Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedचारगाव (शिरपूर) घाटावर वाळू सत्याग्रह आंदोलनाची घोषणा; भाजप नेत्यांचा सरकारविरोधी एल्गार

चारगाव (शिरपूर) घाटावर वाळू सत्याग्रह आंदोलनाची घोषणा; भाजप नेत्यांचा सरकारविरोधी एल्गार

News Today 

वणी (प्रतिनिधी) – “गरिबांच्या हक्काचे वाळू राजकारणाच्या गटारात जाऊ देणार नाही,” अशा ज्वलंत भावना व्यक्त करत वणी तालुक्यातील चारगाव (शिरपूर) घाटावर वाळू सत्याग्रह आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन दिनांक १५ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, याचे नेतृत्व भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर करणार आहेत. पिदुरकर ही स्वतः भाजपाचे पदाधिकारी असून चक्क सरकारच्या विरोधात आंदोलन करीत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

विरोधकांच्या आंदोलनांनी सरकारची गोची होणे अपेक्षित असते, पण यावेळी विशेष बाब म्हणजे केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या सरकारविरोधात भाजपच्याच नेत्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिकच गाजण्याची शक्यता आहे.

वाळू धोरण गरिबांसाठी संकट निर्माण करणारे

सध्याचे वाळू उत्खनन धोरण गरिबांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठरत असून, स्थानिकांना व घरबांधणी करणाऱ्या गरीब कुटुंबांना मोठा फटका बसत आहे. गावपातळीवर वाळू सहज उपलब्ध नसल्याने सामान्य जनतेला अवाजवी दराने वाळू खरेदी करावी लागत आहे, तर दुसरीकडे दलालांचे राजकारण फोफावले आहे.

सरकारच्या भूमिकेवरच भाजप नेत्यांचा सवाल

माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी थेट सरकारलाच जबाबदार धरत, “गरिबांची कामं थांबली, भ्रष्टाचाराने बळ मिळवले, आणि वाळू माफियांना पाठबळ मिळतंय. हे आम्ही चालू देणार नाही,” असा रोखठोक इशारा दिला आहे.

राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ

सत्ताधाऱ्यांच्याच गोटातील नेत्यांनी सरकारविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकप्रकारे खळबळ माजली आहे. १५ मे रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हे आंदोलन फक्त वाळू प्रश्नापुरते मर्यादित राहते की अन्य मुद्द्यांनाही गती मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सत्तेत असूनही विरोधाची भूमिका घेणं हे भाजपचं दुटप्पी – संजय निखाडे जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा गट 

सत्तेत असूनही विरोधाची भूमिका घेणं हे भाजपचं दुटप्पी राजकारण दर्शवतं,” अशी परखड प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी दिली. त्यांनी म्हटलं की, “केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपकडून जनतेला दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाळू धोरणावर स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आंदोलनाचा दिखावा केला जातोय.”

निखाडे पुढे म्हणाले, “जर निर्णय घेण्याची क्षमता नसती तर भाजपने सत्तेवर राहण्याचा नैतिक हक्क गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी हे असं आंदोलन केलं जातंय, हे दुर्दैवी आहे.”

ही प्रतिक्रिया भाजपच्या धोरणांवर व कृतीवर कठोर सवाल उपस्थित करत असून, सत्ताधाऱ्यांची जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती निखाडे यांनी स्पष्टपणे उघड केली आहे.

वाळूच्या आंदोलनात टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार – दिलीप भोयर अध्यक्ष , वणी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट

वणी तालुक्यात वाळूच्या नावाखाली सुरु असलेलं राजकारण हे केवळ जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. काहीजण वाळू आंदोलनाच्या आडून केवळ टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे मुद्दे बाजूला ठेवून स्वार्थ साधण्याचा हा प्रकार जनतेला माहीत आहे. वाळूची धोरण हे सरकार ठरवत असतात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांना माहीत आहे. की घरकुलासाठी वाळू गरजेची आहे. तरी देखील गरीबांना वाळू न मिळण्यासाठी यांनी धोरणे आखली आहे. आणि हे आंदोलन जर करत असेल तर सरकार आहे कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

करायचेच असेल तर मुख्यमंत्र्यांचा आणि पालक मंत्र्यांचा निषेध करून आंदोलन कराव आम्ही सोबत राहू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी व्यक्त केली. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter