

News Today
वणी – शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसताना, सरकार मात्र या कंपन्यांना 1 हेक्टर सोयाबीनसाठी ₹16,500 इतके अनुदान देत आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त मदत केवळ ₹8,500 इतकी, तीही नगण्य नुकसानीवर, दिली जाते. तसेच पीककर्ज पुनर्गठनाच्या घोषणेमुळे शेतकरी आणखी कर्जबाजारी होत आहेत.

या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा आता गप्प बसणार नाही, असा इशारा काॅ. अनिल हेपट यांनी दिला आहे. 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे लाखो शेतकरी शासनाविरोधात एल्गार पुकारणार आहेत.

या आंदोलनात वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काॅ. अनिल हेपट, अनिल घाटे, मोरेश्वर कूंटलवार, रवी गोरे, पंढरी मोहीतकार, गणेश कळसकर, प्रविण आडे, गुलाबराव उमरतकर, द्वारका ईमडवार, मनोहर पचारे, विनायक नन्नोरे, गुणवंत डुकरे, अनंत कदम, गोपाल काळे, रामभाऊ दाभेकर, मारोतराव ईमडवार, रामकृष्ण महल्ले, अनुराधा उटाणे, विजया पावडे, राजे तेलतुंबडे, अॅड. गजानन पखाले आदींनी केले आहे.




