Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 33

राजकीय सत्ता असताना पदाधिकाऱ्यांकडून धार्मिक संघटनेचा वापर का ? शहरात चर्चेला ऊत, शहरातील शांतता भंग करण्याचा कट कुणाचा

0

पोलिस उपअधिक्षक व ठानेदारांच्या बदलीसाठी शहरात ” कुट” नीतीचा वापर करतो तरी कोण ?

News Today (दिलीप भोयर)

वणी :- केंद्रात व राज्यात राजकीय सत्ता असताना देखील काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून धार्मिक संघटनेला सामोरं करून आपला उल्लू शिकविण्याचा कट रचून प्रशासनाला वेठीस पकडून शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित करण्याचा घाट रचीयता कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला असून कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या बदलीसाठी तर हा खटाटोप केल्या जात नाही ना?  अश्या चर्चेला आता शहरात उत आला आहे.

वणी शहरात मागील अनेक वर्षापासून प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मोठ्या थाटा माठात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या धार्मिक संस्थेकडून आज पर्यंत कोणताही वादात आपला सहभाग नोंदविला नाही. परंतु मागील काही दिवसांपासून ही धार्मिक संस्था शहरातील विविध प्रश्नांवर प्रशासनाला निवेदन देवून वेठीस धरण्याचे कार्य करीत असल्याचे निदर्शनात येत आहे.

यामुळे शहरातील शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे ऑटो चालक,  प्रवाशी वाहतूक करणारे ऑटो चालक, तसेच विद्यार्थ्यांच्या वाहनांवर नाहक कारवाईचा बळगा उठविल्या जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

एकीकडे प्रशासनातील अधिकारी वर्ग जर राजकीय पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसेल किंवा त्यांच्या उचीत मागण्याची दखल घेत नसतील तर सत्ता असताना आंदोलनाची व अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याची गरज का? सरळ सरळ संबंधित विभागाच्या मंत्रालयातील मंत्र्यांकडे जावून संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी बसवून त्यांचेवर कारवाई करणे अत्यंत सोपी व साधी पद्धत असताना देखील रस्त्यावर उतरून आपल्या सत्तेचे धिंडवळे काढण्याची वेळ या सत्तेतील पदाधिकाऱ्यांवर का आली असेल या बाबीचे चिंतन करण्याची वेळ निर्माण झाली आहे.

धार्मिक संघटनेतील कार्यकर्ते अत्यंत साधे आणि भोळे असतात त्यांना राजकीय कावे प्रथमतः समजून येत नाही. त्यांच्या धार्मिक भावनेचा वापर सत्ता पक्षातील पदाधिकारी आपली पोळी शेकून घेण्यासाठी  करून तर घेत नाही ना अशी शंका आता या कार्यकर्त्यांना भेडसावून राहिली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनसुबे उघड पडत आहे. या कपटी व धूर्त पदाधिकाऱ्याकडून शहरात अनुचित प्रकार घडवण्याचा घाट रचल्या तर जात नाही ना? 

मागील दहा वर्ष वणी विधानसभा क्षेत्र भाजपाचा ताब्यात असताना या धार्मिक संघटनेने कधीच तोंड वर केले नव्हते. आणि कोणतीही समस्या त्यांना दिसून येत नव्हती. आज निवडणुकीत पराभव मिळताच हे पदाधिकारी धार्मिक संघटनेला समोर करून शहरातील शांतता व सुव्यवस्था भंगवू पहात तर नाही ना? असा प्रश्न वणीकरांच्या समोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या धार्मिक संघटनेचा बोलविता धनी आहे तरी कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एका माजी लोकप्रतिनिधींचे चोचले पुरविणे अधिकाऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे हा माजी लोकप्रतिनिधी पदावर असताना चिरीमिरीत आपले कर्तव्यदक्षता बासणात गुंडाळून ठेवत होता आणि आता मात्र राम नाम जपना ओर पराया माल अपना करण्यासाठी धार्मिक संघटनेच्या आडून शहरात अशांतता पसरवून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागे असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 

कृष्णानपुर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

0

News Today
वणी :- तालुक्यातील कृष्णानपुर येथील जिजाऊ महिला बचत गट तर्फे दि. १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच अंकुश ठावरी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठित नागरिक बंडू लांडे निखाडे गुरुजी, अमोल ढेंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ अर्चना कातकडे जिजाऊ महिला बचत गट अध्यक्ष सौ गोदावरी अमोल ढेगळे, आशा सेविका तसेच जिजाऊ महिला बचत गट सचिव कीर्ती निलेश लांडे, मंगला नेताजी जुनगरी. अश्विनी राजू लांडे आदींनी परिश्रम घेतले.

मोठी :- खळबळ वणीत शेकडो गोहत्या झाल्याचे उघड, अनेक वर्षापासून गोमास तस्करीच्या धंद्याला अभय कुणाचे?

0

गोहत्यांतील सर्व आरोपींचे मूळ तपासून कारवाई करा – आ. संजय देरकर

दिलीप भोयर

वणी : – शहरातील दिपक टॉकीज परिसरातील काटेरी झुडपाच्या घनदाट परिसरात कुंटनखाण्याजवळ टिन पत्र्याचे शेड उभारून त्यात मागील अनेक वर्षापासून गोहत्या करून त्यांचे मास तस्करी केल्या जात असल्याच्या प्रकार आज तारीख ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. गोहत्या केलेल्या गायींचे मुंडके व मास आढळल्याने संपूर्ण वणी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उघडकीस आणला आहे.

जत्रा मैदानातील तलाव समोरील नव्याने उभारण्यात आलेल्या मटण मार्केट मागील बाजूस प्रचंड मोठ्या जागेवर ऑस्ट्रेलियन काटेरी बाभुळींचे झाडे आहेत. त्या झाडांच्या आडोश्याचा फायदा घेत गोमांस तस्करांनी टिन पार्टीचे मोठे शेड उभारून त्यात गोहत्या करून त्यांचे मास बाजारात विक्री करीत होते. त्या शेड परिसरात शेकडे गायींचे कुजलेले मुंडके, हाडे, व जनावरांच्या पोटातील फेकावू वस्तू तसेच चांबडे आढळून आले आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी , नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली व यात जनावरांचे अविध्य बुचडखाणा चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्या परिसरितल सर्व अवैध्य बुचडखणा बल्डोजरणे तोडून काढला हा बुचडखाना मागील अनेक वर्षापासून चालू असल्याची चर्चा आहे. हा बुचाडखाणा सत्तेतील राजकीय आश्रयाखाली चालू असून यात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता वाढली आहे.

गोहत्या बंदी कायदा असताना गोहत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब – आ. संजय देरकर

महारष्ट्र राज्यात गोहत्या बंदी कायदा असताना देखील गोहत्या करून गोमांस तस्करी केल्या जात असल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेतील कोणत्याही आरोपीला पोलिसांनी आश्रय देवू नये किंव्हा कारवाईसाठी हायगत करू नये. या घटनेतील मूळ आरोपींचा शोध घेवून सक्त कारवाई करण्यात यावी असे आमदार संजय देरकर यांनी घटास्थळी भेट देवून पोलिसांना ठणकावून सांगितले. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, राजू तुरणकर, संजय देठे, भगवान मोहिते आदी शिवसैनिक उपस्थित होते.

गो- मास तस्कारीतून ही चिरीमिरी खाणारा तो लोक प्रतिनिधी कोण? अखिल सातोकर यांच्या आरोपाने खळबळ

मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सत्तेतील एका माजी लोकप्रतिनिधींच्या (मामा) आशीर्वादाने हा प्रकार सुरू होता ही तस्करी करण्यासाठी तस्कराकडून लाखो रुपयांचा मासिक हप्ता त्यांना मिळत होता व या तस्करांसोबत या मामा नामक माजी लोकप्रतिनिधींनी शहरातील एका तारांकित हॉटेल मध्ये डील केल्याच्या मोठा गंभीर आरोप नगर परिषदेचे माजी नगर सेवक अखिल सातोकर यांनी वणी न्युज टुडे जवळ बोलताना केल्याने या मामाचा  बुरखा मात्र टरटर फाटल्याने प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात जल जीवन मिशन योजनेचा उडाला फज्जा – आ. संजय देरकर यांच्या आरोपामुळे खळबळ

0

विकासाच्या नावाखाली जिवनाश्यक बेबीच्या योजनेत हजारो कोटी रुपयाचा खेळखंडोबा  

News Today (दिलीप भोयर)

वणी :- सरकारने जल जीवन योजनेखाली गावातील हर घर नळ म्हणून सुरू केलेल्या या योजनेत विकासाच्या नावाखाली हजारो कोटी रुपयाचा खेळखंडोबा केला असून वणी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात या कामात प्रचंड मोठी अनियमितता दिसून येत आहे. या योजनेतील संबंधित विभाग मात्र मूग गिळून गप्प बसला आहे. असा आरोप आमदार संजय देरकर यांनी केल्यामुळे प्रशासनात प्रचांडमोठी खळबळ उडाली असून याची उचित चौकशी करून संबंधितांवर सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. ज्याचे उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई दररोज ५५ लिटर नळाचे पाणी नियमितपणे पुरवण्याचे आहे. ही योजना २०२४ पर्यंत दीर्घकालीन आधारावर सुरू केली होती.

ही राष्ट्रीय ग्रामीण पेयजलाची पुनर्रचना आहे ऑगस्ट २०१९ मध्ये मोदी सरकारचा कार्यक्रम (NRDWP) जाहीर करण्यात आला होता. यात नळाचे पाणी आरोग्यासाठी उत्तम असतात तर स्वयंपाक करण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी पर्याप्त जल असल्याची माहिती आहे. या योजनेने ग्रामीण भागातील प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोचविण्याचा उद्देश होता.

यवतमाळ जिल्ह्यासह वणी विधानसभेतील शेकडो गावात या योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. गावात पाणी पुरवठा होईल आणि गावातील प्रत्येक महिलांच्या डोक्यावरची घागर खाली उतरेल अशी आशा महिलामध्ये निर्माण झाली होती. परंतु या आशेवर  पुर्णतः विरजण पडले आहे.

शेकडो गावात जल जीवन मिशन योजनेची कामे सुरू आहे. ही कामे करताना ज्या गावात सिमेंट रस्ते मध्यातून करण्यात आले ती सिमेंट रस्ते फोडून पाईप लाईन टाकण्यात आल्याने रस्ते उद्ध्वस्त झाले आहे. त्याच बरोबर कुठे टाकलेली पाईप लाईन बुजवली तर कुठे न बुजविताच उघड्यावर ठेवल्याने पाईप लाईन फुटली आहे.

ज्या ठिकाणी ५०० फूट पाईप लाईन टाकली असेल तर त्या ठिकानची जास्त लांबीच्या पाईप लाईनचे  देयकांची उचल केली आहे. तर कुठ पाण्याच्या टाकीचे काम अर्थवत सोडून कंत्राटदार बेपत्ता झाले आहे. तर कुठ नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम करून ठेवले आहे. या कामावर संबंधित विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने हजारो कोटी रुपयाच्या कामात अनियमितपणा व भ्रष्टाचार उघडपणे दिसून येत आहे. 

ही योजना कार्यान्वित होण्यासाठी ग्राम पंचायत व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात परवानगी दिली होती परंतु या योजनेतील भ्रष्ट कारभारामुळे गावात नव्याने बांधण्यात झालेले रस्ते फोडून टाकण्यात आले आहे. त्यामुळे गावातील रस्ते उद्ध्वस्त होऊन रहदारीस अडचण होत असून ग्रामस्थांना मनस्ताप होत असल्यामुळे सरकारप्रति रोष वाढला आहे. 

 ग्रामीण  विकासाच्या नावाखाली केंद्र व राज्य सरकारने अधिकारी व कंत्राटदारांच्या माध्यमातून जनतेच्या हजारो कोटीवर हात साफ केला आहे. या प्रकरणात संबंधितांची योग्य चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रधानमंत्री कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाकडे चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय देरकर यांनी दिली आहे.

धनोजे कुणबी सभागृहात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

0

News Today

वणी :- शहरातील छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम तथा मराठा सेवा संघ या दोन्ही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चळवळीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 जानेवारी २०२५ रोज शनिवारला वणीतील धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक सभागृह येथे सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर येथील लाइफलाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून या सामाजिक उपक्रमाला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता राष्ट्रमाता जिजाउंच्या प्रतिमेस माल्यार्पण करून रक्तदान शिबिरास प्रारंभ होईल. मराठा आरोग्य कक्षाचे प्रमुख अरुण डवरे यांच्या नेतृत्वात आयोजित या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादासजी वागदरकर, सचिव नितीन मोवाडे, विधी सल्लागार एड.अमोल टोंगे, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचे उपाध्यक्ष अशोक पिंपळशेंडे, सचिव मंगेश खामनकर, यांनी केले आहे.

या शिबिराला यशस्वी करण्यासाठी  संचालक भास्कर दुमोरे,मारोती मोडक, विवेक गाडगे,मारोती जिवतोडे, विनोद बोबडे, दत्ता पुलेनवार,संजय जेऊरकर,प्रदीप बोरकुटे,दिलीप वागदरकर,अजय धोबे यांनी केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम तथा मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

उद्या वणीत आमदार चषकाचा उद्घाटन सोहळा वणी प्रीमियर लीग सिजन – २ ची धडाकेबाज सुरवात

0

News Today (दिलीप भोयर)

वणी :- प्रीमियर लीग (WPL) सीजन – २ चे उद्या तारीख १० जानेवारी रोजी शासकीय मैदान पाण्याच्या टाकी जवळ सकाळी ११ वाजता धूम धडाक्यात उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे.

या सोहळ्याला यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

वणी प्रीमियर लीग (WPL) हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण भागातील युवा खेळाडूंच्या खेळाच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे. या लीगच्या माध्यमातून, खेळाडूंच्या कामगिरीला राज्य पातळीवर पोहोचवण्यासाठी संधी मिळणार आहे. विविध ग्रामीण क्षेत्रातील खेळाडूंना हे एक महत्वाचे व्यासपीठ प्रदान केला जात आहे, ज्यामुळे त्यांना आपल्या कलेचा एक नवा पल्ला ओलांडण्याचा आणि पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.

सदर लीगमध्ये विविध टीम्स सहभागी होणार आहेत. या लीगमध्ये भाग घेणाऱ्या टीम्सचे नामांकन खालीलप्रमाणे आहे. कॉटन किंग, रंगनाथ वॉरिअर , जन्नत इलेव्हन , जेएमसीसी , हॉटेल आर जे शाईन , छत्रपती वॉरियर , शिवनेरी टायगर , अर्सलांन इलेव्हन ब्लास्टर , शिवनेरी टायगर, आर एन सी सी असणार आहे. वणी प्रीमियर लीगचे आयोजन शैलेश ढोके,नदीम शेख, मंगेश करंडे, धवल पटेल, विनोद निमकर, सचिन पांडे, संतोष चिलकावार यांनी केले आहे.

या स्पर्धेचे आयोजन ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील सामर्थ्य व कौशल्य इतर राज्यांपर्यंत पोहचवण्यासाठी करण्यात आले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचे आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळविण्याचे उद्दीष्ट आहे.

वणी प्रीमियर लीग एक महत्त्वपूर्ण मंच ठरले आहे, ज्यामुळे ग्रामीण खेळाडूंना जागतिक स्तरावर आपली क्रीडा क्षमता सिद्ध करण्याचा संधी मिळेल. खेळाचे आयोजन राज्याच्या क्रीडा प्राधिकरणाने आणि स्थानिक क्रीडा संघटनाने केले आहे.

सीताफळ शेतीने दाखवली शेतकऱ्यांना प्रगतीची कास,  नगद पीक आणि आर्थिक भरभराटी, देश विदेशात मोठी मागणी

0

News Today ( दिलीप भोयर)

सोलापूर :- पारंपरिक शेतीने शेतकऱ्यांना डबघाईस आणले आहे. त्यामुळे पच्छिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पूर्ण विराम देवून फळबाग शेतीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिक भरभराटी आली आहे. अश्याच एका सीताफळ शेतीचा घेतलेला आढावा. 

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव पुर्णतः सिंचनाने व शेती विकासाने फुललेले गाव आहे. या गावातील शेतकऱ्याच्या शेतात कोणती ना कोणती फळबाग आहे. या दाळींब, पेरू, शेवगा, दाक्ष, कलिंगड,सीताफळ आणि ऊस हे प्रमुख पीक आहे. यावर त्यांचे वार्षिक नियोजन आहे. अश्याच एका युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात ९ एकर जागेत सीताफळ शेती लागवड केली आहे. येवढी मोठी फळ करणाऱ्या या युवा शेतकऱ्याचे नाव सागर वागमोडे आहे.

शेती म्हणजे अपार कष्ट आणि परिश्रमाचा व्यवसाय आहे. त्यातही निसर्गाच्या भरोष्यावर अवलंबून राहावे लागते. कधी निसर्ग शेतकऱ्यांची कंबर मोडतो तर कशी सरकार बाजार भाव पाडून त्यांच्या श्रमाला मातीमोल करतो. अस्मानी आणि सुलतानी हे दोन्ही संकट शेतकर्यांचा डोक्यावर दररोज घिर्ड्या घालत असते.  या संकटातून कसा बसा शेतकरी वाचला तर त्यावर सरकारी संकट शेतकऱ्यांना सोडत नाही. त्याने जगावे तर कसे जगावे असा प्रश्न त्याच्या समोर सदैव असतो.

प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते की माझ्या शेतातील शेतमालाला योग्य दर मिळाला पाहिजे. सर्व खर्च वजा करून दोन पैसे नफा म्हणून शिल्लक असायला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील माल बाजारात जाण्यासाठी सज्ज असला की सरकार मात्र शेतमालाची निर्यात थांबवून तो माल आयात करून शेतकऱ्यांना तोंडघशी पाडतो. त्यामुळे पारंपरिक शेती व शेतकरी हा उद्ध्वस्त होत आहे. 

अश्या पारंपरिक शेतीवर मात करण्यासाठी शेतकरयांना पर्याय म्हणून फळबाग शेती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. म्हणून पच्छिम महाराष्ट्रातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळले आणि शेतीची काया पलटून दाखवली जिद्द आणि परिश्रम असेल की मातीतून मोती पिकविता येत आणि मोत्यातून उन्नती करत येत म्हणून या भागातील शेतकऱ्यांमध्ये कर्जबाजारी पणाने आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. शेतीला सिंचनाची साथ मिळाली की त्यातून वर्षभर उत्पन्न मिळविण्याची धम्मक असली की त्याची प्रगती निच्छित होते हे या भगातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे.

अश्याच होतकरू एका मारकडवाडी येथील होतकरू युवा शेतकरी सागर शंकरराव वाघमोडे पाटील यांनी  ७ एकर शेतीत सीताफळाची बाग लागवड केली आणि बघता बघता या सीताफळ बागेतून दरवर्षी लाखोचे उत्पन्न मिळवले. या सिताफळांना राज्यातच नाही तर केरळ, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा या भागात मोठी मागणी असून विदेशात देखील प्रचंड मागणी आहे. बांगलादेश व नेपाळमध्ये देखील या फळांची निर्यात केली जाते.

त्यामुळे पारंपरिक शेतीला पूर्ण विराम देवून जे पिकते ते पिकवित बसण्यापेक्षा जे बाजारात खपते ते पिकविण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी फळ बागेकडे वळला आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न घेवून आपले अर्थिकता बळकट करीत आहे. हीच गरच विदर्भातील शेतकऱ्यांची आहे. 

फळबाग शेती शरदचंद्र पवार साहेबांची देणं

पारंपरिक शेतीने शेतकरी पुर्णतः उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे. त्यासाठी शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे यासाठी या भागातील तत्कालीन खासदार तथा देशाचे कृषीमंत्री शरदचंद्र पवार साहेबांनी शेतकरयांना फळबाग शेतीकडे कल वळविला शेतकऱ्यांनी देखील त्याचेवर विश्वास टाकून साथ दिली आणि आज या शेतकऱ्यांचे भाग्य उजळले म्हणून त्यांना एक दूरदृष्टीकोणी नेता अशी ओळख आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शरदचंद्र पवार यांना आपले भाग्य विधाता म्हणून मानतात. 

 

कुंड्रा येथे कबड्डीचे भव्य खुल्या सामान्यांचे आयोजन , आ. संजय देरकर यांच्या हस्ते उद्घाटन

0

News Today 

कायर : तालुक्यातील कुंड्रा या गावांमध्ये भव्य कबड्डीचे खुले सामने आयोजन दिनांक २ ते 4 जानेवारी पर्यंत हनुमान मंदिराच्या भव्य  पटांगणावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते तारीख २ वरोजी रात्री ८ वाजता  करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून वणीतील युवा उद्योजक ऍड. कुणाल चोरडिया, प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष कुचनकर,  वणी येथील सामाजिक कार्यकर्ते रुद्रापाटील कुचनकार प.स. चे माजी सभापती सुधाकर गोरे,  सरपंच विजय ठावरी, ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण गेडाम, पोलीस पाटील चंद्रशेखर  कोंगरे नंदकिशोर अंभोरे , संदीप ढेगळे,  तंटामुक्ती  अध्यक्ष मारुती पाटील थेरे, शुभम गोरे,  सामाजिक कार्यकर्ते   तथा मुख्य आयोजक मंगेश गोरे, उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय कुमरे यांनी केले तर आभार सुभाष आत्राम यांनी केले. यावेळी गावातील शेकडो नागरिक व उपस्थित होते.

आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह, अडेगाव येथे शंकर पटाचे उद्धाटन

0

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन

News Today 

वणी :- येथून जवळच असलेल्या झरिजामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीचा शंकर पटाचे आयोजन करण्यात आले असून या पटाचे उद्धाटन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी शंकर पटाची जोडी हाकाण्याचा मोह मात्र आमदार संजय देरकर यांना आवरता आला नाही. हा उद्धाटन सोहळा आज ता. ३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विक्रम भोयर यांचे शेतात संपन्न झाला. 

शेतकऱ्यांमध्ये बैल जोडीचा पट हाकणे हा खेळ अत्यंत लोकप्रिय असल्याने दरवर्षी अडेगाव येथे हा पट आयोजित करण्यात येत असतात आज पासून सुरू झालेल्या या आयोजित पटाचे उद्धाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून सरपंच भास्कर सुर, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा ससंपर्क प्रमुख संतोष महुरे, दिलीप भोयर, पोलिस पाटील अशोक उरकुडे, माजी सरपंच अरुनजी हिवरकर, तंटामुक्ती अध्यक्ष शरद काळे, विक्रम भोयर, नितेश ठाकरे, सीताराम पिंगे, प्रदीप विंचू, दिवाकर आसुटकार, नामदेव मासिरकर, तुकाराम ठाकरे, डॉ. मसिरकर, किशोर चटप, माजी सरपंच्या सीमा लालसरे, प्रतिभा खोबरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. संजय देरकर यांची चारगाव येथील नित्कृष काँक्रिट रस्ता बांधकामावर “नायक” स्टाईल कारवाई

0

 

News Today (दिलीप भोयर)

वणी :- येथील जिल्हापरिषद बांधकाम अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या १० लाखाच्या सिमेंट रस्ता बांधकामात मोठा गैरप्रकार होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी देताच आमदार संजय देरकर हे घटनास्थळी पोहचून नायक स्टाईल कामाची पाहणी करून सदर कामाची रीतसर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधित अभियंत्याला देण्यात आले आहे. आमदाराच्या बेधडक कारवाईने ने गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ही कारवाई चारगाव येथे ता. १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता केली आहे. 

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चारगाव (चौकी) येथे तत्कालीन माजी आमदार बोदकुरवार यांनी विशेष प्रयत्न करून साधुजी भांदकर ते सुरेश नावडे ते बंडू डंभारे यांच्या. घरा पर्यंत सुमारे १२० मीटर लांब व ३ मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रिट रस्ता नुकताच बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्याचा निधी कोणत्या खात्यातून आला याची कोणतीही माहिती नाही. केवळ विशेष प्रयत्नातून मिळाल्याचे या कामाच्या लावण्यात आलेल्या बोर्डावर नमूद आहे.

संबंधित काम कोणत्या खात्यातून मिळालेल्या निधीची आहे. व सदरचे काम किती दिवसात पूर्ण करायचे आहे. आणि त्या कामाची देखभाल किती महिने करायची आहे. याची कोणतीही माहिती नसून तो बोर्ड केवळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी करीत असल्याचे निदर्शनात येत आहे.

संबंधित काम १० लक्ष रुपयाचे असून या कामात रस्ताला बेड काँक्रिट करणे व त्यावर ४ इंच जाळीचे मजबूत सिमेंट काँक्रिट करणे आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने बेड काँक्रिट न करताच सरळ सरळ २ इंच सिमेंट काँक्रिट करून रस्ताचे काम पूर्णत्वास आणले आहे. याबाबतची तक्रार गावातील काही नागरिकांनी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्याकडे करताच या तक्रारीची दखल घेण्यात आली व आमदार यांनी संबधित विभागाच्या अभियंत्यांना चारगाव येथे उपस्थित राहून कामाच्या पाहणी करिता बोलवले व काम बघून त्यांना चांगलेच धारेवर धरले आणि या कामाची रीतसर चौकशी करून सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समिती विभागा मार्फत चालू असलेले सर्व कामे असेच नित्कृष्ट दर्जाची असल्याची ओरड गावकरी करीत होते. व घरकुलाचे चेक काढून देण्यासाठी ग्राम पंचायतीचे एक नावडे नामक सदस्य ५ ते २ हजार रुपये घेवून चेक आणून देत असल्याचे आरोप केले आहे. सर्व गावकरी भ्रष्टाचाराच्या विरोधात रोष व्यक्त करून भाजप व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात चीड निर्माण करीत होते. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपला जोरदार दणका बसण्याची शक्यता आहे. 

भाजपने केले विकासाचे फक्त देखावे गावकऱ्यांचा आरोप

भाजपचे माजी आमदार बोदकुरवार यांनी विकास कामाच्या नावाखाली शासनाचा करोडो रुपयाचा निधी खेचून आणला ऊत मात्र नीलाभर देखील शंका नाही. परंतु या निधीतून केलेला विकास मात्र पुर्णतः भकास होता याची प्रचिती चारगाव येथील केलेल्या सिमेंट रस्ता बांधकामावरून सर्व गावकऱ्यांना दिसून येत आहे. येवढेच नाही तर याच रस्त्याला लागून सा. बां. विभागाकडून देखील १० लाखाचा निधी देवून अश्याच प्रकारचे नित्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने केवळ विकासाच्या नावाने देखावे केल्याचे आरोप गावकरी बोलून दाखवत होते. यावेळी आमदार संजय देरकर यांच्या कारवाईने नायक पीचर्स मधील ज्या प्रमाणे अनिल कपूर हे अभिनेते काम करायचे तीच अनुभूत आमदार संजय देरकरांमध्ये गावकऱ्यांना दिसून येत होती.