Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 35

आमदार संजय देरकर यांची आदिवासी विद्यार्ध्यांच्या वस्तीगृह संदर्भातील आंदोलनाला भेट

0

News Today 

वणी :-  मागिल ८ दिवसापासून पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समोर सूरू असलेले आंदोलन . त्यात आदिवासी मुला/ मुली यांचे त्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढत आहे. त्यांच्या प्रमुखं मागण्या महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येकवर्षी आदिवासी विकास विभागामार्फत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला – मुलींना वस्तीगृहामध्ये लागु असलेल्या DBT या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी यासारख्या प्रश्नाबाबत आंदोलन सूरू आहे. या आंदोलनस्थळी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट घेतली.

त्या वेळी आमदार संजय देरकर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची समस्या जाणुन घेतल्या व लवकरात लवकर संबंधीत विभागाला भेटून न्याय मिळवून देऊ असे आश्र्वासन दिले. त्यावेळीं प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, य. जि. म. बॅक संचालक राजीव येल्टीवार , मिथुन सोयांम, राहुल दांडेकर, बाळु दुधखुळे , संतोष जंगीलवार, गौरव पंधरे, बंडू आळे, गोपाल मडावी, संतोष कोहळे, गौरव भूषेवार उपस्थिती होते.

वणी प्रीमियर लीग – टेनिस बॉल क्रिकेट सामने,आमदार चषकाचे आयोजन 

0

News Today (दिलीप भोयर)

वणी :- इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने वणी विधानसभा क्षेत्राचे आदरणीय आमदार संजय जी देरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १० जानेवारी २०२५ पासून वणी प्रीमियर लीग चे टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित केले जात आहेत. हे सामन्यांचे आयोजन एक ऐतिहासिक आणि रोमांचक अनुभव देण्यासाठी आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी २५ डिसेंबर २०२४ पर्यंत खेळाडूंची रजिस्ट्रेशन सुरू राहील आणि त्यानंतर २८ डिसेंबर २०२४ रोजी खेळाडूंची ऑक्शन प्रक्रिया होईल. या सामन्यात भाग घेणाऱ्या खेळाडूंना एक उत्तम संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे क्रिकेट कौशल्य एक नवीन उंचीवर पोहोचेल.

हे टेनिस बॉल क्रिकेट सामने खेळाडू आणि नागरिकांसाठी अत्यंत उत्साही आणि थरारक असतील. हे एक अद्वितीय मंच आहे जिथे स्थानिक खेळाडूंना त्यांची कलेची ओळख प्रकट करण्याची संधी मिळेल. आणि यामुळे त्या खेळाडूंना भविष्यात मोठ्या स्तरावर स्पर्धा करण्याचा मार्ग खुला होईल.

सर्व स्पर्धकांनी या रोमांचक सामन्यात भाग घेण्याचे आवाहन आम्ही आयोजक म्हणून करतो आहे. एकत्र येऊन, आपली कर्तृत्वाची गाठ बांधून, या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपली जागा पक्की करा आणि आपला खेळ दाखवा.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्या आणि आपल्या क्रिकेट कलेला एक नवा वळण द्या!

अधिक माहिती करिता संपर्क शैलेश ढोके:- 9822561450
नदीम:- 8806333786 यांच्याशी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या उपदेशाची समाजाला गरज – सौ. किरनताई देरकर

0

कर्मयोगी संत गाडगेबाबांचा स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम

News Today 

वणी निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा चौक वणी येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने किरणताई संजय देरकर यांच्या प्रमूख उपस्तीतित मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व हारार्पण कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झाला.

सर्वप्रथम श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाला किरनताई संजय देरकर, विजय चोरडिया, दिपक कोकास,सुनील कातकडे, संभाजी वाघमारे, दिलीप मस्के, शेखर चिंचोलकर, यांचे हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गरजूंना ब्ल्यंकेट तर महाप्रसादाचे वितरण.

