News Today
वणी (जि. यवतमाळ) – नागपूर येथून दिनांक २ ऑगस्टपासून निघालेल्या मंडल यात्रेचे आयोजन मंडल दिन (७ ऑगस्ट) निमित्ताने करण्यात आले असून ही यात्रा विदर्भातील सात जिल्ह्यांतून जात आहे. या यात्रेचा भाग म्हणून दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही यात्रा ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जनजागृती करत आहे. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
जातनिहाय जनगणना तात्काळ घ्यावी.
महाज्योती संस्थेला ₹१००० कोटींचा निधी मिळावा.
प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी भवन उभारण्यात यावे.
७२ वस्तीगृहे लवकर सुरू करावीत.
५०० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती द्यावी.
नोकरभरतीतील कंत्राटीकरण व खाजगीकरण थांबवावे.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
१००% शिष्यवृत्ती सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळावी.
एक लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग तात्काळ भरावा.
सर्व नागरिकांनी या जाहीर सभेला आणि यात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना समिती, वणी, मारेगाव, झरी यांच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मोहन हरडे यांनी केले आहे.



