

News Today
वणी नगर परिषदेच्या निवडणुकीची सरगर्मी वाढत असतानाच, काही तथाकथित पत्रकार आता आपल्या सवर्ण मानसिकतेच्या पिंजर्यातून बाहेर पडू न शकल्याने कमळाबाईचे पाय चाटत फिरताना दिसत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जनतेचा विश्वास असतो, पण काही पत्रकारांनी तोच स्तंभ बाजारात विकायला काढल्यागत वर्तन सुरू केले आहे.

विधानसभेतील पराभव अजूनही गळ्याखाली न उतरणाऱ्या काही सवर्ण गटांतील लोकांनी आता “पत्रकार” या आडव्या नावाखाली एका विशिष्ट पक्षाला वाचविण्याची मोहीम उघडपणे चालवली आहे. तांत्रिक कारणे, आकडेमोडीचे खेळ आणि अर्धवट सत्य मांडून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

लोकशाहीला पोसणारे माध्यम आता एका पक्षाच्या पिंजऱ्यात अडकले असून वास्तविक मुद्द्यांपासून दूर जाऊन केवळ प्रचाराचे पोस्टी लिहिण्याचे काम सुरु झाले आहे. जनतेचा आवाज आज मुळात विकला जात आहे — आणि हेच भयावह आहे.

सजग मतदारांनी या जातीयवादी आणि पक्षपाती पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. कारण पत्रकारितेचा उद्देश जनतेला माहिती देणे आहे, गोंधळ घालणे नाही.

अश्या चाटूगिरी करणाऱ्या एका पत्रकाराला देखील मराठी अस्मिता जागवणाऱ्या एका राजकीय नेत्याने त्याला घरी जाऊन चोप दिला होता. या घटनेचे मळभ दूर सारत नाही तोच नांदेपरा चौफुली येथे एका आंबट शौकाच्या प्रकरणातून चार ते पाच राजूर येथील तरुणांनी बेधून बदळले होते. या प्रकरणाचे व्हिडिओ क्लिप हाती लागले आहे. तसेच मुकुटबन रोडवरील ९८ एकराच्या जमिनीच्या गौळ बंगाल लवकरच जनतेला वाचण्यासाठी मिळणार आहे.