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिननिमित्त गरजवंताला ब्ल्यांकेट वाटप नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनात तर महाप्रसादाचे वितरण व्यवस्था संभाजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली.

गाडगे बाबांच्या कार्याची उजळणी.

गुरुदेव सेवा मंडळाचे ठेंगणे, विजयाताई दहेकर, विजय चोरडिया, किरण ताई देरकर, सुनील कातकडे व दिलीप मस्के यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची महती सांगितली.

*समाजाला गाडगे बाबांच्या स्वचछता व शिक्षणाची व निर्व्यसनी जिवन जगण्याच्या विचारांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन किरन ताई देरकर यांनी केले.*

यावेळी गीता ताई उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पाताई भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके,बेबी ताई थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके,रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर , माधुरी फाले राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे भगवान मोहिते, दिलीप भोयर, विनोद ढुमणे, राजु धवांजेवार, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, नितीन बिहारी, स्वप्नील बिहारी महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार , नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर सुमित तुरानकर, संजय तुराणकर, संदीप फाले पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागपूरे, सचिन क्षिरसागर , विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे,राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके उपस्तीत होते.

स्मारक स्थळी वृक्षारोपण..

आज श्री संत गाडगेबाबा स्मारक निळापूर रोड येथे संत गाडगेबाबांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून बाबांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान प्रकरणी आमदार संजय देरकर मैदानात

0

News Today

वणी :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती अपमान जनक टिपणी केल्याने संपूर्ण देशात रोष पसरला आहे. नागपूर येथे चालू असलेल्या विधिमंडळात देखील याचे लोन पोहचले असून विरोधी पक्षाकडून आज ता. १९ रोजी सकाळी ११ वाजता विधान भावनांच्या पायरीवर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यात वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे देखील डॉ. आंबेडकरांच्या सन्मानासाठी मैदानात उतरले आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आसून अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. दररोज विविध आंदोलने विरोधी पक्षाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसून येत आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा तमाम भारतीयांच्या उधारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आता देशाला सांगायची गरज उरली नाही. परंतु सातत्याने भाजप व मनुवादी व्यवस्थेकडून भारतीय राज्य घटना व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर केल्या जात आहे. ज्यांच्या रजयघटनेने दिलेल्या अधिकाराने देशाची सूत्र सांभाळली जात आहे. तेच लोक आज डॉ. आंबेडकरांचा अवमान करीत आहे. अश्या लोकांना सत्तेत बसायचा कोणताही नैतिक  अधिकार नाही असे मत वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी यावेळी व्यक्त केले. या आंदोलनात आमदार संजय देराकर हे निळी टोपी लावून सहभागी झाल्याने आंबेडकरवादी जनतेनी आमदार  संजय देरकर यांची दखल घेतली आहे. 

रेमंड युको डेनिम प्रा. ली. यवतमाळ व निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0

News Today

यवतमाळ:- येथील  रेमंड युको डेनिम प्रा.ली. व निस्वार्थ फाउंडेशन यांचे संयुक्तरित्या लोहरा येथील एम.आय. डी.सी. येथे भव्य रक्तदान शिबिर ता. १८ रोजी आयोजित करण्यात आले होते.

शासकीय रक्तपेढी मध्ये मागील अनेक दिवसापसून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात भर्ती असणाऱ्या रुग्णांना रक्त मिळणे खूप कठीण झाले होते. थालेसेमिया, सिकलसेल, प्रसुती तसेच अपघातग्रस्त अशा अनेक रूग्णांना रक्ता अभावी उपचार घेणे अवघड झाले होते.

निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ या रुग्णांना रक्त मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांनी रेमंड युको डेनिम प्रा. ली. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करणे करीता आवाहन केलं असता, त्यांनी लगेचच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे करीता परवानगी दिली त्याला रेमंड मधील अधिकारी व कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सदर शिबिरामध्ये रक्तदात्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 86 रक्त दात्यांनी रक्तदान केले.

