने कमी त्रासात शेतकऱ्यांनी कापूस विकला तर सर्वत्र आ. संजय देरकर यांची स्तुती वाढतील या उद्देशाने बाजार समिती व भाजपच्या काही भुरक्या पुढाऱ्यांनी सिसीआयची कापूस खरेदीमध्ये आडकाठी टाकत असल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे भाजप व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांप्रती मोठा रोष निर्माण होत आहे. 

वणी हा परिसर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी बाजार पेठ असून ही बाजार पेठ अत्यंत संवेदनशिल आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचा कधी ही उद्रेक होऊन मागील. २० वर्षा अगोदरची घडलेली पूर्नरावृती घडण्याची दाट शक्यता आहे. कदाचित  बाजार समितीच्या पुढाऱ्यांना व सिसीआयला शेतकर्यांचा उद्रेक अपेक्षित आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

येथून जवळच असलेल्या कोरपना येथे देखील सीसीआय कडून शासकीय कापूस खरेदी सुरू केली आहे. त्या ठिकाणी एका दिवसात ७ ते ८ हजार क्विंटल कापूस खरेदी होत असेल तर वणीत का केल्या जात नाही. का म्हणून शेतकरयांना वेठीस पकडल्या जात आहे. असा प्रश्न शिवसेने कडून उपस्थित केला असून तत्काळ उपाय योजना करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्वात सुधीर थेरे, प्रवीण खानझोडे, राजू इड्डे, मंगेश पाचभाई, रवी पोटे यांनी सहाय्यक संस्था निबंधक यांचेकडे एका निवेदनद्वारे मागणी केली आहे. 

 

माजी आ. बोदकुरवार यांचे कडून पक्ष शिस्तीचा भंग, वरिष्ठांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष, 

0

News Today 

दिलीप भोयर

वणी :- संपूर्ण महाराष्ट्रातून जनुकाही एकमेव वणी विधानसभेतील माजी आ. बोदकुरवार हेच फक्त पराजीत झाल्याची स्थिती सद्या रडून भागून केल्या जात असल्याची चर्चा  होताना दिसून येत आहे. आपल्या पराभवाचे खापर भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे नाव घेवून फोडल्याने पक्ष शिस्तीचा भंग झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आ. बोदकुरवार यांचेवर पक्षश्रेष्ठी कडून कोणती ठोस कारवाई केल्या जाईल का ?  याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच बोदकुरवार यांच्या पक्ष विरोधी पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या काही भाजपच्या नेत्यांवरची  पक्ष विरोधी कार्यात सहभाग नोंदविल्याने त्यांचेवरही कारवाईची टांगती तलवार दिसून येत असल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

भारतीय जनता पार्टीचे मागील १० वर्षापासून वणी विधानसभेत आमदार म्हणून सत्ता भोगणारे माजी आ. बोदकुरवार यांना नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचेकडून मोठ्या मताधिक्याने पराजय व्हावे लागले आहे. 

या पराभवाने चीतर बितर झालेले बोदकुरवार यांनी आपल्या पराभवाचे खापर पक्षातीलच जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले तारेंद्र बोर्डे यांचेवर फोडत पक्षा सोबत गद्दारी केल्याचा अत्यंत गंभीर आरोप लावला आहे. बोर्डे यांचे नेतृत्वात यवतमाळ, राळेगाव, आर्णी, व वणी अश्या चार विधानसभा उमेदवार निवडून आणायची जबाबदारी होती. 

यातील राळेगाव व आर्णी या दोन जागेवर भरघोस मतांनी भाजपचे उमेदवार निवडून आले तर यवतमाळ आणि वणी येथील उमेदवारांना  पराजय स्वीकारावा लागला आहे. वणी पेक्षा यवतमाळ येथील भाजपचे उमेदवार माजीमंत्री मदन येरावार हे अनेकवेळा आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भोगलेले असून त्यांचे कार्य बोदकुरवार यांचे पेक्षा किती तरी पटीने मोठे आहे. परंतु त्यांना देखील जनतेनी नाकारले. पण त्यांनी कोणावरही आरोप केले नाही. इथे त्यांची खरी राजकीय परिपक्वता दिसून आली आहे. 

माजी मंत्री मदन येरावार हे एक संयमी राजकारणी असून यांनी आपल्या पराभवाचे खापर  कोणावरही न फोडता आपल्या पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केल्या जात आहे. परंतु बोदकुरवार यांनी आपल्या परभावानंतर रडून फडून जनतेची व पक्षाची सहानुभूती मिळविण्यासाठी एक ड्रामा केल्याचे आरोप मतदारांमधून केल्या जात आहे. तेवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांनी तारीख १ डिसेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेवून आपल्या पराभवाला जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे आहे. असे जाहीरपने सांगितले आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद चक्क पक्ष विरोधी ठरल्याचे मत काही राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

तसेच बोदकुरवार यांनी बोर्डे यांनी पक्षासोबत गद्दारी  केल्याचा अती गंभीर आरोप केल्याने बोदकुरवार हे पक्ष शिस्तीच्या कारवाईस पात्र ठरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप एक शिस्तबध्द पक्ष असून अश्या शिस्तभंग करणाऱ्या माजी आमदारावर खरंच पक्षश्रेष्ठी कोणती कारवाई करतील की त्यावर पांघरून घालतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. या गंभीर बाबीकडे पक्षाने दुर्लक्ष केल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर पालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्याच्या निवडणुकीत भाजपला चांगलाच थक्का बसण्याची शक्यता वाढली आहे. 

     बोदकुरवार व तारेंद्र बोर्डे यांचा वाद विकोपाला 

निवडणुकीत पराभव मिळाला म्हणून पराभवाचे खापर भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचेवर माजी आमदार बोदकुरवार यांनी फोडले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर पक्षा सोबत गद्दारी केल्याचा गंभीर आरोप लावल्याने बोर्डे समर्थकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या बोर्डे यांचेवर झालेल्या आरोपांमुळे भाजपची प्रतिमा पुर्णतः माजी आ. बोडकुरवार यांनी मल्लिन केल्याचे बोलल्या जात आहे. आता या दोघांचा वाद चांगलाच विकोपाला गेला असून वरिष्ठ पातळीवर या वादाचे काय निराकरण केल्या जाईल याची प्रतीक्षा आहे. तसेच तारेंद्र बोर्डे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे पुर्णतः खंडन केले आहे. याबाबत त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस काढले आहे.

शिवनी ग्रामवासीयांकडून आ. संजय देरकरांचे स्वागत

0

 

News Today
प्रतिनिधी
वणी :- येथील शिवनी ग्राम वासियांनी आज तारीख २ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता वणी विधानसभेचे लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांची भेट घेतली व पुष्स्वागुच्छ देवून स्वागत करण्यात आले.


यावेळी शिवणीच्या सरपंच्या सौ.स्वाती स्नेहल राजुरकर, उपसरपंच प्रमोद हनुमंते, माजी सरपंच सुभाष भोंगळे, प्रकाश बल्की, माजी पो. पा. प्रमोद भोंगळ, शांतारामजी पंधरे आबाजी.पंढरी बांदुरकार.विजय बुच्चे, सुरेश घुंगरुड , हर्षद बोर्डे, स्नेहल राजुरकर,अजय ढवस, प्रविण जिवतोडे उपस्थित होते.

कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी प्रकरणी, माजी. आ. बोदकुरवार यांच्या चौकशीची गरज, दोन्ही पत्रकार परिषदेत दुतोंडी भूमिका

0

News Today

दिलीप भोयर

वणी :- येथील भाजपचे माजी आ. बोदकुरवार यांनी निवडणुकीतील संपन्न झालेल्या प्रचार कार्यालय परिसरात ता. ४ नोव्हेंबर रोजी कुणबी समाजा बद्दल घटलेल्या त्या वक्तव्यासंदर्भात प्रथम हा प्रकार घडलाच नाही अशी पत्रकार परिषद तारीख ५ नोव्हेंबर रोजी घेतली होती. तर काल ता. १ डिसेंबर रोजी आणखी एक पत्रकार परिषदेत चक्क त्या घटनेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेद्र बोर्डे यांनी मारहाण केल्याची कबुली दिल्याने बोदकुरवार यांची दुतोंडी भूमिका समाजासमोर आल्याने कुणबी समाजात रोष पसरत आहे. व बोदकुरवार हे आणखी अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.

तत्कालीन भाजपच्या व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी या समाज कंठकाने संपन्न झालेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मधील भाजपा प्रचार कार्यालयाच्या परिसरात कुणबी समाजाबद्दल अक्षेपार्थ वक्तव्य करताच संपूर्ण कुणबी समाजाच्या तळपायाची आग मस्तकात पोहचली होती.

तारीख ५ नोव्हेंबर रोजी बोदकुरवार यांनी घेतलेली पत्रकार परिषदेतील वृत्ताची लिंक उघडा आणि बघा

https://youtu.be/w-oBXqX2R1o?si=DyXNpZP_bSSCt-X5

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी कार्यालयात येवून मजी आ. बोदकुरवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज (भैया) अहिर यांच्या समक्ष समाज कंठक सुधीर साळी याला चांगला चोप दिल्याने ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली होती. आता ही घटना घडल्याची कबुली माजी आ. बोदकुरवार यांनी जाहीर पत्रपरिषदेत दिली आहे.

ता. ४ नोव्हे. रोजी घडलेल्या त्या घटनेची सोशल मीडिया व काही वृत्त वाहिन्यांनी दखल घेवून वृत्त प्रकाशित होताच भाजपच्या पायाखालची जमीन सरकली व माजी आ. बोदकुरवार यांनी त्याच प्रचार कार्यालयात तारीख ५ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अती तातळीची पत्रकार परिषद बोलवून ती घटना घडली नाही असे उपस्थित पत्रकारांना सांगण्यात आले. तारेंद्र बोर्डे यांनी कुणाला मारहाण केली नाही. त्यांनी फक्त ते भांडण सोडवले होते. अशी माहिती दिली होती.

परंतु कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी करणाऱ्यांची त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्ष पाठ राखण केली होती. पण या घटनेची सत्यता सर्व समाजाला कळल्याने गावोगावी बोदकुरवारांना प्रचारादरम्यान या घटने संदर्भात कुणबी समाजाच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत होते. तर काही ठिकाणी गावातही प्रचार करू दिल्या जात नव्हते. तर काही गावात निवडणूक प्रचाराचे फलक देखील फाडण्यात आले होते.

या निवडणुकीत बोदकुरवारांना शेवटी पराभव पत्करावा लागला आणि त्यांनी या पराभवाचे खापर जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नावाची फोडायला सुरवात केली. तारेंद्र बोर्डे हे एक कुणबी समाजातील उभरत नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वात केळापूर आणि राळेगाव विधानसभेतील २ आमदार विजय झाले तर यवतमाळ व वणी येथील उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.

हा पराभव बोदकुरवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. आज ता. १ डिसेंबर रोजी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चक्क भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे नाव घेवून माझ्या पराभवाला कारणीभूत ठरवले आहे. व प्रचार कार्यालयात त्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली आहे. व ही मारहाण झाली नसती तर माझा पराभव झाला नसता असे बोलले आहे.

यामुळे राजकीय स्वार्थ भोगण्यासाठी माजी आ. बोदकुरवार हे किती खालची पातळी गाठू शकते याची प्रचिती कुणबी समाजासमोर आणखी एकदा आली आहे. बोदकुरवार यांनी निवडणूक संपन्न होण्याअगोदर बोर्डे यांनी मारहाण केलीच नाही ही भूमिका घेवून समाजाची दिशा भूल केली आहे. तर आता त्यांनी मारहाण केली म्हणून कबुली दिली आहे.

याचा अर्थ असा निघतो की कुणबी समाजाबद्दल जे आक्षेपार्थ वक्त्यव करण्यात आले होते ते खरे आहे. ते लपविण्याचे पाप भाजप व बोदकुरवार यांनी केले आहे. या घटनेत आरोपी असलेला सुधीर साळी यांचेवर दोषारोपण करण्यासाठी व त्याला न्यायालयीन दंडित करण्यासाठी माजी आ. बोदकुरवार यांनी घेतलेल्या दोन्ही पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पुरावा म्हणून कामी पडणार आहे. व त्यांची देखीलसह आरोपी म्हणून कसून चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासन व कुणबी समाज काय निर्णय घेतली याकडे लक्ष लागले आहे.

बघा व्हिडिओ माजी आ. बोदकुरवार म्हणत आहे.

https://youtu.be/Lin0Z5IS83M?si=45wmjOTySjHnLvTE

माजी आ. बोदकुरवार यांचेकडून कुणबी नेतृत्वाला बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाही ना?

पराभव स्वीकारल्या नंतर माजी आ. बोदकुरवार यांनी ज्या पद्धतीने भाजपचेच जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचेवर खापर फोडायला सुरवात केली आहे. त्यामुळे भाजपातील दोघांचा वाद आता प्रचंड विकोपाला गेला आहे. बोदकुरवाराना कुणबी नेतृत्व नकोस वाटू लागले आहे. असे जनतेच्या निदर्शनास येत आहे. वणी विधानसभेत सर्वाधिक मतदार हे कुणबी समाजाचे असून भाजपाने लोकसभा व विधानसभेत कुणबी ओबीसी उमेदवार न दिल्याने त्यांची किंमत चुकवली आहे. आणि आता जर कुणबी नेत्यांना वादाच्या भोऱ्यात टाकून नेतृत्व संपविण्याचा घाट तर रचला जात नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. असे घडल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीतही भाजच्या हातात भोपळा आल्या शिवाय राहणार नाही.

चार दिवससा आदी त्या आरोपीने घेतली बोदकुरवारांची भेट

कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी करणाऱ्या त्या आरोपीला भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. परंतु त्या आरोपीने चार दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात माजी आमदार बोदकुरवार यांची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती आहे. त्या आरोपीचे वाहन बोदकुरवार यांचे घरासमोर उभे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व प्रत्यक्ष दर्शिनी त्या आरोपीला स्वतःचे चारचाकी वाहन उभे करून घरात जातांनी बघितले आहे. जेव्हाकी हकालपट्टी झाल्यानंतरही तो बोदकुरवार यांचे संपर्कात का आहे. असा प्रश्न निर्माण झाले. व यांच्यात अजूनही गुप्तपणे हालचाली घडल्यानंतर तारेंद्र बोर्डे यांचेवर खुलेआम पराजयाचे खापर फोडून बोदकुरवार हे आगपाखड करीत आहे. त्यांना कुणबी नेतृत्व नको आहे का? की त्यांना जिल्हाध्यक्षपदाचे आता डोहाळे तर लागले नाही ना अश्या अनेक चर्चेला ऊत येत आहे.

बघा त्यांच्या काल तारीख १ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील बातमीची लिंक

https://wanibahuguni.com/waninews/bodkurwar-press-conference-wani/

बोदकुरवारांकडून कूणबी समाज अशिक्षित समाज असल्याचा उल्लेख,आणखी रोष वाढण्याची शक्यता

 

रडणाऱ्यांचा पण अलगच धंदा , जनतेच्या प्रेमातही घोटाळा, व्हारे भाजपाई 

0

News Today 

दिलीप भोयर

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर भारतीय जनता पार्टीचे पराजयित उमेदवार माजी आ. बोदकुरवार यांच्या भावुक व्हिडिओ वायरल झाला आणि तेव्हापासून जणू काही विधानसभेवर डोंगर कोसळला असल्या सारखे अनेक जन बोदकुरवारांच्या भेटायला जावून आपले नयन अश्रू वाहून घेत होते.  परंतु त्यातही काही जण केवळ मज्जा घेण्यासाठी तिकडे जावून रडत आहे. व नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचेकडे जावून प्रफुल्लित होऊन शुभेच्छा देखील देताना दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रेमातही भाजप मात्र घोटाळा करण्यात मागे नाही अशी चर्चा रंगत आहे.

