Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगल तोड; सामान्य शेतकऱ्यांना बसतोय फटका, वन विभागाचे...

कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगल तोड; सामान्य शेतकऱ्यांना बसतोय फटका, वन विभागाचे दुर्लक्ष

 

News Today 

तालुका प्रतिनिधी : मंगेश गोरे

तालुक्यातील मुंड्रा शिवार ते चिलई या भागात एका खासगी कंपनीने मोठ्या प्रमाणात जमीन विकत घेतल्याने आणि जंगलतोड सुरू केल्याने स्थानिक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कंपनी सुरू होणार असल्याच्या आमिषाखाली काही शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीन खरेदी करण्यात आली असून, या साऱ्या प्रक्रियेस ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सदर जमीन माईन्स के के गौरव गोयल माईन्स या नावाने घेतली गेली असून, संबंधितांनी आपल्या मनमानी पद्धतीने कारभार सुरू केल्याचे समजते. या जंगलतोडीमुळे परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होत असून, उंदीर, नीलगाय, रानडुक्कर, माकडे यांसारखी वन्यप्राणी शेतात येत आहेत. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.

तसेच, कंपनीच्या कामामुळे गावाकडे जाणारे रस्ते खराब झाले असून, दळणवळणाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter