
रवी मानव यांनी विचारला खुला प्रश्न ? बघा व्हिडिओ
News Today
चंद्रपूर :- जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या अड्याळ टेकडीची जागा व त्यावरील असलेल्या बांधकामावर अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने बेकायदेशीर आपला ताबा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमास चंद्रपूर पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांना पाचारण करण्यात आले असता हजारो गुरुदेव सेवकांनी संतप्त होऊन पालकमंत्र्यांचा संपूर्ण ताफा तारीख २१ रोजी दुपारी ३ वाजता अद्याड टेकडीच्या पायथ्याशी अडविण्यात आला यावेळी गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी खुला प्रश्न विचारून सर्वांचे लक्ष वेधले होते.

तुकाराम दादा गीताचार्य यांचे कार्य पाहून शासनाची जमीन मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकार वापरून भुवैकुंठ समिती घड्याळ टेकडीच्या नावाने दिली होती. अशाप्रकारे शासकीय जमिनीचा हस्तांतरण करण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यालाच असतात. असे असताना ब्रह्मपुरी तहसीलदार सतीश मासाळ यांनी सदर जमिनीचे सातबारावर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नाव चढवून बेकायदेशीरपणे हस्तांतरण घडवून आणले आहे.

यामुळे संतप्त झालेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या हजारो कार्यकर्त्यांनी अचानक पालकमंत्र्यांचा ताफा रोखला. यावेळी आत्मानुसंधान टेकडी भू वैकुंठ समितीचे संचालक सुबोध दादा, सेवकरामजी मिलमिले, रवी मानव, दिलीप भोयर, ज्ञानेश्वर रक्षक, मिलिंद पाटील, रामदास पखाले, मंगेश गोरे, रेखाताई बुराडे, लालचंद नखाते, कवडू वडस्कर इत्यादी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

उघडा लिंक बघा व्हिडिओ



