
News Today
वणी (प्रतिनिधी) – चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशी (ता. कोरपना), पिंपरी (ता. भद्रावती) व स्वीट कोसारा (ता. वरोरा) या घाटांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा व तस्करी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नुकतेच हर्रास करण्यात आलेले घाट असूनही, घाट धारक नदीच्या पात्रात प्रोक्लेमअधीन यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

वरील वाळू घाटावरून वणी (जि. यवतमाळ) येथे येण्यासाठी केवळ २ तासापेक्षा कमी कालावधी लागतो, या वाळूच्या प्रवासासाठी एकाच वाहनावर दिवसातून तब्बल ८ ते १० ट्रिप लावण्यात येत असल्याचे उघडकीस येत आहे. वाली भरून निघालेल्या वाहनाला नाशिक जिल्ह्यातील वणी येथे पोहचण्यासाठी २४ तास कालावधीनदेवून ते वाळूचे वाहन वणी जि. यवतमाळ येथे खाली करून लगेच घाटावर जावून वारंवार वाळू भरून खाली करीत आहे. विशेष म्हणजे, या सर्व ट्रिप ‘नाशिक वणी’ येथून निघाल्याचे दर्शवणाऱ्या Online टिपी दाखवून वाहतूक सुरू आहे.
हे सर्व वाळू वाहतूक करणारे वाहननाना नियमानुसार GPRS प्रणाली लावणे अनिवार्य आहे. आणि सर्व वाळूच्या टिपी online असल्याने त्या वाहनांचे GPRS तपासणे गरजेचे झाले आहे. दररोज एकाच परवान्यावर ८ ते १० ट्रिप वाळू उपसा करीत असूनही, त्यांच्या हालचालींची कोणतीही पडताळणी प्रशासनाकडून होत नाही, ही बाब अधिकच संशयास्पद आहे. वणी शहरासाठी येणाऱ्या काही वाहनांच्या टिपीवर २ तास तर काही वाहनांच्या टिप्यावर २४ तास वेळ नमूद आहे. २४ तास नमूद आलेल्या वाहनांच्या टिप्यावर वारंवार वाळूच्या ट्रिपा मारल्या जात आहे.

यासंदर्भात चंद्रपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाईची भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. यात तपासण्यासाठी महत्वाचे खाली मुद्देनिहाय चौकशीची गरज निर्माण झाली आहे.
१. सर्व वाहनांचे GPRS डेटा तपासून त्यांच्या प्रत्यक्ष ट्रिप व वेळांची पडताळणी करण्यात यावी.
२. नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर तातडीने बंदी आणावी.
३. हर्रास झालेले घाट असूनही सुरू असलेल्या उपशावर कठोर कारवाई करण्यात यावी.
४. Online टिपीचा गैरवापर रोखण्यासाठी ती प्रणाली अधिक पारदर्शक करण्यात यावी.

या वाळू तस्करीमुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असून, पर्यावरणाचा ऱ्हासही वेगाने होत आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.



