Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedअबब...१५ एकर शेतीवर मिळते १०० कोटीचे कर्ज! फक्त अट एकच तुम्ही आमदार...

अबब…१५ एकर शेतीवर मिळते १०० कोटीचे कर्ज! फक्त अट एकच तुम्ही आमदार आहात का? भाजप आमदार दाम्पत्यावर ‘मेगा लोन’चा वाद वाचा सविस्तर वृत्त

News Today 

नागपूर – भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य आमदार डॉ. परिनय फुके आणि त्यांची पत्नी परिणीता फुके यांच्या नावावर केवळ १५ एकर शेतीवर तब्बल १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. आ. फुके हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात.

कॅनरा बँकेच्या नागपूर शाखेने हे कर्ज ५ मार्च २०२४ रोजी मंजूर केले असून उद्देश “शेती विकास प्रकल्प” असा नमूद करण्यात आला आहे. मात्र या रकमेचा वापर व्यावसायिक उद्देशासाठी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मौजा रनाळा तालुका कामठी येथील सर्व्हे नंबर १२९/१/१/४४ आणि १२९/१/१/६४ मधील एकूण ६.०७ हेक्टर (१५ एकर) जमीन परिणीता फुके यांच्यासह इतर काही लोकांच्या प्रमुख मालकीची असून सातबारा उताऱ्यात परिनय आणि परिणीता फुके या दोघांची नावे नोंद आहेत. या जमिनीचे एन. ए. प्लॉट करून हे कर्ज घेतल्याची माहिती आहे. परंतु खरच हे प्लॉट या किमती आहे का? हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कारण, सामान्य शेतकऱ्यांना एवढ्याच क्षेत्रावर केवळ ५० ते ७५ लाख रुपयांचे कर्जही मंजूर होत नाही, तर सत्ताधाऱ्यांना थेट कोट्यवधींची सवलत मिळते, असा रोष व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांचं म्हणणं कामठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना “ना हरकत प्रमाणपत्र”, “भांडवल पुरावा” अशा विविध कारणांनी बँकांकडून कर्ज नाकारले जाते. शेतकरी संघटनांचे नेते सांगतात, “१५ एकर शेतीवर आम्हाला २० लाखांचं कर्जही मिळत नाही, पण MLC साहेबांना १०० कोटी! हे अन्यायकारक आहे.”

राजकीय वाद निर्माणया घटनेवर विरोधकांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी “सत्तेचा उघड दुरुपयोग” असा आरोप करत तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर #FukeLoanScam हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला असून ग्रामीण भागात या प्रकरणावरून संताप उसळला आहे.प्रशासनाने घ्यावी दखलराज्यात सुमारे १० लाख शेतकरी आजही कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यापैकी केवळ ३० टक्क्यांना कर्ज मंजूरी होते, अशी अधिकृत आकडेवारी सांगते. 

अशा वेळी सत्ताधाऱ्यांना १५ एकरवर १०० कोटींचे कर्ज मिळाल्याने बँकिंग व्यवस्थेतील असमानता समोर आली आहे.शेतकरी संघटनांनी सरकारकडे या प्रकरणाची चौकशी, पारदर्शकता आणि समान कर्जनियमांची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभरात शेतकरी मोर्चाचे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना असे भाजपाच्या आमदारांचे प्रकरण उघडकीस येत असल्याने मतदारांमध्ये मोठी नाराजीचे सूर उमटत आहे. 

बघा व्हिडिओ.

https://www.instagram.com/reel/DQVrX8ECIHj/?igsh=ZmdzcmR0emQwemxr

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter