News Today
नेरड (पू.) : नेरड गावात मस्कर्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला महिला मंडळाच्या भजन गजराची जोड मिळाली आणि गावभर भक्तिमय वातावरण पसरले. गेल्या दहा दिवसांपासून गावात सुरू असलेल्या उत्सवाचा आज मंगलमय समारोप झाला.

यावर्षी मस्कर्या गणपती उत्सव ने २५ वर्षे पूर्ण केल्याने गावकऱ्यांत विशेष उत्साह होता. सकाळपासूनच गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली. महिला मंडळाच्या भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत सामूहिक भजने, गजरे आणि अभंग गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या वेळी परिसरातील तब्बल १६ गावांमधील भजन मंडळांनी सहभाग नोंदवला. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाच्या नादात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने वातावरण दुमदुमले.

गावातील ज्येष्ठ मंडळींनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले. तरुणांनी मिरवणुकीत पारंपरिक खेळ, नृत्य आणि ढोलवादन सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
२५ वर्षांचा प्रवास
मस्कर्या गणपती उत्सव मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा यांसारख्या उपक्रमांतून मंडळाने गेली २५ वर्षे समाजकार्य केले आहे. त्यामुळे गणपती उत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचा प्रतीक ठरला आहे.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश उत्सव मंडळ, गावकरी व महिला मंडळाने मेहनत घेतली. अखेर संध्याकाळी जल्लोषात आणि भक्तिभावात गणरायांना निरोप देण्यात आला.

गणेश मंडळाची स्वच्छता मोहीम
गावातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जनानंतर रस्त्यावर पडलेले कागदी ग्लास आणि कचरा झाडून स्वच्छता केली. विसर्जनाच्या आनंदसोहळ्यानंतर गाव स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम राबवून मंडळाने समाजासाठी आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

गणपती विसर्जनावेळी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक दरम्यान भाविकांना पिण्यासाठी मोफत फिल्टर केलेल्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंकित पशुपालन , ग्राम अमृत अक्का व विविध ग्राम उद्योग केंद्राचे संचालक पिदुरकर यांच्या वतीने ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व भजन मंडळांना तसेच भाविकांना याचा लाभ घेता येईल. विसर्जन मिरवणुकीतील गर्दी व उष्ण वातावरण लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे.



