Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 25

विदर्भवादी मंगल बाबू चिंडलिया यांचे दुःखद निधन

0

News Today

वणी: सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध व्यावसायिक तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सक्रिय सदस्य मंगलाबाबू चिंदालिया (७५ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने १९ मे रोजी संध्याकाळी ८ वाजता दरम्यान निधन झाले. बरेच दिवस ते आजारी होते.

त्यांची अंत्ययात्रा २० मे रोजी संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. अंत्यसंस्कार वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहेत.

मंगलाबाबू हे पत्रकारिता, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय होते. विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून सतत आपला सक्रिय सहभाग नोंदवत राहिले.

ते हसतमुख, मनमिळावू व जनसंपर्कात कुशल स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे वणी शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.

 

खुश खबर :- घरकूल लाभार्थ्यांसाठी वणी तालुक्यात वाळू वाटपास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

0

गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा; ४२३० ब्रास वाळूचे वाटप होणार

वणी , दि. १९ मे २०२५
महाराष्ट्र शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण-२०२५ अंतर्गत वणी तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांनी सुमारे ४२३० ब्रास वाळू स्थानिक लाभार्थ्यांसाठी वाटपास मंजुरी दिली आहे. घरकुलाच्या वाळूसाठी आमदार संजय देरकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे घरकुल धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या निर्णयानुसार, शासनाच्या ८ एप्रिल व ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयांनुसार पात्र लाभार्थ्यांना कमाल ५ ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही. तहसिल कार्यालय ऑनलाईन पास तयार करून देईल आणि संबंधित ग्रामसेवकांमार्फत ही वाळू थेट घरपोच पोहोचवली जाईल.

यामध्ये केवळ पर्यावरणीय मंजुरी मिळालेल्या आणि लिलाव न झालेल्या वाळूगटांमधूनच वाळू दिली जाणार आहे. स्थानिक नागरिकांनी वैयक्तिक घरबांधणीसाठी वाळूची मागणी केल्यास, ₹६०० प्रति ब्रास दराने आणि इतर अनुज्ञेय शुल्क भरून ऑनलाईन पास द्वारे वाळू उपलब्ध होणार आहे.

तहसिलदार व गट विकास अधिकारी यांच्यावर संपूर्ण कार्यवाहीची संयुक्त जबाबदारी राहणार आहे. या निर्णयामुळे घरकुलासाठी वाळूची टंचाई दूर होणार असून, गरजू कुटुंबांना त्यांच्या घराच्या उभारणीसाठी हक्काची मदत मिळणार आहे.

मोठी दुर्घटना :- वादळाचा कहर : विज पडून १८ शेळ्यांचा मृत्यू , आणि शेळीपालक …, वाचा सविस्तर वृत्त

0

News Today 

मारेगाव :-  तालुक्यातील नेत वरूड परिसरात आज दिनांक १८ मे रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता अवकाळी वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी आकाशात विजांचा कडकडाट होत असताना कवडू जुमनाके यांच्या शेतात वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली.

या घटनेत भारत गेडाम यांच्या शेळीपाळीतील २२ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. शेळ्या शेताच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत चरायला सोडण्यात आल्या होत्या. त्याचवेळी वीज कोसळल्याने या निष्पाप जनावरांचा दुर्दैवी अंत झाला. यात शेळी पालक भारत जुमानाके हा देखील जखमी झाला असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना अतिशय हृदयद्रावक असून मेंढपाळ भारत गेडाम यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

तालुक्यात अवकाळी वादळाचा परिणाम इतर भागांमध्येही दिसून आला असून, शेतकऱ्यांची पिकेही या पावसामुळे बाधित झाली आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शेतकरी व पशुपालकांना मदत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

वणी विभागातील मामा तलावांची कामे रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी, सत्ताधाऱ्यांवर रोष

0

News Today

वणी (जिल्हा यवतमाळ) वणी विभागातील मामा तलावांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे अर्धवट अवस्थेत थांबवण्यात आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असताना प्रशासनाकडून कंत्राटदारांना काम बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे तलाव अजूनही अपूर्ण अवस्थेत असून, त्यामुळे आगामी खरीप हंगामात सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

कामे थांबवून “बिलांची तयारी”?

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, काम थांबवण्यामागे एक ‘गोरखधंदा’ सुरू आहे. पावसाचे पाणी तलावात साचल्यानंतर प्रत्यक्षात काम न करता ते पूर्ण झाल्याचे दाखवले जाईल आणि त्यावर बिले काढली जातील, असा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्या असून, यावेळीही तशीच पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची मागणी:

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या लावून धरल्या आहेत:

रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत.

कामाच्या गुणवत्तेची तातडीने चौकशी करावी.

पावसाळ्याआधी तलाव कार्यक्षम स्थितीत असावेत.

या प्रकारामुळे सत्ताधाऱ्यांवर देखील रोष वाढत असून, स्थानिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी तालुक्यातून ४५०० ब्रास वाळूसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल, मारेगाव व झरि जामनीतुन एक एक हजार ब्राससाठी सोमवारी होणार प्रस्ताव दाखल

0

२० तारखेपासून वाळू घरकुल धारकांना मिळण्याचे संकेत

News Today 

वणी (प्रतिनिधी) – वणी तालुक्यातील घरकुल विकासकामांसाठी तहसीलदार वणी यांनी ४५०० ब्रास वाळूच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केला आहे. संबंधित प्रस्ताव खाणीकर्म विभागाने मंजूर केला असून, अंतिम निर्णयासाठी तो जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

मात्र, काल तारीख १५ रोजी जिल्हाधिकारी विकास मीना यांची अमरावती येथील विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याने वाळूसंबंधीचा प्रस्ताव सध्या प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

वाळूच्या उपलब्धतेचा प्रश्न सध्या वणी तालुक्यातील अनेक विकासकामांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. 

वणी बरोबर मारेगाव तहसील कार्यालयात देखील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे उपस्थितीत वाळू संदर्भात बैठक संपन्न झाली असता यावेळी तहसीलदार श्री निलावार गटविकास अधिकारी,माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  एक हजार ब्रास वाळू साठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. असाच प्रस्ताव झाडीतून देखील सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे वणी विधानसभेतील वाळू प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

वाळू वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासोबत सातत्याने आमदार संजय देरकर हे पाठपुरावा  करीत असून जसे आदेश धडकतील वाळूचा वाटप करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार निखिल धूळधर यांनी दिली आहे.

वाळू घोरणावर उचित चर्चा करताना आमदार संजय देरकर

गावपातळी वाळू नियोजन समिती मार्फत होणार वितरण

गाव पातळीवर वाळू नियोजन समिती गठित असून या समितीचे अध्यक्ष विद्यमान सरपंच असणार आहे. तर सचिव म्हणून विद्यमान तलाठी हे असणार आहे.  तर सदस्य म्हणून पोलिस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष व इतर लोक असणार आहे. 

या समितीने ज्या घाटावरून वाळूची वाहतूक केल्या जाणार आहे. त्या ठिकाणावरून तर लाभार्थ्यांच्या घरापर्यंत वाहतुकीचा व  वाहनात वाळू भरायचा खर्च योग्य आकारणी करून सर्वांना समान दराने वाळू उपलब्ध करुन द्यायची आहे. केवळ वाळूची जे शासकीय  रॉयल्टी असणार आहे ते शुल्क माफ असणार आहे. घरकुलाचा संपूर्ण डेटा ग्रामपंचात स्थरावर उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आमदार संजय देरकारांच्या कार्यप्रणालीवर घरकुल धारक समाधान व्यक्त करीत आहे.

  जनतेने भाजपला सत्तेसाठी निवडून दिलं आहे, आंदोलन करण्यासाठी नव्हे. आमदार संजय देरकर यांची बेधडक प्रतिक्रिया:

“भाजपचं वाळू आंदोलन म्हणजे लोकांची डोळ्यात धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. एकीकडे महसूल खातं भाजपच्या मंत्र्याकडे आहे, त्याच खात्याच्या माध्यमातून वाळू धोरण आखलं जातं आणि दुसरीकडे त्याच पक्षाचे कार्यकर्ते सत्याग्रहाच्या नावाखाली आंदोलन करतायत – ही केवळ नाटकीपणाच नाही तर जनतेची दिशाभूलही आहे.

भाजपला जर खरोखर वाळूच्या गैरव्यवहाराची चिंता असेल, तर त्यांनी आपल्या मंत्र्यांकडून ठोस निर्णय घ्यायला लावावेत. आंदोलन करून अधिकाऱ्यांवर खापर फोडणं म्हणजे जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग आहे. सत्ता चालवायची असेल तर जबाबदारी घ्या, आणि जनतेची बुद्धीमत्ता कमी लेखू नका. भाजप  हे ५  महिन्यापासून सत्ता भोगता आहे. परंतु वाळूवर धोरण ठरवता आलं नाही. 

जनतेने भाजपला सत्तेसाठी निवडून दिलं आहे, आंदोलन करण्यासाठी नव्हे. जनतेच्या प्रश्नांवर उपाय शोधणं हेच त्यांचं कर्तव्य आहे – आंदोलन नव्हे. अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार संजय देरकर यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम

0

News Today 

मुंबई (प्रतिनिधी) :मागील २ ते ३ वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य  संस्थेतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरावात केली असून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अधिकृतपणे लवकरच घोषणा होण्याचा संकेत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संभाव्य निवडणूक कार्यक्रमानुसार २१ मेपर्यंत नोटिफिकेशन जारी करण्यात येणार असून,५ जून ते २५ पर्यंत आदर्श आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. ता. २५ जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान आणि २७ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. अश्या निवडणुका संपन्न होण्याची शक्यता आहे. 

या निवडणुकांचे वारे वाहतच विविध पक्षांचे हवसे आणि गवसे सज्ज झाले असून, मतदारांना भुलवण्यासाठी जनसंपर्क, जाहिरातबाजी आणि गुप्त बैठकींना सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवरील हे निवडणुकीचे रण आता उभे राहत असून, स्थानिक विकासाच्या मुद्द्यांपासून जातीय समीकरणांपर्यंत अनेक गोष्टी या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतील.

 प्रत्येक गटात उमेदवार निश्चिती, प्रचारासाठी रणनीती, आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवकल्पनांचा मारा होणार हे स्पष्ट आहे. गावपातळीवर मतदारांमध्येही उत्सुकता वाढली असून, ‘या वेळी कोण?’ हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

राजकीय पक्षांच्या तयारीसह प्रशासनही निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी सज्ज झाले असून, आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यात येणार आहे. वरील माहिती ही केवळ संभाव्य आहे. निवडणूक आयोग अधिकृत माहिती प्रकाशित केल्यानंतरच निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. 

मोठी खळबळ:- माजी आमदार बोदकुरवारांची शेतकऱ्याला अश्लीश शिवीगाळ व धमकी;  शेताच्या सीमावादातून पोलिसांत तक्रार

0

 

News Today 

वणी :- शेताच्या सीमावादातून वणी तालुक्यातील एका शेतकऱ्याला माजी आमदाराने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बोदकुरवारांच्या या प्रतापामुळे भाजपची प्रतिमा मात्र मलिन होतांना दिसून येत आहे. या प्रकरणी उचित चौकशीची गरज निर्माण झाली आहे.

मारोती दादाजी खुसपुरे (वय ५४) असे तक्रारदार शेतकऱ्याचे नाव असून ते ओम नगर, चिखलगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या शेतालगतच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे शेत आहे. दिनांक १४ मे २०२५ रोजी सकाळपासून खुसपुरे आपल्या शेताच्या सीमारेषेवर सिमेंटचे खांब लावून कंपाऊंड करत होते. सायंकाळी सुमारे ६ वाजता माजी आमदार बोदकुरवार हे आपल्या वाहनासह घटनास्थळी आले.

तक्रारीनुसार, त्यांनी खुसपुरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत, “तुझ्या शेताची सीमा इथून येत नाही, मी माजी आमदार आहे, सरकार आमचं आहे,” अशी धमकी देत खांब उखडून फेकून दिले. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या वाहनचालकानेही खुसपुरे यांना धक्का दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

खुसपुरे यांनी दिलेल्या तक्रारीत, या घटनेमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवितास धोका असून, माजी आमदार असल्याने राजकीय दबाव टाकून त्रास दिला जाऊ शकतो, असे नमूद केले आहे. या प्रकरणाची दखल वणी पोलीसनी घेतली नसून कारवाईस दिरंगाई केल्या जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे.

माजी आमदार बोदकुरवार यांनी शेतकऱ्यांविषयी केलेली अश्लील आणि अवमानकारक भाषा केवळ दुःखदच नाही, तर ती अत्यंत निंदनीय आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरणं म्हणजे संपूर्ण शेतकरी समाजाचा अपमान करण्यासारखं आहे.

लोकप्रतिनिधी पद भूषवलेली व्यक्ती जर अशा प्रकारे वागते, तर ती लोकशाही मूल्यांचाही अपमान करते. आम्ही अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.

शेतकऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, कारण अन्नदाता अपमानित होणार असेल तर संपूर्ण समाजाचं भविष्य अंधारात जाईल. अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी व्यक्त केली.

संजय निखाडे जिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा)

मोझरी संस्थेचा कट फसला : अड्याळ टेकडीवरील हक्कासाठीचा लढा भु-वैकुंठ टेकडीच्या बाजूने

0

News Today 

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या भु-वैकुंठ अड्याळ टेकडीवरील मालकी हक्कासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज मोझरी यांच्याद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कायदेशीर संघर्ष अखेर न्यायालयात फसला आहे. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिनांक २ मे २०२५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात अड्याळ टेकडीवरील सुबोधदादा व नवलाजी मुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे हक्क मान्य करून, गुरुकुंज मोझरीच्या दाव्यांना पूर्णतः फेटाळले आहे.

तुकारामदादा गीताचार्य यांनी १९६७ मध्ये सुरू केलेले ग्रामगीतेचे प्रयोग, मौनसाधना, पंचगव्य चिकित्सा, ग्रामोद्योग, महिला सशक्तीकरण यांसारख्या उपक्रमांमुळे अड्याळ टेकडी हे आत्मविकासाचे भुवैकुंठ म्हणून ओळखले जाते. हे कार्य विनाअनुदान व स्थानिक जनतेच्या श्रमदानातून उभे राहिले असून, कोणतीही संस्था नोंदणीकृत नसतानाही समाजकार्याच्या बळावर टिकून आहे.

२०१० पासून मोझरी संस्थेने विविध दावे करून अड्याळ टेकडीवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सर्व दावे ब्रह्मपुरी दिवाणी न्यायालय व चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने खारिज केले. तरीही १२ डिसेंबर २०२० रोजी, घरभेदी मधुकर तुंडूलवार यांनी लोकन्यायालयात गुप्तपणे मोझरी संस्थेशी मिळून अड्याळ टेकडीची संपत्ती हस्तांतरणाचा समझोता करून घेतल्याचे वृत्त समोर आले.

या बेकायदेशीर कृत्याला विरोध करत सुबोधदादा व नवलाजी मुळे यांनी ०४/२०२१ अंतर्गत न्यायालयात आवाहन केले. हा दावा स्थानिक व जिल्हा न्यायालयांनी फेटाळला असला, तरी उच्च न्यायालयात या लढ्याला यश मिळाले.

न्यायालयाने केवळ लोकन्यायालयातील समझोता रद्द केला नाही, तर मूळ ०४/२०२१ दावा पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश दिले असून, यानंतर अड्याळ टेकडीच्या बाजूने कायदेशीर लढ्याला अधिक बळ मिळाले आहे. या विजयामुळे अड्याळ टेकडीवरील सेवाभावी कार्याला नवसंजीवनी मिळाली असून, गुरुकुंज मोझरीच्या मालकी दाव्याचा पूर्णतः शेवट झाला आहे.

संपूर्ण प्रकरणात अड्याळ टेकडीवरील गुरुदेवभक्तांनी एकजूट दाखवून न्याय मिळवला. आता या पवित्र कार्यासाठी पुन्हा एकदा संघटीत होऊन ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं’ या उक्तीप्रमाणे अड्याळ टेकडीचे कार्य तितक्याच निष्ठेने पुढे नेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वणी तालुक्यात वाळू वाटपाचे धोरण निश्चित — मंडळ निहाय क्षेत्रातून वाळूचा होणार वाटप

0

आ. संजय देरकर, SDO नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धूळधर यांच्यातील चर्चा यशस्वी

News Today
वणी (प्रतिनिधी)  : तालुक्यातील रखडलेली घरकुल कामे मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आज ता. १४ रोजी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयातील तहसीलदार कक्षात आमदार संजय देरकर यांनी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांच्यासोबत वाळू वाटपाच्या धोरणावर सविस्तर चर्चा केली. 

या बैठकीत वणी तालुक्यातील वणी, शिंदोला, शिरपूर, कायर, रासा, राजूर, पुरवट, भालर या आठ मंडळांतील घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या वाळू वाटप प्रक्रियेमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या समन्वयातून वाहनांमध्ये GPRS प्रणाली बसवून पारदर्शकतेने वाळूचे वितरण होणार आहे.

पंचायत समिती वणीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी सर्व लाभार्थ्यांची यादी तहसील प्रशासनाकडे सुपूर्द केली असून, लाभार्थ्यांच्या गरजेनुसार संबंधित ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे वाळूची ऑफ लाईन मागणी करायची आहे.

पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी ज्या वाळू घाटांचा समावेश करता येणार नाही, अशा घाटांना वगळून उर्वरित पात्र घाटांमधून प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू दिली जाणार आहे. वणी तालुक्यात सुमारे १० हजारांहून अधिक घरकुल लाभार्थी असून, वाळू अभावामुळे रखडलेली कामे आता वेग घेणार आहेत. या चर्चे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, भगवान मोहिते, सुधीर थेरे, अजय कवरासे, डॉ. जगन जूनगरी आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारामुळे वाळूच्या गंभीर प्रश्नावर मार्ग निघाल्याने तालुक्यात सर्वत्र समाधानाचे वातावरण असून, नागरिकांकडून आमदार देरकर यांचे आभार मानले जात आहेत.

       मारेगाव व झरी जामणी येथे हीच पद्धत
वणी प्रमाणेच मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील घरकुल धारकांच्या समस्या आहे. त्यांना देखील लागणारी वाळू वणी तालुक्यातील धोरणाप्रमाणे मिळणार आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतील सरपंच व ग्रामसेवकाच्या माध्यमातून वाळूची मागणी करावी असे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे.

वणी येथे खरीप हंगामपूर्व नियोजनाची तालुका स्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): वणी येथील महसूल भवनात तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२५ पूर्व नियोजनाची तालुका स्तरीय आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. संजय देरकर होते.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे विधानसभा अध्यक्ष मा. दिलीप भोयर, इंजी. कुंडलिक ठावरी, अविनाश राऊत, भगवान मोहिते, डॉ. जगन जूनगरी, डॉ. बोबडे, पांढरकवड्याचे उपविभागीय कृषी अधिकारी चंदन निगोट , तसेच वणी तालुका कृषी अधिकारी पवन कावरे, झरी तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, मारेगाव तालुका कृषी अधिकारी दीपाली खवलेआदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड आणि शेतीपूरक व्यवसायांकडे वळावे, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांमध्ये कृषीविषयक जागृती निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे.”

बैठकीला वणी विधानसभा क्षेत्रातील कृषी विभागाचेअधिकारी, कर्मचारी, कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीडनाशके, सिंचन व्यवस्था व विविध योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली.

मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि समस्यांवर उपाय सुचवले. सकारात्मक चर्चासत्राने बैठकीचा समारोप झाला.