News Today (वृत्त संस्था)
उज्जैन – दशहरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक नवा वाद पेटला आहे. स्थानिक ब्राह्मण समाजाकडून यावर्षी रावण दहनाला जोरदार विरोध नोंदवला जात आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रावणाचा पुतळा जाळणे थांबवण्याची मागणी करत समाजाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जर ही प्रथा बंद न केल्यास हायकोर्टात दाद मागण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

अखिल भारतीय युवा ब्राह्मण समाज व महाकाल सेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी “रावण दहन बंद करा” अशी मागणी करणारी पोस्टर्स लावली. दशहरा मैदानावर कार्यकर्त्यांनी रावणाच्या पुतळ्याजवळ जाऊन काळ्या मटक्या फोडल्या व आयोजकांच्या विवेकबुद्धीसाठी प्रार्थना केली.

समाजाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, “रामायणात रावण दहनाची परंपरा आढळत नाही. रावण हा विद्वान, शिवभक्त आणि ग्रंथांचा रचयिता होता. त्यामुळे त्याचा पुतळा जाळणे म्हणजे ब्राह्मण समाजाचा अपमान आहे.” आयोजकांनी ही परंपरा केवळ करमणूक व राजकीय प्रचारासाठी वापरणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्राह्मण समाजाने आयोजकांना आठ शास्त्राधारित प्रश्न विचारून स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्हिडिओ येथे पाहता येते.h
इंग्लिश भास्कर वरील वृत्त
फेसबुकवरील रिल बघण्यासाठी इथे क्लिक करा.👇



