News Today
वणी : केदारनाथ यात्रेहून परतणाऱ्या भाविकांचे हेलिकॉप्टर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौंरीकुंड परिसरात आज तारीख १५ जून रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका केवळ २३ महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे. या बालिकेसह तिचे आई वडील हे वणीतील कुटुंब असल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान व कमी दृश्यमानता (visibility) असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत व शोधकार्य तातडीने सुरू करण्यात आले.
मृतांमध्ये समाविष्ट प्रवासी:
कॅप्टन राजबीर सिंह चौहान (पायलट, जयपूर), विक्रम रावत (बीकेटीसी कर्मचारी, रासी, उखीमठ), विनोद देवी (उत्तर प्रदेश, वय ६६ वर्ष), तृष्टी सिंह (उत्तर प्रदेश, वय १९ वर्ष), राजकुमार सुरेश जायसवाल (गुजरात, वय ४१ वर्ष), श्रद्धा राजकुमार जायसवाल (महाराष्ट्र), काशी जायसवाल (महाराष्ट्र, वय २३ महिने) विशेष म्हणजे, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्य (राजकुमार, श्रद्धा आणि काशी जायसवाल) होते. हे कुटुंब वणी जिल्हा यवतमाळ येथील आहे. अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यात्रेच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आमदार संजय देरकारांकडून शौक व्यक्त
वरील घटनेची माहिती मिळताच वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी शौक संवेदना व्यक्त करून मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली व जयस्वाल कुटुंबियांवर पडलेल्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली यावेळी सौ. किरण देरकर उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, भगवान मोहिते, आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



