News Today
वणी :- दिनांक 18 फेब्रुवारीला यवतमाळ येथे एकता सिकलसेल असोसिएशन व निस्वार्थ सेवा फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या “मातोश्री प्रतिक्षाालय ” येथे सिकलसेल जनजागृती शिबिर संपन्न करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जया रामटेके,उद्घाटक अधिष्ठाता डाॅ. गिरीश जतकर, वैद्यकिय अधीक्षक डाॅ. सुरेंद्र भुयार , मार्गदर्शक विभाग प्रमुख( मेडिसिन) डाॅ. बाबा येलके व डाॅ. गणेश जाधव तसेचअरुण घनमोडे संचालक, जविसेस, प्रीती नगराळे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
डाॅ. सुरेंद्र भुयार प्रमुख मार्गदर्शक यांनी सिकलसेल रुग्णांनी सिकलसेल रुग्णा सोबत विवाह करू नये. निरोगी व्यक्तीने सिकलसेल व्यक्ती सोबत विवाह करावा. ज्यामुळे पुढील पिढीत सिकलसेल आजार टाळता येईल. डाॅ. बाबा येलके सर व डाॅ. गणेश जाधव सर यानी रुग्ण रुग्णाला योग्य उपचाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. , अरुण घनमोडे यांनी पिण्याचे शुद्ध पाण्याचे महत्व उपस्थितांना विविध उदाहरण सह समजाऊन सांगितले. पिण्याच्या पाण्या पासून होणारे 80% आजाराला जागृतीमुळे नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हे प्रत्येकाच्या हातात आहे.
तसेच वैयक्तीक स्वच्छता, परिसर स्वच्छता, जीवनसत्त्व चे आहारात मोलाचे योगदान. या विषया वर भर देण्यात आला. ज्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी करता येते. असे मोलाचे मार्गदर्शन अरुण घनमोडे यांनी उपस्थितांना केले. तसेच प्रीती नगराळे यांनी सिकलसेलग्रस्त रुग्णांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणुन गजभिये सर लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भुषन घनमोडे यांनी तर प्रास्ताविक अमित लभाने व आभार प्रदर्शन बादल बांबोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परशुराम कडू, करण गेडाम,ज्योती राठोड, प्रांजली मडावी तसेच चमूने अथक परिश्रमपूर्वक सहकार्य केले. सिकलसेल रुग्णांना मदत करण्यासाठी आणि यवतमाळमधील स्थितीबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दिशेने हे जनजागृती शिबिर एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.