News Today
मुकुटबन (ता. झरी), दि. २२ सप्टेंबर २०२५
आरसीसीपीएल कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगार युवक, बाधित शेतकरी, गावकरी व पर्यावरण संरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने कंपनीच्या मुख्य गेटसमोर आमरण उपोषणास सुरुवात झाली.

नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गझलवार यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपोषणावर बसले आहेत. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुकुटबन व येडशी गावातील शेकडो महिला-पुरुषांनी उपस्थित राहून ठाम पाठिंबा दर्शविला.

✦ प्रमुख मागण्या
कंपनीतील ८०% नोकऱ्या स्थानिकांना द्याव्यात.
पर्यावरणपूरक झाडे लावावीत किंवा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी द्यावी.
लेबर कॉन्ट्रॅक्टर बंद करून स्थानिक एजन्सीद्वारे भरती व्हावी.
कामगारांचे वेतनवाढ व पी.एफ./इन्शुरन्स लाभ निश्चित करावेत.
स्थानिकांना टेंडरशिप द्यावी; भ्रष्टाचार रोखावा.
खान परिसरात स्फोटके साठवणे थांबवावे.
कामगारांना सेफ्टी किटचे नियमित वाटप करावे.
भूजलावर आधारित वीज निर्मिती बंद करावी; नदीवर बंधारे बांधावेत.
सिमेंट धुळीमुळे शेती व गावकऱ्यांना होणारा त्रास थांबवावा.
पर्यावरण व वन्यप्राणी कायद्याचे पालन व्हावे.
वाहनांच्या धूर-प्रदूषणावर नियंत्रण आणावे.
बाहेरील कामगारांचे चरित्र प्रमाणपत्र सक्तीचे करावे.
रस्त्यावरची पार्किंग बंद करून स्वतंत्र पार्किंगची सोय करावी.
कंपनीने बांधलेले रस्ते स्थानिक ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावेत.
सीएसआर निधीतून आरोग्य, पाणी, रस्ते व इतर सुविधा द्याव्यात.

✦ ग्रामस्थांचा पाठिंबा
येडशी गावातील नागरिकांनी उपोषणास ठाम पाठिंबा दर्शविला असून शेकडो महिला-पुरुषांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. त्यामुळे आंदोलनाला जनआंदोलनाचे रूप आले आहे.
✦ कंपनी प्रशासन मौन
पहिल्या दिवशीच्या आंदोलनाबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही.