सदर शिबिराचे उद्घाटन श्री. नितीन श्रीवास्तव सर, श्री. संतोष चांडक सर यांचे हस्ते करण्यात आले. तर शिबिर यशस्वीरीत्या पार पाडणे करीता रेमंड युको डेनिम प्रा.ली कंपनी तर्फे श्री. नितीन श्रीवास्तव सर, श्री पातुरकर सर, श्री. संतोष चांडक सर, जयविर राठोड, मयूर काळे, निलेश कळसकर, अझर खान, श्यान इंगळे, निलेश कोरे आणि अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. तसेच निस्वार्थ सेवा फाऊंडेशन तर्फे अनिकेत नवरे, परशुराम कडू, निलेश जगताप, आस्तेश गावंडे, यांनी परिश्रम घेतले. शासकीय रक्तपेढीच्या  अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने  व जबाबदारीने शिबिर यशस्वीरीत्या पार पाडणे करीता सहकार्य केले. त्यामुळें शासकीय रक्तपेढीत रक्त तुटवडा काहीसा भरून निघण्यास मदत झाली.

 


या महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी रक्तंदात्यांना प्रोत्साहन पर भेट देणे करीता *स्व. श्रीमती रक्षा विजय कुमार बुंदेला यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजय कुमार बुंदेला* यांचे कडून टिफीन बॉक्स देण्यात आले. शासकीय रक्तपेढी तर्फे डॉ.विकास भरकाडे, समाजसेवा अधीक्षक आशिष दहापुते सर, आशिष खडसे सर, मोहन तडवेकर, अतुल राऊत, अनिकेत राठोड, अनिकेत चव्हाण, अंजली जाधव , पल्लवी राठोड, स्नेहल शिवनकर, दीक्षा राऊत या सर्व चमूने सहकार्य केले.

विधिमंडळाच्या पहिल्याच भाषणात आ. संजय देरकर यांनी जिंकली वणी विधानसभेतील मतदारांची मने, बघा व्हिडिओ

0

जलजिवन योजना, शिंदोल्यातील देवस्थानाच्या जमिनी, व सीसीआय कापूस खरेदीबाबत प्रश्न 

News Today (दिलीप भोयर)

वणी :-  येथील विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी नागपूर येथे चालू आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या भाषणात मतदार संघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडून वाचा फोडल्याने आमदार देरकर यांनी तमाम मतदारांची मने जिंकल्याने सर्वत्र त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची चर्चा होताना दिसून येत आहे.

नुकतीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून जेमतेम सरकार स्थापन होऊन पहिलेच अधिवेशन नागपूर येथे संपन्न होत आहे. या पहिल्या अधिवेशनात आज तारीख १८ रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या अभि भाषणावर वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांना बोलण्याची संधी मिळाली असता त्यांनी वणी , मारेगाव ल, झरि तालुक्यातील जलजिवण योजनेअंतर्गत अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या कामाबाबत कामांना गती देण्यासाठी सरकारने निधी देवून २४१ गावातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा,

तसेच वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील देवस्थानाची जमीन शेतकरी कसत असून ७/१२ वर त्या शेतकर्यांनी नावे नाही त्यामुळे त्यांनी पिकविलेला कापूस सीसीआय खरेदी करून घेत नाही. त्यांचा कापूस सीसीआयने खरेदी करण्यासाठी तहसीलदार यांचे पत्र असूनही खरेदी केल्या जात नसल्याने सरकारने त्यांना कापूस खरेदीचे आदेश द्यावे व सीसीआय खरेदीचे केंद्र वाढविण्यात यावे,

तसेच शिरपूर – कोरपणा मार्ग हा पुर्णतः खड्डेमय झाला आहे. तो मार्ग अवघ्या दोन वर्षात उद्ध्वस्त झाला आहे तो तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी आमदार देरकर यांनी  केल्याने हे तिन्ही प्रश्न अत्यंत जनतेच्या जिव्हाळ्याचे असून आजपर्यंत वणीच्या इतिहासातील कोणत्याही आमदाराने सरकार दरबारी मांडले नाही. 

उघडा लिंक बघा आमदार संजय देरकर यांचा व्हिडिओ

https://www.facebook.com/share/v/18oMVsfdeg/

आमदार संजय देरकर यांनी आज विधिमंडळाच्या पायरीवर पराटीचे झाड नेवून शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले व पहिल्याच भाषणात जोरदारपणे अत्यंत प्रलंबित असलेले प्रश्न मांडून सरकारच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे आमदार देरकर यांनी वणी विधानसभेच्या प्रत्येक मतदारांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आज त्यांनी केलेल्या अप्रतिम कामगीरीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

 

विधिमंडळात गाजले कपासीचे झाड, आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय,

0

 

शेतमालाच्या हमीभावासाठी कपासीचे झाड पोहचले विधिमंडळात

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय

News Today
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. आज तारीख १८ अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सभागृहाच्या पायरीवर महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमीभाव अधिक ५०% नफा घोशित करण्यात यावा या करिता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चक्क शेतातील कपासीचे झाड घेवून शेतकऱ्यांना न्याय मागितल्याने सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आ. देरकरांच्या भूमिकेचे कौतुक केल्या जात आहे.

मागील दहा वर्षात केंद्रात व राज्यात डबल इंजनची सत्ता असून शेतकऱ्यांना हमी भाव अधिक ५०% नफा देवू म्हणून आश्वासन देणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. शेतकर्यांनी ना कर्ज माफी केल्या जात आहे. ना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिल्या जात आहे. शेतकऱ्यांचा लागत खर्च देखील निघत नसल्याने मुद्दलमध्ये तोटा निर्माण होत आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मूल्य सरकार ठरवू शकत नाही आहे. हे सरकार शेतकरी विरोधी धोरण आखून शेती हा व्यवसाय नष्ट करू पाहत आहे. परंतु हे सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाही. असा सूर विरोधी पक्षाकडून निघत आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व पक्षांची गटनेते विद्यमान आमदार यांनी विधानभवनाच्या पायरीवर शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्ज माफी झालीचं पाहिजेत, शेतकऱ्याना शेती पंपासाठी पूर्णवेळ विज मिळालीच पाहिजेत, यासाठी लाक्षणिक आंदोलन केले त्यानिमित्ताने विधानसभेतील सर्व महाविकास आघाडीचे आमदार व नेते मंडळी उपस्थित होते. वणी विधानसभेतील आमदार संजय देरकर हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते त्यांनी कपासीचे बोंडे भरलेले झाडच विधी मंडळात पोहचविण्याचे शेतकऱ्यांसाठी झटणारा एकमेव आमदार म्हणून त्यांचे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

शासकीय कंत्राटदारांसोबत कॅबिनेट मंत्री प्रा. उईके यांच्या भेटीने मामाच्या उलट सुलट चर्चेला ऊत 

0

News Today 

वणी :- राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. प्रा. अशोक उईकें यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेताच शासकीय जिल्हा कंत्राटदार संघटनेने एका माजी आमदाराला घेवून भेट घेतल्याने मामाच्या उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. 

वणी विधानसभेतील बहुतांश रस्ते हे नित्कृष्ट दर्जाचे व बोगस पद्धतीने बनविल्याने कोणत्याही कंत्राटदारांची चौकशी होऊ नये या करिता एका माजी आमदाराने सर्व कंत्राटदाराला घेवून नामदार उईके यांची भेट घेतल्याचे बोलल्या जात आहे.

सदरच्या माजी आमदाराने विधानसभा क्षेत्रात केवळ आणि केवळ कामे मंजूर करून घेतली व त्या कामाची सुरवात देखील झाली परंतु आता कंत्राटदार हे आर्थिक दबगाईस आल्याने ही भेट सावरा सावर तर नाही ना अश्या चर्चांना ऊत आला आहे. या भेटीत वणी विधानसभा क्षेत्रातील निवडक कंत्राटदार दिसून येत आहे. 

 

आ. दौलत दरोडा यांना ओबीसी जातनिहाय जणगणनेसाठी निवेदन

0

मराठ्यांना ओबिसीचे प्रमाणपत्र देवू नये – भरत निचीते 

News Today (प्रतिनिधी)

ठाणे :- ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करण्यात यावी या करिता ठाणे जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे लढवाये नेते भरत निचीते यांनी शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडे यांना एका निवेदनाव्दारे मागणी केली आहे. तसेच मराठ्यांना ओबिसिचे प्रमाणपत्र देवू नये असे ही त्यात नमूद केले आहे.

हजारो वर्षापासून धर्मसत्ता , शिक्षणसत्ता, अर्थसत्ता व राजसत्ता नाकारत गेल्याने कायम मागास राहिलेल्या जातसमुहांचे मागासलेपण दुर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात या बहुसंख्य जातसमुहांसाठी ३४० व्या कलमांतर्गत आयोग स्थापून आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. ओबीसींचे मागासलेपण दुर करण्यासाठी दि. ७ ऑगस्ट, १९९० रोजी मंडल आयोगाच्या रुपाने काही प्रमाणात आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. परंतु आजही त्या शिफारशी पूर्ण झालेल्या नाहीत.

 या देशातील जातव्यवस्था लक्षात घेता ‘जातनिहाय जनगणना ‘ही प्रमुख मागणी ओबीसी समूह करत आहेत. ओबीसींची संख्यानिश्चिती न झाल्याने व आरक्षणासाठी ५०% मर्यादा लावली गेल्याने २७% आरक्षण ओबीसीसाठी तुटपुंजे ठरत आहे. मात्र सध्या मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. मराठा समाजास सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलेले आहे, तथापि मागासवर्ग आयोगामार्फत अहवाल घेऊन ओबीसींच्या कोट्याला कोणताही धक्का न लावता त्याव्यतिरिक्त मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण लागू करण्यास ओबीसींचा कोणताही विरोध नाही.

त्याचप्रमाणे ओबीसींसह सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करणे , ओबीसींच्या सामाजिक व शैक्षणिक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत , त्यांचे निराकरण अद्याप न झाल्याने ओबीसी समाज अ‌द्याप ही मागासलेला राहिला आहे. त्यामुळे संविधान दिनाचे औचित्य साधून मी संविधानिक न्यायहक्कांसाठी व ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दि.२६ नोव्हेंबर, २०२३ ला आमरण उपोषण करुन महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधून घेतले. परिणामी राज्याच्या शिष्टमंडळाला ३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपोषण स्थळी येण्यास भाग पाडले.

समस्त ओबीसी समाजाच्या खालील प्रमुख मागण्या मी आपणांसमोर मांडत आहे. यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात येवू नयेत तसेच मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये, 

  महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या नोकऱ्यांची श्वेतपत्रिका काढून ओबीसींचा नोक-यांमधील बॅकलॉग त्वरित भरावा, प्रत्येक तहसिल व जिल्हा स्तरांवर ओबीसी वि‌द्यार्थ्यांसाठीं स्वतंत्र वसस्तीगृहाची व्यवस्था करण्यात यावी.

महाराष्ट्र राज्यात ओबीसी मुला-मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात २ याप्रमाणे ३६ जिल्ह्यांसाठी ७२ वसतिगृहे सुरू करण्याचे अगोदरच्या महाविकास आघाडी व नंतर सत्तेत असलेल्या महायुती सरकारने अनेक परिपत्रके काढून जाहीर केले होते. ओबीसी संघटनांच्या सातत्याच्या मागणी व रेट्यामुळे काही जिल्हह्यांमध्ये शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर ओबीसी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत.

परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या विभागात म्हणजे कोकण विभागात विशेषतः मुंबई/ठाणे जिल्ह्यांत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येत असतात त्या कोकणातील एकाही जिल्ह्यात आजपर्यंत ओबीसी मुला-मुलांसाठीचे वसतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. आपण ज्या शहापूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करता तो आपला तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तारित असून खुपच दुर्गम आहे. गावखेड्यावर/पाड्यावर राहणाऱ्या शेतकरी-कष्टकरी-ओबीसी समाजाच्या मुलांना वसतिगृहांची अद्यापही कोणती सोय नसल्याने मुंबई-ठाणे शहारांतील महाविद्यालयांत गुणवत्तेनुसार प्रवेश मिळूनही वसतिगृहां अभावी त्यांना आपले शैक्षणिक प्रवेश रद्द करावे लागत आहेत. आपल्या मतदार संघातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे यामुळे प्रचंड नुकसान होत आहे.

तरी ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी अधिवेशनात आग्रही मागणी, ओबीसी समाजातील जे विद्यार्थी स्वतःच्या घरापासून दूर राहून/भाड्याने घर घेऊन शिक्षण घेत आहेत परंतु ज्यांना शासनाच्या कोणत्याही वसतिगृहात मोफत प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२०२५ पासून वरील निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे हे प्रथम वर्ष आहे. तसेच संबंधित मंत्रालय व जिल्हा कार्यालयांकडून पुरेशी व सुव्यवस्थित माहिती ओबीसी समाजापर्यंत न पोहोचवली गेल्याने प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना लाभ मिळणे अपेक्षित असलेल्या या योजनेच्या लाभासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १०% विद्यार्थीही अर्ज करू शकले नाहीत.

राज्यातील २१६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित असताना ३००० विद्यार्थीही अर्ज करू शकले नाहीत. असे असतानाही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रथमच सुरू केलेल्या या योजनेची मुदत मात्र संबंधित यंत्रणेकडून ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपुष्टात आणली गेली. मात्र त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व एकलव्य योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे आणखी दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी Online सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु ओबीसी विद्यार्थ्यांसाठी Online अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर होणारा खुप मोठा अन्याय आहे. तो त्वरित दूर करावा व सदर योजनेस पुढे तात्काळ ४ महिन्यांची मुदतवाढ द्यावी तसेच Online अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी हा विषय हिवाळी अधिवेशनात विधीमंडळात मांडून ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. हि नम्र विनंती, केजी ते पिजी शिक्षणाचं पूर्ण सरकारी कारण केले जावे.

( जिल्हा परिषद शाळा मध्ये १०% पटसंख्या नसतील तर अशा शाळेतील विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर अंतरावर ग्रुप शाळा निर्माण करुन त्या शाळा खाजगी कंपन्यांना चालवायला देणार आहेत ते थांबवावे. सरकारने शाळेचे पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले तर त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल, मंडल आयोग, नच्चीपन समिती आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्यात,ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यात यावे, ओबीसीत फूट पडणाऱ्या प्रस्तावित रोहिणी आयोगाच्या शिफारशी रद्द करण्यात याव्यात.

        तरी उपरोक्त मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करून ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी मी आपणांस विनंती करीत आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार ओबीसी वर्गाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय नेतृत्वापासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करित आहे. सदर प्रकार अन्यायकारक आहे. याप्रकारामुळे ओबीसी समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही? तरी राज्यसरकारने तेढ निर्माण न होण्यासाठी काही ठोस भूमिका घ्यावी. 

बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करण्यात आली. त्यात ओबीसी वर्गाची संख्या ६५% समोर आली परंतु न्यायालयाने निर्णय देण्यास नकार दिल्याने ओबीसी वर्गाला अन्याय सहन करावा लागला यांची दखल केंद्रिय सरकारने घेऊन लवकरात लवकर जनगणना करावी तसेच ओबीसींच्या नोकऱ्यांचा बॅकलॉग हा २.६५ लाखाच्या जवळपास आहे. तरी तो त्वरित भरण्यात यावा.

 

ओबीसी वर्गावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच शासकीय शाळा याचे खाजगीकरण उदारीकरण आदेश व महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती खाजगीकरणातून होणार आहे त्या आदेशाला स्थगिती दिली आहे ती स्थगिती न देता दोन्ही जीआर रद्द केले पाहिजेत .

    २६ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या उपोषणा ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने जे आश्वासन दिले होते , महाराष्ट्र सरकार शिंदे कमिटी रद्द करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत असे आश्वासन लेखी स्वरूपात उपोषण करते भरत निचीते यांना महाराष्ट्रराज्य शिष्टमंडळाने दिले होते, परंतु २६ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व मागासवर्गीय सचिव यांनी एक परिपत्रक जाहीर केले की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील.

 त्या नंतर महाराष्ट्र सरकारने या परिपत्रावर लोकांकडून हरकती मागवल्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या संदर्भात लाखो संख्येने हरकती मंत्रालयात देण्यात आल्या. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने परत कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिला ,परंतु काही दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये पुन्हा प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केल्याने ओबीसींवरअन्याय होणार आहे. तो अन्याय होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी भरत निचिते , रमेश निचिते, जनार्दन निचिते, धिरज निचिते , कैलास निचिते , अक्षय निचिते, दिनेश चंदे , अनिल निचिते, संभाजी घरत (पाटिल) आदी उपस्थित होते.

कवडशी येथे दत्त जयंती निमित्त शिवराय मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिर, आ. संजय देरकर यांची भेट

0

News Today (प्रतिनिधी)

वणी :- तालुक्यातील कवडशी येथे दत्त जयंती निमित्त पूनवट येथील शिवराय मित्र मंडळाच्या वतीने तारीख १४ रोजी दुपारी १२ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या भव्य शिबिराला वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट देवून आयोजकांचे कैतुक केले.

दरवर्षी कवडशी येथील मल्हारगड येथे दत्त जयंती भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असतात. या निमित्याने शिवराय मित्र मंडळ पुनवट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केलेले होते. यावेळी या उपक्रमाला सामाजिक कार्यास भरपूर प्रतिसाद मिळाला यात शेकडो रक्तदात्याने आपले रक्तदान केले आहे. 

यावेळी रक्त संकलन केंद्र चंद्रपूर येथील डॉ. निधी पुतिया, डॉ. गणेश तुघेकर, गोखरे, अमुल रामटेके, प्रतीक मोटे, महेश दुर्गे, अक्षय, अभिषाश यादिंनी रक्त संकलाचे कार्य पार पाडले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवराय मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश महल्ले, उपाध्यक्ष शुभम पाटील , सचिव सचिन डाहुले , सहसचिव सुमित बोन्डे, कोषाध्यक्ष अमोल कडू ,सदस्य आशिष चिकटे , नरेंद्र बोन्डे , संकेत विचू, गुरुदेव ढेंगळे , गणेश लिंगे, प्रज्वल उकिनकर, विष्णू कामरे, मनोज राखुंडे अक्षय गाताडे शुभम बोन्डे अजय गाताडे कारण ताजने अनिकेत विचू , अनिकेत कडू, कुणाल पायघन , आदींनी परिषम घेतले.

सौ. किरण देरकर यांची रक्तदान शिबिराला भेट

मल्हारगड येथील आयोजित रक्तदान शिबिराला वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या अर्धांगिनी सौ. किरण देरकर यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला यावेळी श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, डॉ विलास बोबडे, रामदास पाटील पाखले, चंपत पाचभाई, मंगेश गोरे, गिरीश सातपुते यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.