Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 43

लोकशाही राज्यव्यवस्थेत मतदारांचा दर्जा मोठा आहे: योगेंद्र यादव 

0

लोकशाही राज्यव्यवस्थेत मतदारांचा दर्जा मोठा आहे: योगेंद्र यादव 

प्रतिनिधी (अमरावती)

News Today 

गुरुकुंज मोझरी: लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुक . यामध्ये मतदार हा मतदान करून पाच वर्षाकरिता आपला प्रतिनिधी निवडत असतो. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आणि आयुष्याच्या अस्तापर्यंत मतदानाचा हक्क त्याचे कडून कोणीही हिराहू शकत नाही. परंतु निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाच वर्षापर्यंतच त्या पदावर राहण्याचा अधिकार असतो. निवडून येणाऱ्या पेक्षा निवडून देणारा चा दर्जा हा नेहमीच मोठा असतो असे प्रतिपादन श्री योगेंद्र यादव यांनी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे आयोजित ग्रामगीता तत्त्वज्ञान आचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाच्या प्रसंगी बोलताना केले. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे दरवर्षीप्रमाणे ग्रामगीता तत्त्वज्ञान आचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संध्याकाळी सात वाजताच्या सत्रा मध्ये श्री योगेंद्र यादव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

अध्यात्म गुरुकुलचे संचालक रविदादा मानव यांचेशी हितगुज करताना ज्येष्ठ समाजसेवी योगेंद्रजी यादव

हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या जनसागरासमोर लोकशाही राज्यव्यवस्थेत नागरिकांची जबाबदारी या विषयावर योगेंद्र यादव बोलत होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध सप्तखंजरी वादक प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज, अध्यात्म गुरुकुल चे संचालक रवि मानव, भारत जोडो अभियानाचे महाराष्ट्र संयोजक अविनाश काकडे, इंजी भाऊसाहेब थुटे, प्रेमकुमार बोके, डॉ धर्मपाल चिंचोळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

लोकसंत सप्तखंजेरी वादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे सोबत हास्य मुद्रेत ज्येष्ठ समाजसेवी योगेंद्रजी यादव

पुढे बोलताना योगेंद्र यादव म्हणाले की धार्मिक स्थळांवर जाण्याआधी मी खूप विचार करतो,तसाच इथेही येण्यापूर्वी मी विचार केला राष्ट्रसंतांच्या व्यक्तित्व व कार्याबद्दल माहिती घेतली व माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं की आपण या ठिकाणी निश्चितच गेले पाहिजे कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे लोकशाही मूल्य समाजामध्ये रुजवणारे एक राष्ट्रभक्त होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये टाकले हाल अपेक्षा सहन केल्या हे कळल्यानंतर तुकडोजी महाराजांबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आणि श्रद्धा आहे. आपला प्रमुख ग्रंथ ग्रामगीता हा शेतकरी काम करी वर्गाला अर्पण करणारा असा महात्मा च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला येण्याचे सौभाग्य मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना प्रलोभन दिल्या जातील धर्माभिमान व जातीचा अभिमान सांगून राष्ट्रीय एकात्मतेला पायदळी तुडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होईल परंतु आपण शुद्ध सुज्ञ नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी शांतता सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कोणत्याही अफवांच्या मागे न जाता माणुसकीच्या धर्माचे पालन करत एका सुज्ञ मतदाराप्रमाणे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अशी भूमिका प्रास्ताविक भाषणामध्ये बोलताना रवी मानव यांनी मांडली होती. इंजी भाऊसाहेब थूटे यांनी या सत्राच्या सुरुवातीला राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांविषयी लिहिलेल्या खंजरी भजनाचे सादरीकरण केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रेमकुमार बोके यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मपाल चिंचोळकर यांनी केले.

माझ्यावर झालेल्या हमल्यामुळे मी घाबरलो नाही : योगेंद्र यादव

आज दुपारी अकोला येथे एका नियोजित कार्यक्रमांमध्ये काही विघातक तत्त्वांनी आमच्यावरती हमला केला. हा दडपशाहीचा एक प्रकार मी समजतो मी त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा करायला तयार आहोत त्यांनीही तशी तयारी ठेवावी अशा हमले करून मला ते घाबरवतील असे त्यांना वाटत असेल तर त्यांचा हा समज चुकीचा आहे मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही तर यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळते.
मी त्यांना माझे विरोधक समजत नाही परंतु त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामंजस्यांनी चर्चेचा मार्ग स्वीकारावा.

सर्वधर्म समन्वय संमेलनातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

0

News Today 

प्रतिनिधी (अमरावती)

गुरुकुंज मोझरी : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या स्मृतिदिननिमित्त श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे पालखी पदयात्रा शिबिर महोत्सव सुरु आहे. त्यामध्ये सर्वधर्म समन्वय संमेलन पर पडले त्यात सर्व धर्माच्या धर्मप्रतीनिधिंनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये हिंदू (सनातन)धर्म प्रतिनिधी मा.नामदेव गव्हाळे,मुस्लिम धर्म प्रतिनिधी इस्तीयाक अहमद,ख्रिश्चन धर्म प्रतिनिधी नितीन सरदार, बौद्ध धम्म प्रतिनिधी भदंत संघरत्न मानके, जैन धर्मप्रतीनिधी डॉ.मेघराज कोचर, सिख धर्मप्रतिनिधी राणासिंग बावरी इत्यादी उपस्थीत होते.


आपला धर्म विश्व कल्याणाची कामना करतो , हिंसा शिकवत नाही तर माणसाला माणसाशी मानवते ने वागायची शिकवण देतो अश्या आशयाचे प्रतिपादन सर्वच धर्म प्रतिनिधींनी केले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी या संमेलनाचे समारोपीय भाषण केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनातले अनेक दाखले त्यांनी दिले .ज्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जोपासल्या जातो. या संमेलनाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले तर सूत्र संचालन आकाश टाले यांनी केले.

अखेर नांदेपेरा मार्गावरील अतिक्रमन धारकांवर होणार कारवाई

0

धन डानग्या अतिक्रमण धारकांना बजावल्या नोटीस तर कंत्राटदाराला दिल्या कानपिचक्या 

सा. बां. विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयाने घेतली वणी न्युज टुडेची दाखल

News Today 

दिलीप भोयर

वणी :- शहरातील साई मंदिर ते नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामात अडसर येत असलेल्या धन डानग्याच्या अतिक्रमणावर अखेर बुलडोजर चालण्यासाठी प्रशासनाची हिरवी झेंडी मिळाल्याने नैसर्गिक न्याय तत्वा प्रमाणे अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावली आहे. 

मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या या रस्त्याचे काम कंत्राटदार आर.व्ही. उंबरकर कडून करण्यात येत आहे. तब्बल ६ कोटी रुपयांच्या या रस्त्याच्या निविदेतील मंजूर कामाला वगळून लोक प्रतिनिधीच्या मर्जीने काम सुरू होते. विशेष म्हणजे अनेक तक्रारी नंतरही सा. बा. विभाग व कंत्राटदार कोणालाही न जुमानता आपल्या मर्जीने काम करीत होते या बाबत वणी न्युज टुडेनी सातत्याने यावर वृत्त प्रकाशित केल्याने वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी याची दाखल घेवून धन डानग्या अतिक्रमण धारकांना आज तारीख १८ रोजी नोटीस बजावून ७ दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले असून रस्ता बांधकाम करणाऱ्या आर. व्ही. उंबरकर कंपनीच्या देखील चांगल्याच कानपिचक्या घेतल्याची माहिती आहे. 

सदर रस्त्याच्या मंजूर निविदेनुसार रस्त्याच्या मध्य १ मिटरचे डिव्हायडर व त्याच्या दोन्ही बाजू ने ७.५० मीटर सिमेंट रस्ता, २.५० मीटरचे पेव्हर ब्लॉक व १.५० मीटर रुंदीचे सिमेंट ड्रॅनेजसह एकूण २४ मीटर रुंदीचे बांधकाम करावयाचे आहे. मात्र साई मंदिर ते न. प. शाळा क्रमांक ५ पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण करून अनेक पक्के घर, दुकाने व अपार्टमेंट बांधण्यात आले आहे. तर त्यापुढे अनेक जणांनी अतिक्रमण करून घराचे वाल कंपाऊंड बांधले आहे. कामात होत असलेल्या गैरप्रकार बाबत वणी न्युज टुडेनी सातत्याने पाठवपुरावा केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल घेत सर्व अतिक्रमण धारक धन डानगे लोकांना कारवाईचा नोटीस देवून. ७ दिवसात अतिक्रमण काढण्याचे सुचविले आहे. अन्यथा प्रशासनाच्या माध्यमातून काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

रस्त्याचा बांधकाम सुरू करताना भूमी अभिलेख विभागाने मोजमाप करून रस्त्याची हद्द आखून दिली. रस्त्याच्या केंद्रापासून १२ मीटरचे आत काही मोठ्या लोकांच्या इमारती असल्यामुळे त्या इमारती तोडणे गरजेचे होते. मात्र विधानसभा निवडणूक आणि मालमत्ता धारकांचा दबाव असल्यामुळे परस्पर रस्त्याची रुंदी कमी करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराकडून कोणतेही अतिक्रमण न तोडता नागमोडी रचनेनुसार नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रस्त्याचा देखरेखी करिता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अभियंता कामावर हजर राहत नाही. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत होता. मामा आमदार तर असल्याने आम्हाला कोणाचीच भीती नाही अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या कंत्राटदाराला आचार संहितेमुळे मामा हा केवळ कामा पुरता उरला आहे. मर्जी लावल तर सक्त कारवाई करण्यात येईल अश्या कानपिचक्या अधिकाऱ्यांनी दिल्याची जोरदार चर्चा वणी शहरात सुरू आहे.

गुरुकुंज मोझरी येथे होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये वादळी पावसाची बाधा

0

कोणीही गुरुकुलात मुक्कामी येण्याचे टाळावे- रवी मानव यांचे आवाहन

News Today
प्रतिनिधी

अमरावती :- जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्ताने होत असलेल्या “पालखी पदयात्रा शिबिर” या कार्यक्रमांमध्ये वादळी पावसा मुळे कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झालेला आहे . त्यामुळे यात्रेकरूंनी मुक्कामी येण्याचे टाळावे प्रचंड गैरसोय निर्माण होऊ शकते त्यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये या दृष्टी कोनातून श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी प्रसार माध्यमांतून आवाहन केले आहे. पुढील कार्यक्रम हॉलमध्ये घेण्यात येईल व त्या पद्धतीची सूचना सर्वांना देण्यात येईल. अशी माहिती दिली आहे.

मागील १७ तारखेपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्य स्मृतीदिना निमित्त विविध कार्यक्रमाचे जोरदार आयोजन केले होते. परंतु मागील दोन दिवसाच्या वादळी वारा पाण्याने कार्यक्रमासाठी व मुकामी येणाऱ्या मान्यवरांसाठी मुक्कामाच्या व्यवस्थे करिता पेंडाल व मंडपाची मोठी व्यवस्था करण्यात आली होती परंतु या वादळी वाऱ्याने सर्व अस्ता व्यस्त पडझड झाल्याने येणाऱ्या मान्यवरांचे व श्रीगुरुदेव उपसाकांची गैरसोय होवू शकते. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी कोणीही मुक्कामाच्या बेताने येवू नये दि. २१ ऑक्टोंबर रोजी मुख्य कार्यक्रला दिवसानेच उपस्थित राहावे असे आवाहन अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी केले आहे.

खालील लिंकवर क्लिक करून बघा झालेली नासधूस

https://www.facebook.com/share/v/N9BgTdhUZ1iNwbsk/

वणी भाजपात पडली उभी फूट , खोक्यांवर उतरली उमेदवारी,

0

तारेंद्र बोर्डे दिल्लीत, विजय चोरडिया मुंबईत ठान मांडून तर आ. बोदकुरवार नैराश्यात घरीच 

News Today

दिलीप भोयर

वणी :- भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे येथील वादग्रस्त शासकीय कंत्राटदार नितीन उंबरकर यांचेसोबत भूखंड खरेदी विक्री व्यवहार उघड झाल्यापासून स्थानिक भाजप नेत्यांमध्ये उभी फूट दिसून येत आहे. आ. बोदकुरवार यांची उमेदवारी धोक्यात आल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांना उमेदवारीचा ज्वर चढलं आहे. माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे उमेदवारी मिळण्यासाठी दिल्ली वारी करून आले. तर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया हे मुंबईत आपले बस्तान बांधून असल्याची माहिती आहे. शिवाय विजय पिदूरकर , रवी बेलूरकर, हे देखील आपापल्या परीने उमेदवारी खेचून आणण्याच्या जोरदार प्रयत्नात दिसून येत आहे. अश्या राजकीय तापलेल्या वातावरणात इतरांची जुळवा जुळवी सुरू असताना आ. बोदकुरवार हे नैराश्यात आले असून घरीच मुक्काम ठोकून असल्याची माहिती आहे. उमेदवारीसाठी वाढत्या रस्सीखेच मुळे खोके संस्कृती घडण्याची शक्यता वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या असून येत्या २२ ऑक्टोंबर पासून नाम निर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यातच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच चालू असताना वणी विधानसभेचे विद्यमान संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी रद्द होण्यासाठी आमदार महोदयांनी केलेल्या अनेक पराक्रमाची गुरुकिल्ली पक्षश्रेष्ठींच्या टेबलवर जावून आहे.यात वणी विभागातील रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करणारे कंत्राटदार नितीन (मनू) उंबरकर यांचे सोबत असलेले हित संबंधाचे पुरावे, तसेच शहरातील कुख्यात वरली मटका संचालकाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जावून फित कापणे, असे अनेक प्रकरणं आमदाराच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पार्टीत एक संघ प्रणित गट असून दुसरा असंघ प्रिय गट आहे. संघप्रिय गट हा देखील हळूहळू उघडपणे आ. बोदकुरवार यांच्या व्यवहरासंबधी वरिष्ठ पातळीवर विरोध दर्शवत असून असंघ प्रिय गट हा देखील भाऊ आणि भैय्याच्या गटातटात विखुरला आहे. यातील भैय्यागट हा प्रामाणिक पक्षाची धुरा खांद्यावर घेवून उमेदवार बदलण्यासाठी परिश्रम घेत आहे. तर भाऊ गट देखील नाराजीचा सुर उमटवत आहे. त्यामुळे संघाच्या भूमिकेवर पक्षाची शिस्त आहे.

आ. बोदकुरवार यांचे “राज” बाहेर पडल्याने स्थानिक कार्यकर्ते व पुढारी नाराज असल्याने वरिष्ठ पातळीवर उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपतील अनेक इच्छुक उमेदवार आपली शक्ती पणाला लावत आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिल्लीत तर विजय चोरडिया मुंबईत आपले ठाण मांडून बसले असले तरी इतर इच्छुक मंडळी नागपूरच्या वाऱ्या करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उमेदवारीची रस्सी खेच वाढल्याने ज्यांचे जास्त खोके त्यांना उमेदवारी ओके

पक्षांतर्गत सुरू असलेल्या विद्यमान उमेदवारीचा विरोध वाढत जात असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ज्यांचे जास्त खोके त्यांची उमेदवारी ओके असल्याची गोपनीय चर्चा बाहेर येत आहे. आपल्याच मामाला उमेदवारी  मिळविण्यासाठी हवे तेवढे खोके  कंत्राटदार भाचा बाजारातून जमा करून देण्याची जबाबदारी  घेत असल्याची चर्चा आहे. खोके देवून ओके करायचे आणि बोके मतदारांच्या मानगुटीवर बसवायचे धंदे जोरात दिसत आहे.

उमेदवारीसाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हंसराज अहिराकडे लोटांगण

0

अहिरांच्या कचेरीतून बोदकुरवार यांचा पत्ता कट असल्याची विश्वसनीय माहिती

News Today
दिलीप भोयर
वणी :- वणी विधानसभेचे विद्यमान भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे शासकीय कंत्राटदार आर. व्ही. उंबरकर कस्ट्रक्षन कंपनीचे मालक नितीन रमेश उंबरकर याचे सोबत भूखंडाच्या खरेदी विक्री प्रकरणात हित संबंध उघड झाल्याने सदर प्रकरणाची भाजप पक्षश्रेष्ठीनी दखल घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाचविण्यासाठी आ. बोदकुरवार यांनी आपल्या तीन सहकार्यांना घेवून गुरुवार तारीख १७ रोजी दुपारच्या सुमारास माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर (भैया) यांच्यापुढे लोटांगण घातल्याची माहिती आहे. मात्र हंसराज अहिर यांच्याकडून आ. बोदकुरवार यांना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे.

सन २०१४ व २०१९ मध्ये मोदी लाटेत वाहून आलेले आमदार संजीयरेड्डी बोदकुरवार यांना विधानसभा २०२४ मध्ये उमेदवारी मिळतील याची सर्वांना शास्वती होती. आणि त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रासाठी भूतो ना भविष्य असा निधी देखील खेचून आणला. परंतु या निधीतून बांधण्यात आलेले रस्ते व इतर बांधकामे प्रचंड निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे विकास हा भकास होऊन बसला आहे. या विकास कामाच्या जरी ऑनलाईन पद्धतीने निविदा काढल्या असल्या तरी या निविदा केवळ आर. व्ही. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीला कश्या मिळतील यासाठी निविदातील नियम व अटींचे व्यवस्थापन व्यवस्थित करून घेतल्या जात असल्याची चर्चा आता इतर कंत्राटदारांकडून दबक्या आवाजात केल्या जात आहे.

आज पर्यंतच्या कोणत्याही आमदारांनी शासकीय कंत्राटदारा सोबत कोणतेही संबंध जुळतील असा प्रकार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या घडवून आणला नाही. परंतु आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शासकीय कंत्राटदार नितीन उंबरकर सोबत प्रत्यक्ष भूखंड खरेदी करून आपले हित संबंध जोडले आहे. व आर्थिक लाभ मिळतील असा व्यवहार केला आहे. या प्रकरणाची वणी न्युज टुडेने सर्वत्र पोलखोल करताच भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या भुवया देखील उंचावल्या आहे. त्यामुळे बोदकुरवार यांची उमेदवारी तळ्यात मळ्यात सापडली आहे.

या भागातील माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर (भैया) यांची ओबीसी मतदारांवर मोठी पकड आहे. अहिर यांच्या शांत व संयमी स्वभावाने प्रत्येक व्यक्ती त्यांचा आदर ठेवत असतात. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभेत त्यांची भाजपने उमेदवारी कापून टाकल्याचा परिणाम मतदारांनी भाजपला दाखवून दिला आहे. तीच पुन:रावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी भैय्या यांनी काही उचित पक्ष हिताचे पावले उचलली आहे. याची कुणकुण लागताच येरवी भैयाच्या भेटी टाळणारे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी हंसराज अहिर यांची भेट घेवून उमेदवारी कायम ठेवण्यासाठी लोटांगण घातल्याची माहिती आहे. यावेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी दिनकर पावडे, वणी विधानसभा अध्यक्ष संजय पिंपळशेंडे, वणी तालुकाध्यक्ष गजानन विधाते आमदार महोदयासोबत उपस्थित असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी संकटात

0

शासकीय कंत्राटदारासोबत भूखंड खरेदी व्यवहार भोवणार..!

News Today
दिलीप भोयर
वणी :- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासकिय कंत्राटदाराच्या भागीदारीत भूखंड खरेदी विक्रीचा व्यवहार उघडकीस आल्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी संकटात येण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्त्याची बोगस व निकृष्ट दर्जाची कामे करणारे शासकीय कंत्राटदार आर. व्ही. उंबरकर कंपनीचे मालक  नितीन रमेश उंबरकर सोबत भागीदारीत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मौजा वणी येथील गट क्रमांक ६८/३ क्षेत्र १.२१ हे.आर. हा भूखंड दिनांक ०९/०६/२०२१ रोजी ६७ लक्ष १० हजार रुपयात खरेदी केल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. सदर भूखंड हा सतीश ओदेलू तोटावार, रा. सत्यसेवा हॉस्पिटल जवळ वणी यांचेकडून खरेदी करण्यात आला.

सदर भूखंड जरी शासकीय नियमानुसार खरेदी केला असला तरी शासकीय कंत्राटदारांना लोक प्रतिनिधी सोबत कोणतीही भागीदारी करता येत नाही. तसेच लोक प्रतिनिधींना सुद्धा शासकीय कंत्राटदारा सोबत कोणतेही आर्थिक हितलाभ संबंध ठेवता येत नाही. त्यामुळे सदर भूखंड व्यवहार अनैतिक आहे. की नाही यावर प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासण्याची गरज आहे.

आर. व्ही. उंबरकर कन्स्ट्रक्शन  कंपनी कडून सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नगर परिषद व इतर प्राधिकरण कडून कामे करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहे. या कंपनीला कोणतेही कामे देवू नये अश्या पद्धतीच्या नागरिकांच्या तक्रारी देखील आहे. जनतेच्या पैश्यावर चालणारी शासकीय यंत्रणा मात्र जनतेच्या तक्रारीची दखल न घेता याच कंपनीला कामे देतात व शेकडो कोटीची कामे निकृष्ट असताना त्यांची देयके अदा करून अधिकारी वर्ग देखील मलींदा लाटण्याचे काम डोळ्या देखत सुरू आहे. अश्या वादग्रस्त कंपनीच्या मालकासोबत लोकांनी लोकांची संपत्तीचे रक्षण करण्यासाठी निवडून पाठवलेले लोकप्रतिनिधीच जर भागीदारीचा व्यवहार करून मधुर संबंध जोडत असेल तर याला कोणते संबंध म्हणावे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून कुंपणच शेत खायला लागले आहे असे बोलल्यास काहीच वावगे ठरणार नाही.

             साहेब ये रिश्ता क्या कहलाता है…?
वणी विधानसभेतील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद, नगर पंचायत व इतर शासकीय बांधकाम प्राधिकरण विभाग यांचे कडून ज्या ज्या बांधकामाच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहे. त्या सर्व निविदा उंबरकर कंपनीला कश्या मिळतील अश्याच पद्धतीच्या नियम व अटी टाकून सर्व सामान्य कंत्राटदारांना निविदा मिळूच नये याची तरतूद करण्यात येत होती. तसेच इतर कोणत्याही बांधकाम करणाऱ्या कंपनीने कंत्राट घेतल्यास त्या कंपनीने प्रत्यक्ष कोणतेच काम केली नाही. या कंपन्यांनी घेतलेली सर्व कामे आर. व्ही. उंबरकर कंपनीने बेकायदेशीर पणे केले आहे. ही बेकायदेशीर कामे आर. व्ही. उंबरकर या कंपनीने कोणाच्या आशीर्वादाने केली असावी हे सांगण्यासाठी या व्यवहारामुळे गरज उरली नाही. त्यामुळे इथ अस म्हणावे लागेल की “ये रिश्ता क्या कहलाता है” ?

  ना. गडकरी यांनी दिलेल्या निधीतून पेवर ऐवजी मॅन पॉवरने केलेले वणी शहरील मुख्य मार्गावरील निकृष्ट रस्ता बांधकाम 

   नितीन गडकरीजी दाल में कूछ काला है..

प्रसार माध्यमांच्या एका मुलाखतीमध्ये देशाचे रस्ते बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी असे म्हणाले की आमच्या पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींचे व शासकीय कंत्राटदार कंपनी सोबत हीत संबंध निदर्शनास आणून दिल्यास, त्या लोकप्रतिनिधींवर सक्त कारवाई केल्या जाईल. अश्या प्रतिक्रिया दिल्या होत्या व तसा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर प्रचंड वायरल झाला होता. मग आता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व आर. व्ही. उंबरकर या कंपनीचे मालक नितीन रमेश उंबरकर यांचे हीत संबंध जगजाहीर झाले आहे. तसेच दस्तुर खुद नितीन गडकरी यांनी  वणी शहरातील मुख्य मार्गाचे काँक्रिट रस्त्याला २० कोटीचा फंड दिला होता. ते काम मुबई येथील जे. पी. कंस्ट्रक्षण कंपनीने निविदा घेवून प्रत्यक्ष काम करायचे होते. परंतु तसे न करता आर. व्ही उंबरकर या कंपनीने बेकायदेशीरपणे निकृष्ट करून देखील कोणतीही कारवाई झाली नाही. याचे काही टक्केवारी गडकरी वाड्यात गेली की काय असी चर्चा देखील रंगू लागल्याने एका इमानदार व्यक्तिमत्त्वाला देखील भ्रष्टाचाराचा डाग लागल्या जात आहे. त्यामुळे ये डाग अच्छे है असे म्हणायची वेळ भाजपावर आली आहे. त्यामुळे नितीन गडकरी हे यावर काय कारवाई करतील का? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

साई मंदिर नांदेपेरा रोड सिमेंट रस्ता, बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेवून

0

सुरुवाती बिंदूपासून काम सुरु न करता मधून सुरु केला काम

सा. बा. अभियंता व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

News Today 

दिलीप भोयर

वणी :- शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत चार पदरी सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. सद्या या रस्त्याच्या एका बाजूने ड्रेनेज बांधकाम तर दुसऱ्या बाजूला रुंदीकरण करण्यासाठी खुदाई सुरु आहे. कोट्यवधीच्या या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभागाचे उप अभियंता व कनिष्ठ अभियंता या कामाकडे ढुंकूनही पाहत नसल्यामुळे कंत्राटदाराच्या मर्जीने काम सुरू आहे.
कंत्राटदारांनी सदर कामाची सुरुवात साई मंदिर चौकापासून करायला हवी होती. त्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या अनेक पक्या इमारतीचे १ ते ४ मीटर पर्यंत अतिक्रमण तोडावे लागणार होते. परंतु निवडणूक काळात लोक प्रतिनिधीबद्दल मतदारांची नाराजगी पथ्यात पडण्याची भीतीमुळे सदर अतिक्रमण तोडण्याची कारवाई वगळण्यात आली.

जिल्हा मार्ग, राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गाची हद्दिपासून इमारत बांधकाम नियमात एकसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासन नगर रचना विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम १५४ अन्वये दिनांक ०५/०८/२०१९ रोजी शासन आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या नागरी भागात ३ ते ६ मीटर व अनागरी भागात रस्त्याच्या मध्यपासून ३७ मीटर जागा सोडून इमारत बांधकाम करता येणार. तसेच राज्य महामार्ग असलेल्या नागरी व औद्योगिक भागात रस्त्याच्या मध्यपासून २० मीटर किंवा रस्त्याच्या हद्दिपासून ४.५ मीटर जागा सोडून बांधकामांना परवानगी आहे.

साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्ग या रस्त्याची राज्य महामार्ग श्रेणीत नोंद आहे. त्यामुळे या रस्त्याच्या निविदेमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने १२-१२ मीटर बांधकाम करण्याची अट आहे. असे असताना वरिष्ठ पातळीवर कोणतीही परवानगी न घेता परस्पर रस्त्याची रुंदी कमी जास्त करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

सत्तेतील आमदार बोदकुरवार व शासकीय कंत्राटदार उंबरकरांसोबत भागीदारीत खरेदी केला भूखंड 

0

आर्थिक लाभाच्या हित संबंधामुळे नित्कृष्ट दर्जाच्या कामाची होत नाही चौकशी

News Today 

दिलीप भोयर

वणी :- वणी विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार संजीवयरेड्डी बापूरावजी बोदकुरवार यांनी वणी येथील स्थानिक शासकीय कंत्राटदार तथा आर. व्ही. उंबरकर कंत्रक्षण कंपनीचे मालक नितीन रमेशराव उंबरकर (मनू) यांचे सोबत मौजा वणी येथील शेत सर्वे क्रमांक ६८/३ क्षेत्रफळ १.७९ हे. आर. शेतजमीन शासकीय मुल्याप्रमाने रुपये ६७ लाख १० हजार रुपयास दिनांक ९ जून २०२१ रोजी नोंदणीकृत दस्त क्रमांक १८३६ नुसार खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भूखंड खरेदी केल्याचा पुरावा

महाराष्ट्र राज्याच्या लोकप्रतिनिधी नियमावलीच्या माहिती नुसार कोणत्याही लोकप्रतीनिधीस शासकीय कंत्राटदारासोबत आर्थिक लाभाचा व्यवहार करण्याची मुभा अथवा परवानगी नसल्याचे कळते आहे. सदर आमदार महोदयांनी ह्या जमिनीचे व्यवहारातील त्यांचे भागीदार ह्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री सडक योजना व नगर परिषद वणी, मारेगाव, झरि तसेच इतर शासकीय बांधकाम विषयक प्राधिकरना व्दारा निविदा प्रचलित नियमावली डावलून विशेष अटी घालून शेकडो कोटींचे कामे ह्या कंत्राटदाराला मिळवून देवून घशात घातले. याचा प्रचंड लाभ उठवत निकृष्ट दर्जाचे कामे करून करोडो रुपयाचा मलिंदा लाटला आहे.
या कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या दर्जा विषयी कितीही तक्रारी करून आज पावेतो कुठलीही चौकशी झालेली नाही. ह्या सर्व चौकश्या आणि कारवाया आमदार महोदयांनी स्वतःचे वजन वापरून थंड बस्त्यात ठेवल्याचे आरोप वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेतून केल्या जात आहे.

भूखंड विकल्याचा पुरावा

तसेच उपरोक्त खरेदी केलेली जमिनी विषयी मतदार संघात उहापोवा होवू लागताच सदरची ही जमीन नोंदणीकृत दस्त क्रमांक २७३७/२०२३ दिनांक ३० जून २०२३ रोजी वणी येथील एका डेव्हलपर तथा बिल्डरला रुपये ७६ लाख शासकीय किंमतीने विकली आहे. परंतु या जमिनीचे बाजार मूल्य ५ करोड रुपयाच्या घरात असल्याची माहिती काही खरेदी विक्री करणारे जाणकारांनी दिली आहे. म्हणजेच शासकीय कंत्राटदारासोबत आमदार महोदयांनी भागीदारी करून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय केला आहे. हे यावरून सिद्ध होते. असे अनेक उघडकीस न आलेले व्यवहार असल्याचे मतदार संघात चर्चा रंगू लागली आहे.
    या प्रकाराची शासन गांभीर्याने दखल घेवून उचित कारवाई करणार की नाही याकडे वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • निवडणूक आयोगाकडून साध्या ग्राम पंचायत सदस्य पदाच्या उमेदवाराकडून शपथपत्रावर लिहून घेते की,  कोणत्याही आर्थिक लाभत सहभागी असणार नाही व कंत्राटदारासोबत कोनतेही हीत जोपासल्या जाईल असे संबंध ठेवणार नाही मग एका आमदार पदावर असलेल्या व्यक्तीला असे प्रकार करता येतो का याची रीतसर चौकशी होणे गरजेचे आहे. 

सदर वृत्त कोणत्याही मान्यवरांची बदनामी व्हावी हा उद्देश नसून सत्य आणि कायदेशीर बाबी उघड व्हाव्यात यासाठी आहे. कोणाच्या भावना दुखाव्यात हा उद्देश नाही.

संपादक

साई मंदिर ते नांदेपेरा रोड रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार

0
  • निविदेतील अटी वगळून मनमर्जीने होत आहे काम
    धन दांडग्यांची मालमत्ता वाचविण्यासाठी रस्त्याची रुंदी केली परस्पर कमी

धनदांडग्यांचे वाल कंपाऊंड वाचविण्यासाठी नालीचा प्रवाह मोडला

News Today 

दिलीप भोयर

वणी:- शहरातील साई मंदिर ते नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु या रस्त्याचे काम कंत्राटदार आर.व्ही. उंबरकर कडून करण्यात येत आहे. तब्बल ६ कोटी रुपयांच्या या रस्त्याच्या निविदेतील मंजूर कामाला वगळून लोक प्रतिनिधीच्या मर्जीने काम सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक तक्रारी नंतर ही सा. बा. विभाग व कंत्राटदार कोणालाही न जुमानता आपल्या मर्जीने काम करीत आहे.

           नित्कृष्ट दर्जाचे होत असलेले नाली बांधकाम

सदर रस्त्याच्या मंजूर निविदेनुसार रस्त्याच्या मध्य १ मिटरचे डिव्हायडर व त्याच्या दोन्ही बाजू ने ७.५० मीटर सिमेंट रस्ता, २.५० मीटरचे पेव्हर ब्लॉक व १.५० मीटर रुंदीचे सिमेंट ड्रॅनेजसह एकूण २४ मीटर रुंदीचे बांधकाम करावयाचे आहे. मात्र साई मंदिर ते न. प. शाळा क्रमांक ५ पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण करून अनेक पक्के घर, दुकाने व अपार्टमेंट बांधण्यात आले आहे. तर त्यापुढे अनेक जणांनी अतिक्रमण करून घराचे वाल कंपाऊंड बांधले आहे.

रस्त्याचा बांधकाम सुरू करताना भूमी अभिलेख विभागाने मोजमाप करून रस्त्याची हद्द आखून दिली. रस्त्याच्या केंद्रापासून १२ मीटरचे आत काही मोठ्या लोकांच्या इमारती असल्यामुळे त्या इमारती तोडणे गरजेचे होते. मात्र विधानसभा निवडणूक आणि मालमत्ता धारकांचा दबाव असल्यामुळे परस्पर रस्त्याची रुंदी कमी करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराकडून कोणतेही अतिक्रमण न तोडता सर्पाकार रचनेनुसार नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रस्त्याचा देखरेखी करिता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अभियंता कामावर हजर राहत नाही. त्यामुळे कंत्राटदार आपल्या सोयीने काम करीत आहे.

याच इमारती वाचविण्यासाठी रस्त्याची रुंदी केली कमी

नांदेपेरा मार्ग हा आजच्या घडीला शहरात सर्वात जास्त रहदारीचा मार्ग झाला आहे. या मार्गावर शाळा, कॉलेज, दवाखाने असल्यामुळे दिवसभर रहदारी असते. तर रेल्वे फाटक बंद असताना मोठा ट्रॅफिक जाम होत असतो. अशातच कोट्यावधीच्या या रस्त्याच्या कामात बांधकाम विभाग, लोक प्रतिनिधी व कंत्राटदाराच्या संगनमताने मोठा गौडबंगाल होत आहे. याबाबत सा. बां. विभागाचे उपविभागीय अभियंता आसुटकार यांच्याशी संपर्क केला असता त्यांची चौकशी करून कारवाई करणार असे सांगितले. परंतु कारवाई होईल की नाही याची कोणालाही शास्वती नाही. सदर कामात सुरु अनियमितता बाबत शहरातील एका समाजसेवकाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.