निवडणूक प्रणाली ही लोकशाहीचं प्रतीक आहे आणि जनतेनी निवडून द्यायचं की नाही हा अधिकार जनतेला आहे. दर पाच वर्षांनी आपला प्रतिनिधी बदलवायचा की नाही हे जनतेच्या हातात असताना नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आ. बोदकुरवार यांना जनतेकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव त्यांनी चांगलाच जिव्हारी लावून घेतल्याचे दिसून येत आहे. 

मतदान प्रक्रिया असल्याने जो उमेदवार बहुमत घेतो तो विजयी ठरतो. परंतु पराभव झाला म्हणून रडण्याचे काही कारण नाही. तसे असते तर माजी आमदार वामनराव कासावार हे २० वर्ष आमदार म्हणून कार्यकाळ काढणारे एकमेव आमदार आहेत ते देखील २००४,२०१४,२०१९ असे तीनदा पराभूत झाले. त्याच बरोबर माजी आमदार विश्वास नांदेकर हे देखील २००९,२०१४,२०१९ मध्ये पराभूत झाले.

त्याच बरोबर १९९९, २००९, २०१४, २०१९ असे चारदा संजय दरेकर हे पराभूत झाले होते. मनसेचे राजू उंबरकर यांनी देखील २००९, २०१४, २०१९,२०२४ आहे चार वेळा निवडणूक लढून पराभव पत्करला परंतु यातील एकाही उमेदवारांनी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहले नाही. आणि कोणत्याही कार्यकर्त्यांनी आपली हुंकार फोडला नाही. उलट भाऊ आपण आणखी लढू हेच बोलताना दिसून येत होते.

नुकत्याच विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी. आ. बोदकुरवार यांचा जनतेनी प्रचंड बहुमताने पराभव केला. साहजिकच आहे. भाजप कडून बहुसंख्य असलेल्या समाजाचा प्रतिनिधी न देता अत्यल्प असलेल्या समाजाला प्रतिनिधित्व देत असेल तर बहुसंख्य असलेला समाज हा अपमान सहन करू शकत नाही. लोकसभेत जे घडलं ते विधानसभेत घडणार हे सर्वश्रुत असताना सुद्धा तीच चूक करणे भाजपला भोगावी लागली आहे.

पराभव झाला म्हणून आ. बोदकुरवार हे भावुक होऊन डोळ्यातून अश्रू काढत असेल तर यात काहीही नवल नाही. निवडणूक संपताच तेच कार्यकर्ते नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना  शुभेच्छा देवून माजी आ. बोदकुरवार यांची भेट घ्यायला जात असतात व उगीच डोळ्यातून अश्रू पाडून घेत असल्याचे वास्तव निर्दशनास आले आहे. 

लिंगटी हे गाव बोदकुरवारांचे असून तेथील एका संस्थेचे पदाधिकारी हे चक्क रडताना व्हिडिओत दिसत आहे. तर तेच पदाधिकारी आ. संजय देरकर यांना शुभेच्छा देखील देत आहे. त्यामुळे रडण्याचा हा गोरख धंदा केवळ सहानुभूतीसाठी तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला असून जनतेच्या प्रेमाचा माजी आं. बोदकुरवार हे घोटाळा करायला विसरले नाही अशी जोरदार चर्चा वणी विधानसभेत रंगत आहे. 

करा क्लिक बघा व्हिडिओ