ग्राहकांच्या अधिकाराचे सर्रास उलंघन, वाचा ग्राहकांचे अधिकार
News Today
वणी :- येथील वीज वितरण कंपनी कडून मनमर्जीने मनमानी कारभार सुरू असून ग्राहकांना मिळणाऱ्या वीज पुरवठ्यासाठी किमान सेवा मानके अधिकाराचे सर्रास उलंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा रोष निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
महाराष्ट्र शासन व वीज वितरण कंपनी कडून वीज ग्राहकांना विविध अधिकार प्राप्त आहेत. तरी देखील वणी उपविभागातील ग्राहकांना अधिकाऱ्यांच्या मनमर्जीचा सामना करावा लागत आहे. वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून ग्राहकांना मिळणाऱ्या अधिकारांना पायदळी तूडविल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या भावनेचा उद्रेक होण्याची शक्यता वाढली आहे.
वीज ग्राहकांना मिळणारे अधिकारी वितरण परवानाधारकांकडून वीज पुरवठ्यासाठी किमान सेवा मानके मिळणे, वितरण परवानाधारकांनी कार्यप्रदर्शन मानकांनुसार सर्व ग्राहकांना २४ x ७ वीज पुरवठा करणे, नवी जोडणी आणि सध्याच्या जोडणीत सुधारणा करण्याचा हक्क वीज देयके आणि भरणा याबाबतची माहिती मिळणे, पुरवठ्याची विश्वसनीयता मिळणे, नुकसान भरपाईसाठी यंत्रणा मिळणे, ग्राहक सेवेसाठी कॉल सेंटर मिळणे, तक्रार निवारण यंत्रणा मिळणे तसेच वीज बंद करायची असल्यास ग्राहकांना एक दिवस किंवा काही तासापूर्वी पूर्व सूचना देऊन वीज पुरवठा खंडित करणे अनिवार्य आहे. असे विविध अधिकार ग्राहकांना प्रधान आहे.
परंतु यातील कोणत्याही अधिकाराची पूर्तता वीज वितरण कंपनी कडून केल्या जात नाही उलट मनमानी पणाने अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार वीज खंडीत करण्याचा प्रकार येथील कार्यालयाचे माध्यमातून केल्या जात आहे. ग्राहकांनी अधिकाऱ्यांच्या संवाद साधला असता बेजबदारीचे उत्तरे देण्यात येत आहे.
अश्या बेशिस्तपणे कारभार चालवित असलेल्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्याची रीतसर चौकशी करून उचित कारवाई अपेक्षित असल्याची भावना वीज वितरणाचे ग्राहक भावना व्यक्त करीत आहे.
सकाळच्या वेळी विज खंडित
सकाळच्या वेळी सर्व ग्राहकांना विजेची नितांत गरज असतात परंतु अशावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी कोणतीही पूर्व सूचना न देता वीज बंद करून आपले कामे काढत असतात. खरे तर नियमानुसार ग्राहकांना पूर्व सूचना देऊन वीज खंडीत करायला पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांना दुपारच्यावेळी आपले कामे करण्याला आळस येत असल्याने ग्राहकांच्या अधिकाराचे उलंघन करून सोयीनुसार कामे केल्या जात असल्याचे आरोप होत आहे.
इथे करा तक्रार
कनिष्ठ अभियंता कार्यालयातील तक्रार निवारण कक्षात आपली रजिस्टरवर नोंदविण्याची सुविधा असते. किंवा याठिकाणी जाणे शक्य नसल्यास कनिष्ठ अभियंता यांचा मोबाईल क्रमांक 8208318185 यावर तक्रार करू शकतात यांनी तक्रार घेण्यास कुचराई केली तर उपविभागीय अभियंता यांचे मोबाईल क्रमांक 7875315448 यांचेकडे संपर्क साधून तक्रार करू शकता यांच्याकडूनही समाधान न झाल्यास कार्यकारी अभियंता पांढरकवडा यांचेकडे त्यांचा मोबाईल 7875763022 यावर संपर्क साधून आपली समस्या मांडू शकता यांचे मोबाईल हे २४ तास ग्राहकांच्या सेवेत सुरू असतात यांनी तक्रार ऐकली नाही किंवा यांनी मोबाईल उचलला नाही तर अधीक्षक अधीक्षक अभियंता यवतमाळ यांच्याकडे त्याचा मोबाईल क्रमांक 7875763555 यावर आपली तक्रार नोंदवू शकतात तसेच वीज वितरण कंपनीच्या ऑनलाइन वेबसाइड वर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतात.