
News Today
शिरजगाव: येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे अर्थात गुरु शिष्य जयंती सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते मा रवी मानव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर मुख्य वक्ते म्हणून मा.मनोज अंबाडकर होते. तर शिरजगाव मोझरी चे सरपंच निरंजन भाऊ कडू, सौ शारदाताई देवघरे पोलीस पाटील शिरसगाव, सौ उमाताई अंबलकर क्रांती दोन क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, दीपक राव तिखे क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हा महासचिव, डॉ.छायाताई मानव, डॉ. सुधाकर डेहनकर, किरण खवले प्रफुल्ल उमाप आदींची उपस्थिती होती.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे मी पूल असे साहित्य निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केलेले आहे. त्यांचाच वसा पुढे चालू येत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना भारताच्या संविधानामध्ये स्थान देऊन त्याला संविधानिक दर्जा बहाल करून घेण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. या दोन्ही महापुरुषांनी देशावर अनन्य साधारण उपकार केले असल्याची भावना मनोज अंबाडकर यांनी आपल्या प्रबोधनातून बोलताना व्यक्त केली.

यानंतर रवी मानव यांचे अध्यक्ष भाषण पार पडले अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयवाद या सर्व विषयावर चौफेर प्रबोधन करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व प्रकारच्या शोषणाचे कारण हे अविद्या आहे म्हणून आपण विद्या घेऊन विद्यावंत व्हावे असा विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला आणि शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत आणली परंतु आज जिल्हा परिषदेच्या शाळा झपाट्याने बंद होत आहे याकडे अर्थसंकल्पामध्ये कुठलीही विशेष तरतूद करण्यात येत नाही ज्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असे झालेले आहे अशी खंत यावेळी रवि मानव यांनी व्यक्त केली .

या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी कष्ट घेतले. महात्मा फुले उत्सव समिती- अध्यक्ष- अक्षय पाचघरे, उपाध्यक्ष- नवीन जळीत, सचिव- ऋषिकेश गाडगे, सहसचिव – सागर बेले, कोषाध्यक्ष – प्रणव पाचघरे, संघटक- सागर होले, सहसंघटक- महेश अडसड, कु.यशस्वी खेरडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – राणी कडू, क्षितिजा गाडगे.सर्व सदस्य गण, समस्त गावकरी मंडळी जय ज्योती जय क्रांती व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




