News Today
वणी :- तालुक्यातील चनाखा येथील कुटुंबातील कर्त्या शेतकरी पुत्राची शेतात विष प्राशन करून तारीख २३ रोजी सकाळी ९ वाजता आपली जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना घडली आहे. अतुल मारोती डाखरे वय ३२ असे या आत्महत्याग्रस्त यवकाचे नाव आहे.
त्यांचे प्रच्छात पत्नी, एक मुलगी, वृद्ध आई वडील असा अप्त परिवार आहे. मृतक हा शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत होता. मागील तीन वर्षांपासून शेतमाला भाव मिळत नसल्याने शेती करणे त्याला अवघड झाले होते. त्यामुळे कुटुंब चालवायचे तरी कसे असा प्रश्न त्याला पडू लागले होते. याच विवंचनेत त्याने शेतात विष प्राषन केले व आपली आत्महत्या केली. या घटनेने शेतकऱ्यांचे जीवन जगणे अत्यंत कठीण झाले असून सरकारने शेतमालाच्या भावाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या आत्महत्या वाढतील अशी स्थिती निर्माण होत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
.