Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणीतील खाजगी कंपन्यांत ८०% स्थानिकांना रोजगार द्या; कामगारांना धमकावाल तर खबरदार  —...

वणीतील खाजगी कंपन्यांत ८०% स्थानिकांना रोजगार द्या; कामगारांना धमकावाल तर खबरदार  — कॉ. अनिल हेपट

News Today 

वणी :-  वणी विधानसभा मतदारसंघातील खासगी कोळसा, सिमेंट आणि इतर उद्योगांमध्ये 80% स्थानिक युवकांना नोकरी देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) तर्फे जोरदारपणे करण्यात आली आहे.

या मागणीसाठी स्थानिक भूमीहिन शेतकरी व युवकांनी कॉ. अनिल हेपट यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला दिवाळीसारख्या सणाच्या काळातही मोठा जनसमर्थन मिळत आहे.

भाकपने बेलोरा-निलजई परिसरातील जिएनआर व साईडएक्स कंपन्यांमध्ये शेती गमावलेल्या भूमीपुत्रांना रोजगार देण्याची वारंवार मागणी केली होती.

मात्र कंपन्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर रोजी ठिया आंदोलन, १७ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको, तसेच १८ व १९ ऑक्टोबर रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले.भाकपने शासनाच्या १८ नोव्हेंबर २००८ च्या आदेशाचा दाखला देत सांगितले की, स्थानिक युवकांना ८०% प्राधान्याने रोजगार देणे कंपन्यांना बंधनकारक आहे. तरीदेखील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) निलजई प्रकल्पासह ठेकेदार कंपन्या हा नियम पाळत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.

कॉ. अनिल हेपट यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करत स्पष्ट इशारा दिला की, आंदोलनकर्त्यांना धमकावण्याचा किंवा दडपशाहीचा प्रयत्न झाल्यास भाकपचे लाल सैनिक योग्य पद्धतीने उत्तर देतील. “कंपन्यांनी मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा गुन्हे दाखल करा; पण आमचा लढा थांबवणार नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.दरम्यान, साईडएक्स कंपनीकडून आंदोलन दडपण्यासाठी स्थानिकांना धमकावण्याचा प्रकार समोर आल्याचा गंभीर आरोप उभा राहिला आहे.

“कंपनीच्या दबावामुळे परिसरातील शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन मात्र मौन बाळगत आहे,” असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.कॉ. अनिल हेपट, कॉ. अनिल घाटे, कॉ. मोरेश्वर कुंटलवार आणि कॉ. अथर्व निवडींग यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन “स्थानिकांना रोजगार द्या, बाहेरच्यांचा हस्तक्षेप थांबवा” या घोषणांनी ऊर्जित आहे.

भाकपने स्पष्ट इशारा दिला आहे की, स्थानिक युवकांना न्याय मिळेपर्यंत आणि बेकायदेशीर ठेक्यांवर कारवाई होईपर्यंत हा संघर्ष अखंड सुरू राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter