१६ वर्षानंतर गाठली ऑल इंडिया फेरी,
राजूर कॉ. येथील मो. अरमान यांची उत्तम कामगिर
News Today
वणी :- आंतरविद्यापीठ स्पर्धेत डी ग्रुपमध्ये पाच विद्यापीठांचा पराभव करीत अमरावती विद्यापीठ क्रिकेट संघ चॅम्पियन्स ठरला आहे. २०१६ नंतर प्रथमच अमरावती विद्यापीठ संघ दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
दरम्यान, राजस्थानातील कोटा येथे झालेल्या आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात अमरावती विद्यापीठाने विक्रांत युनिर्व्हसिटी गुजरात संघाचा ६ गड्यांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आत्मीय विद्यापीठ गुजरात संघाचा ९ गड्यांनी पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात होळकर युनिर्व्हसिटी सोलापूर संघाचा १० धावांनी पराभव केला. तर चवथा सामना रविंद्रनाथ टागोर विद्यापीठाचा १० गड्यांनी पराभव करीत झोनची अंतिम फेरी गाठली.
याफेरीत अहिल्यादेवी युनिव्हसिटी इंदोर संघाचा ७ गड्यांनी पराभव करीत, डी झोनमधून चॅम्पियनशिप प्राप्त करत ऑलइंडिया फेरी गाठली. या स्पर्धेत सलग पाच विद्यापीठांचा पराभव करण्यात अमरावती संघाला मोठे यश आले. यामध्ये आदित्य आहुजा याने पाच सामन्यात २८५ धावा करीत, ‘बेस्ट बॅस्टमनचा खिताब पटकाविला तर कर्णधार आकाश राऊत याने सर्वाधिक १२ गडी बाद केले व मोहम्मद अरमान याने १० गडी बाद केले.
असा आहे विजेता संघ !
आकाश राऊत (कर्णधार), रिंकू चिकारा (उपकर्णधार),मो. अरमान,आदित्य आहुजा, सिद्धांत मुळे, विशेष तिवारी, श्रीयोग पवार, यजवान गाढवे, अर्जुन इंगळे, मल्हार शिकरे, आर्यन लाड, भावेष बोपटे, आदित्य लहाने, अद्वैत राऊत, ओम राजपूत आणि शुभम तिवारी यांचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक डॉ. विवेक कपिले तर संघ व्यवस्थापक संकेत निंभोरकर यांनी काम पाहिले.