Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 41

वणीत अपक्ष उमेदवाराचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

0

संजय देरकरांच्या प्रवाहात प्रचंड मोठी वाढ

News Todat 
दिलीप भोयर
वणी :- येथील विधानसभेतील निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे उमेदवार यशवंत शिवराम बोंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेवून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे संजय देरकरांच्या प्रवाहात प्रचंड मोठी वाढ होत आहे.

येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांची आज नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख आहे. यातच आज ओबीसी समाजातील असलेले अपक्ष उमेदवार यशवंत बोंडे यांनी आज समाजाला एकत्रित येण्याची गरज आहे. तरच शेतकरी विरोधी धोरण राबणाऱ्या भाजपाला पराभूत करता येईल असे मनोगत व्यक्त करून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेवून संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.

त्यांनी कार्यकर्त्यांसह सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचे पारडे जड झाले आहे.

दहा वर्षात शेतकऱ्यांना फसविले, भाजपाचा पराभव फिक्स, एका सर्वेतून माहिती उघड

भाजपने शेतकऱ्यांना फसविल्याचे आरोप

फोडाफोडी व अभद्र व्यवहाराने मतदारांमध्ये नाराजी

महाविकास आघाडीचे संजय देरकर यांचा विजय निच्छित

News Today
दिलीप भोयर
वणी :- होवू घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांचा कलह महाविकास आघाडीकडे दिसून येत आहे. यावेळी आमदार म्हणून संजय देरकर हे बाजी मारणार असल्याचे एका सर्वेतून माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.  विद्यमान आ. बोदकुरवार हे चींताचुर झाल्याचे दिसून येत आहे. एका सामाजिक संस्थेकडून नुकताच एक गोपनीय सर्वे करण्यात आला आहे. त्या सर्वेतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 

मागील दहा वर्षापासून शेतकऱ्यांना महायुती व भाजप सरकार  खोटी आश्र्वासन देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. शेतमालाचा हमी भाव अधिक ५० टक्के नफा देवू त्याच बरोबर शेतकऱ्यांचे उत्पंन दुप्पट करू , स्वामिनाथन आयोग लागू करू अश्या विविध मुद्द्यांवर आश्वासने भाजप कडून देण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी वर्ग भाजपाकडे मोठ्या प्रमाणात वळला होता. परंतु शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन मागील १० वर्षात पूर्ण झाले नाही. उलट शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.

शेतमालाला जीएसटी करात समाविष्ट करून शेती साहित्याचे भाव चार पट वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे तेवढेच आहे. पण त्यांच्या शेतमालाचे भाव सन २०१० चे जे होते तेच आहे. शेतीला लागणारा खर्च देखील शेतमालातून निघत नसल्याने भाजप सरकारला गंडविण्याची जोरदार निती शेतकऱ्यांनी आखली आहे.

भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरण राबविणार खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मतदार यावेळी बदल घडविण्याच्या मानसिकतेत आले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण करून अभद्र युतीचा जन्म झाला. आणि मागील अडीच वर्षांपासून सत्ता भोगत आहे. ते नेते विरोधात असताना किंकाळ्या मारून मारून पोट तीळखीने शेतकऱ्यांच्या कापसाला १० हजार तर सोयाबिनला ८ हजार भावाची मागणी करताना दिसून येत होते तेच आज सत्तेत असून शेतकऱ्यांचे शोषन करीत आहे.

हल्ली कापुस ६ हजारपेक्षा कमी तर सोयाबीन ४ हजारपेक्षा कमी भावाने विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात रक्ताचे आसू येत आहे. तरी या नेत्यांना अश्रू पुसण्याकरिता सवळ मिळत नाही. त्यामुळे यांच्या दुतोंडी पणाचा बुरखा शेतकऱ्या समोर टराटर फाटला आहे. त्यामुळे सरकारचे व भाजपांचे ध्येय धोरण शेतकऱ्यांनी ओळखले आहे. म्हणून यावेळी सर्वेतून बाहेर आलेल्या माहितीने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

भाजपच्या कोणत्याही सभेत शेतकऱ्यांच्या समस्येवर कोणताही नेता उमेदवार बोलताना दिसून येत नाही. व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना दिसून येत नाही. यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना जोरदार झटके बसणार आहे. यात वणी विधानसभेतील भाजपचे उमेदवार  संजीवरेड्डी बोदकुरवार हे तळ्यात मळ्यात आले आहे.

आमदार बोदकुरवार यांच्या नामांकन रॅलीपेक्षा महाविकस आघाडी प्रणित शिवसेना (उबाठा)गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या नामांकन भरतेवेळी निघालेल्या महारॅलीची चर्चा आजही भाजपाच्या गोठ्यात केल्या जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार हे आपला आत्मविश्र्वास हरवून बसल्याची गोपनीय माहिती आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी काही निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांची नामांकन अर्ज वापस घेण्याची अंतिम तारीख आहे. यात कोण कोण उमेदवार आपले नामांकन परत घेशील याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

संजय देरकर यांना स्वराज्य शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा

वणी :- वणी विधानसभा महाविकास आघाडी प्रणित शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांना स्वराज्य शेतकरी संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यावाबत संघटनेचे अध्यक्ष सूर्या अडबाले यांनी पाठिंब्याचे पत्र देखील देण्यात आले आहे.


राज्यातील शेतकरी प्रचंड दुःखी असून त्यांना आर्थिकरित्या लुबडण्यात येत आहे. व्यापारी हीत सरकार जोपासत असून शेतकरी देशोधडीला लावल्या जात असल्याने शेतकरी विरोधी धोरण राबणाऱ्या राजकीय सत्तेचा पालट करण्यासाठी संजय देरकर यांची निवासस्थानी भेट घेवून स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वणी विधानसभेत महाविकास आघडीची शक्तित वाढ झाली आहे.

ओ एकनाथ मामा, सोशल मीडियावर तो व्हिडिओ तुफान वायरल, वाचा बातमी

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांची पोट तिळखीची आर्त हाक, 

समाज माध्यमावर वायरल झालेल्या व्हिडिओमुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारप्रती वाढला रोष, 

News Today 

दिलीप भोयर

वणी :-  सद्या सणासुदीचा दिवस आहे. आपलाही सन उत्सवात जावा म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतमाल सोयाबीन बाजारात विकायला आणत आहे. अशाच सोयाबीनच्या भावा संदर्भात एक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पावती दाखवत म्हणत आहे. ओ एकनाथ मामा, अगा एकनाथ मामा, सोयाबीन बत्तीश्याने गेलं गा, तेलाचा पिपा बाविष्ये झाला गा म्हणून सरकारचा आर्थ हाक मारत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडी मोल भाव मिळत असूनही सरकार मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचे हीत जोपासत असल्याने शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे. सोबतच शेतकरी भाजपा ब त्यांच्या सरकारवर प्रचंड रोष व्यक्त करीत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव येथे एका शेतकऱ्याने आपले सोयाबीन विक्रीस आणले आहे. त्या सोयाबीनला बाजार भावाप्रमाणे हमीभाव  मिळाला नाही. आणि कुठच हमीभाव व्यापारी देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रचंड संतापाची लाट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव अधिक ५०% नफा देवू म्हणून सत्तेत आलेले भाजप व मोदी सरकार यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे.

 जो भाव शेतमालाला मागील १५ ते १६ वर्षा अगोदर मिळत होता तोच भाव आज मिळत आहे. ज्यावेळी सोयाबीनला प्रती क्विंटल तीन ते तीन हजार पाचशे रुपये भाव मिळायचा त्यावेळी सोयाबीन तेलाच्या पीपा हा केवळ ८०० ते ९०० रुपयात मिळत होता आज तोच भाव आणि तेलाच्या पिप्याचा भाव २२०० रुपये झाला आहे. 

व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या साहित्याच्या मालाचे भाव तीन पट संख्येने वाढले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला मात्र कवडी मोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्चावर आधारित कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मुद्दल खर्च देखील निघत नसून उलट नफ्या पेक्षा तोटा जास्त होत आहे.

सोयाबीन पेरणीच्या खर्च देखील निघत नसल्याने एका शेतकऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आर्थ हाक लावली आहे. एकीकडे लाडकी बहिण म्हणून प्रत्येक महिलेला निवडणुकीच्या तोंडावर १५०० रुपये महिना वाटला तर दुसरीकडे ऐन दीपावली सणा सूदीच्या तोंडावर खाद्य पदार्थांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवून दिले आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणावर शेतकरी प्रचंड नाराज आहे. 

समाज माध्यमातून तुफान वायरल झालेल्या या व्हिडिओच्या दुष्परिणाम वणी विधानसभेतील भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेवर देखील होत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारला यावेळी चांगलीच अद्दल घडविणारं असल्याचे चित्र उभ झाल आहे. 

सोशल मीडियावर प्रसारित झालेला व्हिडिओ खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघा

 https://www.facebook.com/share/d9tQ2TjPQk2gZcxi/

शिवसेनेचे संजय देराकरांच्या नामांकन महारॅलीने विरोधाची उडाली झोप

0

 

हजारो कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने शहरातील रस्ते झाले जाम

महाविकास आघाडी करून शिवसेनेचे संजय देरकरांची उमेदवारी दाखल

News Today
वणी :- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीतील आज नामांकन दाखल करण्याची शेवटच्या दिवशी आज महाविकास आघाडी कडून शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांनी नामांकन आपला नामांकन (उमेदवारी) अर्ज दाखल केला आहे. यावेळी आयोजित महारॅलीने विरोधाच्या डोळ्याची झोप उडाली आहे. रॅलीतील हजारो सहभागी कार्यकर्तेच्या जल्लोशाने वणी शहरातील तमाम रस्ते जाम करून सोडल्याने केवळ संजय देरकर यांचीच चर्चा सुरू झाली.

महारॅलीने झालेले रस्ते जाम

होवू घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपली आज अखेरच्या दिवशी उमेदवारी भरली यात आज शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांनी आपले शक्ती प्रदर्शन करून मोठ्या थाटात आपली उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आयोजित नामांकन महारॅलीत उफाळून आलेल्या गर्दीमुळे विरोधकांवर मात्र डोक्याला हात मारून घेण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे आज संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या महारॅलीने भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मात्र झोप उडाली आहे. भाजपच्या गोठ्यात मात्र माहाविकास आघाडीची जोरदार चर्चा सुरू आल्याची माहिती आहे. 

.        मनोगत व्यक्त करताना खासदार संजय देशमुख

महाविकास आघाडी प्रणित शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजय देरकर यांची नामांकन महारॅली ही दुपारी जत्रा मैदानातून निघून दीपक टॉकीज चौक, शहीद भगतसिंग चौक, गांधी मार्केट, खाती चौक, छ. शिवाजी महाराज चौक व शासकीय मैदानावर जावून देरकर यांनी आपला नामांकन दाखल केले व प्रचार सभा घेण्यात आली.

मनोगत व्यक्त करताना माजी आमदार वामनराव कासावार

यासभेत अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावर, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे, प्रा टिकाराम कोंगरे.डाँ महेंद्र लोढा, राकापचे विजय नगराळे, दिलीप भोयर, माकप चे ऍड दिलीप परचाके, ऍड कुमार मोहरामपुरी.. मनोज काळे राजीव येल्टीवार. राजीव कासावार , अरुणाताई खंडाळकर , संध्याताई बोबडे, वंदनाताई आवारी, गीताताई उपरे, योगिताताई मोहाड, डिमनताई टोंगे, यांचेसह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर उपस्थित होते, ह्यावेळी सभे चे संचालन प्रवीण खानझोडे तर आभार सुनील कातकडे यांनी केले.

सभेला संबोधित करताना प्रा. काँगरे सर

आज कोण उमेदवार भरणार नामांकन अर्ज, कॉम्रेडचा पाठिंबा कुणाला, कुणाचे होणार पारडे जड, वाचा बातमी

0

महाविकास आघाडी कडून संजय देरकर आज नामांकन दाखल करणार, हजारो समाज बांधव आज एकत्र येणार

वणी :- विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटांचे अधिकृत संजय निळकंठ देरकर आज तारीख २९ रोजी भव्य महारॅलीने महाविकास आघाडी कडून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटामाटात निवडणूक निर्णय अधिकारी वणी यांचेकडे दाखल करणार आहे. यावेळी त्यांचे सोबत तमाम शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचेसह हजारो समाज बांधव स्वयंपूर्तीने उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

वणी विधानसभेत मागील दहा वर्षापासून शेठजी, भटजी, आणि लाटजी असलेल्या भाजप पक्षाच्या खोट्या भूलथापांना बळी पडून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमुरांनी भाजपवर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. परंतु या भारतीय जनता पार्टीने मात्र महागाई, बेरोजगारी वाढवून सर्व सामान्य शेतकरी शेतमजुरांचे मात्र जगणे अवघड करून ठेवले आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव अधिक ५०% नफा देवू असे आश्वासन भाजपा कडून देखील देण्यात आले होते. पण या भाजपाने सन २०१४ मध्ये जो भाव कापसाला व सोयाबीनला मिळत होता त्यांच्या निम्म्यावर आजमितीस आणून ठेवला आहे. ना कापसाचे भाव वाढले, ना सोयाबीनचे भाव वाढले, किंबहुना होते त्यापेक्षाही अर्धे करून बी बियाणे, रासायनिक खते, आणि फवारणीसाठी वारण्यात येणाऱ्या ओषधांचे भाव दाम दुप्पट करून व्यापाऱ्यांचे अच्छेदिन आणले येवढेच नाही तर जी.एस टी. सारखा मोगली कर आकारून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

त्यामुळे या भाजप सरकारवर शेतकरी प्रचंड कोपला आहे. शेतकऱ्याचे मतांवर निवडून येवून व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेवून शेतकरी आर्थिकरित्या बर्बाद केल्याने संतापलेल्या शेतकर्यांनी आता भाजपच्या विरोधात खुले बंड पुकारले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे काल तारीख २८ रोजी भाजपचे उमेदवार आ. बोदकुरवार यांच्या नामांकन रॅलीला तेलंगणातील कार्यकर्त्यांना गर्दी दाखविण्यासाठी पाचारण करावे लागले होते.

शेतकरी ध्येय व धोरण विरोधी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शिवसेनेची मशाल हाती घेवून शेतकरयांना न्याय मिळवून देण्यासाठी संजय देरकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी,शेतमजूर व विविध समाज बांधव स्वयंपुर्तीने एकत्रित येवून देरकरांच्या खांद्याला खांदा लावून उमेदवारी नामांकन दाखल करण्यासाठी आयोजित रॅलीला उपस्थित असणार असल्याची माहिती आहे.

ही रॅलीला जत्रा मैदानातील हनुमान मंदिरातून दुपारी १२ वाजता निगणार असून या रॅलीला महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस पार्टीकडून माजी आमदार वामनराव कासावार, शिवसेनेकडून माजी आमदार विश्वास नांदेकर , तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे व दिलीप भोयर यांनी केले आहे.

           कॉम्रेडचा संजय देरकरांना पाठिंबा

भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मास्कवादी) यांनी वणी वणी विधानसभेचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तरी महाविकास आघाडीच्या नामांकन दाखल रॅलीत सर्व काम्रेडच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महासचिव ऍड. कुमार मोहरमपुरी, राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. दिलीप परचके, जिल्हा उपाध्यक्ष मनोज काळे यांनी केले आहे. अनेक छोट्या मोठ्या पार्टी आणि सामाजिक संघटनेचा पाठिंबा संजय देरकर यांना मिळत असल्याने देरकरांचे पारडे जड होत आहे. 

अर्रर… आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नामांकन रॅलीसाठी तेलंगाण्यातील कार्यकर्त्यांचा वापर

0

तेलंगाणा राज्यातीलअसंख्य वाहनाने लोकांची आयात

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील महायुती प्रणित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज सलग तिसऱ्यांदा वणी विधानसभा क्षेत्रा करिता आपला उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड मोठ्या रॅलीचे आयोजन करून निवडणूक अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचेकडे नामांकन अर्ज दाखल केला आहे. परंतु या रॅलीत वणी विधानसभेतील मतदार व कार्यकर्त्यांची संख्या नाममात्र दिसून आली पण शेजारील तेलंगाना राज्यातून असंख्य वाहनांनी लोकांची आयात करण्यात आली होती. त्यामुळे रॅलीत तेलगू भाषिक नागरिक निदर्शनास येत असल्याची चर्चा आहे. आ. बोदकुरवार यांच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाची संपूर्ण हवाच गुल झाली आहे. 

 या नामांकन रॅलीत थोडी फार गर्दी असली तरी प्रत्यक्षात वणी विधानसभेतील दर्दी मतदार अत्यल्प असल्याने भाजपाला निवडणूक संपन्न होण्याअगोदरच परावभवाची प्रचिती येत आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती.

रॅलीत सहभागी तेलगू भाषिक लोक इंदिरा गांधी चौकात ?

विधानसभा निवडणुकीचे वारे प्रचंड तापल्या जात आहे. जो तो उमेदवार आपली गर्दी दाखवत आहे. परंतु आयात केलेल्या लोकांची गर्दी ही मतदारांवर कोणताही परिणाम करताना दिसून येत नाही. 

आज आ.बोदकुवार हे नामांकन दाखल करणार यासाठी तीन ते चार दिवसाअगोदर पासून याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी शेकडो वाहनाची देखील बुकिंग केल्याची माहिती आहे. परंतु वणी विधानसभेतील गावागावातून मतदारांना वणीत बोलवण्यात आले होते. पण गावागावातील शेतकऱ्यांमध्ये शेत मालाला भाव महायुती व भाजप सरकारने  न दिल्यामुळे भाजपाप्रती शेतकरी नाराज आहे. तसेच भाजप व भाजपाच्या उमेदवारांकडे शेतकरी ढुंकूनही बघायला तयार नाही. त्यामुळे मतदार व शेतकरी भाजपच्या रॅलीला येणास देखील तयार होत नाहीत याची जाणीव अगोदरच भाजप पदाधिकाऱ्यांना होती त्यामुळे त्यांनी शेजारील राज्यातील हजारो नागरिकांना त्यांचे वाहने घेवून बोलवण्यात आल्याची माहिती आहे. 

         तेलंगाणा राज्यातील पासिंग असलेले वाहन

 भाजपच्या नामांकन रॅलीत सहभागी झालेले तेलंगणातील असंख्य वाहने वणी येथील शासकीय मैदानाच्या बाजूला असलेल्या खुल्या प्रांगणात पार्किंग केल्या गेली होती. त्यामुळे या वाहनांनी रॅलीत गर्दी दिसावी म्हणून उपस्थिती दर्शविली असावी. तसेच तीन ते चार दिवसांपूर्वी तेलंगाणातील माजी आमदार बंटी सुभाष रेड्डी इथे आ. बोदकुरवार यांचे   सोबत मागील चार दिवसापासून नियोजन करीत होते. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी वणीतील नामांकन रॅलीत गर्दी करून भाजपची शोभा वाढविल्याने बोलल्या जात आहे. आयात केलेल्या गर्दीने भाजप निवडणूक जिंकण्याचे स्वप्न भंगतील अशी चर्चा होत आहे. 

खा. संजय देशमुख आले आणि कुणाच्या आमदारकीचा रस्ता मोकळा करून गेले उघडा लिंक वाचा बातमी

https://wanitoday.com/2024/10/27/खा-संजय-देशमुख-आले-आणि-संज/

 

खा. संजय देशमुख आले आणि संजय देरकरांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा करून गेले

0

महाविकास आघाडीची धुरा माजी आमदार वामनराव कासावरांच्या खांद्यावर

घटक पक्षांतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत खा.देशमुखांची यशस्वी चर्चा

News Today 

दिलीप भोयर

वणी :- वणी विधानसभा क्षेत्राची जागा शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला आली असून विधानसभेसाठी संजय देरकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून देरकर हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. येत्या २९ तारखेला नामांकन अर्ज भरल्या जाणार आहे.  यावेळी महाविकास  आघाडीत कोणताही घटक नाराज राहू नये यासाठी यवतमाळ – वाशिम  लोकसभा क्षेत्राचे  खासदार संजय देशमुख हे आज तारीख २७ रोजी सायंकाळी ५ वाजता वणीत दाखल झाले व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेवून सर्वांचा समन्वय साधून संजय देरकर यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा करून परत गेले आहे.

२० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर  महाविकास आघाडी कडून शिवसेना (उबाठा ) गटाला मिळालेल्या जागेवर संजय देरकर यांच्या हाती मशाल आली आहे. तेव्हापासून सर्व सामान्य शिवसैनिकांच्या अंगात विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी उत्साह संचारला आहे. परंतु काही शिवसेनेतील व काँग्रेस मधील पदाधिकारी हे नाराजी नाट्य धरून बसले होते. त्यामुळे यांची भेट घेवून त्यांना एकसंघाने निवडणुकीच्या प्रवाहात आणून महाविकास आघाडीला विजय मिळावा यासाठी एकत्रित करणे गरजेचे होते. त्यासाठी  खासदार संजय देशमुख हे आज वणीत दाखल झाले त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली व यावेळी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली.

यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेस पक्ष व पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे महाविकास आघाडी सोबत असून संजय देरकरांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची ग्वाही दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत चर्चा करताना खा. संजय देशमुख

यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या देखील पदाधिकाऱ्यांना बोलवून भेट खा. देशमुख यांनी भेट घेतली यावेळी व कामाला लागा म्हणून सूचना दिल्या यावेळी राकापचे विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे, दिलीप भोयर, वणी तालुकाध्यक्षा प्रवीण खारकर, शहराध्यक्ष  विनोद ठेंगणे, मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, शहराध्यक्ष मुन्नाभाई शेख,  झरि तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, शहराध्यक्ष राकेश सोयाम, रामदास पखाले , मनोज दुर्गे, आदी मान्यवर उपस्थित होते.

वसंत जिनिगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांचे सोबत चर्चा करताना खा. संजय देशमुख सोबत शिवसेना नेते राजेंद्र गायकवाड संजय निखाडे, राजू येल्टीवार व मविआचे उमेदवार संजय देरकर

त्यानंतर वसंत जीनिंगचे अध्यक्ष आशिष खुळसंगे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली असता खुलसंगे यांनी देखील महाविकास सोबत राहण्याची शास्वती दिली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांची भेट घेतली व त्यांनी ही महाविकास सोबत असल्याची खात्री खा. देशमुखांना दिली आहे. त्याच बरोबर संजय खाडे यांची ही त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे कोहाचेही मनभेद व मतभेद उरले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याची चर्चा संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात सुरू झाली आहे. 

माजी आमदार कासावार यांचे कडून खा. देशमुखांचे स्वागत

खा. संजय देशमुख हे पहिल्यांदाच वणी मध्ये आले असता त्यांनी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी माजी आमदार वामनराव कासावार यांची निवासस्थानी भेट घेतली असता कासावार यांनी खासदार देशमुखांचे गुलाब पुष्पांचा बुके देवून स्वागत केले. याठिकाणी संपन्न झालेल्या बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी निवडणुकीची धुराच वामनराव कासावार यांचे खांद्यावर दिली आहे . यावेळी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दहा दिवसांपासून रेल्वे सायडिंगवर पाणी मारणे बंद , युवा सेनेने सायडिंग अधिकाऱ्याला धरले धारेवर 

0

    प्रदूषणाच्या वाढीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

News Today 

दिलीप भोयर

वणी: येथील कोळशाच्या रेल्वे साईडिंगवर मागील १० दिवसांपासून पाणी मारणे बंद असल्याने प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. याबाबत परिसरातील काही नागरिकांनी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांची भेट घेऊन समस्या सांगितली असता अजिंक्य शेंडे यांनी सायडिंग मॅनेजर यांची भेट घेऊन सोमवार २८ ऑक्टोबर पर्यत जर पाणी मारणे सुरु न केल्यास कोळष्याची एकही गाडी सायडिंगवर येऊ देणार नसल्याची तंबी देवून मॅनेजरला चांगलेच धारेवर धरले होते. 

  वणी तालुका हा खनिज संपत्तीने भरलेला आहे. या परिसरातून मोठया प्रमाणात कोळसा हा वीज निर्मितीसाठी पॉवर प्लॉटला पाठविला जातो. वाहतुकीसाठी मालगाडीचा उपयोग केला जातो. सदर कोळसा हा वणीतील रेल्वे सायडिंगवर ट्रकने पोहचविल्या जातो. व त्यानंतर मालगाडीत भरून विविध पॉवर प्लांटमध्ये पाठविण्यात येतो. यावेळी धूळ उडू नये म्हणून पाणी मारण्याचे टेंडर सरकारकडून काढल्या जाते. असेच टेंडर वणी सायडिंगबाबतही काढल्या गेले. या ठिकाणी १२ हजार लिटर पाणी टँकर क्षमता असलेल्या टँकरचा उपयोग केल्या जावा असा नियम आहे. परंतु या ठिकाणी ट्रॅक्टर ने पाणी मारल्या जात आहे. आणि हा प्रकार गेल्या १० दिवसांपासून सुरू आहे. जेव्हा टेंडर घेणाऱ्याकडे १२ हजार लिटर क्षमता असलेले वाहन नाही तेव्हा त्याला टेंडर दिला तरी कसा?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील १०दिवसांपासून ट्रॅक्टर ने पाणी मारणे सुरू असतांना सायडिंग इंचार्ज मूंग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित होतो.  

  या सर्व प्रकारबाबत परिसरातील महिलांनी २६ ऑक्टोबर रोजी युवासेना जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांना भेटल्या व अजिंक्य यांनी तात्काळ सायडिंग इंचार्ज श्रवण कुमार यांची भेट घेतली व चांगलीच कानउघडणी केली. तुम्हाला सर्व प्रकार माहीत असतांना या टेंडर घेणाऱ्यावर काय कारवाई केली. लोकांना अनेक आजाराला या धुळीमुळे समोर जावे लागत आहे. श्वसनाचे अनेक आजाराने परिसरातील जनता त्रस्त आहे. व आपण यावर कोणतीही कारवाई करीत नाही. जर सोमवार २८ ऑक्टोबर पर्यत असेच सुरू राहल्यास युवासेनेचे कार्यकते, परिसरातील जनतेला घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. व एकही गाडी सायडिंगवर खाली होऊ देणार नसल्याचे सांगितले. होणाऱ्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सायडिंग इंचार्ज व संबंधित अधिक्कार्यांची राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी युवा सेनेचे बादल येसेकर, आर्या राउत, रुद्राक्ष सिडाम, हेमंत चवले, रोहन गंदेवार, महेश बलकी, निलेश कडूकर, आदित्य पेटकर, ईशान झाडे, गोलू बलकी, धनु मडावी, तेजस नागपुरे, किशोर ठाकरे, रोशन काकडे उपस्थित होते.

संबंनधित ठेकेदाराला आम्ही पत्र दिले आहे. व अशीच तक्रार वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला करण्यात आली आहे. सदर ठेकेदारावर कारवाई करण्याचा अधिकार हा माझा नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. सायडिंग इंचार्ज श्रवण कुमार यांनी सांगितले.

लाडक्या नातीच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

0

राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे विदर्भाध्यक्षा संबा वाघमारे यांच्या स्तूत उपक्रम

News Today 

दिलीप भोयर
वणी :- येथील वसंत गंगा विहार कॉलनीतील रहिवासी संबाजी वाघमारे यांनी आपल्या लाडकी नात कु. अन्वी अतुल वाघमारे हिच्या वाढदिवसानिमित्त लोकसंत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवणपाल महाराज वडाळीकर यांचे जाहीर राष्ट्रीय कीर्तन व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन तारीख ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कॉलनीतील खुल्या मैदानावर आयोजित केला आहे.

पवनपाल महारांचे कीर्तन हे सप्तखांजेरी वादनावर असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता विचारावर व त्यांच्या उपदेशावर असतात त्याच बरोबर मनोरंजन, धार्मिकता व राष्ट्रीय एकात्मतेवर असतात. त्यांचे कीर्तन राज्यासह इतरही राज्यात प्रचंड गाजलेले आहे. ते एक. नामवांत कीर्तनकारा आहे . त्यांच्या संचासह ते कीर्तनाचे सादरीकरण करतात संगीतमय आणि चालू घडामोडींवर त्यांचे कीर्तन सपंन होत असल्याने अनेकांना त्यांचे कीर्तन ऐकायची  आस लागलेली असते असे प्रसिद्ध किर्तनकार वणीत येत आहे. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने वसंत गंगा विहारवासी व राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना एक वैचारिक मेजवानी मिळणार आहे. तरी या कार्यक्रमाला वणी तालुक्यातील, शहरातील, कॉलनीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघ व वसंत गंगा विहार कॉलोनी परिवाराच्या वतीने संबाजी वाघमारे यांनी केले आहे. या अनोख्या स्तुत्य उपक्रमाची संपूर्ण शहरात कौतुक केल्या जात आहे. तर कू. अंवी हिला  सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा मिळत आहे.